राजकीय
वीस वर्षांपूर्वी राजकारणात स्वतःला सिद्ध करण्यासाठी वेगळे झालेले “त्रिदेव”, पुन्हा आंबेगावच्या आसमंतात एकत्रित झळकणार

लोकसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत. तशीच राजकारणामध्ये वेगाने बदल घडत आहेत. देशाच्या व राज्याच्या राजकारणात जशी नवीन समीकरणे दररोज उदयास येत आहेत. तसेच आंबेगाव तालुक्याच्या राजकारणामध्ये एक जुनेच समीकरण नव्याने जुळले आहे. याला योगायोग म्हणावा कि, ऐकमेतील निस्वार्थी आत्मिक प्रेम त्यामुळे आज तालुक्यातील “थ्री ,डी” (दादा म्हणजेच शिवाजीराव आढळराव, दिलीप वळसे पाटील, देवेंद्र शाह ) हे तीन मित्र पुन्हा एकत्र येत आहेत.

ज्या राजकारणाने २००३ साली यांना एकमेकांपासून दूर केले तेच राजकारण यांना एकत्र आणीत आहे. हा विधीचा खेळच अजब आहे निसर्गातील कोणतीच गोष्ट विनाकारण होत नाही व घडते तेही चांगल्या साठीच घडते असे म्हणतात . कुणीतरी म्हटलेच आहे दुनिया गोल आहे. सकाळी अन्नासाठी उडालेली पाखरं संध्याकाळी एकत्र तसेच काहीसे घडत आहे. या तिघां जीवलग मित्रांच्या मनोमिलनामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर हसू…. तर अनेकांच्या डोळ्यात आसू…… हि स्थिती पहावयास मिळणार, मात्र हे नियतीचे गणित अनेकांच्या दृष्टीने अनाकलनीय असले. तरी पुढील काळात याची उत्तरे मिळतील यासाठी वाट पाहावी लागणार आहे.

गेली वीस वर्षांपूर्वी एकदिलाने राहणारी राजकारणात एकत्रित काम करणारी, शिवाजीराव आढळराव उर्फ दादा, प्रसिद्ध उद्योगपती देवेंद्र शाह, तसेच राज्याचे सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील या तीन मित्रात अनेक अकलनिय ,अनाकलनीय कारणामुळे मतभेद निर्माण होऊन दरी निर्माण झाली होती. यासही राजकारण जबाबदार असल्याचे त्याकाळातील तालुक्याच्या राजकारणात समावेश असलेल्या अनेक कार्यकर्त्यांचे मत आहे. राजकारणात स्वतःला सिद्धकारण्याच्या दृष्टीने घेतलेले निर्णयाने तिघे तब्बल वीस वर्षे वेगळे राहिले तरी त्यांच्या मनाच्या कोपऱ्यात खोलवर रुजलेल्या अविरत घट्ट मैत्रीच्या धाग्यामुळे, निसर्गाने पुन्हा 20 वर्षांनंतर राजकारणाच्या पटलावर अशी स्थिती निर्माण केली की, आज हे मित्र पुन्हा एकत्र येत आहेंत.

एकेकाळी दिलीप वळसे पाटलांच्या मागे सावली सारखे उभे राहणारे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी “होय मी नाराज आहे” असे म्हणत वळसे पाटील यांची साथ सोडुन स्वतः ला राजकारणात सिद्ध करण्यासाठी त्यांनी मंचर (ता आंबेगाव) येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. छत्रपती शिवाजी महाराजाप्रमाणे शिवनेरीच्या कुशीतून निवडून येऊन शिवसेनेचा भगवा दिल्लीच्या तक्तावर रोवण्याचा शब्द दिला व तो एकदा नाही तर तीनदा पूर्ण हि केला.

त्यावेळी पासून शिवसेनेचा जिल्ह्याचा गड सांभाळत, शिवाजीराव आढळराव यांनी पश्चिम महाराष्ट्रात स्वतः ला सिद्धहि केले. व तब्बल तीन पंचवार्षिक निवडणुकातून दिल्लीच्या संसदेत जनतेचे प्रश्न मांडत राहिले. व जनहिताच्या अनेक प्रश्नांची सक्षमपणे सोडवणूक करून मतदार संघाच नव्हे, तर राज्यातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्नही केले. तेव्हापासून आज पर्यंत तब्बल वीस वर्षे हे वळसे पाटील व शिवाजीराव आढळराव हे दोन मित्र, कट्टर राजकीय शत्रू होऊन आपआपले व आपल्या पक्षाचे अस्तित्व टिकविण्यासाठी व त्यातून जिल्यातील जनतेची सेवा करण्यासाठी झटत होते.
गेल्या वीस वर्षाच्या पूर्वी निर्माण झालेल्या वेगवेगळ्या प्रगतीच्या वाटांमध्ये तिघेही यशस्वी झाले. दिलीप वळसे पाटलांनी राज्याच्या राजकारणात आपला प्रभाव निर्माण करीत अनेक मंत्री पदे सांभाळत सक्षम राजकीय वाटचाल केली तसेच शिवाजीराव आढळराव पाटील यांनी स्वताची वेगळी वाट निवडून स्वतःच्या कर्तृत्वाने तब्बल तीनवेळा विरोधकांना धूळ चारत देशाच्या राजकारणात यशस्वी धडक दिली तर देवेंद्र शाह यांनी आपल्या उद्योग क्षेत्रात नवनिर्मिती करत सर्व साधारण दूध संकलन केंद्र सुरु करून त्याचे रूपांतर एका सार्वजनिक क्षेत्रातील प्रतिष्ठित कंपनीत केले आज जगाच्या बाजार पेठेत गोवर्धन कंपनीने आपला नावलौकिक व दबदबा निर्माण केला आहे. देवेंद्र शाह यांनी यशस्वी उद्योजक होऊन औद्योगिक क्षेत्रातील अवकाशाला कावेत आणण्यासाठी गरुड झेप घेत यशस्वी गगन भरारी मारली व हे तिन्हींनी मित्र आपआपल्या क्षेत्रात स्वतः ची योग्यता सिद्ध करण्यात आज यशस्वी झाले. हाच यांच्या सचोटीचा धडा पुढील नवयुवकांसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरेल.
राज्याच्या व देशाच्या राजकारणात झालेले अनपेक्षित बदल मात्र आंबेगाव कारणांसाठी सुवर्ण पर्वणीच ठरणार आहे. यात काही शंका नाही कारण वीस वर्षांपूर्वी एकत्रित पणे पाहिलेली स्वप्ने या तीन दिग्गजाच्या एकत्र येण्याने पूर्ण होणार अशी अपेक्षा जुने जाणकार बोलून दाखवत आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती मध्ये आपल्या जीवनाची वाटचाल करताना जीवनात अनेक प्रकारच्या धक्का तंत्राचे हलाहल विष पचवत हे ” त्रिदेव” ऐकत्र येत असल्याने आंबेगाव तालुक्यात नव्हे तर पुणे जिल्याच्या राजकारणातही खूप बदल दिसून येतील यात शंका नाही
शिरूर लोकसभेची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली असून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. वळसे पाटलाचा राजकीय गाडा अभ्यास, व म्हणतात ना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सर्व नियोजन अमित शाह पहातात तसेच आंबेगाव मध्ये हि देवेंद्र शाह यांचे नियोजन जे भल्या भल्याची भंबेरी उडवून देणार, यात कोण्या जोतिष्याची गरज नाही. असो राजकारणामुळे वीस वर्षाच्या पूर्वी वेगवेगळे झालेले तीन जिवलग मित्र पुन्हा राजकारणाच्या गणितामुळेच पुन्हा एकत्र येत आहेत. मनाच्या तारा जुळत आहेत त्यातून मैत्रीच्या अनाभाकांची गीते पुन्हा नव्याने सर्वाना ऐकावयास मिळतील या सारखे सूंदर ते काय ? असेल
देशासाठी लोकसभेची निवडणूक काहीही निकाल देवो, परंतु आंबेगाव तालुक्यातील जनतेच्या मनात निकाल आजच लागला आहे. काळरात्र संपून तालुक्यात पुन्हा विकासाची एकोप्याची समृद्धतेची पहाट झाली असे म्हणावयास काही हरकत नाही.
राजकीय
हे कार्यकर्ते… “खरंच जनहितार्थी कि लाभार्थी”?

मंचर दि (प्रतिनिधी)राज्याच्या राजकारणात वळसे पाटलांना स्थान मिळाले नाही म्हणून वळसे पाटलांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी पक्ष नेतृत्वाकडे कोणतीही दाद मागण्या ऐवजी .आपल्या नेत्यावर अन्याय होऊनही निमूटपणे मूग गिळून गप्प बसणारे हे कार्यकर्ते वर्षानुवर्षे सत्तेचा लाडू चाखत असूनही जेव्हा नेत्यावर अन्याय अन्याय होतो. तरीही गप्प असतील तर ते खरंच जनहितार्थी लाभार्थी कि, स्वार्थी ?

राज्याच्या राजकारणात गेली पस्तीस वर्षे असणारे एकेकाळचे शरद पवार यांचे खंदे समर्थक दिलीप वळसे पाटील यांना यावर्षी मात्र राज्य मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नाही खऱ्या अर्थाने राज्याच्या उत्कर्षांसाठी नियोजनबद्ध काम करणाऱ्या व्यक्तीला महाराष्ट्र मुकाला असे म्हणावायास हरकत नाही कारण वळसे पाटलांनी ज्या खात्याचे काम पाहिले त्या खात्याचा कारभार उत्तम पप्रकारे करून खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील जनतेला न्याय दिला असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
या वेळी मात्र महायुतीच्या काळात त्यांना मंत्री मंडळातून डावळण्यात आले यामागे कोणतीही व काहीहि कारणे असतील. परंतु महाराष्ट राज्य एका चांगल्या व्यक्तीला प्रभावी व्यक्तिमहत्वाला मुकला हेही खरेच. वळसे पाटलांनी त्यांच्या कारकिर्दीत ज्या खात्याचे काम पाहिलं त्या खात्याची प्रगती झाली आहे इतिहास आहे. अशा कर्तृत्वान व्यक्तीला बाजूला ठेवणे हे पक्ष नेतृत्वाचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल.

दरम्यान राज्य मंत्रिमंडळ विस्तारात माजी मंत्री छगन भुजबळ यांचे नाव नाही म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र डोक्यावर घेतला ओ बि सी वर अन्याय झाला. असे सांगत पक्ष नेतृत्वावर आगपाखाड केली व आपण काहीही करू शकतो हे दाखवत पक्ष नेतृत्वाच्या निर्णयाचा निषेध केला व जोडे मारो आंदोलन करून धिक्कार हि अनेक कार्यकर्त्यांनी केला.परंतु आंबेगाव तालुक्यात मात्र वळसे पाठलांच्या कार्यकर्त्यांकडून साधा निषेधही नोंदवीला गेला नाही.
आंबेगाव,जुन्नर, खेड, शिरूर तालुक्यात वळसे पाटलांचे शेकडो कार्यकर्ते आहेत.परंतु वळसे पाटलांची मंत्री पदी वर्णी लागली नाही. यावर कार्यकर्त्याकडून मंत्रिपदच्या मागणीसाठी प्रचंड हल्लाबोल होणं गरजेचं होत. परंतु यावर बोलण्याचे धारिष्टय कोणत्याही कार्यकर्त्यामध्ये नाही. याचाच अर्थ वळसे पाटलांनी जे कार्यकर्ते जपले त्या कार्यकर्त्यांची भूमिका फक्त “टी फॉर टॅट” अशीच होती कि काय? असा प्रश्न विचाराला जातं आहे.
गेली अनेक वर्ष ते वळसेपाटलांच्या सोबत राहून समोर आल्यावर फक्त ” देखल्या देवाला दंडवत” घालत फक्त सत्तेचा मलिदा चाखणारे लाभार्थी कार्यकर्ते वळसे पाटलांजवळ होते हि सांगण्यासाठी कोण्या जोतिष्याची आवश्यकता नसावी. कारण वळसे पाटलांना डावलले जातं असताना त्यांच्या बाजूने खंबीर भूमिका घेत रस्त्यावर येण्याचे धाडस एकाही कार्यकर्त्यांने दाखविले नाही किंवा या लाभार्थी कार्यकर्त्यांना वळसे पाटलांना मंत्री पदापासुन डावळून त्याच्यावर अन्याय केला जातं आहे. असेही वाटले नाही. किंवा त्यांची बाजू पक्ष नेर्तृत्वासमोर मांडण्याची हिंम्मतहि कोण्या कार्यकर्त्यांची झाली नाही हि मोठी शोकांतिका आहे.
दरम्यान काल झालेल्या आभार मेळाव्यात एकमेकांची उणी दुनी काढून आपण किती समर्थक हे दाखविण्याची जणू स्पर्धाच सुरु होती. परंतु त्यात साहेबांवर पक्ष नेतृत्वाने अन्याय केला असून त्यावर पक्ष नेतृत्वाला जाब विचारावा असा साधा मुद्दाही कोणी मांडला नाही. खरंतर वळसे पाटलांना याची खंत नक्कीच असेल पण काय करणार? एकही कार्यकर्ता काहीच बोलला नाही यावरून असेच दिसते कि, साहेबांना मिळालेले बहुतांशी कार्यकर्ते फक्त जनहितार्थी नसून लाभार्थी आहेत का? अशा आशयाची चर्चा सर्वत्र सुरु आहे.
राजकीय
माजी खासदार शिवाजीराव आढळराव ठरताहेत? “किंगमेकर”

मंचर दि. (प्रतिनिधी) लोकसभेतील पराभवाचा वचपा काढत, खासदार अमोल कोल्हे यांचा शिरूरलोकसभा मतदार संघावर आपली एकहाती वर्चस्व निर्माण करण्याच्या संकल्पचा “अश्व” रोखून धरत,माजी खासदार शिवाजीराव आढळराव हे किंग मेकर ठरले असल्याची चर्चा सर्वत्र आहे.

विधानसभेची रणधुमाळी संपली, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले महायुतीत आनंदी आनंद साजरा होत असताना मात्र विधानसभा काळात शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे यांनी फोडलेल्या गगनभेदी डरकाळ्या पराभवाच्या गर्तेत शांत झाल्या या लोकसभा मतदार संघात विजयाची पताका फडकविणारे शिरूर लोकसभेचे खासदार व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे स्टार प्रचारक अमोल कोल्हे यांचे पश्चिम महाराष्ट्राचा ओ बी सी चा नेता होण्याचे स्वप्न मात्र धुळीलाच मिळाले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

मागील दोन लोकसभा निवडणुकीत माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांना पराजयाची धूळ चारणारे तसेच प्रती संभाजी म्हणून आपली प्रतिमा मालिकांच्या माध्यमातून तयार करून सर्वसामान्य जनतेच्या गळ्यातील ताईत झालेले, खासदार अमोल कोल्हे यांना यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी विधानसभेच्या रणांगणात मात देली व विधान सभेत आपल्याच विचाराचे लोकप्रतिनिधी विजयी करून शिरूर लोकसभेवर आपला वरचष्मा असल्याचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी दाखवून दिले असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.

लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर खासदार आढळराव थोडे बॅक फूट वर गेले होते. त्यांचे राजकारण मर्यादीत झाले. अशा अशयाच्या चर्चा देखील सर्वत्र झाल्या.परंतु नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत खासदार शिवाजीराव आढळराव यांनी प्रचंड कष्ट घेत आंबेगाव,शिरूर, भोसरी,जुन्नर व हडपसर येथे आपल्या विचाराचे प्रतिनिधी निवडून आणून खासदार कोल्हे यांना चांगलाच झटका दिला असल्याचे बोलले जाते.

दरम्यान जुन्नर, हडपसर, आंबेगाव भोसरी हे मतदार संघ विधानसभेत विरोधात जाणे म्हणजे कोल्हे यांच्या पुढील राजकीय वाटचालीच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे. असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यात कोल्हे यांना मतदारांनी लोकसभा मतदार संघात निवडून येताना जेव्हढी मते पडली त्या पेक्षा सुमारे दोन लाख कमी मते विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या वेळी आघाडीच्या उमेदवारांना मतदान झालेले आहे.

दरम्यान राज्याचे तात्कालीन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी दिलेली जबाबदारी माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी सार्थ करीत आपल्या विचाराचे उमेदवार निवडून आणले आहेत तर पुढील काळात खासदार कोल्हे यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी केलेल्या विविध घोषणा पूर्ण करणे करणे गरजेचे आहे. त्यात इंद्रायणी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, भोसरी ते खेड रस्ता या दोन गोष्टी उत्तर पुणे जिल्यातील मतदारांच्या दृष्टीने महत्वाच्या घोषणा आहेत. या घोषणा बाबत खासदार कोल्हे यांनी जागरूक राहून हि कामे युद्ध पातळीवर करणे त्यांच्या राजकीय सौख्याचे दृष्टीने गरजेचे आहे. परंतु केंद्रात व राज्यात विरोधी विचार सरणीचे सरकार असताना खासदार कोल्हे हे महत्व कांक्षी प्रकल्प कसे पूर्ण करणार? व शिरूरच्या जनतेला कसा? न्याय मिळवून देणार हे पहाणे कुतूहलचे ठरणार आहे.
राजकीय
“राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे फोटो शासकीय कार्यालयात लावावेत”:जेष्ठ नेते अशोक काळे यांची प्रशासनाकडे मागणी

मंचर दि(प्रतिनिधी) सत्य अहिंसा व शांततेचा भारताला नव्हे तर जगाला संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे फोटो व संदेश सर्व शासकीय नियमशासकीय कार्यालयांमध्ये त्वरित लावावे या मागणीचे निवेदन तहसीलदार आंबेगाव यांना काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोक आप्पा काळे पाटील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विजयराव आढारी यांनी दिले आहे.

जगाला शांततेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे फोटो सध्या तालुक्यामध्ये संपूर्ण शासकीय निमशासकीय कार्यालयात दिसत नाहीत गेले काही काळापासुन सर्व संस्थांमध्ये जगाला शांततेचा संदेश देणारे राष्ट्रपुरुष महात्मा गांधी यांचे फोटो व संदेश होते परंतु हे फोटो व संदेश काही दिवसापासून काही शासकीय कार्यालयांमधून हटवले गेलेले आहेत किंवा काढले गेलेले निदर्शनास येत आहे असे काळे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान सर्व शासकीय नियम शासकीय कार्यालयांमध्ये महात्मा गांधीजींचे फोटो व संदेश लावावे जावेत असे आवाहन केले असून या प्रसंगी पाटणचे उपसरपंच कुंडलिक कुंडलिक असवले त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य दगडू मते सुनील शेळके रामदास मते गणेश खानदेशी बाळासाहेब इंदोरे बंटी मोरडे आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
यासंदर्भातल्या निवेदनाच्या प्रती राष्ट्रपती द्रोपदी मुर्दौ राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते व काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे महाराष्ट्राचे राज्यपाल त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनाही पाठवले असून देशपातळीवरती व राज्य पातळीवरती या संदर्भामध्ये तातडीने कार्यवाही करावी व त्या दृष्टीने शासनाकडे पाठपुरावा करावा अशी विनंती ही संबंधित निवेदनामध्ये केलेले आहे.
दरम्यान याबाबत तालुका पातळीवर डिसेंबर अखेर कार्यवाही न झाल्यास राज्यघटनेनुसार परमपूज्य गांधींनी आखून दिलेल्या मार्गानुसार राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते ज्या शासकीय कार्यालयामध्ये परमपूज्य गांधीजींचा फोटो नसेल त्या ठिकाणी आंदोलन करण्याचा मानस व्यक्त केलेला आहे या संदर्भात पो स्टेशन घोडेगाव ग्रामीणरुग्णालया घोडेगाव रजिस्टर आँफीस प्रकल्प कार्यालय यांना निवेदन देण्यात आले आहे.
-
राजकीय1 year ago
“टायगर इज बॅक” शिरुर लोकसभेच्या मैदानात खळबळ माजणार..!
-
राजकीय7 months ago
वळसे पाटील यांना मोठा धक्का : शरद बँकेचे संचालक जयसिंग थोरात यांचा शरद पवार गटात जाहीर प्रवेश
-
राजकीय1 year ago
आयात उमेदवारांपेक्षा निष्ठावंतांना संधी द्या; उद्योगपती देवेंद्र शहा यांच्या नावाची शिरूर लोकसभेसाठी चर्चा…….
-
राजकीय7 months ago
आंबेगाव मध्ये महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर : निवडणुकीत सहभाग न घेण्याचा शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचा निर्णय
-
राजकीय1 year ago
अढळरावांनी, वळसे पाटलांची भेट घेऊन केली चौकशी
-
राजकीय10 months ago
भोसरी विधानसभा क्षेत्रातील असंख्य नाराज कार्यकर्ते भाजपाला ठोकणार रामराम: उबाठा सेनेत करणार प्रवेश?
-
सामाजिक1 year ago
“माणसात देव शोधत, सर्वसामान्यांच्या हितासाठी प्रयत्नशील राहणारा, माणसातील “देवमाणूस”….
-
शैक्षणिक11 months ago
घोडेगाव इंग्लिश मेडीयम स्कुलच्या “बालचमुंचा रंगला, अनोखा बालदिंडी सोहळा”