Connect with us

शेतीशिवार

पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवरही येऊ शकते आत्महत्येची वेळ, यासाठी सर्वांनी एकत्रित लढा उभारण्याची गरज – शेतकरी नेते सुरेश नवले (अवहेलना दूध उत्पादकांची भाग- १)

Published

on

अकोले (प्रतिनिधी) :-  शेतकरी बांधवांच्या हातात खेळते भांडवल उपलब्ध करून देणारा मुख्य जोडधंदा म्हणून ओळखला जाणाऱ्या दूध व्यवसायात दिवसेंदिवस दुधाचे खरेदीचे दार कमी होत असल्याने या व्यवसायात वाढत चाललेल्या प्रचंड तोट्याने दूध व्यवसायिक शेतकरी देशोधडीला लागला असून यासाठी बळीराजाने एल्गार पुकारण्याची गरज निर्माण झाली आहे.

       आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी  हाताला हक्काचा रोजगार मिळवून देणारा व्यवसाय म्हणून दूध धंद्याची ओळख, म्हणून शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी मिळत नाही. म्हणून उच्च शिक्षित तरुण दूध व्यावसायात आले विविध बँकांतून कर्ज काढून पंजाब सारख्या विविध राज्यांतील गाई  विकत घेऊन त्यांनी दुध धंद्याला सुरुवात केली.

 सध्या दुधाला प्रति लिटर ३.५ (सिग्धांश) व ८.५ (एस. एन.एफ.)ला २६/- रुपये किंवा त्यापेक्षा ही कमी भाव असल्याची चर्चा अनेक शेतकरी करीत आहेत. परंतु हेच दूध शहरी भागात मात्र प्रतिलिटर ५४/-दराने विकले जाते. म्हणजेच दूध डेअरीला प्रति लिटर २०/-ते२५/-रुपये निव्वळ नफा मिळत आहे. शासनाने कडक धोरण राबविल्यास डेअरी सुद्धा कमीत कमी १०/- ते १५/- रुपये प्रतिलिटर भाव वाढवून देऊ शकते यासाठी कोणत्याही शासकीय अनुदानाची गरजही नाही परंतु राज्यकर्ते यांच्या अनास्थेपोटी बळीराजावर वाईट दिवस आले असल्याचे दिसत आहे.

आज उन्हाळी परीस्थिती असल्याने  दुग्धजन्य पदार्थांचा खप प्रचंड प्रमाणावर वाढलेला आहे. तरी देखील  दुधाचे दर दिवसेंदिवस कमी होत आहेत. मात्र विविध दूध कंपन्यांकडून शहरी भागात विकल्या जाणाऱ्या दुधाचा व दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीचा दर मात्र कमी झाला नाही. त्यामुळे डेअरी उद्योग मात्र नफा कमविण्यात व्यस्त आहे. उलट पक्षी मात्र  दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक दृष्टया कंबरडे मोडले जात आहे.

      दरम्यान महाराष्ट्र सरकारने मोठा गाजावाजा करत फेब्रुवारी महिन्यात  पाच रूपये अनुदानाची मोठी घोषणा केली. परंतु ही योजना म्हणजे फुसका फटाकाच ठरला असल्याचे दिसते. कारण यात बहुतांशी दुध उत्पादक शेतकऱ्यांना  अद्यापही प्रति लिटर पाच रुपये अनुदानच मिळालेलेच नाही.तर  या अनुदानासाठी शासनाने लागू केलेल्या विविध जाचक  अटी आणि शर्थी मुळे शेतकरी प्रचंड प्रमाणावर भरडला गेला असल्याचे दिसत आहे.

 दरम्यान प्रत्यक्षात मात्र ही योजना म्हणजे “बोलाचीच कढी”,अन “बोलाचाच भात” या म्हणी पेक्षा वेगळी नसावी. शासनाने केलेली अनुदानाची घोषणा म्हणजे शेतकऱयांची केलेली फसवणूकच आहे अशी चर्चा सूरु झाली आहे. सर्वच राजकिय पक्ष व त्यांचे कथाकथित नेते देश आणि राज्य काबीज करण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे कोणालाही शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी साधा वेळही नाही असे दिसत आहे.

 सर्व स्तरावर बळीराज्याच्या कुठल्याही शेती पिकाला भाव नसल्याने शेतकरी आर्थिक दृष्ट्या मेटाकुटीला आला असून ,बाजार भाव नाही. व शेतमाल व दुधाला भाव नसल्याने दिवसेंदिवस वाढणाऱ्या कर्जाच्या बोजामुळे, पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱयांची अवस्था  विदर्भ, मराठवाड्यात राहणाऱ्या शेतकऱ्यांसारखी झाली असून, पुढील काळात होणाऱ्या शेतकरी आत्महत्यांचे लोन सधन समजल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील बागायती पट्ट्यात येऊन शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढेल की काय?अशी भिती व्यक्त केली जात आहे.

 दरम्यान डेअरी उद्योग जसा संघटीत आहे. तसा शेतकरी मात्र दुध उत्पादक,ऊस उत्पादक, भाजीपाला उत्पादक शेतकरी असा विभागला गेला आहे.म्हणुन सफेद दुधावर पोसलेल्या या सफेद कपड्यातील काळ्या बोक्यांचे फावले आहे. या साठी राज्यात शेतकऱ्यांचा भव्य एल्गार ऊभा करणे अपेक्षित आहे. यासाठी सर्व शेतकरी नेते व दुध उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र यावे असे आवाहन शेतकरी नेते सुरेश नवले यांनी केले आहे.

(क्रमशः- A 2 दुधाच्या नावाखाली ग्राहकांची होत आहे फसवणूक ,पुढील भागात)

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

शेतीशिवार

आंबेगाव तालुक्याचे आदिवासी गावात “बिबट्याचे” वाढते हल्ले :नागरिकांत प्रचंड भीतीचे वातावरण 

Published

on

मंचर दि (प्रतिनिधी)-आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात बिबटयाचा संचार वाढला असून जांभोरी (ता आंबेगाव) येथे भागुजी रामजी केंगले या शेतकऱ्याची शेळी बिबट्याने फस्त केली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान  आदिवासी भागात पाणी टंचाई असल्याने महिला वर्गाला दूरवरून जंगल रस्त्याने पाणी डोक्यावर घेऊन दोन ते पाच किलोमीटर पायापीट करावी लागते.त्याचप्रमाणे वाडी वस्तीवर राहणारी लहान लहान शाळकरी मुले गावाच्या ठिकाणी तीन ते पाच कि मी पर्यंत पायापीट करून दररोज शाळेला येत असतात. तसेच आदिवासी गाव वाड्यावरील शेतकऱ्यांचे हिरडा हे मुख्य पीक असल्यामुळे हिरडा काढण्यासाठी अरण्यात जावे लागते.  हा सर्व भाग दाट झाडीचा असल्याने जंगलात कड्या कपारीत  किंवा दाट झाडीतून बिबड्या सारखे हिंस्त्र प्राणी वाटेल दबा धरून बसू शकतात त्यामुळे जीव मुठीत धरूनच येथील नागरिकांना ये – जा करावी लागते.

त्याचप्रमाणे तालुक्याच्या पूर्व भागाप्रमाणे पश्चिम आदिवासी भागातील पाळीव जणावरांवर दररोज बिबट्याचे हल्ले होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आदिवासी भागातील जांभोरी  गावातील शेतकरी भागूची केंगले यांच्या मृत शेळीचा पंचांनामा करून त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पश्चिम विभाग युवा नेते मारुती केंगले यांनी केली आहे.

Continue Reading

शेतीशिवार

शेती व्यवसायाला, उद्योगाचे प्रगल्भ स्वरूप देणारा प्रतिभावंत “शेती उद्योजक”

Published

on

वळती दि. (विलास भोर यांजकडून) बिकट परिस्थितीतुन वाट काढत शेतीव्यावसाय करीत, स्वतः ची चाळीस व इतर तीस एकर शेती खंडाने घेऊन, आपल्या कुटुंबातील सर्व सभासदाना एकत्रित करून जिद्दीने, शेती व्यवसायात यशस्वी होण्याचे ध्येय उराशी बाळगत शेती व्यवसाय नव्हे तर शेती उद्योग उभा करणारा “मराठमोळा” सर्वसामान्य युवक शेती उद्योजक बनला हे नव्या पिढीतील शेतकरी युवकांना मार्गदर्शक ठरणारी यशोगाथा म्हणावी लागेल.

बाजारातील परिस्थितीचा नियमित अभ्यास, त्याचबरोबर योग्य नियोजन आणि प्रमाणिक पणे श्रम केल्यास शेती व्यवसा्यातही प्रगती करता येते “असे मत प्रगतशील शेतकरी धोंडिभाऊ भोर यांनी व्यक्त केले.


दरम्यान आज शेती व्यवसायात प्रचंड तोटा होत असल्याची तक्रार अनेक शेतकरी करीत आहेत. बाजारभाव नसल्याने शेती व्यवसाय परवडत नाही. अशी ओरड कायमच सर्वत्र ऐकावायास मिळते परंतु आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात एका युवकाने पंचवीस वर्षापूर्वी दुसऱ्या एका शेतकऱ्याची दोन एकर शेती खंडाने (अर्धलिन) घेऊन शेती व्यवसाय केला. आज पंचवीस वर्षानंतर हाच युवक एक प्रगतशील शेतकरी म्हणून उदयास आला असून प्रमाणिक कष्ठ, बाजारपेठेविषयचा अभ्यास व सुयोग्य नियोजन यामुळे आज भोर यांनी स्वतः ची चाळीस एकर जमीन खरेदी केली असून सुमारे तीस एकर जमीन, गाव व परिसरातील इतर शेतकऱ्याकडून खंडाने घेऊन शेती व्यवसाय नव्हे तर एक छोटीशी “शेती इंडस्ट्री” सुरु आहे. असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

त्याचप्रमाणे मराठी माणूस व्यवसायात मागे असल्याची अनेकवेळा तक्रार अनेक जण करतात. परंतु अनेकजण कोणत्याही व्यवसायाची सखोल माहिती न घेता व्यवसायात उडी घेतात व नंतर व्यवसायात आलेल्या चड उतारा मुळे वैफल्य ग्रस्त होऊन व्यवसाय बंद करतात. पण कोणताही व्यवसाय करताना त्या व्यवसायात येणाऱ्या अडचणी नीट लक्षात घेऊन तसेच बाजारपेठची मागणी व पुरवठ्याचे व्यवस्थित धोरण लक्षात घेऊन कोणताही व्यवसाय केला तर तो नक्की यशस्वी होतो.आज शेती व्यवसाय होऊ शकत नाही. कारण शेतीत काहीच परवडत नाही असे म्हणणाऱ्या अनेक शेतकऱ्यांसाठी, शेती व्यवसायात प्रचंड प्रगती करणारे धोंडीभाऊ भोर हे त्याचे सक्षम व योग्य उदाहरण आहेत असे म्हणावयास हरकत नाही.


दरम्यान भोर यांच्यासोबत चर्चा केली असता त्यांनी सांगितले कि, आपल्या घरातील सदस्य यांना विश्वासात घेऊन योग्य व आखनी करून त्यासोबत बाजार पेठेतील योग्य ज्ञान, पीक नियोजनाचा अभ्यास व व्यवस्थित नियोजन केल्यास शेती व्यवसाय हा तोट्यात जाऊ शकत नाही. भोर हे सत्तर एकर शेती करत असून त्यापैकी त्यांच्याकडे आजही तीस एकर शेती खंडाने आहे. या शेतीसाठी त्यांनी दोन एकरामध्ये शेततळे निर्माण केले असून नदीवरून पाईप लाईन करून तळ्यात पाणी आणून सोडले आहे.एखाद्या उद्योजकला लाजवील असा स्वतः चा सर्व सुखसोयी युक्त बंगला, घरासमोर विविध उच्च श्रेणीच्या गाड्या, हे सर्व निर्माण केले ते फक्त शेती व्यवसायातून, अनेकांच्या डोळ्यांत अंजन भरणारी हि भोर यांची कामगिरी आहे. त्यामुळे शेतीकडे व्यवस्थित लक्ष दिल्यास शेती उद्योगात कोणतीही व्यक्ती गरुडझेप घेऊ शकतो हेच भोर यांच्या या कर्तृत्वातून दिसून येते.

दरम्यान शेती उदयोग सुरु करताना त्यांना साथ मिळाली ती त्यांचे बंधू मोतीराम भोर यांची, दोन भावांनी एकत्रित विचार करून हे यशाचे ध्येय गाठले. आजही यांच्या या उद्योगात घरातील दहा सदस्य एकजुटीने पडेल ते काम करतात रोजंदारीने मानसे मिळोत अथवा न मिळोत आपला व्यवसाय प्रगती पथावर नेण्यासाठी कुटुंबा तील सर्व सदस्य अहोरात्र एकजूटीनेच काम करतात. आपलें पूर्वज एकत्रित कुटुंबं असावे याकरिता का? प्रयत्नशील राहत हे यातून दिसून येते. ज्या घरात एकत्रित कुटुंबं पद्धती आहे अशा घराचा उत्कर्ष झपाट्याने होतो हे देखील पुढील पिढीला एक शिकवण या कुटुंबाकडून मिळते असे म्हणवायास हरकत नाही.

Continue Reading

राजकीय

शिरुर मतदार संघातील बळीराज्याच्या व्यथा मांडण्यात कमकुवत ठरलेल्या,व मतदार संघात ५वर्षे  न फिरकणाऱ्या खा. अमोल कोल्हे यांना मतदार कौल देणार का?

Published

on

 ( शिरूरचा दावेदार कोण -भाग -3)

शिरूरचा गड जिकण्यासाठी सर्वच पक्ष ताकद पणाला लावत आहेत. महायुतीचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत.. तिकडे महा आधाडीचेही कार्यकर्ते काम करत आहेत. यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, व राज्याच्या केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्यावर करण्यात आलेल्या राजकीय आघाताने यांच्या बाबत  निर्माण झालेल्या सहानुभूतीचा फायदा घेत पुन्हा खासदारकीची निवडणूक लढवून संसदेत जाण्याचे दृष्टीने  डॉ अमोल कोल्हे आपले नशीब आजमावत आहेत.

 खासदार अमोल कोल्हे यानी प्रकाशित केलेल्या  आपल्या “विकास पर्व” या पत्रिकेतून अनेक लोकोभिमुख काम करण्याबाबत आश्वासनही दिले आहे. परंतु गेल्या पाच वर्षात ते मतदार संघात कुणाला भेटले अथवा दिसले सुद्धा नाहीत. अशी चर्चा नागरिक करीत असून डॉ. कोल्हेच्या या कृती बाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे मागील पाच वर्षात सर्व सामान्यांच्या मूलभूत प्रश्नांवर योग्य उत्तर शोधू न शकल्यामुळे विद्यमान खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या बाबत शिरूरचा मतदार काय निर्णय घेणार? लवकरच दिसणार आहे.

          गेल्या पाच वर्षात  कष्टकऱ्यांसह शेतकऱ्यांच्या व्यथा पाहण्याऐवजी पुन्हा खासदारकीची  दिवा स्वप्न पाहणाऱ्या अभिनेत्याला आपल्या चंदेरी दुनियेतून वेळ मिळाला म्हणूनच की काय?  मतदार संघातील सर्वसामान्य जनता  तब्बल पाच वर्षां नंतर  दिसली असावी, त्यामुळे पुन्हा चित्रपटातील चंदेरी दुनियेतील चंद्र निवडणुकीत पुन्हा  मतदानरुपी आशीर्वाद घेण्यासाठी उभा आहे.अशी टीका विरोधक करीत आहेत.

   शिरुर लोकसभा मतदार  संघात चाकण एमआयडीसी, शिक्रापूर एमआयडीसी, पिंपरी चिंचवड महानगर पालिका भाग त्याचा बरोबर अध्यात्मिक मध्ये श्री क्षेत्र भीमाशंकर, आळंदी, देहू, श्री क्षेत्र ओझर गणपती, श्री क्षेत्र रांजणगाव गणपती,श्री क्षेत्र लेण्याद्री,या समवेत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जन्म ठिकाण,धर्मवीर संभाजीराजे राजे यांचे स्मृती ठिकाण वडू तुळापूर  तसेच सुमारे 130 चौरस किलोमीटर परिसरात पसरलेले भीमाशंकर अभयारण्य या सारखी धार्मिक,ऐतिहासिक, नैसर्गिकरित्या संपन्न, स्थळे येथेच आहेत 

     शेतकरी वर्गाची होणारी पिळवणूक

 शिरूरच्या सर्वसामान्य जनतेच्या उत्पन्नाचे दृष्टीने महत्वाची औद्योगिक विकास क्षेत्र या ठिकाणी असून दऱ्या खोऱ्यानी नैसर्गिक साधन संपत्तीने परिपूर्ण या विभागातील  विविध समस्यांना येथील जनतेला सामोरे जावे लागते या भागात शेती व दुग्ध व्यवसायही हा शेतकरी वर्गाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे उत्पन्नाचे साधन आहे. रोजच्या दैनंदिन जीवनात केंद्र शासनाकडून घेतल्या जाणाऱ्या उदा.  दूध पावडर, कांदा,ऊसाची साखर, द्राक्षे आदी शेती उत्पादित मालाची निर्यात बंदी तसेच  खाते बी बियाणे, पशुखाद्य या बाबत कंपन्यांकडून होणारी प्रचंड दरवाढ याचा शेतकरी वर्गाच्या  आर्थिक जीवन पद्धतीवर प्रचंड प्रभाव पडतो. मागील वर्षी दुधाच्या किमतींमध्ये वाढ झाली. या काळात दुधाचे दर सुमारे ४० रुपयांपर्यंत पोहचले. त्यामुळे दूध व्यवसायात बळीराजाला दोन पैसे मिळुही शेतकऱयांच्या हाताला काही उरले नाही  याचे कारण यात एक घटना प्रामुख्याने घडली ती म्हणजे दुधाचे भाव जसे वाढत जात होते तशीच लगेच पशुखाद्य दरात वाढ होत होती. दुधाचा दर लिटरला एक रुपयाने वाढला की, पशूखाद्य दर किलो मागे दहा रुपयांनी वाढत होते. दरम्यानच्या काळात काही दिवसांनी दुधाचे दर लिटरला  २५ ते 2७ रुपयांवर आले  परंतु पशुखाद्याचे दर मात्र वाढलेलेच आहेत. अशा काळात केंद्रासरकार कडे  संसदेत बळीराज्याची बाजू मांडणारा हक्काचा खासदार हवा असतो .  परंतु त्यावेळी आदरणीय सांसदपट्टू शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याऎवजी आपल्या चंदेरी दुनियेत व्यस्त होते की काय? अशी चर्चा सुरू आहे.

  आजही शेत मालाचे भाव पडलेले आहेत. दुधाला भाव नाही बी बियाणे व पशुखाद्याचे भाव प्रचंड वाढलेले आहेत व शेतकरी वर्गाची मोठी आर्थिक कुचंबणा होत आहे. व विद्यमान लोकप्रतिनिधी यांची  या बाबत ठोस भूमिका नसल्यामुळे सर्वसामान्य जनतेचा पालनहार असलेल्या बळीराज्याची मोठी अवहेलना मागील पाच वर्षात झाली आहे. तर माजी खासदार शिवाजीराव आढळराव मागील वेळी निवडणुकीत पडूनही न खचता मतदार संघात काम करत राहिले असे म्हटले जाते त्यामुळे शिरूरची जनता कोणाच्या पारड्यात आपला मतदान रुपी आशीर्वाद टाकणार हे पाहावे लागणार आहे.

Continue Reading
Advertisement

Trending