सामाजिक
नेमकी “गद्दारी” करणं म्हणजे काय?

पुणे दि. (प्रतिनिधी)आंबेगाव च्या इतिहासात एक अनोखी गोष्ट घडली “वळसे पाटलांना पाडा” असे जाहीर आवाहन देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी जाहीर सभेतून मतदारांना केले. खरंतर गद्दारांना पाडा असे म्हणणारे शरद पवार यांनी घेतलेला हा निर्णय किती योग्य व किती अयोग्य हा विचार मतदारांनी करावयाची वेळ आता आली आहे.

गेली अनेक वर्ष देशाच्या राजकारणात आपलें स्थान आढळ ठेवणारे शरद पवार आज जाहीर पणे वळसे पाटलांना पाडा असे म्हणतं आहेत हे व्यासपीठावरून जरी योग्य वाटत असले तरी खरंच त्यांच्या या अवाहणास प्रतिसाद आंबेगावातील जनतेने दिला पाहिजे का? हाच खरां महत्वाचा विषय आहे.

कारण तालुक्यात बदल करण किंवा तोच प्रतिनिधी निवडणं हे सर्वस्वी तालुक्यातील सुजान मतदाराच्या हातात आहे. तो हक्क मतदार प्रमाणिकपणे बाजावतील यात शंका नाही. आज राज्यात साहेबाना सोडलं ही गद्दारी झाली असे भासविले जातं असले तरी काही वर्षा पूर्वी देखील राज्याचे मुख्यमंत्री होण्यासाठी शरद पवारांनी त्यावेळाचे नेते यशवंतराव चव्हाण यांच्या विरोधी भूमिका घेतली होती त्याला आपण काय? म्हणणार ती ही गद्दारीच होती ना? मग असे असताना शरद पवारांनी वळसे पाटलांना गद्दार म्हणणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा होणार नाहीत का?
दरम्यान साडेतीनशे वर्षापूर्वी गणोजी शिर्के यांनी छत्रपती संभाजी राजे सोबत केलेली गद्दारी केलेली महाराष्ट विसरला नाही असे सांगितले जाते. तर मग काही वर्षापूर्वी यशवंतराव चव्हाना बाबत झालेली गद्दारी तरी महाराष्ट कसा? विसरेल हेही महत्वाचे आहे. म्हणतात ना पेरलेले उगवते असाच काहीसा हा प्रकार म्हणावा लागेल नाही का?
आज कोणीही काहीही म्हणो परंतु १९९0अगोदर चा काळ ज्या व्यक्तींनी पाहिला त्यांनी या तालुक्यातील दुष्काळ बेरोजगारी, आर्थिक असमतोल पाहिला आहे.ते पहाता वळसे पाटलांचे योगदान तालुक्यातील जनतेने विसरणे ही सुद्धा एक गद्दारीच ठरेलं असे म्हणणे वावगे ठरणार नाही का?
तालुक्यात अनेक नेत्यांच्या सभा होत आहेत होत राहणार परंतु आपल्या तालुक्याच्या हिताचे काय? हा विचार जनतेने करायचा असतो तालुक्यात अनेक प्रश्न आहेत तालुक्यात एम आई डी सी ची गरज आहे परंतु ही एम आय डी सी सुरु झाल्यावर तालुक्यातील प्रश्न सुटणार आहेत का? आज शेजारच्या अनेक तालुक्यातील शेतकरी या मुळे गाव सोडून वरागंदा झाला आहे. हे वास्तव आहे. काही खरेदी विक्री करणारे एजंट या प्रकरणास हवा घालीत असले तरी एम आय डी सी ची आंबेगाव तालुक्यात खरच गरजेची आहे का? हा विचार होणे आवश्यक आहे.
दरम्यान शेजारी तालुक्याचे प्रश्न पहाता आंबेगाव तालुका खूप संपन्न आहे. असे सर्वांना जाणावेल परंतु शेवटी मतदार हा राजा आहे. त्याला त्यांचा मतदाणाचा हक्क आहे. व त्याने तो बजावला पाहिजे. परंतु, तो पूर्ण विचार करून….. कारण मतदानानंतर पुढील पाच वर्ष हात चोळण्याशिवाय मतदार राजाच्या हातात काहीच राहणार नाही हे नक्की, त्यामुळे विचार करा व मतदान करा…म्हणतात ना…. एकदा तोंडातून गेलेला शब्द व धनुष्यातून सुटलेला बाण परत घेता येत नाही तसेंच एकदा केलेले मतदान पुन्हा पाच वर्षे तरी सुधारता येणार नाही म्हणूनच मतदान हे सर्व श्रेष्ठ दान आहे विचारपूर्वक करणे आवश्यक आहे
सामाजिक
आदिवासी भागातील शेतकऱ्याच्या शेतीचे पंचांनामे करून त्वरित नुकसान भरपाई द्यावी -मारुती केंगले

डिंभे दि. (प्रतिनिधी) आंबेगाव तालुक्याचे पश्चिम आदिवासी भागातील बळीराजाचे एकमेव उत्पन भात व हिरडा पिकांचे नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने प्रचंड नुकसान झाले असून याचे पंचांनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे वतीने मारुती केंगले यांनी केली आहे.
नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱऱ्यांच्या कुटुंबाच्या तोडचा घासच पाळवीला आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड अतोनात नुकसान होऊन शेतकरी देशोधडीला लागल्याचे दिसत आहे. अशा कठीण प्रसंगी शासकीय मदतीची शेतकऱ्यांना गरज आहे पण शासनाकडून अद्यापही कोणत्याही मदतीबाबत दिलासादायक घोषणा अद्यापहि झालेली नाही त्यामुळे ऐन दीपावळीच्या काळात अनेकांची घरे दिव्यांनी उजाळालेली असतील परंतू महाराष्ट्रातील बळीराजच्या घरात अंधार असेल अशीच काही परिस्थिती दिसत आहे.
तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात एकमेव पिक भात शेती आणि हिरडा हिरड्याला बाजार भाव आता सध्या १०० रुपये इतका भाव आहे परंतू आदिवासी भागात पावसामुळे हिरडा पीक मोठ्याप्रमानावर सडून खराब झाले आहे. मे ते ऑक्टोबर सलग ५ महिच्या कालावधित झालेल्या मुसळधार पावसामुळे भातपिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊन भात पीक वाया गेले आहे तर अनेक ठिकाणी भातशेती पावसामुळे सडून गेली आहे.त्यामुळे पिकांची पंचनामे करून आदिवासी शेतकऱ्याला मदतीचा हात मिळावा यासाठी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले तालुक्याचे तहसिलदार कार्यालयास दिले असून निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी साहेब. प्रांत अधिकारी गोविंद शिंदे साहेब आंबेगाव तालुक्याचे आमदार व माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांना देण्यात आले असून याबाबत त्वरित कार्यवाही ना झाल्यास नाजिकच्या काळात शेकऱ्यांच्या हितासाठी भिमाशंकर रस्त्यावर तीव्र आंदोलनाचा इशारा केंगले यांनी दिला आहे.
सामाजिक
जांभोरी येथे कुस्ती तालीम इमारत भूमिपूजन सोहळा संपन्न

घोडेगाव दि (प्रतिनिधी ) जांभोरी (ता आंबेगाव)पासून जवळच असलेल्या माचीचीवाडी या ठिकाणी कुस्तीसाठी तालीम इमारतिचा भूमिपूजन समारंभ उत्साहात पार पाडला
आजच्या धाकधकीच्या काळात तरुणांई मोबाईल व गेम यात अडकून ना रहाता शारीरिक तंदृस्तीकडे आकर्षित व्हावी या हेतूने सुरु होत असलेल्या कुस्ती तालीम इमारतीसाठी येथील वसंत वालकोळी,बबन केंगले, भिवा वालकोळी, अनंता वालकोळी, यांनी ११गुंठे जमीन दिली आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री सहकारमंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील यांनी दहा लाख रुपयांचा निधी तालमीच्या प्रत्यक्ष बांध कामासाठी मंजूर केला आहे यासाठी आदिवासी भागाचे नेते सुभाषराव मोरमारे साहेब संजय गवारी, प्रकाश घोलप, यांनी परीश्रम घेतले आहेत
दरम्यान जांभोरी गावचे लोकनियुक्त सरपंच सुनंदाताई पारधी, पोलिस पाटील नवनाथ केंगले, पोलिस पाटील सोनाली पोटे, ज्ञानेश्वर पारधी. पुनाजी पारधी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले, श्री व्यंकोजी कुस्तीगीर तालीम संघटना जांभोरीचे अध्यक्ष भिवा वालकोळी, शिवाजी केंगले , सखाराम केंगले, खरेदी विक्री संघाचे संचालक शामराव बांबळे, ग्रामपंचायत सदस्य दुंदा भोकटे, ग्रामपंचायत सदस्य शिवराम केंगले,किसन पोटे, अनंता वालकोळी, सुनिल वालकोळी, नामदेव भोकटे, घोडेगाव पोलिस शिवाजी जनार्दन केंगले, सुरेश केंगले,संजय केंगले, ग्रामसेवक सुनिल पारधी, कृषी सेवक सुनिल लोहकरे, भिवा केंगले, चंद्रकांत केंगले, पांडुरंग केंगले,राज केंगले,गफुरशेठ तांबोळी,सर्व जांभोरी ग्रामस्थ उपस्थित होते.
सामाजिक
हजारो कोस दूर असूनही संकटप्रसंगी आपल्या मायभूमीतील माणसांच्या मदतीला धावणारी आंबेगावची कन्या….सौ.माधुरी श्रीकांत पवार

मंचर दि. (प्रतिनिधी) -“नवदुर्गेचा सन्मान तू…परोपकारची खाण तू…. सर्वांचा अभिमान तू…….श्री शक्तीचा मान तू…… जन्मभूमीची ठेवी जाण तू”….. संपूर्ण महाराष्ट्रावर महा पुराचे संकट आले असताना हजारो कोस दूर अमेरिकेत असूनही आपल्या माय भूमितील आपल्या माणसांच्या मदतीसाठी धावणारी आंबेगाव ची कन्या “माधुरी ताई ” हि खरोखरच सर्वांचे प्रेरणादायी स्थान ठरली आहे.
गेल्या काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने थैमान माजविले असून यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून संपूर्ण महाराष्ट्रातील शेकडो कुटुंबे महापुराच्या तडाख्याने रस्त्यावर आली आहेत. महाराष्ट्रात निर्माण झालेल्या महापुराणे अनेक जण बेघर झाले आहेत अशा हतबल परिस्थितीत परोपकारच्या शिकवणीतून निर्माण झालेल्या माधुरी श्रीकांत पवार यांनी आपल्या मायभूमीचे पांग फेडण्याचा प्रयत्न केला आहे. तिच्या या निर्णयाने तिच्या जन्मदात्या मातापित्याचे उर अगदी अभिमानाने भरून आले असेल यात शंका नाही
आपल्या माय भूमितील आपल्या माणसाबद्द्ल मधुर्याचा ओलावा असलेल्या माधुरी ताईने तीला शक्य होईल तेव्हढी मदत करीत आपले कर्तव्य बाजावण्याचा प्रयत्न केला आहे. ती आपल्या संभाषणात सांगते कि,
“मी “माधुरी श्रीकांत पवार”महाराष्ट्रातील अतिवृष्टी मुळे झालेल्या पूरग्रस्त घटना व नुकसान टीव्हीवर पाहत होते खूप वाईट वाटत होते, तसेच व्हाट्सअप वर वळसे पाटील साहेबांनी केलेल्या आवहानामुळे माझ्या जन्मभूमीत असलेल्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीने माझ्या शेतकऱ्यांची फार मोठ्या प्रमाणात हानी झाली. सर्वात मोठे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यांना मी माझे आदर्श व सतत समाजाचा विचार करणारे माननीय दिलीपराव वळसे पाटील साहेब माजी गृहमंत्री यांच्या प्रेरणेने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना छोटीशी मदत माझ्या कृतीप्रमाणे पाठवीत आहे.”
खरेतर “माधुरी ताई” यांनी केलेली मदत हि पुरांनातील त्या टिटवीची आठवण करून देते कि जिने आपल्या मुलांना वाचविण्यासाठी समुद्र अटविण्याचा निर्धार केला शेवटी परमेश्वराला हि येऊन तिची मदत करावी लागली. आज या ताईंनी केलीली मदत हि अनेकांना आपल्या मायभूमी बद्द्लचे कर्तव्य बजावण्याची शिकवण देते यात शंका नाही. हा देश माझा आहे या देशाला देव भूमी म्हटले गेले आहे या ठिकाणी जन्म मिळणे हि खरेतर सन्मानांची गोष्ट आहे. माधुरी यांनी केलेले हे कार्य सर्वांसाठी एक शिकवण आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यामुळे माधुरी पवार यांच्या प्रमाणे आपापल्या परीने मदत करा.चला सारे एक होऊया आपल्या देश बांधवांना पुन्हा उभे करण्यासाठी मदतीचा हात देऊया…..
-
राजकीय2 years ago
वीस वर्षांपूर्वी राजकारणात स्वतःला सिद्ध करण्यासाठी वेगळे झालेले “त्रिदेव”, पुन्हा आंबेगावच्या आसमंतात एकत्रित झळकणार
-
राजकीय1 year ago
“टायगर इज बॅक” शिरुर लोकसभेच्या मैदानात खळबळ माजणार..!
-
राजकीय11 months ago
वळसे पाटील यांना मोठा धक्का : शरद बँकेचे संचालक जयसिंग थोरात यांचा शरद पवार गटात जाहीर प्रवेश
-
राजकीय2 years ago
आयात उमेदवारांपेक्षा निष्ठावंतांना संधी द्या; उद्योगपती देवेंद्र शहा यांच्या नावाची शिरूर लोकसभेसाठी चर्चा…….
-
राजकीय12 months ago
आंबेगाव मध्ये महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर : निवडणुकीत सहभाग न घेण्याचा शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचा निर्णय
-
राजकीय1 year ago
अढळरावांनी, वळसे पाटलांची भेट घेऊन केली चौकशी
-
राजकीय1 year ago
भोसरी विधानसभा क्षेत्रातील असंख्य नाराज कार्यकर्ते भाजपाला ठोकणार रामराम: उबाठा सेनेत करणार प्रवेश?
-
सामाजिक1 year ago
“माणसात देव शोधत, सर्वसामान्यांच्या हितासाठी प्रयत्नशील राहणारा, माणसातील “देवमाणूस”….
Nilkanth Suresh Kale
November 13, 2024 at 5:18 pm
👌👌👌👌👌
Vikram Pandharinath Kale
November 13, 2024 at 6:55 pm
आंबेगाव ची सुज्ञ जनता ही विकास पुरुष नामदार दिलीपराव वळसे पाटीलचे मागे उभी आहे
⏰⏰
अशोक मोढवे
November 14, 2024 at 12:28 am
योग्य विचार मांडलेत आंबेगाव तालुक्यातील जनता सुज्ञान आहे या ठिकाणी दिलीपराव वळसे पाटीलच निवडून येणार
Arvind Ramesh Ghodekar
November 14, 2024 at 1:30 am
अगदी बरोबर आहे एमआयडीसी ची तशी तालुक्याला गरज काय काही ठराविक लोक यासाठी आग्रही आहेत पण आंबेगाव शिरूर ची जनता सुज्ञ आहे तालुक्याचा विकास काय झाला आहे हे 1990 पासून पाहिलेली मांडली या तालुक्यात अजून आहेत
Suyog
November 14, 2024 at 3:12 am
खुप छान विश्लेषण केलयं आपणं … पण तरी सुद्धा आंबेगाव ची जनता जर भावनिक होवुन मतदान करणार असेल तर त्यांच्या एवढे दुर्दैवी कोणचं नसतील
Yash nandkar
November 14, 2024 at 8:37 am
100% सहमत