singa8

rp8888

singa8

slot demo

slot qris

singa8

rp8888

https://bertrodriguez-museum.org

https://journal.uecommercebintaro.ac.id/

singa8

singa8

singa8

singa8

singa8

singa8

singa8

singa8

92GLORY

http://vecas.org.vn/id/

https://admire.ch/vendor/

Connect with us

सामाजिक

“कथाकथित पुढारी” वाढदिवसाला भरवून “बैलगाडाच्या शर्यती”…. त्यामुळे शेतकऱ्याच्या तरुण मुलांच्या भविष्याची होतेय का माती?….. 

Published

on

मंचर दि-(प्रतिनिधी) ग्रामीण भागातील तरुण विद्यार्थी हा  शाळा महाविद्यालयात दिसण्याऐवजी गावोगावी बैलगाडा घाटात मावा गुटका गांजा दारू  आदी मादक पदार्थ्यांच्या विळख्यात अडकून, तरुण पिढी बरबाद होण्याच्या उंबरठ्यावर आहे. यासाठी विचार होणे गरजेचे आहे.

काही वर्षापूर्वी बैलगाडा शर्यतीवर काही पर्यावरण प्रेमीनीं न्यायालयात धाव घेऊन बंद करण्याविषयी याचिका दाखल करून या शर्यतिमधून मुक्यापाळीव प्राण्यावर कशाप्रकारे  अत्याचार होतो?  हे दाखवून देत  बैलगाडा  शर्यतीवर बंदी आणली त्यानंतर ग्रामीण भागातील  बळीराजाने यांस विरोध दर्शवीला बैलगाडा सुरु व्हावा यासाठी अनेक समर्थक संघटना या साठी धावून आल्या न्यायालयात लढाई लढण्यात आली परंतु निसर्ग मित्र संघटनाही एकत्रित होऊन पाळीव प्राण्यांच्या अत्याचाराची गांथा न्यायालयात मांडत अनेक वर्ष लढत होत्या. परंतु बैलगाडा या स्पर्धा सुरु होणे दुरास्पद वाटतं होते अखेर बैलगाडा शर्यत हा परंपरागत असलेला खेळ पुन्हा सुरु व्हावा. याकरिता शासनाने आपली बाजू न्यायालयात प्रखरपणे मांडली व अखेर शेतकऱ्याची बाजू ऐकत न्यायालयाने या शर्यतींना परवानगी दिली. याचे जन्मानसातून पेढे वाटतं कौतुक हि करण्यात आले. परंतु हिच बैलगाडा शर्यत शेतकऱ्याच्या पोराच्या भविष्याची काळोखमय याताना होण्याची चिन्हे दिसत आहेत. 

     गेली अनेक पिढ्यांपासून सुरु असलेली “बैलगाडा शर्यत” खरी तर खूप पुरातन काळापासुन सुरु असल्याचे बोलले जाते. असे म्हणतात  जुन्या काळात अनेक लोक आपल्या कुटुंबासमवेत खंडोबाला दर्शनासाठी जातं त्यावेळी प्रवास हा बैलगाडीनेच होता.जेजुरीसारख्या तीर्थस्थानी गेल्यानंतर तिथे खंडोबाच्या नावाने भंडारा उधळत “बैलगाडा” घाटात पळविण्याची प्रथा सुरु झाली. नंतर त्याचा प्रसार होऊन  गावोगावीच्या  ग्रामदैवतांच्या  यात्रांमध्ये बैलगाडे पळविले जावू लागले. अशाप्रकारे बैलगाडा शर्यतींचा  प्रसार झाल्याचे जुन्यापिढीच्या  मंडळींकडून सांगितले जाते.

परंतु  शर्यतींनी इतके भयावह रूप घेण्यास सुरुवात केली आहे कि त्यामुळे ग्रामीण भागातील शेकडो शेतकऱ्यांची कुटुंबे बरबादीच्या उंबरठ्यावर असल्याचे चित्र पाहावायास मिळत आहे.आता  या स्पर्धानी  वेगळेच उग्र  वळण घेतलेले दिसते. ग्रामदैवताच्या यात्रा सोबत इतर  विविध देवातांच्या यात्रेसाठी हि या स्पर्धाचे आयोजन सुरु झाले  अनेक कथाकथित  राजकीय पुढारी आपल्या वाढदिवसानिमित्ताने या स्पर्धाचे आयोजन करीत आहेत यात त्या मुक्या प्राण्याची ओढातान तर होतच आहे. परंतु या स्पर्धाँमुळे तरुणांई मात्र भरकटू लागल्याचे दिसत आहे. आज या बैलागाडा शर्यतिमुळे संपूर्ण उत्तर पुणे जिल्ह्यात युवक वर्ग भरकटत चालला असून अधिकाधिक व्यसनाधीन होत असल्याचे चित्र सर्वत्र पहावायास मिळत आहे.

दरम्यान आज बैलगाडा शर्यतिमुळे शाळा महाविद्यालये ओस पडत असून बैलगाडा घाट मात्र तरुणांईने प्रफुल्लित होत. या ठिकाणी मादक पदार्थाचे सेवनही होत असल्याचे विरादक चित्र सर्वत्र पहावायास मिळत आहे. बैलगाडा शर्यती बंद  कराव्यात यातून हि मागणी नाही तर, फक्त आपले ग्रामदैवत यात्रेत शर्यत भरवावी व  जे गावकरी पुढऱ्याच्या हाताचे खेळणं होऊन कथाकथित पुढऱ्याच्या  सवंग लोकप्रियतेसाठी  त्यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडा शर्यती भरवून तरुणाईला नादाला लावून आसुरी आनंद घेत आहेत.  ते आपल्या सोबत या समाज्याचेही नुकसानच करत आहेत. त्यासोबत आपल्याच पुढील पिढ्या बरबाद करित आहेत हे तेव्हढेच सत्य आहे.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सामाजिक

आदिवासी भागातील शेतकऱ्याच्या शेतीचे पंचांनामे करून त्वरित नुकसान भरपाई द्यावी -मारुती केंगले

Published

on

डिंभे दि. (प्रतिनिधी) आंबेगाव तालुक्याचे पश्चिम आदिवासी भागातील बळीराजाचे एकमेव उत्पन भात व हिरडा पिकांचे नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने प्रचंड नुकसान झाले असून याचे पंचांनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे वतीने मारुती  केंगले यांनी केली आहे.

नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱऱ्यांच्या कुटुंबाच्या तोडचा घासच पाळवीला आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड अतोनात नुकसान होऊन शेतकरी देशोधडीला लागल्याचे दिसत आहे. अशा कठीण प्रसंगी शासकीय मदतीची शेतकऱ्यांना गरज आहे पण शासनाकडून अद्यापही कोणत्याही मदतीबाबत दिलासादायक घोषणा अद्यापहि झालेली नाही त्यामुळे ऐन दीपावळीच्या काळात अनेकांची घरे दिव्यांनी उजाळालेली असतील परंतू महाराष्ट्रातील बळीराजच्या घरात अंधार असेल अशीच काही परिस्थिती दिसत आहे.

 तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात एकमेव पिक भात शेती आणि हिरडा हिरड्याला बाजार भाव आता सध्या  १०० रुपये इतका भाव आहे परंतू आदिवासी भागात पावसामुळे हिरडा पीक मोठ्याप्रमानावर सडून खराब झाले आहे. मे ते ऑक्टोबर सलग ५ महिच्या कालावधित झालेल्या मुसळधार पावसामुळे भातपिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊन भात पीक वाया गेले आहे तर अनेक ठिकाणी भातशेती पावसामुळे सडून गेली आहे.त्यामुळे पिकांची पंचनामे करून आदिवासी शेतकऱ्याला मदतीचा हात मिळावा यासाठी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले तालुक्याचे तहसिलदार कार्यालयास दिले असून निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी साहेब. प्रांत अधिकारी गोविंद शिंदे साहेब आंबेगाव तालुक्याचे आमदार व  माजी गृहमंत्री  दिलीपराव वळसे पाटील यांना देण्यात आले असून याबाबत त्वरित कार्यवाही ना झाल्यास नाजिकच्या काळात शेकऱ्यांच्या हितासाठी  भिमाशंकर रस्त्यावर तीव्र आंदोलनाचा इशारा केंगले यांनी दिला आहे.

Continue Reading

सामाजिक

जांभोरी येथे कुस्ती तालीम इमारत भूमिपूजन सोहळा संपन्न

Published

on

घोडेगाव दि (प्रतिनिधी ) जांभोरी (ता आंबेगाव)पासून जवळच असलेल्या माचीचीवाडी या ठिकाणी कुस्तीसाठी तालीम इमारतिचा भूमिपूजन समारंभ उत्साहात पार पाडला

आजच्या धाकधकीच्या काळात तरुणांई मोबाईल व गेम यात अडकून ना रहाता शारीरिक तंदृस्तीकडे आकर्षित व्हावी या हेतूने सुरु होत असलेल्या कुस्ती तालीम इमारतीसाठी  येथील वसंत वालकोळी,बबन केंगले, भिवा वालकोळी, अनंता वालकोळी, यांनी ११गुंठे जमीन दिली आहे त्याचप्रमाणे  महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री सहकारमंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील यांनी दहा लाख रुपयांचा निधी तालमीच्या प्रत्यक्ष बांध कामासाठी मंजूर केला आहे यासाठी आदिवासी भागाचे नेते सुभाषराव मोरमारे साहेब  संजय गवारी, प्रकाश घोलप, यांनी परीश्रम घेतले आहेत

 दरम्यान जांभोरी गावचे लोकनियुक्त सरपंच सुनंदाताई पारधी, पोलिस पाटील  नवनाथ केंगले, पोलिस पाटील सोनाली पोटे, ज्ञानेश्वर पारधी. पुनाजी पारधी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले,  श्री व्यंकोजी कुस्तीगीर तालीम संघटना जांभोरीचे अध्यक्ष भिवा वालकोळी, शिवाजी केंगले , सखाराम केंगले,  खरेदी विक्री संघाचे संचालक शामराव बांबळे, ग्रामपंचायत सदस्य दुंदा भोकटे, ग्रामपंचायत सदस्य शिवराम केंगले,किसन पोटे, अनंता वालकोळी, सुनिल वालकोळी, नामदेव भोकटे, घोडेगाव  पोलिस शिवाजी जनार्दन  केंगले, सुरेश केंगले,संजय केंगले, ग्रामसेवक सुनिल पारधी, कृषी सेवक सुनिल लोहकरे, भिवा केंगले, चंद्रकांत केंगले, पांडुरंग केंगले,राज केंगले,गफुरशेठ तांबोळी,सर्व जांभोरी ग्रामस्थ उपस्थित होते. 

Continue Reading

सामाजिक

हजारो कोस दूर असूनही संकटप्रसंगी आपल्या मायभूमीतील माणसांच्या  मदतीला धावणारी आंबेगावची कन्या….सौ.माधुरी श्रीकांत पवार

Published

on

मंचर दि. (प्रतिनिधी) -“नवदुर्गेचा सन्मान तू…परोपकारची खाण तू…. सर्वांचा अभिमान तू…….श्री शक्तीचा मान तू…… जन्मभूमीची ठेवी जाण तू”….. संपूर्ण महाराष्ट्रावर महा पुराचे संकट आले असताना हजारो कोस दूर अमेरिकेत असूनही आपल्या माय भूमितील आपल्या माणसांच्या मदतीसाठी धावणारी आंबेगाव ची कन्या “माधुरी ताई ” हि खरोखरच सर्वांचे प्रेरणादायी स्थान ठरली आहे.

गेल्या काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात  पावसाने थैमान माजविले असून यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून संपूर्ण महाराष्ट्रातील शेकडो कुटुंबे महापुराच्या तडाख्याने रस्त्यावर आली आहेत. महाराष्ट्रात निर्माण झालेल्या महापुराणे अनेक जण बेघर झाले आहेत अशा हतबल परिस्थितीत परोपकारच्या शिकवणीतून निर्माण झालेल्या माधुरी श्रीकांत पवार यांनी आपल्या मायभूमीचे पांग फेडण्याचा प्रयत्न केला आहे. तिच्या या निर्णयाने तिच्या जन्मदात्या मातापित्याचे उर अगदी अभिमानाने भरून आले असेल यात शंका नाही

आपल्या माय भूमितील आपल्या माणसाबद्द्ल मधुर्याचा ओलावा असलेल्या माधुरी ताईने  तीला शक्य होईल तेव्हढी मदत करीत आपले कर्तव्य बाजावण्याचा प्रयत्न केला आहे. ती आपल्या संभाषणात सांगते कि,

“मी “माधुरी श्रीकांत पवार”महाराष्ट्रातील अतिवृष्टी मुळे झालेल्या पूरग्रस्त घटना व नुकसान टीव्हीवर पाहत होते खूप वाईट वाटत होते, तसेच व्हाट्सअप वर  वळसे पाटील साहेबांनी केलेल्या आवहानामुळे माझ्या जन्मभूमीत असलेल्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीने माझ्या शेतकऱ्यांची फार मोठ्या प्रमाणात हानी झाली. सर्वात मोठे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यांना मी माझे आदर्श व सतत समाजाचा विचार करणारे माननीय दिलीपराव वळसे पाटील साहेब माजी गृहमंत्री यांच्या प्रेरणेने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना छोटीशी मदत माझ्या कृतीप्रमाणे पाठवीत आहे.”

 खरेतर “माधुरी ताई”  यांनी केलेली मदत हि पुरांनातील त्या टिटवीची आठवण करून देते कि जिने आपल्या मुलांना वाचविण्यासाठी समुद्र अटविण्याचा निर्धार केला शेवटी परमेश्वराला हि येऊन तिची मदत करावी लागली. आज या ताईंनी केलीली मदत हि अनेकांना आपल्या मायभूमी बद्द्लचे कर्तव्य बजावण्याची शिकवण देते यात शंका नाही. हा देश माझा आहे या देशाला देव भूमी म्हटले गेले आहे या ठिकाणी जन्म मिळणे हि  खरेतर सन्मानांची गोष्ट आहे. माधुरी यांनी केलेले हे कार्य सर्वांसाठी एक शिकवण आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यामुळे माधुरी पवार यांच्या प्रमाणे आपापल्या परीने मदत करा.चला सारे एक होऊया आपल्या देश बांधवांना पुन्हा उभे करण्यासाठी मदतीचा हात देऊया…..

Continue Reading
Advertisement

Trending

Best Replica Watches UK