सामाजिक
नेमकी “गद्दारी” करणं म्हणजे काय?

पुणे दि. (प्रतिनिधी)आंबेगाव च्या इतिहासात एक अनोखी गोष्ट घडली “वळसे पाटलांना पाडा” असे जाहीर आवाहन देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी जाहीर सभेतून मतदारांना केले. खरंतर गद्दारांना पाडा असे म्हणणारे शरद पवार यांनी घेतलेला हा निर्णय किती योग्य व किती अयोग्य हा विचार मतदारांनी करावयाची वेळ आता आली आहे.

गेली अनेक वर्ष देशाच्या राजकारणात आपलें स्थान आढळ ठेवणारे शरद पवार आज जाहीर पणे वळसे पाटलांना पाडा असे म्हणतं आहेत हे व्यासपीठावरून जरी योग्य वाटत असले तरी खरंच त्यांच्या या अवाहणास प्रतिसाद आंबेगावातील जनतेने दिला पाहिजे का? हाच खरां महत्वाचा विषय आहे.

कारण तालुक्यात बदल करण किंवा तोच प्रतिनिधी निवडणं हे सर्वस्वी तालुक्यातील सुजान मतदाराच्या हातात आहे. तो हक्क मतदार प्रमाणिकपणे बाजावतील यात शंका नाही. आज राज्यात साहेबाना सोडलं ही गद्दारी झाली असे भासविले जातं असले तरी काही वर्षा पूर्वी देखील राज्याचे मुख्यमंत्री होण्यासाठी शरद पवारांनी त्यावेळाचे नेते यशवंतराव चव्हाण यांच्या विरोधी भूमिका घेतली होती त्याला आपण काय? म्हणणार ती ही गद्दारीच होती ना? मग असे असताना शरद पवारांनी वळसे पाटलांना गद्दार म्हणणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा होणार नाहीत का?
दरम्यान साडेतीनशे वर्षापूर्वी गणोजी शिर्के यांनी छत्रपती संभाजी राजे सोबत केलेली गद्दारी केलेली महाराष्ट विसरला नाही असे सांगितले जाते. तर मग काही वर्षापूर्वी यशवंतराव चव्हाना बाबत झालेली गद्दारी तरी महाराष्ट कसा? विसरेल हेही महत्वाचे आहे. म्हणतात ना पेरलेले उगवते असाच काहीसा हा प्रकार म्हणावा लागेल नाही का?
आज कोणीही काहीही म्हणो परंतु १९९0अगोदर चा काळ ज्या व्यक्तींनी पाहिला त्यांनी या तालुक्यातील दुष्काळ बेरोजगारी, आर्थिक असमतोल पाहिला आहे.ते पहाता वळसे पाटलांचे योगदान तालुक्यातील जनतेने विसरणे ही सुद्धा एक गद्दारीच ठरेलं असे म्हणणे वावगे ठरणार नाही का?
तालुक्यात अनेक नेत्यांच्या सभा होत आहेत होत राहणार परंतु आपल्या तालुक्याच्या हिताचे काय? हा विचार जनतेने करायचा असतो तालुक्यात अनेक प्रश्न आहेत तालुक्यात एम आई डी सी ची गरज आहे परंतु ही एम आय डी सी सुरु झाल्यावर तालुक्यातील प्रश्न सुटणार आहेत का? आज शेजारच्या अनेक तालुक्यातील शेतकरी या मुळे गाव सोडून वरागंदा झाला आहे. हे वास्तव आहे. काही खरेदी विक्री करणारे एजंट या प्रकरणास हवा घालीत असले तरी एम आय डी सी ची आंबेगाव तालुक्यात खरच गरजेची आहे का? हा विचार होणे आवश्यक आहे.
दरम्यान शेजारी तालुक्याचे प्रश्न पहाता आंबेगाव तालुका खूप संपन्न आहे. असे सर्वांना जाणावेल परंतु शेवटी मतदार हा राजा आहे. त्याला त्यांचा मतदाणाचा हक्क आहे. व त्याने तो बजावला पाहिजे. परंतु, तो पूर्ण विचार करून….. कारण मतदानानंतर पुढील पाच वर्ष हात चोळण्याशिवाय मतदार राजाच्या हातात काहीच राहणार नाही हे नक्की, त्यामुळे विचार करा व मतदान करा…म्हणतात ना…. एकदा तोंडातून गेलेला शब्द व धनुष्यातून सुटलेला बाण परत घेता येत नाही तसेंच एकदा केलेले मतदान पुन्हा पाच वर्षे तरी सुधारता येणार नाही म्हणूनच मतदान हे सर्व श्रेष्ठ दान आहे विचारपूर्वक करणे आवश्यक आहे
सामाजिक
शासनाने “आद्य क्रांतिवीर होनाजी केंगले” यांचे जांभरी येथे राष्ट्रीय स्मारक बांधवे,: जागतिक आदिवासी दिनानिमित्त मागणी

भीमाशंकर दि (प्रतिनिधी)आदिवासी समाज्याच्या न्याय हक्कासाठी आपल्या रक्ताचे बलिदान देणाऱ्या वीर क्रांतिकारक होनाजी केंगले, बिरासा मुंडा तसेच राघोजी भांगरे यांच्या स्मुर्ती जपत जागतिक आदिवासी क्रांती दिन जांभोरी ता. आंबेगाव येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

इंग्रजी सत्तेच्या विरोधात बंड पुकारत गरीब दिन दुबळ्या आदिवासी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देत रक्त सांडणाऱ्या आदिवासी क्रांतिकारकांची जन्मभूमी जांभोरी हे गाव असून आदिवासी समाज्याचा धाण्या वाघ आदिवासी क्रांतिकारक होनाजी केंगले. बिरसा मुंडा राघोजी भांगरे निसर्गवासी माजी सभापती शंकरराव विठ्ठल केंगले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करून त्यांच्या स्मृतीना आवाहन करण्यासाठी येथील दूध डेअरी पासून आद्यक्रांतिकारक होनाजी केंगले यांच्या स्मारकपर्यंत प्रचंड रैली काढण्यात आली.

दरम्यान या वेळी प्रतिमेचे पूजन करताना जांभोरी गावच्या सरपंच सुनंदाताई पारधी.उपसरपंच बबन केंगले. पोलिस पाटील नवनाथ केंगले. बिरसा ब्रिगेड शाखा जांभोरीचे अध्यक्ष सुनिल गिरंगे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले. लखन पारधी. सागर काठे. शिक्षक पतसंस्थेचे आंबेगाव तालुका सभापती संजय केंगले. विकास पोटे. भिमा केंगले. शांताराम केंगले. दत्ता गिरंगे. किसन शेळके. पेसा अध्यक्ष मारुती केंगले. अंकुश गिरंगे. मिना केंगले. लताबाई केंगले. राजेंद्र उभे. दिगंबर केंगले. गणपत काठे. तंटामुक्ती अध्यक्ष नामदेव भोकटे. निवृत्ती केंगले. निलेश गिरंगे. नितीन गिरंगे. विठ्ठल पारधी कांताराम केंगले लक्ष्मण केंगले बबन केंगले . जांभोरी गावचे सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

त्याचप्रमाणे जांभोरी गाव हे आदिवासी क्रांतिकारकांची जन्मभूमी म्हणुन ओळखली जाते. याठीकाणी होनाजी केंगले यांचे स्मारक शासनाने निर्माण करावे अशी मागणी जांभोरी ग्रामस्थानी शासन दरबारी केली असून तत्कालीन मुख्यमंत्री. एकनाथराव शिंदे साहेब. तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब. तत्कालीन सहकारमंत्री गृहमंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब माजी खासदार शिवाजी दादा आढळराव पाटील साहेब खासदार डॉ. अमोल कोल्हे साहेब यांना निवेदन गेल्या वर्षी देण्यात आल्या असून शासन दरबारी पाठपुरावा केला जात आहे याबाबत शासनाने तात्काळ दखल घेऊन जांभोरी येथे राष्ट्रीय स्मारक बांधवे ज्यामुळे भावी पिढीला या आदिवासी क्रांतिकारकाच्या त्यागाची व बलिदानाची गाथा समजेल व यातून पुढील युवा पिढीत देशभक्ती वाढीस लागेल
दरम्यान या कार्यकामाचे आयोजन बिरसा ब्रिगेड शाखा जांभोरी. जांभोरी ग्रामविकास फाऊंडेशन जांभोरी.ग्रामविकास प्रतिष्ठान जांभोरी नांदुरकीचीवाडी. व्यंकोजी दूध उत्पादक सहकारी संस्था जांभोरी. ग्रामपंचायत कार्यालय जांभोरी. यांनी केले. कार्यक्रमानिमित आदिवासी दिवसाबद्दल माहिती विकास पोटे यांनी सांगितली तर सुत्र संचालन अंकूश गिरंगे यांनी केले.
सामाजिक
“हिरडा खरेदी” आणि “भीमाशंकर” रस्त्याच्या दुरवस्थेवरून, संतप्त आदिवासी जनतेकडून तळेघर येथे रास्ता रोको

मंचर दि.(प्रतिनिधी): श्री क्षेत्र भीमाशंकर रस्त्याची दुरावस्था व त्याचप्रमाणे हिरड्याची बंद असलेली खरेदी यांसह विविध मागण्यासाठी तळेघर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट), बिरसा ब्रिगेड, अखिल भारतीय किसान सभा आणि ट्रायबल फोरम यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
आदिवासी बांधवांचे उपजीविकेचे प्रमुख साधन असलेल्या हिरड्याची बंद असलेली खरेदी योग्य किंमतीने तातडीने सुरू करावी त्याचप्रमाणे श्री क्षेत्र भीमाशंकर रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली. सध्या श्रावण मास सुरु असलेल्याने देशाच्या कानकोपऱ्यातून लाखो शिवभक्त शिवज्योर्तिलिंगाचे दर्शनासाठी येत आहेत. परंतू भीमाशंकरकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठ्याप्रमानावर दुरावस्था झाली असून, या रस्त्याची दुरुस्ती करावी, या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.आंदोलनात मोठ्याप्रमानावर आदिवासी बांधव सहभागी झाले होते
दरम्यान आदिवासी विकास विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी घोडेगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम,तालुकाध्यक्ष धोंडीभाऊ भोर, महिला अध्यक्ष पूजा वळसे, युवक अध्यक्ष विशाल वाबळे, किसान सभेचे सचिव अशोक पेकारी, बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष संतोष तिटकारे, ट्रायबल फोरमचे अध्यक्ष सखाराम हिले, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब बाणखेले, सदानंद शेवाळे (पाटील),शेतकरी नेते माउली ढोमे, पुरुषोत्तम फदाले, शिवराम केंगले, दीपक चिमटे,के. के. तिटकारे, गणेश खाणदेशी, कृष्णा वडेकर, लखन पारधी उपस्थित होते.
“हिरडा खरेदीसाठी हमीभाव मिळावा”
माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी हिरडा खरेदीसाठी हमीभाव मिळावा आणि खरेदी लवकरसुरू व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वारंवार बैठका घेतल्या. तसेच मंचर-भीमाशंकर रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विकास विभागाला आदेश दिल्यापासून तात्पुरते खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले आहे, अशी माहिती माजी पंचायत समिती सभापती आणि आदिवासी नेते संजय गवारी यांनी दिली.
सामाजिक
अडिवरे येथे “आदिवासी स्त्रीयांसाठी मोफत आरोग्य शिबीर संपन्न”.

डिंभे दि (प्रतिनिधी)- आदिवासी स्त्रियांचे आरोग्य सुधारण्यासाठी आडीवरे ता. आंबेगाव येथे स्त्रियांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यांस महिलाकडून उत्कृष्ठ प्रतिसाद मिळाल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अमोल अंकुश यांनी दिली.
आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी पश्चिम पाट्यातील डिंभे धरणाच्या आतील बाजूस दुर्गम भागात असलेल्या आडीवरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर अडिवरे स्त्री रोग निदान आणि उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात विशेषतः पावसाळ्यात आदिवासी भागा मध्ये शेतात काम करणाऱ्या महिला वर्गा मध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या त्वचेचे आजार व साथी चे आजार पायांना कुहे होने,सर्दी,ताप,डोके दुखी, सांधे दुखी, हिमोग्लोबिन कमी होने ई. आजारा च्या तपासण्या सदर करून महिलांना मोफत औषधोपचार करण्यात आले. यात सुमारे ९३ महिलांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या.
दरम्यान या शिबिराचे उद्घाटन आदिवासी सेवक मा.शंकरराव मुदगुन यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते मा.अमोल अंकुश मार्गदर्शनाखाली करण्यात आले या शिबिरास मा.चंद्रकांत बांबळे सेवा निवृत्त कर्मचारी संघटना अध्यक्ष, मा.सखाराम गभाले (बाजार समिती संचालक) मा.संगिता किर्वे ( सरपंच), मा.रामदास भोकटे, जावजी कोकणे ई मान्यवर उपस्थित होते.
शिबिरामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र अडिवरे येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दशरथ चौरे आणि डॉक्टर प्रथमेश भोर यांनी महिलांच्या विविध आजाराविषयी माहिती देऊन त्यांच्या आरोग्य समस्या विषयी मार्गदर्शन केले या शिबिरासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र अडिवरे येथील आरोग्य निरीक्षक श्री गोविंद भारमळ.आरोग्य निरीक्षक ( हिवताप विभाग ) श्री अजय बोराडे. आरोग्य सहायिका श्रीमती विजया शिंदे. आरोग्य सेवक श्री दत्ता कंठाळे रामचंद्र असवले आरोग्य सेविका श्रीमती पोटे मॅडम, उघडे मॅडम, गिरे मॅडम सर्व आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक श्रीमती वंदना तळपे, स्वाती कोकणे यांचे सहकार्य मिळाले. शिबिरासाठी महा लॅब मंचर यांच्यावतीने प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून अविनाश पारधी यांनी काम पाहिले
-
राजकीय1 year ago
वीस वर्षांपूर्वी राजकारणात स्वतःला सिद्ध करण्यासाठी वेगळे झालेले “त्रिदेव”, पुन्हा आंबेगावच्या आसमंतात एकत्रित झळकणार
-
राजकीय1 year ago
“टायगर इज बॅक” शिरुर लोकसभेच्या मैदानात खळबळ माजणार..!
-
राजकीय10 months ago
वळसे पाटील यांना मोठा धक्का : शरद बँकेचे संचालक जयसिंग थोरात यांचा शरद पवार गटात जाहीर प्रवेश
-
राजकीय1 year ago
आयात उमेदवारांपेक्षा निष्ठावंतांना संधी द्या; उद्योगपती देवेंद्र शहा यांच्या नावाची शिरूर लोकसभेसाठी चर्चा…….
-
राजकीय10 months ago
आंबेगाव मध्ये महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर : निवडणुकीत सहभाग न घेण्याचा शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचा निर्णय
-
राजकीय1 year ago
अढळरावांनी, वळसे पाटलांची भेट घेऊन केली चौकशी
-
राजकीय12 months ago
भोसरी विधानसभा क्षेत्रातील असंख्य नाराज कार्यकर्ते भाजपाला ठोकणार रामराम: उबाठा सेनेत करणार प्रवेश?
-
सामाजिक1 year ago
“माणसात देव शोधत, सर्वसामान्यांच्या हितासाठी प्रयत्नशील राहणारा, माणसातील “देवमाणूस”….
Nilkanth Suresh Kale
November 13, 2024 at 5:18 pm
👌👌👌👌👌
Vikram Pandharinath Kale
November 13, 2024 at 6:55 pm
आंबेगाव ची सुज्ञ जनता ही विकास पुरुष नामदार दिलीपराव वळसे पाटीलचे मागे उभी आहे
⏰⏰
अशोक मोढवे
November 14, 2024 at 12:28 am
योग्य विचार मांडलेत आंबेगाव तालुक्यातील जनता सुज्ञान आहे या ठिकाणी दिलीपराव वळसे पाटीलच निवडून येणार
Arvind Ramesh Ghodekar
November 14, 2024 at 1:30 am
अगदी बरोबर आहे एमआयडीसी ची तशी तालुक्याला गरज काय काही ठराविक लोक यासाठी आग्रही आहेत पण आंबेगाव शिरूर ची जनता सुज्ञ आहे तालुक्याचा विकास काय झाला आहे हे 1990 पासून पाहिलेली मांडली या तालुक्यात अजून आहेत
Suyog
November 14, 2024 at 3:12 am
खुप छान विश्लेषण केलयं आपणं … पण तरी सुद्धा आंबेगाव ची जनता जर भावनिक होवुन मतदान करणार असेल तर त्यांच्या एवढे दुर्दैवी कोणचं नसतील
Yash nandkar
November 14, 2024 at 8:37 am
100% सहमत