सामाजिक
“माणसात देव शोधत, सर्वसामान्यांच्या हितासाठी प्रयत्नशील राहणारा, माणसातील “देवमाणूस”….

समाजसेवा ही मुळातच मनात असावी लागते , समाज्याविषयी असलेली तळमळ, ही समाज्यातील गरवंतांच्या व्यथा दूर करण्यासाठी मनात जिद्द निर्माण करते. या जिद्दीतूनच समाज हिताचे काम करण्याची उर्मी तयार होते. आपल्या परिसरातील लहानग्या चिमुरड्या मुलांना बागडण्यासाठी, छानसा बगीच्या निर्माण करणे अथवा गरजवंतासाठी स्वखर्चातून रुग्ण वाहिका उपलब्ध करण्याचे अनमोल कार्य उल्लेखनीय च म्हणावे लागेल.

आपण अनेकदा संस्कारांविषयी ऐकतो, संस्कार म्हणजे काय? मानवास निसर्गाने दिलेली ही एक अमूल्य देणगीच म्हणावी लागेल. जीवनामध्ये अनेक चढउतार येतात. तरीही अशा स्थितीत आपल्या कर्तव्यापासून तसूभरही न ढळता सक्षमपणे प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत जनहित साधण्यासाठीही संस्कार होणे गरजेचे आहे. व देणगीची आपल्या पूर्व पिढी तसेच सभोवताली असणाऱ्या आपल्या जवळच्या व्यक्तीं पासूनच निर्माण होते. म्हणूनच यात जिव्हाळा ग्रुप, रोटरी क्लब या संस्थातील सहकाऱयांचेही कार्य मोलाचे आहे.
समाज्याच्या हितासाठी काम करणारा आपल्या पायाला काटा टोचला असताना, त्यावर रडत न राहता समाज्यातील इतर घटकांना अशा वेदना होऊ नयेत. म्हणून इतरांच्या पायाखाली गालीच्या अंथरून दुःख दुर करून आनंद निर्माण करण्याचा प्रयन्त करणे. यालाही संस्कार म्हणावा लागेल. व हा संस्कार असाच मिळत नाही. तो पिढी दर पिढी आपल्या पूर्वजांकडून वारसात आलेला दिसतो. म्हणूनच लोक कल्याणासाठी काम करण्याची मनीषा असणे हाही एक पूर्वजांकडून आलेला संस्कारच म्हणावा लागेल. व हा संस्कार प्रत्येक पिढीला आपल्या मागील पिढीकडून मिळालेली देणगीच म्हणावी लागेल.
सामाजिक कार्यासाठी कार्यरत असलेल्या “अजयने”आपल्या जीवनात आलेल्या दुःखांची पर्वा न करता इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी समाजसेवेचे व्रतच घेतले असे म्हणावयास हरकत नाही. आपले दुःख बाजूला ठेवून इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यांचे काम अजय करत आहेत. सर्वसामान्यांची मुले बागेतील फुलासारखी सदैव आनंदात सुखात बहरात राहोत या साठी समाजसेवेचे व्रत हाती घेऊन मुलगा संस्कारच्या नावाने एक छोटीशी बाग निर्माण करून छोट्या छोट्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याचे काम अजय यांनी केले आहे
मंचरचे शहरात मनमिळावू व्यापारी असा नावलौकिक असलेले व सदैव सामाजिक कार्यात सहभागी राहणारे अजय घुले यांनी समाज सेवेच्या हेतून प्रेरीत होऊन समाज्यातील गरजवंत नागरीकांच्या मदतीकरिता सर्व सुविधासुक्त रुग्णवाहिकेचे लोकार्पण केले. मंचर व परिसरामध्ये या रुग्ण वाहिकेमुळे अनेक रुग्णांना आरोग्याच्या सुविधा मिळणार आहेत. कशाचीही अपेक्षा न करता समाज्यातील दिन दुबळ्या वर्गातील सर्वसामान्य व्यक्ती करिता आपल्या परिस्थितीनुसार शक्य ती मदत करण्याचा त्यांचा हा हेतू कौतुकास्पदच आहे असे म्हणावे लागेल.

अनेकजण आज एखादा रुपया खर्च करतानाही अनेक वेगवेगळी कारणे शोधात असतात. पण आपण समाज्याचा काहीतरी देणं लागतो. या हेतूने समाज्याच्या उन्नती साठी काम करणारी संस्कारक्षम अजेय हे या समाज्यात कार्यरत आहेत. समाज्याच्या व्यथा समजावून घेऊन त्यांना मदत करताना. प्रत्येक माणसामध्ये “देव” शोधणारा माणुसच सामाजिक उन्नतीच्या तळमळीने प्रेरित होऊन जातो. व समाजहिताचे कामासाठी झगडतो. तेव्हा त्या व्यक्तीला “देवमाणूस” म्हणणे वावगे ठरणार नाही. म्हणूनच संतांनी म्हटले आहे. “जे का?रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा देव तेथेचि जाणावा”…

सामाजिक
आदिवासी भागातील शेतकऱ्याच्या शेतीचे पंचांनामे करून त्वरित नुकसान भरपाई द्यावी -मारुती केंगले

डिंभे दि. (प्रतिनिधी) आंबेगाव तालुक्याचे पश्चिम आदिवासी भागातील बळीराजाचे एकमेव उत्पन भात व हिरडा पिकांचे नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने प्रचंड नुकसान झाले असून याचे पंचांनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे वतीने मारुती केंगले यांनी केली आहे.
नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱऱ्यांच्या कुटुंबाच्या तोडचा घासच पाळवीला आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड अतोनात नुकसान होऊन शेतकरी देशोधडीला लागल्याचे दिसत आहे. अशा कठीण प्रसंगी शासकीय मदतीची शेतकऱ्यांना गरज आहे पण शासनाकडून अद्यापही कोणत्याही मदतीबाबत दिलासादायक घोषणा अद्यापहि झालेली नाही त्यामुळे ऐन दीपावळीच्या काळात अनेकांची घरे दिव्यांनी उजाळालेली असतील परंतू महाराष्ट्रातील बळीराजच्या घरात अंधार असेल अशीच काही परिस्थिती दिसत आहे.
तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात एकमेव पिक भात शेती आणि हिरडा हिरड्याला बाजार भाव आता सध्या १०० रुपये इतका भाव आहे परंतू आदिवासी भागात पावसामुळे हिरडा पीक मोठ्याप्रमानावर सडून खराब झाले आहे. मे ते ऑक्टोबर सलग ५ महिच्या कालावधित झालेल्या मुसळधार पावसामुळे भातपिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊन भात पीक वाया गेले आहे तर अनेक ठिकाणी भातशेती पावसामुळे सडून गेली आहे.त्यामुळे पिकांची पंचनामे करून आदिवासी शेतकऱ्याला मदतीचा हात मिळावा यासाठी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले तालुक्याचे तहसिलदार कार्यालयास दिले असून निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी साहेब. प्रांत अधिकारी गोविंद शिंदे साहेब आंबेगाव तालुक्याचे आमदार व माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांना देण्यात आले असून याबाबत त्वरित कार्यवाही ना झाल्यास नाजिकच्या काळात शेकऱ्यांच्या हितासाठी भिमाशंकर रस्त्यावर तीव्र आंदोलनाचा इशारा केंगले यांनी दिला आहे.
सामाजिक
जांभोरी येथे कुस्ती तालीम इमारत भूमिपूजन सोहळा संपन्न

घोडेगाव दि (प्रतिनिधी ) जांभोरी (ता आंबेगाव)पासून जवळच असलेल्या माचीचीवाडी या ठिकाणी कुस्तीसाठी तालीम इमारतिचा भूमिपूजन समारंभ उत्साहात पार पाडला
आजच्या धाकधकीच्या काळात तरुणांई मोबाईल व गेम यात अडकून ना रहाता शारीरिक तंदृस्तीकडे आकर्षित व्हावी या हेतूने सुरु होत असलेल्या कुस्ती तालीम इमारतीसाठी येथील वसंत वालकोळी,बबन केंगले, भिवा वालकोळी, अनंता वालकोळी, यांनी ११गुंठे जमीन दिली आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री सहकारमंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील यांनी दहा लाख रुपयांचा निधी तालमीच्या प्रत्यक्ष बांध कामासाठी मंजूर केला आहे यासाठी आदिवासी भागाचे नेते सुभाषराव मोरमारे साहेब संजय गवारी, प्रकाश घोलप, यांनी परीश्रम घेतले आहेत
दरम्यान जांभोरी गावचे लोकनियुक्त सरपंच सुनंदाताई पारधी, पोलिस पाटील नवनाथ केंगले, पोलिस पाटील सोनाली पोटे, ज्ञानेश्वर पारधी. पुनाजी पारधी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले, श्री व्यंकोजी कुस्तीगीर तालीम संघटना जांभोरीचे अध्यक्ष भिवा वालकोळी, शिवाजी केंगले , सखाराम केंगले, खरेदी विक्री संघाचे संचालक शामराव बांबळे, ग्रामपंचायत सदस्य दुंदा भोकटे, ग्रामपंचायत सदस्य शिवराम केंगले,किसन पोटे, अनंता वालकोळी, सुनिल वालकोळी, नामदेव भोकटे, घोडेगाव पोलिस शिवाजी जनार्दन केंगले, सुरेश केंगले,संजय केंगले, ग्रामसेवक सुनिल पारधी, कृषी सेवक सुनिल लोहकरे, भिवा केंगले, चंद्रकांत केंगले, पांडुरंग केंगले,राज केंगले,गफुरशेठ तांबोळी,सर्व जांभोरी ग्रामस्थ उपस्थित होते.
सामाजिक
हजारो कोस दूर असूनही संकटप्रसंगी आपल्या मायभूमीतील माणसांच्या मदतीला धावणारी आंबेगावची कन्या….सौ.माधुरी श्रीकांत पवार

मंचर दि. (प्रतिनिधी) -“नवदुर्गेचा सन्मान तू…परोपकारची खाण तू…. सर्वांचा अभिमान तू…….श्री शक्तीचा मान तू…… जन्मभूमीची ठेवी जाण तू”….. संपूर्ण महाराष्ट्रावर महा पुराचे संकट आले असताना हजारो कोस दूर अमेरिकेत असूनही आपल्या माय भूमितील आपल्या माणसांच्या मदतीसाठी धावणारी आंबेगाव ची कन्या “माधुरी ताई ” हि खरोखरच सर्वांचे प्रेरणादायी स्थान ठरली आहे.
गेल्या काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने थैमान माजविले असून यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून संपूर्ण महाराष्ट्रातील शेकडो कुटुंबे महापुराच्या तडाख्याने रस्त्यावर आली आहेत. महाराष्ट्रात निर्माण झालेल्या महापुराणे अनेक जण बेघर झाले आहेत अशा हतबल परिस्थितीत परोपकारच्या शिकवणीतून निर्माण झालेल्या माधुरी श्रीकांत पवार यांनी आपल्या मायभूमीचे पांग फेडण्याचा प्रयत्न केला आहे. तिच्या या निर्णयाने तिच्या जन्मदात्या मातापित्याचे उर अगदी अभिमानाने भरून आले असेल यात शंका नाही
आपल्या माय भूमितील आपल्या माणसाबद्द्ल मधुर्याचा ओलावा असलेल्या माधुरी ताईने तीला शक्य होईल तेव्हढी मदत करीत आपले कर्तव्य बाजावण्याचा प्रयत्न केला आहे. ती आपल्या संभाषणात सांगते कि,
“मी “माधुरी श्रीकांत पवार”महाराष्ट्रातील अतिवृष्टी मुळे झालेल्या पूरग्रस्त घटना व नुकसान टीव्हीवर पाहत होते खूप वाईट वाटत होते, तसेच व्हाट्सअप वर वळसे पाटील साहेबांनी केलेल्या आवहानामुळे माझ्या जन्मभूमीत असलेल्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीने माझ्या शेतकऱ्यांची फार मोठ्या प्रमाणात हानी झाली. सर्वात मोठे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यांना मी माझे आदर्श व सतत समाजाचा विचार करणारे माननीय दिलीपराव वळसे पाटील साहेब माजी गृहमंत्री यांच्या प्रेरणेने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना छोटीशी मदत माझ्या कृतीप्रमाणे पाठवीत आहे.”
खरेतर “माधुरी ताई” यांनी केलेली मदत हि पुरांनातील त्या टिटवीची आठवण करून देते कि जिने आपल्या मुलांना वाचविण्यासाठी समुद्र अटविण्याचा निर्धार केला शेवटी परमेश्वराला हि येऊन तिची मदत करावी लागली. आज या ताईंनी केलीली मदत हि अनेकांना आपल्या मायभूमी बद्द्लचे कर्तव्य बजावण्याची शिकवण देते यात शंका नाही. हा देश माझा आहे या देशाला देव भूमी म्हटले गेले आहे या ठिकाणी जन्म मिळणे हि खरेतर सन्मानांची गोष्ट आहे. माधुरी यांनी केलेले हे कार्य सर्वांसाठी एक शिकवण आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यामुळे माधुरी पवार यांच्या प्रमाणे आपापल्या परीने मदत करा.चला सारे एक होऊया आपल्या देश बांधवांना पुन्हा उभे करण्यासाठी मदतीचा हात देऊया…..
-
राजकीय2 years ago
वीस वर्षांपूर्वी राजकारणात स्वतःला सिद्ध करण्यासाठी वेगळे झालेले “त्रिदेव”, पुन्हा आंबेगावच्या आसमंतात एकत्रित झळकणार
-
राजकीय1 year ago
“टायगर इज बॅक” शिरुर लोकसभेच्या मैदानात खळबळ माजणार..!
-
राजकीय11 months ago
वळसे पाटील यांना मोठा धक्का : शरद बँकेचे संचालक जयसिंग थोरात यांचा शरद पवार गटात जाहीर प्रवेश
-
राजकीय2 years ago
आयात उमेदवारांपेक्षा निष्ठावंतांना संधी द्या; उद्योगपती देवेंद्र शहा यांच्या नावाची शिरूर लोकसभेसाठी चर्चा…….
-
राजकीय12 months ago
आंबेगाव मध्ये महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर : निवडणुकीत सहभाग न घेण्याचा शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचा निर्णय
-
राजकीय1 year ago
अढळरावांनी, वळसे पाटलांची भेट घेऊन केली चौकशी
-
राजकीय1 year ago
भोसरी विधानसभा क्षेत्रातील असंख्य नाराज कार्यकर्ते भाजपाला ठोकणार रामराम: उबाठा सेनेत करणार प्रवेश?
-
शैक्षणिक1 year ago
घोडेगाव इंग्लिश मेडीयम स्कुलच्या “बालचमुंचा रंगला, अनोखा बालदिंडी सोहळा”