सामाजिक
आदिशक्ती मळगंगेच्या “भाळीचा ईश्वर”, चिंचोली(कोकणे) येथील शिव मंदिर “कपालेश्वर”

मंचर दि. (संजय कोकणे पाटील ) “आदिशक्तीच्या भाळीचा ईश्वर म्हणजेच आंबेगाव तालुक्यातील चिंचोली(कोकण्यांची) येथील कपालेश्वर महादेव होय……महाराष्ट्रातील साडेतीन पिठांपैकी एक असलेल्या माहूर गडाची रेणुका मातेचं पीठ असून, आदिशक्ती रेणुका माता विश्वजणनी आहे.कार्ला लेणी येथील एकविरा माता , कर्नाटकातील यल्लमा, व निघोजची मळगंगा हि आदिशक्ती रेणुका मातेची रूपे असल्याचे सांगितले जाते.

जुन्या पिढीच्या व्यक्तींकडून अशी आख्यायिका सांगितली जाते कि, “आदिशक्ती मळगंगा मातेचे” वास्तव्य चिंचोली येथील ढुम्या डोंगराजवळ होते .या काळात “धूम” नामक दैत्याने भगवान शंकरांना प्रसन्न करून वर प्राप्त केला होता. त्यानंतर निर्माण झालेल्या अहंकारापोटी “धूम” दैत्याने मानवासहित देवांना ही, घाबरून सळो कि पळो करून सोडले होते. या “धूम” राक्षसाचा वध करून पुन्हा धर्माची स्थापना व्हावी. यासाठी देवतांनी भगवान शंकरांचे आवाहन केले. परंतु “धूम” दैत्याचा वध “आदिशक्तीच्या” हातुनच होणार असल्याने, भगवान शंकरासोबत सर्व देवातांनी आदिशक्तीचा धावा केला.व आदिशक्तीने प्रसन्न होऊन मळगंगा मातेचा अवतार घेऊन या “धूम” दैत्याचा वध केला. व त्या दैत्याच्या अत्याचारातून सर्वांची सुटका केली.

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात घोड नदीच्या पवित्र तिरावर चिंचोली (कोकण्यांची) येथे “कपालेश्वर महादेव” या नावाने पवित्र प्राचीन शिव मंदिर आहे. या मंदिरास कपालेश्वर महादेव मंदिर म्हणून ओळख आहे. खरंतर सनातन धर्मा प्रमाणे स्त्री च्या कपाळावरचा मळवट म्हणजेच कुंकू व कपाळावरील कुंकवास “पतीचेदेवाचे ” प्रतीक म्हणून ओळखले जाते. हिंदू धर्मात पतीला परमेश्वराचे स्थान समजले जाते . व कपाळावरील मळवट(कुंकू) हे स्त्रीच्या पती परमेश्वराचे वास्तव्य दाखववितो म्हणजेच आदिशक्ती मळगंगेच्या कपाळावरील मळवट रूपाने म्हणजेच कुंकू रूपाने असलेला ईश्वर तोच कपालेश्वर महादेव होय…..

आदिशक्ती मळगंगा मातेचा निवास नगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यात मानला जातो. परंतु आदी शक्तीची मळगंगा मातेचे एक स्थान आंबेगाव तालुक्यातील चिंचोली कोकणे याठिकाणी आहे. चिंचोली कोकण्यांची या सुमारे दीड हजार वस्तीच्या छोट्याशा गावांत श्री कपालेश्वर महादेवांचे एक अनोखं भव्य मंदिर शेकडो वर्षांपासून उभे असून हे मंदिर या गावचे ग्रामदैवत आहे. या कपालेश्वर मंदिरात प्राचीन काळापासुन अतिशय सुंदर आणि आकर्षक शिवलिंग आहे. या मंदिर व मंदिराचा गाभारा याचे अतिशय सुरेख दगडी बांधकाम जुन्या काळात करण्यात आलेले आहे.तसेच नदीकाठचा परिसर निसर्गाच्या अनोख्या अविष्काराची साक्ष देतो त्यामुळे येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकाच्या मनात सकारात्मकता व प्रसन्नता निर्माण होते. तसेच भाविकांच्या मनोकामना पूर्ण करणारे जागृत देवस्थान म्हणून या मंदिराची ओळख आहे.

कपालेश्वर महादेव यात्रा दरवर्षी माघ शुद्ध दशमी या पवित्र शुभ मुहूर्तावर यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न होत असते. दरवर्षी यात्रा उत्सवाच्या निमित्त गावामध्ये हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते पंचक्रोशीतील भक्त भाविकांसाठी ही एक पर्वणीच असते.त्यासोबत कुस्त्यांचा जंगी आखाडा, हारतुरे यांची भव्य मिरवणूक काढली जाते. गावातील पुरुषाबरोबरच सर्व महिला पाण्याच्या घागरी घेऊन मिरवणुकीमध्ये सहभागी होतात. लेझीम, ढोल, वाजंत्री या पारंपारिक वाद्यांच्या मंगल गजरामध्ये अतिशय भव्य व नेत्रदीपक मिरवणूक सर्वांचे आकर्षन ठरते करते. नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने मुंबई, पुणे आदी शहरांमध्ये वास्तव्यास असलेले सर्व चिंचोलीकर भक्ती भावाने सहकुटुंब श्री कपालेश्वर महादेवांचा अभिषेक करण्यासाठी व आशीर्वाद घेण्यासाठी प्रतीवर्षी गावी येतात. यात्रेच्या निमित्ताने संपूर्ण दिवसभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

त्याचप्रमाणे दरवर्षी येणाऱ्या श्रावण मासात भगवान शिवशंकराचे रूप असलेले कपालेश्वर महाराजांचे मंदिरात शिवलिंगावर दुग्धभिषेक करून रुद्र पूजा केली जाते. तसेच श्रावणी सोमवार निमित्त फुलांची आकर्षक व दिव्यांची सजावट करून साजविले जाते. ग्रामदैवत श्री कपालेश्वर महाराज यात्रा उत्सवाबरोबरच गावात आदिशक्ती मळगंगा मातामंदिर , हनुमान मंदिर, मुक्ता देवी मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मातेचे मंदिर असून या सर्व देवतांचे उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात सध्याच्या काळाच्या ओघात गावचं रूप बदलत असूनहि गावातील जुन्या वा नवीन फळीतील मंडळींनी आपला धार्मिक, समाजिक व सांस्कृतिक वसा जपून ठेवला आहे.
सामाजिक
आदिवासी भागातील शेतकऱ्याच्या शेतीचे पंचांनामे करून त्वरित नुकसान भरपाई द्यावी -मारुती केंगले

डिंभे दि. (प्रतिनिधी) आंबेगाव तालुक्याचे पश्चिम आदिवासी भागातील बळीराजाचे एकमेव उत्पन भात व हिरडा पिकांचे नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने प्रचंड नुकसान झाले असून याचे पंचांनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे वतीने मारुती केंगले यांनी केली आहे.
नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱऱ्यांच्या कुटुंबाच्या तोडचा घासच पाळवीला आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड अतोनात नुकसान होऊन शेतकरी देशोधडीला लागल्याचे दिसत आहे. अशा कठीण प्रसंगी शासकीय मदतीची शेतकऱ्यांना गरज आहे पण शासनाकडून अद्यापही कोणत्याही मदतीबाबत दिलासादायक घोषणा अद्यापहि झालेली नाही त्यामुळे ऐन दीपावळीच्या काळात अनेकांची घरे दिव्यांनी उजाळालेली असतील परंतू महाराष्ट्रातील बळीराजच्या घरात अंधार असेल अशीच काही परिस्थिती दिसत आहे.
तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात एकमेव पिक भात शेती आणि हिरडा हिरड्याला बाजार भाव आता सध्या १०० रुपये इतका भाव आहे परंतू आदिवासी भागात पावसामुळे हिरडा पीक मोठ्याप्रमानावर सडून खराब झाले आहे. मे ते ऑक्टोबर सलग ५ महिच्या कालावधित झालेल्या मुसळधार पावसामुळे भातपिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊन भात पीक वाया गेले आहे तर अनेक ठिकाणी भातशेती पावसामुळे सडून गेली आहे.त्यामुळे पिकांची पंचनामे करून आदिवासी शेतकऱ्याला मदतीचा हात मिळावा यासाठी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले तालुक्याचे तहसिलदार कार्यालयास दिले असून निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी साहेब. प्रांत अधिकारी गोविंद शिंदे साहेब आंबेगाव तालुक्याचे आमदार व माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांना देण्यात आले असून याबाबत त्वरित कार्यवाही ना झाल्यास नाजिकच्या काळात शेकऱ्यांच्या हितासाठी भिमाशंकर रस्त्यावर तीव्र आंदोलनाचा इशारा केंगले यांनी दिला आहे.
सामाजिक
जांभोरी येथे कुस्ती तालीम इमारत भूमिपूजन सोहळा संपन्न

घोडेगाव दि (प्रतिनिधी ) जांभोरी (ता आंबेगाव)पासून जवळच असलेल्या माचीचीवाडी या ठिकाणी कुस्तीसाठी तालीम इमारतिचा भूमिपूजन समारंभ उत्साहात पार पाडला
आजच्या धाकधकीच्या काळात तरुणांई मोबाईल व गेम यात अडकून ना रहाता शारीरिक तंदृस्तीकडे आकर्षित व्हावी या हेतूने सुरु होत असलेल्या कुस्ती तालीम इमारतीसाठी येथील वसंत वालकोळी,बबन केंगले, भिवा वालकोळी, अनंता वालकोळी, यांनी ११गुंठे जमीन दिली आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री सहकारमंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील यांनी दहा लाख रुपयांचा निधी तालमीच्या प्रत्यक्ष बांध कामासाठी मंजूर केला आहे यासाठी आदिवासी भागाचे नेते सुभाषराव मोरमारे साहेब संजय गवारी, प्रकाश घोलप, यांनी परीश्रम घेतले आहेत
दरम्यान जांभोरी गावचे लोकनियुक्त सरपंच सुनंदाताई पारधी, पोलिस पाटील नवनाथ केंगले, पोलिस पाटील सोनाली पोटे, ज्ञानेश्वर पारधी. पुनाजी पारधी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले, श्री व्यंकोजी कुस्तीगीर तालीम संघटना जांभोरीचे अध्यक्ष भिवा वालकोळी, शिवाजी केंगले , सखाराम केंगले, खरेदी विक्री संघाचे संचालक शामराव बांबळे, ग्रामपंचायत सदस्य दुंदा भोकटे, ग्रामपंचायत सदस्य शिवराम केंगले,किसन पोटे, अनंता वालकोळी, सुनिल वालकोळी, नामदेव भोकटे, घोडेगाव पोलिस शिवाजी जनार्दन केंगले, सुरेश केंगले,संजय केंगले, ग्रामसेवक सुनिल पारधी, कृषी सेवक सुनिल लोहकरे, भिवा केंगले, चंद्रकांत केंगले, पांडुरंग केंगले,राज केंगले,गफुरशेठ तांबोळी,सर्व जांभोरी ग्रामस्थ उपस्थित होते.
सामाजिक
हजारो कोस दूर असूनही संकटप्रसंगी आपल्या मायभूमीतील माणसांच्या मदतीला धावणारी आंबेगावची कन्या….सौ.माधुरी श्रीकांत पवार

मंचर दि. (प्रतिनिधी) -“नवदुर्गेचा सन्मान तू…परोपकारची खाण तू…. सर्वांचा अभिमान तू…….श्री शक्तीचा मान तू…… जन्मभूमीची ठेवी जाण तू”….. संपूर्ण महाराष्ट्रावर महा पुराचे संकट आले असताना हजारो कोस दूर अमेरिकेत असूनही आपल्या माय भूमितील आपल्या माणसांच्या मदतीसाठी धावणारी आंबेगाव ची कन्या “माधुरी ताई ” हि खरोखरच सर्वांचे प्रेरणादायी स्थान ठरली आहे.
गेल्या काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने थैमान माजविले असून यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून संपूर्ण महाराष्ट्रातील शेकडो कुटुंबे महापुराच्या तडाख्याने रस्त्यावर आली आहेत. महाराष्ट्रात निर्माण झालेल्या महापुराणे अनेक जण बेघर झाले आहेत अशा हतबल परिस्थितीत परोपकारच्या शिकवणीतून निर्माण झालेल्या माधुरी श्रीकांत पवार यांनी आपल्या मायभूमीचे पांग फेडण्याचा प्रयत्न केला आहे. तिच्या या निर्णयाने तिच्या जन्मदात्या मातापित्याचे उर अगदी अभिमानाने भरून आले असेल यात शंका नाही
आपल्या माय भूमितील आपल्या माणसाबद्द्ल मधुर्याचा ओलावा असलेल्या माधुरी ताईने तीला शक्य होईल तेव्हढी मदत करीत आपले कर्तव्य बाजावण्याचा प्रयत्न केला आहे. ती आपल्या संभाषणात सांगते कि,
“मी “माधुरी श्रीकांत पवार”महाराष्ट्रातील अतिवृष्टी मुळे झालेल्या पूरग्रस्त घटना व नुकसान टीव्हीवर पाहत होते खूप वाईट वाटत होते, तसेच व्हाट्सअप वर वळसे पाटील साहेबांनी केलेल्या आवहानामुळे माझ्या जन्मभूमीत असलेल्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीने माझ्या शेतकऱ्यांची फार मोठ्या प्रमाणात हानी झाली. सर्वात मोठे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यांना मी माझे आदर्श व सतत समाजाचा विचार करणारे माननीय दिलीपराव वळसे पाटील साहेब माजी गृहमंत्री यांच्या प्रेरणेने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना छोटीशी मदत माझ्या कृतीप्रमाणे पाठवीत आहे.”
खरेतर “माधुरी ताई” यांनी केलेली मदत हि पुरांनातील त्या टिटवीची आठवण करून देते कि जिने आपल्या मुलांना वाचविण्यासाठी समुद्र अटविण्याचा निर्धार केला शेवटी परमेश्वराला हि येऊन तिची मदत करावी लागली. आज या ताईंनी केलीली मदत हि अनेकांना आपल्या मायभूमी बद्द्लचे कर्तव्य बजावण्याची शिकवण देते यात शंका नाही. हा देश माझा आहे या देशाला देव भूमी म्हटले गेले आहे या ठिकाणी जन्म मिळणे हि खरेतर सन्मानांची गोष्ट आहे. माधुरी यांनी केलेले हे कार्य सर्वांसाठी एक शिकवण आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यामुळे माधुरी पवार यांच्या प्रमाणे आपापल्या परीने मदत करा.चला सारे एक होऊया आपल्या देश बांधवांना पुन्हा उभे करण्यासाठी मदतीचा हात देऊया…..
-
राजकीय2 years ago
वीस वर्षांपूर्वी राजकारणात स्वतःला सिद्ध करण्यासाठी वेगळे झालेले “त्रिदेव”, पुन्हा आंबेगावच्या आसमंतात एकत्रित झळकणार
-
राजकीय1 year ago
“टायगर इज बॅक” शिरुर लोकसभेच्या मैदानात खळबळ माजणार..!
-
राजकीय11 months ago
वळसे पाटील यांना मोठा धक्का : शरद बँकेचे संचालक जयसिंग थोरात यांचा शरद पवार गटात जाहीर प्रवेश
-
राजकीय2 years ago
आयात उमेदवारांपेक्षा निष्ठावंतांना संधी द्या; उद्योगपती देवेंद्र शहा यांच्या नावाची शिरूर लोकसभेसाठी चर्चा…….
-
राजकीय12 months ago
आंबेगाव मध्ये महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर : निवडणुकीत सहभाग न घेण्याचा शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचा निर्णय
-
राजकीय1 year ago
अढळरावांनी, वळसे पाटलांची भेट घेऊन केली चौकशी
-
राजकीय1 year ago
भोसरी विधानसभा क्षेत्रातील असंख्य नाराज कार्यकर्ते भाजपाला ठोकणार रामराम: उबाठा सेनेत करणार प्रवेश?
-
सामाजिक1 year ago
“माणसात देव शोधत, सर्वसामान्यांच्या हितासाठी प्रयत्नशील राहणारा, माणसातील “देवमाणूस”….