Connect with us

महाराष्ट्र

“नगर-पुणे रेल्वेमार्गासाठी पाठपुरावा करावा”, मा. खा. प्रसाद तनपुरे यांचा खासदार लंके यांना सल्ला

Published

on

राहुरी : (प्रतिनिधी)

  बलाढय शक्तींविरोधात लढून लोकसभा निवडणूकीत तुम्ही यश मिळविले असून आता नगर-पुणे रेल्वेमार्गासह नगर-मनमाड रस्त्याच्या कामासाठीही पुढाकार घ्या असा सल्ला मा. खा. प्रसाद तथा बापूसाहेब तनपुरे यांनी खा. नीलेश लंके यांना दिला.

  नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत विजय संपादन केल्यानंतर नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी राहुरी येथे माजी खासदार प्रसाद तनपुरे यांची त्यांच्या राहुरी येथील फार्म हाऊसवर जाउन    भेट घेउन आशिर्वाद घेतले. यावेळी माजी खासदार तनपुरे कुटूंबियांच्या वतीने खासदार लंके यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी राहुरी नगरपरिषदेच्या मा.नगराध्यक्षा डॉ. उषाताई तनपुरे,सह सोनाली तनपुरे, सोहम तनपुरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

    यावेळी बोलताना माजी.खा.तनपुरे म्हणाले,नगर जिल्याच्या विकासाठी संसदेमध्ये विविध आयुधांचा वापर करून आपल्या मतदारसंघासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव काम करणे आवश्यक आहे.यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करून केंद्राच्या विविध विकास कामे करण्यासाठी प्रयत्न करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. यावेळी तनपुरे यांनी त्यांच्या राजकीय वाटचालीतील काही अनुभव खासदार लंके यांना सांगितले.तसेच पूर्वीच्या व सध्याच्या राजकारणामध्ये झालेल्या बदलाचीही त्यांनी तुलना केली.विखे कुटूंबासारख्या बलाढया शक्तीविरोधात तुम्ही लढत देऊन निवडणूक जिंकलात. यशाची ही घोडदौड अशीच सुरू ठेवा, तनपुरे परीवार आपल्या पाठीशी सदैव असेल अशी ग्वाही तनपुरे यांनी दिली.

 तसेच नगर-मनमाड रस्त्याच्या दुरूस्तीसंदर्भात आपण अलिकडेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन चर्चा केल्याचे खा. लंके यांनी यावेळी सांगितले. पुढील आठवडयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत मंत्री गडकरी यांनी बैठकीचे आयोजन केले असून या बैठकीत या रस्त्याच्या कामासंदर्भात सकारात्मक निर्णय होईल असा विश्‍वास खा. लंके यांनी यावेळी व्यक्त केला. खा. लंके यांचे सहकारी तथा नांदूरपठारचे मा. उपसरपंच रविंद्र राजदेव यावेळी उपस्थित होते.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्र

“सबका साथ फक्त माझ्या परिवारचा विकास करत,सातबारांवर ताबेमारी करणाऱ्यांना घरी  पाठवा” – खा डॉ. अमोल कोल्हे 

Published

on

भोसरी दि (प्रतिनिधी)-“सबका साथ व फक्त माझ्या परिवाराचा विकास हेच ब्रीद” दिल्यासमोर ठेऊनच सातबारावर ताबेदारी करणाऱ्यांना घरी पाठवा असे आवाहन शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी केले 

 महाराष्ट विधानसभेच्या निमित्तने भोसरी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचा्रार्थ झालेल्या सभेत कोल्हे बोलत होते ते पुढे म्हणाले कि,गेल्या दहा वर्षातले भोसरीतले 184 सातबारा उतारे मी पाहिले आणि तेव्हा माझी खात्रीच पटली की उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ रविवारी भोसरीमध्ये खरेच बोलले. योगी आदित्यनाथ म्हटल्याप्रमाणे” इनका नारा सबका साथ और सिर्फ परिवार का विकास” असेच चित्र भोसरी विधानसभा मतदारसंघात दिसत आहे.

महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे भोसरी मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे व  महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकारी माजी नगरसेवक उपस्थित होते.यावेळी बोलताना डॉ कोल्हे पुढे म्हणाले, कि,भोसरी मतदारसंघांमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा झाली त्यामुळे मी बोलणे फार गरजेचे होते. योगी आदित्यनाथ या सभेत बोलताना म्हणाले “इनका नारा सबका साथ और सिर्फ परिवार का विकास ” पण त्यानंतर मी हे 184 सातबारा पाहिले तेव्हा योगी आदित्यनाथ यांचे बोलणे मला शब्दश:  पटले. हे सातबारा पाहिल्यानंतर ” इनका एक ही नारा कॉन्ट्रॅक्टर का साथ और सिर्फ परिवार का विकास” अशी स्थिती आहे. म्हणूनच भोसरी मतदारसंघांमध्ये ” तुतारी वाजवा, सातबारा वाचवा, तुतारी वाजवा भोसरी वाचवा” ही महत्त्वाची गोष्ट भोसरीकरांनी मनावर घेतली आह

दरम्यान कोले पुढे म्हणाले कि मागील सभेमध्ये मी बकासुराची गोष्ट येथील नागरिकांना सांगितली होती असे सांगून डॉ. कोल्हे म्हणाले, पुराणातील ही कथा आज काहींची प्रवृत्ती बनली आहे. या प्रवृत्तीला नष्ट करणे गरजेचे आहे .म्हणून येत्या 20 नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांचे “तुतारी वाजवणारा माणूस” या चिन्ह समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करायचे आहे.असे त्यांनी सांगितले 

डॉ. कोल्हे म्हणाले मी वैयक्तिक टीका कधीच करत नाही. पण विद्यमान आमदार व्यासपीठावरून वीस तारखे नंतर बघून घेतो अशी जर भाषा वापरत असेल तर त्यांना त्याच भाषेत उत्तर देणे गरजेचे आहे.  माझ्या माता माऊली घरातल्या प्रत्येक मुलाला सांगत असतात “उतू नको मातू नको,  कारण उतमात केल्यानंतर गर्वाचे घर हे नक्की खाली येत असते. 

“भाजपने महाराष्ट्राच्या राजकारणाला गालबोट लावले”

खासदार डॉ.अमोल कोल्हे म्हणाले ,भाजपने महाराष्ट्राच्या राजकारणाला गालबोट लावण्याचे काम केले. आतापर्यंत आपल्याला चप्पल ,शर्ट विकत घेता येतो. हे माहीत होते परंतु भाजपने 50 खोके देऊन आमदार विकत घेतले. भाजपने  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना आणि  शरदचंद्रजी पवार साहेबांनी निर्माण केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला. हे विकले गेले आणि आपल्याला नैतिकतेच्या गोष्टी शिकवतात. दिवसेंदिवस महागाई प्रचंड वाढत आहे. महाराष्ट्रातले आठ शेतकरी दररोज आत्महत्या करतात. 200 शेतकऱ्यांच्या  तिरडी महिन्याला उचलावी लागते. यांना विकासावर काहीच बोलता येणार नाही. लोकसभेत महाराष्ट्राने यांना हद्दपार केले म्हणूनच यांना लाडकी बहीण आठवली. 

“कटेंगे बटेंगे महाराष्ट्रात चालत नाही”

 खासदार डॉ.अमोल कोल्हे म्हणाले , उत्तर प्रदेशातल्या तरुणांचा रोजगारासाठी महाराष्ट्रात यावे लागते आणि त्या प्रदेशाचे मुख्यमंत्री आपल्याला कटेंगे बटेंगे सांगतात. रोजगारासाठी तिथल्या तरुणांची आंदोलने पहा. तिथल्या झाशीच्या हॉस्पिटलमध्ये आग लागून बालके मृत्यूमुखी पडतात. म्हणून मला उत्तर प्रदेशचया मुख्यमंत्र्यांना सांगावेसे वाटते की, उत्तर प्रदेशातल्या गंगा यमुनेच्या भुसभुशीत मातीत हा वीखारीपणा उगवत असेल. पण हा सह्याद्रीचा काळा पाषाण आहे. जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना एकत्र घेऊन बारा बलुतेदारांना एकत्र करून स्वराज्य निर्माण केलं. ही विधानसभा निवडणूक नागरिकांनी हातात घेतली आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही दिसून येणार आहे 

………

Continue Reading

महाराष्ट्र

निवडणुकीत भाजप संलग्न पोलीस कर्मचाऱ्यांची तोतयागिरी; गुन्हा दाखल करण्यासाठी गव्हाणेंचे पत्र

Published

on

भोसरी दि (प्रतिनिधी ) विधानसभा क्षेत्रामध्ये निवडणूक प्रचारामध्ये तोतयागिरी करणाऱ्या भारतीय जनता पक्षाशी सलंग्न पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल  करण्याची मागणी महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भोसरी विधानसभेचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रेवणनाथ लबडे यांना पत्र दिले आहे.

महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भोसरी मतदारसंघाचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी  रेवणनाथ लबडे यांना दिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे की,  भोसरी विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आमदार आमदार महेश लांडगे यांचे कार्यकर्ते पोलीस यंत्रणेतील ‘ऑन ड्युटी’ दिघी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी  स्वप्निल लांडगे, सुधीर डोळस व युनिट तीनचे शशिकांत नांगरे यांना हाताशी धरून प्रचार करण्याकरिता “खुलेआम सहकार्य” करीत आहेत.

भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक आमदारांची मर्जी राखण्यासाठी पोलिस यंत्रणा दबावाखाली काम करत आहे. त्यामुळे दिघी, चऱ्होली परिसरातील नागरिक तक्रार दाखल करण्यास घाबरत आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी या प्रकारामध्ये  नाव नमूद केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर तातडीने गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करण्यात यावी. अशी मागणी महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी केली आहे. 

Continue Reading

महाराष्ट्र

मंचर येथे “दिव्यांग मतदार जनजागृती रॅली व शिबिराचे” आयोजन

Published

on

मंचर दि. (राजेश चासकर ) येथे तहसील आंबेगाव व मंचर नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने “दिव्यांग मतदार जनजागृती रॅली व शिबिर चे आयोजन केले होते.

  नगर पंचायत येथील (शुक्रवार दि २७रोजी) आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग मतदार जनजागृती रॅली व शिबिराचे   यावेळी अस्थिव्यंग- ११,अंध – २ आणि कर्णबधिर-२ असे एकूण- १५  दिव्यांग बांधव उपस्थित होते. त्याचप्रमाणे दिव्यांग मतदारांना सोबत घेऊन दिव्यांग मतदार जनजागृती रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मंचर नगरपंचायत पर्यंत काढण्यात आली.

दरम्यान दिव्यांग मतदार जनजागृती शिबिर मंचर नगरपंचायत, येथे पार पडले. यामध्ये दिव्यांग मतदारांना इ. व्ही. एम. मशीनचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.मतदान केंद्रावर दिव्यांगांसाठी असलेल्या सुविधांबाबत व्हील चेअर,रॅम्प,अंध मतदारांसाठी इ. व्ही. एम. मशीनवर ब्रेल लिपीचे आयोजन करण्यात येईल  तसेच दिव्यांगांच्या मदतीसाठी स्वयंसेवक उपलब्ध असतील असेही सांगण्यात आले .  तसेच जे दिव्यांग बांधव मतदान केंद्रावरती मतदान करण्यासाठी जाऊ शकत नाहीत अशा दिव्यांगांसाठी घरातून मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. याबाबत माहिती देण्यात आली आहे. दिव्यांगांनी आपला मतदानाचा हक्क मतदान करून पार पाडावा असे आवाहन करण्यात आले. यावेळी आंबेगाव नायब तहसीलदार – सचिन वाघ, दिव्यांग कक्ष अधिकारी शरद फड,व  श्रीमती सुजाता जाधव तसेच सर्वश्री कर्मचारी हजर होते.

Continue Reading
Advertisement

Trending