Connect with us

महाराष्ट्र

निवडणुकीत भाजप संलग्न पोलीस कर्मचाऱ्यांची तोतयागिरी; गुन्हा दाखल करण्यासाठी गव्हाणेंचे पत्र

Published

on

भोसरी दि (प्रतिनिधी ) विधानसभा क्षेत्रामध्ये निवडणूक प्रचारामध्ये तोतयागिरी करणाऱ्या भारतीय जनता पक्षाशी सलंग्न पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल  करण्याची मागणी महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भोसरी विधानसभेचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रेवणनाथ लबडे यांना पत्र दिले आहे.

महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भोसरी मतदारसंघाचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी  रेवणनाथ लबडे यांना दिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे की,  भोसरी विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आमदार आमदार महेश लांडगे यांचे कार्यकर्ते पोलीस यंत्रणेतील ‘ऑन ड्युटी’ दिघी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी  स्वप्निल लांडगे, सुधीर डोळस व युनिट तीनचे शशिकांत नांगरे यांना हाताशी धरून प्रचार करण्याकरिता “खुलेआम सहकार्य” करीत आहेत.

भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक आमदारांची मर्जी राखण्यासाठी पोलिस यंत्रणा दबावाखाली काम करत आहे. त्यामुळे दिघी, चऱ्होली परिसरातील नागरिक तक्रार दाखल करण्यास घाबरत आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी या प्रकारामध्ये  नाव नमूद केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर तातडीने गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करण्यात यावी. अशी मागणी महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी केली आहे. 

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्र

“सबका साथ फक्त माझ्या परिवारचा विकास करत,सातबारांवर ताबेमारी करणाऱ्यांना घरी  पाठवा” – खा डॉ. अमोल कोल्हे 

Published

on

भोसरी दि (प्रतिनिधी)-“सबका साथ व फक्त माझ्या परिवाराचा विकास हेच ब्रीद” दिल्यासमोर ठेऊनच सातबारावर ताबेदारी करणाऱ्यांना घरी पाठवा असे आवाहन शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी केले 

 महाराष्ट विधानसभेच्या निमित्तने भोसरी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचा्रार्थ झालेल्या सभेत कोल्हे बोलत होते ते पुढे म्हणाले कि,गेल्या दहा वर्षातले भोसरीतले 184 सातबारा उतारे मी पाहिले आणि तेव्हा माझी खात्रीच पटली की उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ रविवारी भोसरीमध्ये खरेच बोलले. योगी आदित्यनाथ म्हटल्याप्रमाणे” इनका नारा सबका साथ और सिर्फ परिवार का विकास” असेच चित्र भोसरी विधानसभा मतदारसंघात दिसत आहे.

महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे भोसरी मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे व  महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकारी माजी नगरसेवक उपस्थित होते.यावेळी बोलताना डॉ कोल्हे पुढे म्हणाले, कि,भोसरी मतदारसंघांमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा झाली त्यामुळे मी बोलणे फार गरजेचे होते. योगी आदित्यनाथ या सभेत बोलताना म्हणाले “इनका नारा सबका साथ और सिर्फ परिवार का विकास ” पण त्यानंतर मी हे 184 सातबारा पाहिले तेव्हा योगी आदित्यनाथ यांचे बोलणे मला शब्दश:  पटले. हे सातबारा पाहिल्यानंतर ” इनका एक ही नारा कॉन्ट्रॅक्टर का साथ और सिर्फ परिवार का विकास” अशी स्थिती आहे. म्हणूनच भोसरी मतदारसंघांमध्ये ” तुतारी वाजवा, सातबारा वाचवा, तुतारी वाजवा भोसरी वाचवा” ही महत्त्वाची गोष्ट भोसरीकरांनी मनावर घेतली आह

दरम्यान कोले पुढे म्हणाले कि मागील सभेमध्ये मी बकासुराची गोष्ट येथील नागरिकांना सांगितली होती असे सांगून डॉ. कोल्हे म्हणाले, पुराणातील ही कथा आज काहींची प्रवृत्ती बनली आहे. या प्रवृत्तीला नष्ट करणे गरजेचे आहे .म्हणून येत्या 20 नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांचे “तुतारी वाजवणारा माणूस” या चिन्ह समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करायचे आहे.असे त्यांनी सांगितले 

डॉ. कोल्हे म्हणाले मी वैयक्तिक टीका कधीच करत नाही. पण विद्यमान आमदार व्यासपीठावरून वीस तारखे नंतर बघून घेतो अशी जर भाषा वापरत असेल तर त्यांना त्याच भाषेत उत्तर देणे गरजेचे आहे.  माझ्या माता माऊली घरातल्या प्रत्येक मुलाला सांगत असतात “उतू नको मातू नको,  कारण उतमात केल्यानंतर गर्वाचे घर हे नक्की खाली येत असते. 

“भाजपने महाराष्ट्राच्या राजकारणाला गालबोट लावले”

खासदार डॉ.अमोल कोल्हे म्हणाले ,भाजपने महाराष्ट्राच्या राजकारणाला गालबोट लावण्याचे काम केले. आतापर्यंत आपल्याला चप्पल ,शर्ट विकत घेता येतो. हे माहीत होते परंतु भाजपने 50 खोके देऊन आमदार विकत घेतले. भाजपने  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना आणि  शरदचंद्रजी पवार साहेबांनी निर्माण केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला. हे विकले गेले आणि आपल्याला नैतिकतेच्या गोष्टी शिकवतात. दिवसेंदिवस महागाई प्रचंड वाढत आहे. महाराष्ट्रातले आठ शेतकरी दररोज आत्महत्या करतात. 200 शेतकऱ्यांच्या  तिरडी महिन्याला उचलावी लागते. यांना विकासावर काहीच बोलता येणार नाही. लोकसभेत महाराष्ट्राने यांना हद्दपार केले म्हणूनच यांना लाडकी बहीण आठवली. 

“कटेंगे बटेंगे महाराष्ट्रात चालत नाही”

 खासदार डॉ.अमोल कोल्हे म्हणाले , उत्तर प्रदेशातल्या तरुणांचा रोजगारासाठी महाराष्ट्रात यावे लागते आणि त्या प्रदेशाचे मुख्यमंत्री आपल्याला कटेंगे बटेंगे सांगतात. रोजगारासाठी तिथल्या तरुणांची आंदोलने पहा. तिथल्या झाशीच्या हॉस्पिटलमध्ये आग लागून बालके मृत्यूमुखी पडतात. म्हणून मला उत्तर प्रदेशचया मुख्यमंत्र्यांना सांगावेसे वाटते की, उत्तर प्रदेशातल्या गंगा यमुनेच्या भुसभुशीत मातीत हा वीखारीपणा उगवत असेल. पण हा सह्याद्रीचा काळा पाषाण आहे. जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना एकत्र घेऊन बारा बलुतेदारांना एकत्र करून स्वराज्य निर्माण केलं. ही विधानसभा निवडणूक नागरिकांनी हातात घेतली आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही दिसून येणार आहे 

………

Continue Reading

महाराष्ट्र

मंचर येथे “दिव्यांग मतदार जनजागृती रॅली व शिबिराचे” आयोजन

Published

on

मंचर दि. (राजेश चासकर ) येथे तहसील आंबेगाव व मंचर नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने “दिव्यांग मतदार जनजागृती रॅली व शिबिर चे आयोजन केले होते.

  नगर पंचायत येथील (शुक्रवार दि २७रोजी) आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग मतदार जनजागृती रॅली व शिबिराचे   यावेळी अस्थिव्यंग- ११,अंध – २ आणि कर्णबधिर-२ असे एकूण- १५  दिव्यांग बांधव उपस्थित होते. त्याचप्रमाणे दिव्यांग मतदारांना सोबत घेऊन दिव्यांग मतदार जनजागृती रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मंचर नगरपंचायत पर्यंत काढण्यात आली.

दरम्यान दिव्यांग मतदार जनजागृती शिबिर मंचर नगरपंचायत, येथे पार पडले. यामध्ये दिव्यांग मतदारांना इ. व्ही. एम. मशीनचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.मतदान केंद्रावर दिव्यांगांसाठी असलेल्या सुविधांबाबत व्हील चेअर,रॅम्प,अंध मतदारांसाठी इ. व्ही. एम. मशीनवर ब्रेल लिपीचे आयोजन करण्यात येईल  तसेच दिव्यांगांच्या मदतीसाठी स्वयंसेवक उपलब्ध असतील असेही सांगण्यात आले .  तसेच जे दिव्यांग बांधव मतदान केंद्रावरती मतदान करण्यासाठी जाऊ शकत नाहीत अशा दिव्यांगांसाठी घरातून मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. याबाबत माहिती देण्यात आली आहे. दिव्यांगांनी आपला मतदानाचा हक्क मतदान करून पार पाडावा असे आवाहन करण्यात आले. यावेळी आंबेगाव नायब तहसीलदार – सचिन वाघ, दिव्यांग कक्ष अधिकारी शरद फड,व  श्रीमती सुजाता जाधव तसेच सर्वश्री कर्मचारी हजर होते.

Continue Reading

महाराष्ट्र

‘शेतकरी जनाक्रोष आंदोलनाचा दुसरा दिवस, तोडगा नाहीच ‘ खा. सुप्रिया सुळे व जयंत पाटील रविवारी नगरमध्ये येणार

Published

on

नगर : प्रतिनिधी

       कांदा तसेच दुधाच्या दरासंदर्भात खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली नगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या शेतकरी जनआक्रोश आंदोलनामध्ये दुसऱ्या दिवशीही काही तोडगा निघू शकला नाही.आंदोलनस्थळी शनिवारी दुपारी महिलांनी चुली पेटवून आंदोलकांसाठी झुणका भाकरीचा बेत केला होता. खा. नीलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके यांनी भाकरी बनविण्यासाठी पुढाकार घेत खा. लंके यांच्या खांद्याला खांदा लावून आपणही या आंदोलनात मागे नसल्याचे दाखवून दिले.



शुक्रवारी दुपारी खा. नीलेश लंके यांनी बैलगाडीतून जात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले. शुक्रवारी सायंकाळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांनी खा. लंके यांची भेट घेऊन चर्चा करण्याचा प्रयत्न केला, मात्र खा. लंके यांनी त्यास प्रतिसाद दिला नाही. जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी या प्रश्‍नांमध्ये ठोस भूमिका मांडावी अशी त्यांची मागणी होती. मात्र त्यानंतर जिल्हाधिकारी सालीमठ यांच्याकडून त्यास प्रतिसाद मिळाला नाही.

       शनिवारी सकाळपासून आंदोलन स्थळी शेतकरी जमण्यास सुरूवात झाली. शेतकरी येताना गायी, म्हशीही घेऊन आले होते. दिवसभरात जिल्हयातून, जिल्हाबाहेरून आलेल्या सर्वपक्षीयांनी खा.लंके यांनी पुकारलेल्या आंदोलनास पाठींबा देत लंके हेच या प्रश्‍नावर संघर्ष करून न्याय मिळवून देतील असा विश्‍वास त्यांच्याकडून व्यक्त करण्यात येत होता. लंके यांनी राज्याच्या राजधानीमध्ये आंदोलन करावे, राज्यातील लाखो शेतकरी त्यात सहभागी होतील अशी ग्वाही यावेळी विविध नेतेमंडळींकडून देण्यात येत होती.
  
  उपस्थितांशी संवाद साधताना खा.लंके म्हणाले की,रात्री मी दुग्ध विकास विभागाचा अहवाल पाहिला. त्यात दुध उत्पादनाचा खर्च ४१ रूपये इतका आहे. प्रशासनावर दबाव आहे. दबाव कोणाचा आहे हे जिल्ह्यातील जनतेला माहीती आहे.त्यामुळे प्रशासन आंदोलनाकडे दुर्लक्ष करत आहे. जिल्हाधिकारी हे जिल्हयाचे प्रमुख असतात. त्यांना कायद्याची काहीतरी माहीती असेल असे सांगत खा. लंके यांनी अप्रत्यक्षपणे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर खापर फोडले. 
आमच्या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे ही आमची मागणी आहे. आम्ही भिक मागतो का ? आमच्या हक्काचे मागतो ना ? दुधाला इतर राज्यात  गुजरातमध्ये ४२ रूपये, पंजाबमध्ये ४५ रूपये, तामीळनाडूमध्ये ४३ रूपये दर मिळतो. मग महाराष्ट्रात असे का ? सरकार सांगते आहे की, अनुदान देतो. चार महिन्यांपूर्वी दुधाला जाहिर केलेेले अनुदान २ टक्के शेतकऱ्यांना तरी मिळाले का ? दोन टक्के शेतकऱ्यांना अनुदान मिळाले तर पुढाऱ्यांमध्ये धनादेश वाटपासाठी स्पर्धा लागली होती. अनुदानासाठी कागदपत्रे गोळा करण्यास भाग पाडून शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू आहे असा आरोप खा. लंके यांनी केला.

   दरम्यान आज,शनिवारी अनेक आंदोलक जनावरांसह आंदोलनस्थळी पोहचले.शुक्रवारी आंदोलन सुरू झाले त्यावेळी काही शेतकऱ्यांनी जनावरे आणली होती.शनिवारी मात्र जनावरांमध्ये आणखी वाढ झाली.काही आंदोलक शेळ्या,मेंढ्या व कोंबड्यांसह आंदोलनात सहभागी झाले होते.जनावरांसाठी कार्यकर्त्यांकडून चारा, पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.खा.लंके यांनी आज सकाळी आंदोलनस्थळी असलेल्या गायींच्या धारा काढल्या.




राणीताईंच्या नेतृत्वाखाली झुणका भाकरीचा बेत

खा. नीलेश लंके यांच्या पत्नी, जि. प. च्या माजी सदस्या राणीताई लंके यांच्या नेतृत्वाखालील महिलांनी आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांच्या जेवणासाठी आंदोलस्थळीच चुली पेटविल्या. राणीताई लंके या भाकरी तयार करण्यासाठी सरसावल्या. इतर महिलांनीही त्यांना मदत केली. काही महिलांनी झुणका तयार करून उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना झुणका भाकरीचे जेवण देण्यात आले. खा. नीलेश लंके यांनीही कार्यकर्त्यांसमवेत या झुणका भाकरीचा आस्वाद घेतला.

  • खा. नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खा. सुप्रिया सुळे सकाळी साडेनऊ वाजता तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सकाळी अकरा वाजता आंदोलनस्थळी भेट देणार आहेत. जिल्हयातील सर्व शेतकरी बांधव, महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले.
Continue Reading
Advertisement

Trending