सामाजिक
मंचर शहराच्या कारभाराची स्थिती, म्हणजे “अंधेर नगरी आणि चौपट राजा” सारखी…..

मंचर दि- (प्रतिनिधी) शहरांच्या विकास कामे प्रचंड नियोजन शून्य पद्धतीने सुरु असल्याची चर्चा असल्यामुळे नगराचा कारभार म्हणजे “अंधेर नगरी आणि चौपट राजा” अशी असल्याची उत्फूर्त प्रतिक्रिया अनेक नागरिक खाजगीत देत असल्याचे चित्र आहे.
मंचर शहराला सामाजिक, धार्मिक, शौक्षणिक, क्रीडा, राजकीय,दृष्ट्या विविध क्षेत्रात प्रचंड वारसा आहे. मंचर शहरातील अनेक व्यक्तींनी विविध क्षेत्रात प्रचंड नावलौकिक मिळविला आहे. आजही अशा अनेक प्रतिभावंत व्यक्तींची नावे मोठ्या आदरांने घेतली जातात. मंचर शहर हे आंबेगाव तालुक्याचे व्यापारी दृष्ट्या प्रमुख केंद्र असून या ठिकाणी अनेक गावातील नागरिक महिला आबाल दृढ विविध कामासाठी येत असतात त्यामुळे या ठिकाणी घडणाऱ्या कला क्रीडा शौक्षणिक राजकीय व सामाजिक घडामोडींचा परिणाम तालुक्याच्या विविध छोट्या गावांवर होतो.
त्याचप्रमाणे गेल्या काही दिवसांत मंचर शहराची विकासाची घडी विस्कटल्या सारखीच झाली असल्याचे बोलले जातं आहे. म्हणतात ना…. “मांजर झाले जाड, अन उदरांचा झाला सुळसुळाट” या उक्ती प्रमाणे शहरासाठी योगदान असलेल्या चांगल्या ग्रामस्थांच्या विचारांना तिलांजली देत प्रशासनाने काही कथाकथित गाव पुढारी व ठेकेदार यांच्या फायाद्यासाठी विकास कामे सुरु केली असून हि सर्व कामे अतिशय नियोजन शून्य पद्धतीने केली जातं असल्याचर ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
दरम्यान मंचर शहराच्या विकासाठी विविध पक्षाच्या राजकीय नेत्यांनी तसंचे तालुक्याचे आमदार व माजी खासदार तसेच आदी लोकप्रतिनिधिंनी कोट्यावधी रुपयांचा निघी मंचर शहराच्या विकासासाठी उपलब्ध करून दिला.परंतु नगर पंचायातीत प्रशासकीय कारभार असल्यामुळे गावंच्या विकासाबाबत शहरांतील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या चांगल्या व्यक्तींना विचारात न घेता काही कथाकथित गाव पुढऱ्यांच्या सांगण्यावरून प्रशासनाने गावात विविध विकास कामांचे नारळ फोडले व कोट्यावधी रुपयांची विकास कामे सुरु करून विकास निधीची लाईलूट केली जातं असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
दरम्यान शहरात सुरु करण्यात आलेली अनेक विकास कामे अतिशय नित्कृष्ट दर्जाची असून ती कामे शहरांच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून व शहराच्या दृष्टीने पुढील काही वर्षाचे नियोजन डोळ्या समोर धरून विचार करणे आवश्यक होते परंतु वाढत्या शहरांच्या विकासाच्या दृष्टीने नियोजन करण्या ऐवजी अतिशय नियोजनशून्य पद्धतीने विकास कामे करण्यात आली आहेत असे विविध जाणकाराचे मत आहे.त्यामुळे शहराच्या विकासाची अवस्था पाहून नगर पंचायतीच्या कारभाराबद्दल नागरिकांमध्ये प्रचंड आक्रोश असून शहरात सुरु असलेल्या कामांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान मंचर ग्रामपंचायतीचे, नगर पंचायत पंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर शहरात जनतेच्या गरजेची विविध योग्य कामे होतील अशी नागरिकांची अपेक्षा होती कारण मंचर शहरात तालुक्याच्या विविध गावातून अनेक नागरिक मोठ्या प्रमाणावर येतात परंतु याठीकाणी येणाऱ्या व्यक्तीसाठी स्वच्छाता गृह नाहीत. राज्य सरकार लाडक्या बहिणींच्या सन्मानबाबत गतिशील असताना मात्र मंचर शहरात मात्र महिला वर्गासाठी साधे स्वच्छतागृह नगर पंचायतीला उभे करता आले नाही. मात्र नगर पंचायतीने उपलब्ध जागेवर नियोजन शून्य पद्धतीने बिल्डिंग उभ्या करवून त्यातून कोणाचे हात ओले करण्याचा प्रयत्न केला जातं आहे असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारीत आहेत.
सामाजिक
आदिवासी भागातील शेतकऱ्याच्या शेतीचे पंचांनामे करून त्वरित नुकसान भरपाई द्यावी -मारुती केंगले

डिंभे दि. (प्रतिनिधी) आंबेगाव तालुक्याचे पश्चिम आदिवासी भागातील बळीराजाचे एकमेव उत्पन भात व हिरडा पिकांचे नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने प्रचंड नुकसान झाले असून याचे पंचांनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे वतीने मारुती केंगले यांनी केली आहे.
नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱऱ्यांच्या कुटुंबाच्या तोडचा घासच पाळवीला आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड अतोनात नुकसान होऊन शेतकरी देशोधडीला लागल्याचे दिसत आहे. अशा कठीण प्रसंगी शासकीय मदतीची शेतकऱ्यांना गरज आहे पण शासनाकडून अद्यापही कोणत्याही मदतीबाबत दिलासादायक घोषणा अद्यापहि झालेली नाही त्यामुळे ऐन दीपावळीच्या काळात अनेकांची घरे दिव्यांनी उजाळालेली असतील परंतू महाराष्ट्रातील बळीराजच्या घरात अंधार असेल अशीच काही परिस्थिती दिसत आहे.
तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात एकमेव पिक भात शेती आणि हिरडा हिरड्याला बाजार भाव आता सध्या १०० रुपये इतका भाव आहे परंतू आदिवासी भागात पावसामुळे हिरडा पीक मोठ्याप्रमानावर सडून खराब झाले आहे. मे ते ऑक्टोबर सलग ५ महिच्या कालावधित झालेल्या मुसळधार पावसामुळे भातपिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊन भात पीक वाया गेले आहे तर अनेक ठिकाणी भातशेती पावसामुळे सडून गेली आहे.त्यामुळे पिकांची पंचनामे करून आदिवासी शेतकऱ्याला मदतीचा हात मिळावा यासाठी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले तालुक्याचे तहसिलदार कार्यालयास दिले असून निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी साहेब. प्रांत अधिकारी गोविंद शिंदे साहेब आंबेगाव तालुक्याचे आमदार व माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांना देण्यात आले असून याबाबत त्वरित कार्यवाही ना झाल्यास नाजिकच्या काळात शेकऱ्यांच्या हितासाठी भिमाशंकर रस्त्यावर तीव्र आंदोलनाचा इशारा केंगले यांनी दिला आहे.
सामाजिक
जांभोरी येथे कुस्ती तालीम इमारत भूमिपूजन सोहळा संपन्न

घोडेगाव दि (प्रतिनिधी ) जांभोरी (ता आंबेगाव)पासून जवळच असलेल्या माचीचीवाडी या ठिकाणी कुस्तीसाठी तालीम इमारतिचा भूमिपूजन समारंभ उत्साहात पार पाडला
आजच्या धाकधकीच्या काळात तरुणांई मोबाईल व गेम यात अडकून ना रहाता शारीरिक तंदृस्तीकडे आकर्षित व्हावी या हेतूने सुरु होत असलेल्या कुस्ती तालीम इमारतीसाठी येथील वसंत वालकोळी,बबन केंगले, भिवा वालकोळी, अनंता वालकोळी, यांनी ११गुंठे जमीन दिली आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री सहकारमंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील यांनी दहा लाख रुपयांचा निधी तालमीच्या प्रत्यक्ष बांध कामासाठी मंजूर केला आहे यासाठी आदिवासी भागाचे नेते सुभाषराव मोरमारे साहेब संजय गवारी, प्रकाश घोलप, यांनी परीश्रम घेतले आहेत
दरम्यान जांभोरी गावचे लोकनियुक्त सरपंच सुनंदाताई पारधी, पोलिस पाटील नवनाथ केंगले, पोलिस पाटील सोनाली पोटे, ज्ञानेश्वर पारधी. पुनाजी पारधी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले, श्री व्यंकोजी कुस्तीगीर तालीम संघटना जांभोरीचे अध्यक्ष भिवा वालकोळी, शिवाजी केंगले , सखाराम केंगले, खरेदी विक्री संघाचे संचालक शामराव बांबळे, ग्रामपंचायत सदस्य दुंदा भोकटे, ग्रामपंचायत सदस्य शिवराम केंगले,किसन पोटे, अनंता वालकोळी, सुनिल वालकोळी, नामदेव भोकटे, घोडेगाव पोलिस शिवाजी जनार्दन केंगले, सुरेश केंगले,संजय केंगले, ग्रामसेवक सुनिल पारधी, कृषी सेवक सुनिल लोहकरे, भिवा केंगले, चंद्रकांत केंगले, पांडुरंग केंगले,राज केंगले,गफुरशेठ तांबोळी,सर्व जांभोरी ग्रामस्थ उपस्थित होते.
सामाजिक
हजारो कोस दूर असूनही संकटप्रसंगी आपल्या मायभूमीतील माणसांच्या मदतीला धावणारी आंबेगावची कन्या….सौ.माधुरी श्रीकांत पवार

मंचर दि. (प्रतिनिधी) -“नवदुर्गेचा सन्मान तू…परोपकारची खाण तू…. सर्वांचा अभिमान तू…….श्री शक्तीचा मान तू…… जन्मभूमीची ठेवी जाण तू”….. संपूर्ण महाराष्ट्रावर महा पुराचे संकट आले असताना हजारो कोस दूर अमेरिकेत असूनही आपल्या माय भूमितील आपल्या माणसांच्या मदतीसाठी धावणारी आंबेगाव ची कन्या “माधुरी ताई ” हि खरोखरच सर्वांचे प्रेरणादायी स्थान ठरली आहे.
गेल्या काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने थैमान माजविले असून यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून संपूर्ण महाराष्ट्रातील शेकडो कुटुंबे महापुराच्या तडाख्याने रस्त्यावर आली आहेत. महाराष्ट्रात निर्माण झालेल्या महापुराणे अनेक जण बेघर झाले आहेत अशा हतबल परिस्थितीत परोपकारच्या शिकवणीतून निर्माण झालेल्या माधुरी श्रीकांत पवार यांनी आपल्या मायभूमीचे पांग फेडण्याचा प्रयत्न केला आहे. तिच्या या निर्णयाने तिच्या जन्मदात्या मातापित्याचे उर अगदी अभिमानाने भरून आले असेल यात शंका नाही
आपल्या माय भूमितील आपल्या माणसाबद्द्ल मधुर्याचा ओलावा असलेल्या माधुरी ताईने तीला शक्य होईल तेव्हढी मदत करीत आपले कर्तव्य बाजावण्याचा प्रयत्न केला आहे. ती आपल्या संभाषणात सांगते कि,
“मी “माधुरी श्रीकांत पवार”महाराष्ट्रातील अतिवृष्टी मुळे झालेल्या पूरग्रस्त घटना व नुकसान टीव्हीवर पाहत होते खूप वाईट वाटत होते, तसेच व्हाट्सअप वर वळसे पाटील साहेबांनी केलेल्या आवहानामुळे माझ्या जन्मभूमीत असलेल्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीने माझ्या शेतकऱ्यांची फार मोठ्या प्रमाणात हानी झाली. सर्वात मोठे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यांना मी माझे आदर्श व सतत समाजाचा विचार करणारे माननीय दिलीपराव वळसे पाटील साहेब माजी गृहमंत्री यांच्या प्रेरणेने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना छोटीशी मदत माझ्या कृतीप्रमाणे पाठवीत आहे.”
खरेतर “माधुरी ताई” यांनी केलेली मदत हि पुरांनातील त्या टिटवीची आठवण करून देते कि जिने आपल्या मुलांना वाचविण्यासाठी समुद्र अटविण्याचा निर्धार केला शेवटी परमेश्वराला हि येऊन तिची मदत करावी लागली. आज या ताईंनी केलीली मदत हि अनेकांना आपल्या मायभूमी बद्द्लचे कर्तव्य बजावण्याची शिकवण देते यात शंका नाही. हा देश माझा आहे या देशाला देव भूमी म्हटले गेले आहे या ठिकाणी जन्म मिळणे हि खरेतर सन्मानांची गोष्ट आहे. माधुरी यांनी केलेले हे कार्य सर्वांसाठी एक शिकवण आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यामुळे माधुरी पवार यांच्या प्रमाणे आपापल्या परीने मदत करा.चला सारे एक होऊया आपल्या देश बांधवांना पुन्हा उभे करण्यासाठी मदतीचा हात देऊया…..
-
राजकीय2 years ago
वीस वर्षांपूर्वी राजकारणात स्वतःला सिद्ध करण्यासाठी वेगळे झालेले “त्रिदेव”, पुन्हा आंबेगावच्या आसमंतात एकत्रित झळकणार
-
राजकीय1 year ago
“टायगर इज बॅक” शिरुर लोकसभेच्या मैदानात खळबळ माजणार..!
-
राजकीय11 months ago
वळसे पाटील यांना मोठा धक्का : शरद बँकेचे संचालक जयसिंग थोरात यांचा शरद पवार गटात जाहीर प्रवेश
-
राजकीय2 years ago
आयात उमेदवारांपेक्षा निष्ठावंतांना संधी द्या; उद्योगपती देवेंद्र शहा यांच्या नावाची शिरूर लोकसभेसाठी चर्चा…….
-
राजकीय12 months ago
आंबेगाव मध्ये महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर : निवडणुकीत सहभाग न घेण्याचा शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचा निर्णय
-
राजकीय1 year ago
अढळरावांनी, वळसे पाटलांची भेट घेऊन केली चौकशी
-
राजकीय1 year ago
भोसरी विधानसभा क्षेत्रातील असंख्य नाराज कार्यकर्ते भाजपाला ठोकणार रामराम: उबाठा सेनेत करणार प्रवेश?
-
सामाजिक1 year ago
“माणसात देव शोधत, सर्वसामान्यांच्या हितासाठी प्रयत्नशील राहणारा, माणसातील “देवमाणूस”….