Connect with us

शैक्षणिक

ऑलिम्पिक ॲथलेटिक्स स्पर्धेत “देविकाने” द्वितीय तर “पृथ्वीराजने ” तिसरा क्रमांक पटकावीत मिळविले नेत्रदीपक यश…

Published

on

घोडेगाव दि. (प्रतिनिधी) येथील न्यू इंग्लिश मेडीयम स्कुल च्या विद्यार्थ्यांनी ऑलम्पिक ॲथेटीक्स स्पर्धेत विविध खेळात भाग घेऊन या उपक्रमात नेत्रदीपक यश मिळविले.

सकाळ समूहामार्फत सनस ग्राउंड पुणे येथे घेण्यात आलेल्या स्कूल ऑलिम्पिक ॲथलेटिक्स स्पर्धेत घोडेगाव(ता. आंबेगाव ) येथील न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल, विद्यालयातील विद्यार्थिनी देविका संदीप काळे हिने थाळीफेक खेळात  द्वितीय क्रमांक मिळवला तर येथील विद्यार्थी  पृथ्वीराज जितेंद्र खोसे इयत्ता 10 वी याने भलाफेक खेळात  तृतीय क्रमांक मिळवला.

दरम्यान विद्यार्थ्यांनी विविध खेळात नेत्रदीपक कामगिरी केल्याबद्दल  आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळचे अध्यक्ष उपाध्यक्ष व  सर्व संचालक मंडळ व ग्रामस्थांनी तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंदाने विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

शैक्षणिक

जागतिक युवा दिनानिमित्त घोडेगाव येथे  “उद्योजकता प्रेरणा कार्यक्रम” संपन्न….

Published

on

घोडेगाव दि (प्रतिनिधी) पासून जवळच असलेल्या  गोणवडी (ता.आंबेगाव) येथे क्रांतिकारी होन्याजी केंगले शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, घोडेगाव (गोनवडी) आयोजित जागतिक युवा दिनानिमित्त “उद्योजकता प्रेरणा कार्यक्रम” पुणे जिल्हा परिषदेचे मा.उपाध्यक्ष मा.विवेकदादा वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

जागतिक युवा दिनांनिमित्त घोडेगाव  येथील आय टी आय येथे  औद्योगिक प्रेरणा कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले.यावेळी आयोजित कार्यक्रन्मात व्यवसाय उद्योगाच्या निर्मितीसाठी तसेच वाढीसंदर्भात विविध माहिती देण्यात आली.

दरम्यान यावेळी शिरुर लोकसभा राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष सचिनभाऊ भोर, माजी उपसभापती संतोषशेठ भोर, बाजार समिती संचालक सोमनाथ काळे, हेमंत केंगले (अध्यक्ष, स्मारक प्रतिष्ठान),श्री विलास कडलग (मा.अध्यक्ष जुन्नर रोटरी क्लब), राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले सुनिल गिरंगे विलास केंगले सुरेश केंगले मारुती केंगले भिमा केंगले किसन शेळके नामदेव भोकटे श्री निलेश पोखरकर (सहाय्यक शास्रज्ञ, आयुका केंद्र गिरवली), प्राचार्य, शिक्षक तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

Continue Reading

शैक्षणिक

मंचरच्या महात्मा गांधी विद्यालयात संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी साजरी!!!  

Published

on

मंचरदि (प्रतिनिधी) आपल्या कृतीतून जण माणसाला स्वच्छतेचा संदेश देणारे व कीर्तनाच्या माध्यमातून अंधश्रद्धेवरती परिवर्तनाच्या व प्रबोधनाच्या आसूडाचे जोरदार फटके मारणारे थोर संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यात आले. रयत शिक्षण संस्थेचे, महात्मा गांधी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मंचर येथे श्री संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांच्या  प्रतिमेचे पूजन विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका सुरेखा भांगरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पर्यवेक्षक यादव चासकर, डॉ.मनाली बाणखेले,अशरफ पठाण आदी मान्यवर उपस्थित होते. 

दरम्यान यावेळी आपले मत व्यक्त करताना प्राचार्य सुरेखा भांबरे यांनी सांगितले कि संत गाडगे महाराज यांचे विचार आपण प्रत्यक्ष जीवनामध्ये अमलात आणले  पाहिजेत असे मत व्यक्त करीत सर्वांनी प्लास्टिकचा वापर टाळला पाहिजे, आपला परिसर स्वच्छ राहील याची काळजी घेतली पाहिजे; आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे,असे केले तरच गाडगे महाराजांचे विचार खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात आणले जातील असे मत विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका भांगरे यांनी मांडले.

दरम्यान संत गाडगे बाबांचा आणि कर्मवीर भाऊराव पाटलांचा खूप जवळचा स्नेह होता याची आठवणही भांबरे यांनी करून दिली यावेळी आदिबा आतार, माईजा तिरंदाज, गौरी जगताप, अपेक्षा लोंढे, हर्षदा निघोट,आर्या कंधारे, साक्षी देवकर,हिना खान आदी विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणांमधून संत गाडगे महाराज यांचे विचार मांडले.

यावेळी .कार्यक्रमाचे नियोजन प्रियंका गवळी,प्रलय गावंड, दत्तात्रेय चासकर,संतोष मुंढे,किसन थोरात,मारुती बोराडे यांनी केले.दिलीप चौधरी यांनी फलक लेखन केले.सूत्रसंचालन महिमा रोडे हिने केले तर प्रांजल बढे या विद्यार्थिनीने आभार मानले.

Continue Reading

शैक्षणिक

महात्मा गांधी विद्यालयात विद्यार्थिनीकडून “ग्रंथ दिंडी” सोहळ्याचे उत्साहात आयोजन…..

Published

on

मंचर दि (प्रतिनिधी) पुस्तके माणसाच्या जीवनातील महत्वाचे स्थान आहे ग्रंथामुळे माणसाला नवनवीन ज्ञान मिळून त्याच्या जीवनास  नवी दिशा मिळते त्यामुळे “ग्रंथ हे गुरु आहेत” असे प्रतिपादन महात्मा महात्मा गांधी विद्यालय चे प्राचार्य उत्तम आवारी यांनी केले 

दरम्यान या ग्रंथ दिंडीमध्ये  छत्रपती शिवाजी महाराज, शाहू,फुले,आंबेडकर अशा अनेक  समाजसुधारकांचे जीवन चरित्र, सुविचार संग्रह,सरदार वल्लभभाई पटेल,सार्थ ज्ञानेश्वरी आदी अध्यात्मिक पुस्तके सजवलेल्या पालखीमध्ये ठेवण्यात आले. पुस्तकांचे यावेळी प्राचार्य उत्तम आवारी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले

त्याचप्रमाणे या प्रसंगी पुढे बोलताना प्राचार्य आवारी म्हणाले कि, ग्रंथ हेच गुरु या उक्तीप्रमाणे पुस्तके आपल्याला ज्ञान देत असतात आपली बुद्धी विकसित पावते व यामुळे जीवनाला एक नवी दिशा मिळते म्हणून ग्रंथांचे महत्व आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण आहे अशी माहिती प्राचार्य उत्तम आवारी यांनी दिली. ग्रंथपाल कैलास तातळे,प्रवीण कानडे,संतोष मुंढे यांनी नियोजन केले.

Continue Reading
Advertisement

Trending