singa8

rp8888

singa8

slot demo

slot qris

singa8

rp8888

https://bertrodriguez-museum.org

https://journal.uecommercebintaro.ac.id/

singa8

singa8

singa8

singa8

singa8

singa8

singa8

singa8

92GLORY

http://vecas.org.vn/id/

https://admire.ch/vendor/

Connect with us

सामाजिक

“वैदिक” मंत्राच्या जयघोषत,प्रसिद्ध उद्योगपती “देवेंद्र शाह”यांची सुकन्या चि.सौं. कां,”अक्षाली” व चि.” साकेत” यांचा शुभविवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न…..!!!

Published

on

ॐ मङ्गलम् भगवान विष्णुः , मङ्गलम् गरुणध्वजः, मङ्गलम् पुण्डरी काक्षः मङ्गलाय तनो हरिः

पारंपारीक रितिरिवाजानुसार मंगल कार्याची आराध्य  देवता विघ्नहर्ता  “श्री गणेशाला” प्रथम वंदन करून  “वैदिक” मंत्राच्या घोषात देव,ब्राम्हण, माता, पिता,संतश्रेष्ठ,वरिष्ठ मान्यवर यांचे शुभाशीर्वाद घेत नातेवाईक व आप्तेष्ठ यांच्या उपस्थितीमध्ये चि. साकेत व चि. सौं कां अक्षाली यांचा  विवाह सोहळा मोठया उत्साहात  संपन्न झाला.

“साकेत”हे नाव भगवान श्रीकृष्णांना संबोधले जाते ज्यांना आपण या विश्वाचा पालनहार तर  सनातन धर्मात यांस  ब्रम्ह म्हणतात. तर “अक्षाली” (अक्ष +अली) म्हणजे ज्याचा क्षय होत नाही असे ते   देवस्वरूप होय म्हणजेच अनादी काळापर्यंत निरंतर कायमस्वरूपी टिकून राहणारे व ज्याचा क्षय होत नाही (अक्ष -म्हणजेच क्षय न होणारे,अली – म्हणजेच देवस्वरूप ) असे ते म्हणजेच “अक्षाली” होय, भगवान श्रीकृष्ण हे श्री विष्णू यांचे रूप होत त्यांना या ब्रह्मांडाचा निर्माता म्हणजेच “ब्रम्ह” होय . म्हणजे ते  जे चिरकाल निरंतर टिकून राहते त्याचा कधीही नाश होत  नाही असे “अक्षयब्रम्ह” होय. हे विवाह बंधनात बांधलेल्या वधुवर चि. सौ.कां. अक्षाली व चि. साकेत यांच्या नावातून स्पष्ट होते. “

   आपले बंधू धाकटे बंधू “प्रीतम शाह ” यांच्या साथीने, निरंतरपणे  प्रचंड श्रम करून, स्वकर्तुत्वाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत,डेअरी व्यवसायात अदभूत  गरुड झेप घेत “गोवर्धन” नावाचा सुप्रसिद्ध ब्रॅण्ड निर्माण केला. व भारतात नव्हे, तर भारताबाहेर जगाच्या बाजार पेठेत अनेक देशात,आपलें स्वतंत्र वेगळे वर्चस्व सिद्ध केले. तसेच  सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती निरंतर अथक  परीश्रम करून  अनपेक्षित यश संपादन करू शकतो असा विश्वास पुढील युवा पिढीच्या मनात निर्माण केला. 

 आशिया खंडात आपल्या व्यवसायच्या माध्यमातून ज्यांना  मिल्क मॅन या उपाधीने ओळखले जाते. ते  पुणे जिह्यातील आंबेगाव तालुक्याचे सुपुत्र, प्रसिद्ध उद्योगपती  “देवेंद्र शेठ” शाह  यांची व्दितीय कन्या “अक्षाली” हिने लक्ष्मी च्या रूपाने गुप्ता परिवारातील चि.साकेत यांच्या जीवनात  प्रवेश केला. यांचा अदभुत अप्रतिम असा विवाह सोहळा वैदिक मंत्रांच्या  जयघोषात दोन्ही कुटुंबातील सांगेसोयरे आप्तेष्ठ नातेवाईक यांच्या उपस्थितीत देव ब्राम्हण माता पिता यांच्या शुभआशीर्वादाने  मोठया उत्साहात देशाची संमृद्ध नगरी मुंबई येथे नुकताच  पार पडला. या विवाह सोहळ्याप्रसंगी पारंपारीक रितिरिवाजाचे अनुकरण करून राजेशाही थाटात हा विवाह सोहळा संपन्न झाला

दरम्यान या विवाह सोहळ्यानिमित्त व तदनंतर झालेल्या कार्यक्रमात     शाह परिवाराच्या आनंदात सहभागी होण्यासाठी सर्वसामान्य व्यक्ती पासून कला, क्रीडा शौक्षणिक तसेच राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर मंडळी उपस्थित होती. शाह परिवाराकडून झालेल्या सर्व कार्यक्रमामध्ये उपस्थित अतिथी चा योग्य सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रसंगी देशाचे कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, देशाचे माजी कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार, सौ प्रतिभा  पवार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे (पाटील ), खासदार सुप्रियाताई सुळे, सौ. किरण ताई वळसे(पाटील), खासदार सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल,माजी खासदार शिवाजीराव आढळराव (पाटील )मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री बाळासाहेब थोरात,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,माजी आमदार गणेश नाईक आमदार सत्यजित तांबे, आमदार मंगल प्रभात लोढा, आमदार संग्राम जगताप, आमदार अशोकराव पवार, आमदार अतुल बेनके , यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सामाजिक

राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत घोडेगाव येथील “न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या” विद्यार्थ्यांनी मिळविले घवघवीत  यश

Published

on

घोडेगाव. (प्रतिनिधी) जुन्नर नगर वाचनालय व  स्वराज्य मित्र मंडळ, यांचे संयुक्त विद्यमाने . झालेल्या राज्यस्तरीय भव्य मराठी वक्तृत्व स्पर्धेत घोडेगाव ता. आंबेगाव येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळविले 

दरम्यान जुन्नर (ता जुन्नर )येथे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत पार पडलेल्या राज्यस्थारीय मराठी वक्तृत्व स्पर्धेत घोडेगाव येथील आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचलित, न्यू इंग्लिश मीडियम स्कूल,च्या एकूण २७ विद्यार्थ्यांनी  विविध वयोगटातून सहभाग घेतला  यामध्ये खालील विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये उत्कृष्ट सादरीकरण करून यश संपादन केले आहे.बक्षीस पात्र विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे: -इ. १ली ते २री गट: -कु. अभिनव तानाजी बोऱ्हाडे (प्रथम क्रमांक) कु. क्रिशा निखिल आर्वीकर (तृतीय क्रमांक) तसेच इ.३री ते ४थी गट:-कुमारी आर्या स्वप्नील वाळुंज (प्रथम क्रमांक),कु. अनुजा हर्षद राऊत(उत्तेजनार्थ),इयत्ता ८वी ते१०वी गट:-कु.ऋतिका रवींद्र जैद (प्रथम क्रमांक),कु.अनुष्का वसंत लांघी (तृतीय क्रमांक),कु. स्नेहल दत्तात्रय डुकरे (उत्तेजनार्थ) या  स्पर्धेत सर्वात जास्त एकूण सात बक्षिसे विद्यालयाने विद्यालयाने पटकावली.

दरम्यान  सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मराठी विषय शिक्षिका सौ .वंदना वायकर सौ. सुषमा फलके ,सौ सुनीता वाजे, सौ प्रज्ञा घोडेकर, सौ. जागृती महाजन यांनी  मार्गदर्शन केले.तसेच संस्थेचे अध्यक्ष तुकाराम काळे ,उपाध्यक्ष अंड. संजय आर्वीकर, कार्याध्यक्ष सुरेश शेठ काळे, संस्थेचे सचिव विश्वासराव काळे, जॉईंट सेक्रेटरी प्रशांत काळे, समन्वय समिती चेअरमन राजेश काळे, खजिनदार सोमनाथ काळे, वस्तीगृह कमिटी चेअरमन सूर्यकांत गांधी, विद्यालयाचे चेअरमन बाळासाहेब काळे, संस्थेचे संचालक अजित काळे व अक्षय काळे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे तसेच पालकांचे हार्दिक अभिनंदन केले.

दरम्यान आपले विद्यार्थी शालाबाह्य राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी करून संस्थेच्या नाव लौकिकात भर घालत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो असे गौरवोद्गार  सोमनाथ काळे सर यांनी काढले.

Continue Reading

सामाजिक

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात शिंदे सेनेलाहि लागले का? “गटबाजीचे ग्रहण”

Published

on

मंचर दि. (प्रतिनिधी) पक्षाचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री भीमाशंकर येथे दर्शनाला येणार असताना जिल्हाप्रमुख व माजी सरपंचांच्या नियोजनावर पाणी पाडत जेष्ठ पदाधिकार्याने केलेल्या कुरघुडीमुळे आंबेगाव तालुक्यात शिंदेच्या शिवसेनेलाही गट बाजीचे ग्रहण लागल्याची चर्चाच तालुक्यात सर्वत्र सुरु जगली आहे.

“सत्तेचे सगळेच चहाते असतात. “शिंदेची शिवसेना,सत्तेत असल्यापासुन त्यापक्षाकडे सध्या भरती सुरु आहे. पण यामुळे पक्ष बळकट होण्या ऐवजी सर्वत्र गट बाजीला उधान आले असल्याचे बोलले जात असून, त्याचा प्रत्यक्ष प्रत्यय पुणे जिल्यातील आंबेगाव तालुक्यात दिसून आल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे.”

      “म्हणतात णा कानामागून मागून आली आणि तिखट झाली”  या म्हणी प्रमाणे आगोदर पक्षात असलेल्या आपल्या सहकार्याना व जेष्ठ पदाधिकाऱ्यांना नव्याने पक्षात आलेल्या कार्यकर्त्यांची खोड मोडण्यात मजा येते असेच म्हणावे लागेत म्हणूनच विश्वासात न घेताचे कारण पुढे करत क्काही जेष्ठ पदाधीकाऱ्यांनी नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख व उबाटा पक्षातून शिंदे च्या पक्षात आलेल्या माजी सरपंचांची खोड मोडण्यासाठीच केला उतात्याप मात्र यशस्वी झाला असेच म्हणावे लागेल

घडले असे कि,मंचर शहराचे  माजी सरपंच आणी शिंदे सेनेचे नवनिर्वाचित जिल्हा प्रमुख यांनी  राज्याचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आपल्या एकनिष्ठतेची छाप पाडून आपले वर्चस्व वाढविण्याचा घाट घातल्याची कुणकुण काही जेष्ठ नेत्यांना लागल्या नंतर तालुक्यात राजकीय कुरघुडी ला सुरवात झाली. नवनिर्वाचित जिल्हा प्रमुख व माजी सरपंच यांनी घोडेगाव येथे मोठी बॅनरबाजी करीत सत्काराचे आयोजनही केले. पण ज्या ठिकाणी उपमुख्यमंत्री यांचे वाहन सत्कारासाठी थांबणार होते. त्याचे अगोदरच्या स्थळी उप मुख्यमंत्र्यांचा ताफा थांबावून काही जेष्ठ पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्र्यांचा सत्कार केला व सत्कार झाला असे सांगत उपमुख्यमंत्र्यांचा ताफा काढून दिला.

दरम्यान पुढे सत्कारच्या नियोजित स्थळी उपमुख्यमंत्री यांचा ताफा आल्यानंतर जमलेल्या शिव सैनिकांनी जयजयकारच्या घोषणा दिल्या त्याच सोबत ढोल ताशांचा आवाज झाला. जेसीबी ने फुलांची पुष्पावृष्टी हि करण्यात आली पण सत्कार अगोदरच  झाला आहे  असे समजत उपमुख्यमंत्री साहेबांनी याकडे दुर्लक्ष केले व  गाडीच्या काचा हि खाली ना करता  गाड्याचा  ताफा तसाच पुढे सरकत श्री क्षेत्र भीमाशंकर शिवज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी रवाना झाला याठिकाणी जमलेल्या शिवसैनिकांची, कार्यकर्त्यांची यामुळे घोर निराशा झाली व  नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख व नव्यानेच शिंदेच्या शिवसेनेत सामील झालेले मंचरच्या त्या नेत्याचा उपमुख्यमंत्री साहेबांचा सत्कार करण्याच्या त्या सर्व नियोजनावर पाणी पडले. 

दरम्यान यातूनचा आंबेगाव तालुक्यात सध्या वर्चस्वची लढाई शिंदे गटात सुरु झाली असल्याची चर्चा सुरु झाली आहे. अशीच एकमेकांत सुरु असलेली कुरघुडी शिवसेना शिंदे गटास मात्र येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकामध्ये महागात पडू शकते अशी शक्यता सर्वत्र वर्तविली जात आहे यातून शिंदेच्या शिवसेनेतही गटा तटाचे राजकारण मोठ्या प्रमाणावर सुरु असलेले दिसून येत आहे.

Continue Reading

सामाजिक

भीमाशंकर परिसरात सुरु असलेल्या संततधार पावसाने डिंभे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु घोड नदीकाठच्या गावांना सावधनतेचा इशारा….

Published

on

मंचर दि. (सदानंद शेवाळे)- गेल्या दोन दिवसापासुन डिंभे धरण परीक्षेत्रात सुरु असलेल्या पावासामुळे धरणातील पाण्याची पातली वाढल्यामुळे घोड नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला असून नदिकाठच्या  नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन कुकडी प्रकल्प  अभियंता यांनी केले आहे 

दरम्यान डिंभे धरण पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरु असल्यामुळे डिंभे धरण क्षेत्रातील ओढ्या नाल्यांना मोठ्याप्रमाणा वर पाणी आले असल्यामुळे डिंभे धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत चालली आहे सध्या धरणामध्ये ९४% पाणी असून खबरदारीच्छा उपाय म्हणून धरणातून आज दि १९/८/२०२५ रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास ३००० क्यूसेस ने पाण्याचा विसर्ग घोड नदी पात्रात करण्यात आला आहे.  धरणातील पाणी पातळी झपाट्याने वाढत असून सध्या धरणातून तीन हजार क्यूसेस पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे.

.दरम्यान पावसाचा वाढता जोर पहाता घोड नदीपात्रात डिंभे धरणातून  विसर्ग वाढवण्याची देखील शक्यता आहे.त्यामुळे, नदीकाठच्या गावांतील सतर्क राहावे.तसेच  नदीपात्रात किंवा नदीकाठी कोणीही जाऊ नये व आपल्या जनावरांना जाऊ देऊ नये.त्याचप्रमाणे आपल्या गावातील लोकांना ही माहिती कळावी म्हणून सतर्कतेचा इशारा पूर नियंत्रण कक्ष कार्यकारी अभियंता कुकडी पाटबंधारे विभाग नारायणगाव यांचे वतीने देण्यात आला आहे.

Continue Reading
Advertisement

Trending

Best Replica Watches UK

Copyright © 2024 BobhataNews.in