singa8

rp8888

singa8

slot demo

slot qris

singa8

rp8888

https://bertrodriguez-museum.org

https://journal.uecommercebintaro.ac.id/

singa8

singa8

singa8

singa8

singa8

singa8

singa8

singa8

92GLORY

http://vecas.org.vn/id/

https://admire.ch/vendor/

Connect with us

सामाजिक

“पराग”(गोवर्धन) समुहाचे, बांधकाम उद्योगात दमदार पदार्पण…! मंचर येथे पूजन डेव्हलपर्स च्या “औरम” प्रकल्पाची उत्साहात सुरुवात…!!!

Published

on

मंचर दि. (प्रतिनिधी) उगवत्या सूर्याच्या सुवर्ण छटा मुळे जसे विश्व् सुवर्णमयी किरणांनी उजाळून टाकावे त्याच प्रमाणे सर्वसामान्य व्यक्तीचे जीवन्मान उंचावण्याच्या दृष्टीने मंचर ता आंबेगाव  येथे पराग (गोवर्धन ) समूहाचे चेअरमन देवेद्र शाह यांनी पूजन डेव्हलोपर्स चे माध्यनातून  “ऑरम” या प्रकल्पाची सुरुवात करून बिल्डर उद्योगात  पदार्पण केले आहे.

” उद्घाटनाचे दिवशीच नागरिकांकडून मोठया प्रमाणात बुकिंगला प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती प्रकल्पाचे संचालक पूजन शाह यांनी दिली “

सर्वच व्यक्ती उद्योग व्यवसायासाठी शहरी भागाची निवड करतात परंतू देवेंद्र शाह यांनी नेहमीच प्रामुख्याने ग्रामीण भागाताच नवीन व्यवसायाची सुरुवात करून त्यात यशस्वी झाले आहेत. यातून ग्रामीण भागात उद्योग व्यवसाय सुरु होऊन ग्रामीण भागातील तरुण पिढीला आपले गाव सोडून शहरी भागात जायला लागू नये कारण त्यामुळे त्या मागे असणाऱ्या त्या तरुणांच्या मुले पत्नी आई वडील यांना त्रास सहानुभूती करावा लागतो त्यापेक्षा ग्रामीण भागातील तरुण पिढीला आपल्या परिसरात नोकरी अथवा व्यवसायास वाव मिळवून दिला तर ग्रामीण भाग सक्षम होईल व यातूनच सक्षम देश होईल असे देवेंद्र शाह यांना वाटते.

दरम्यान आपल्या कुटुंबाचे जीवन्मान उंचवावे यासाठी ग्रामीण भागात नोकरी अथवा व्यवसाय करणारा राहणारा व्यक्ती आपल्या मुलांचे जीवन माण उंचवण्यासाठी आपले कुटुंब शहरात नेतो व स्वतः मात्र आपल्या नोकरी व्यवसायासाठी  शहरातून  आपल्या व्यवसायाच्या अथवा नोकरीच्या ठिकाणी ये जा करतो त्यामुळे ग्रामीण भागातच त्यांच्या कुटुंबाला सर्व सुविधा मिळून त्यांचे कुटुंबाचे जीवन मान उंचवावे यासाठी मंचर याठीकाणी या सर्वसुविधा युक्त प्रकल्पची सुरुवात करण्यात आली असल्याचे शाह यांनी सांगितले

ग्रामीण भागातील नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास न करता याच नैसर्गिक साधन संपत्ती मानवाच्या दृष्टीने उपयोग करीत पूजन डेव्हलोपर्स या  नावाने मंचर येथे सुरु केलेल्या “ऑराम” प्रकल्पामध्ये  सर्वसामान्य जनतेचे जीवनमान उंचावान्याचा दृष्टीने विविध सुविधा दिल्या आहेत यामुळे या ठिकाणी राहणाऱ्या कुटुंबाची जीवनशैली उंचावेल व आकर्षक किमतीमध्ये सर्व सुविधा युक्त घरे सर्व समान्य कुटुंबातील व्यक्तींना परवडेल या किंमत्तीमध्ये देण्यात येणार आहेत यात विविध सुविधा देण्यात येणार असून यात प्रामुख्याने प्रकल्पला आकर्षक द्वार व या ठिकाणी पाण्याच्ये आकर्षक फवारे, तसेच कलब हाऊस तसेच विविध कार्यक्रमासाठी हॉल, प्रशस्त मोकळ्या हवेची जागा, खेळासाठी मैदान, निसर्गाच्या सानिध्यात डोंगरी पाऊलवाट, विविध मनमोहक वृक्षाची फुल झाडांनी युक्त आकर्षक वनराई, चोहोबाजूने मनाला प्रसन्नता व आनंद निर्माण करणाऱ्या आकर्षक डोंगरी  टेकाड्यांचे समूह,निसर्गरम्य दृश्य डेक, या नैसर्गिक सुविधा सोबत कॉफ़ी शॉप, व्यायाम शाळा(जिम) सोबत बॅटमींटन, योगा, धावपट्टी(जॉगिंग ट्रॅक), ध्यानधारणा हॉल याही सुविधा देण्यात येणार आहेत त्यासोबत  सिनेमा गृह, मुलांसाठी मैदान, बसण्यासाठी आरामदायी जागा, विजेचे बिल कमी करण्यासाठी वीज सोलर सिस्टम वीज निर्मिती प्रकल्प ,सांस्कृतीक हॉल, यासोबत अनेक विविध सुविधा देण्यात येणार आहेत. 

कोणताही उद्योग व्यवसाय सुरु करताना त्या मागचा हेतू शुद्ध असणे खूप महत्वाचे आहे. यात समाज हिता सोबत निसर्गाचे हित जोपासाने हि अत्यावश्यक आहे.त्यामुळे नैसर्गिक साधन संपत्तीचा अपव्यय न होता त्याचे पालन होऊन येथील सर्व सामान्य व्यक्तीच्या कुटुंबाचे  जीवन्मान उचवावे हे द्येय डोळ्यासमोर ठेवून हा प्रकल्पाची निर्मिती करणार असल्याचे देवेंद्र शाह यांनी सांगितले.

  दरम्यान उगवत्या सूर्याची सुवर्णमयी किरणे म्हणजेच “औरम” होय. प्रसिद्ध उद्योगपती देवेंद्र शाह यांच्या संकल्पनेतून साकरत असलेल्या या नव्या प्रकल्पमुळे बिल्डिंग व्यवसायातून भविष्यात मोठी क्रांती होऊ शकते यात शंका नाही. ग्रामीण भागात शहरी भागात निर्माण होणाऱ्या प्रकल्पापेक्षाअत्याधुनिक सुविधा माफक किंमतीत  ग्रामीण भागात देऊन बांधकाम व्यवसायात मोठे बदल पुढील काळात शाह यांच्या या प्रजेक्ट मुले होण्याची शक्यता आहे.

या प्रकल्पाचे उदघाटण प्रसंगी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील मंचरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे, माजी पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले, राष्ट्रवादी काँग्रेस आंबेगाव तालुका अध्यक्ष विष्णुशेठ हिंगे या सोबत जिल्ह्यातील अनेक राजकीय सामाजिक शौक्षणिक औद्योगिक क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते

Continue Reading
1 Comment

1 Comment

  1. मा.संतोषभाऊ बोऱ्हाडे

    May 11, 2025 at 4:22 pm

    नविन प्रकल्पा करीता मनसे शुभेच्छा ! गोवर्धन डेअरी प्रमाणेच या क्षेत्रात सुद्धा विश्व तयार कराल . हिच भावना !

Leave a Reply

Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सामाजिक

आदिवासी भागातील शेतकऱ्याच्या शेतीचे पंचांनामे करून त्वरित नुकसान भरपाई द्यावी -मारुती केंगले

Published

on

डिंभे दि. (प्रतिनिधी) आंबेगाव तालुक्याचे पश्चिम आदिवासी भागातील बळीराजाचे एकमेव उत्पन भात व हिरडा पिकांचे नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने प्रचंड नुकसान झाले असून याचे पंचांनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे वतीने मारुती  केंगले यांनी केली आहे.

नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱऱ्यांच्या कुटुंबाच्या तोडचा घासच पाळवीला आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड अतोनात नुकसान होऊन शेतकरी देशोधडीला लागल्याचे दिसत आहे. अशा कठीण प्रसंगी शासकीय मदतीची शेतकऱ्यांना गरज आहे पण शासनाकडून अद्यापही कोणत्याही मदतीबाबत दिलासादायक घोषणा अद्यापहि झालेली नाही त्यामुळे ऐन दीपावळीच्या काळात अनेकांची घरे दिव्यांनी उजाळालेली असतील परंतू महाराष्ट्रातील बळीराजच्या घरात अंधार असेल अशीच काही परिस्थिती दिसत आहे.

 तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात एकमेव पिक भात शेती आणि हिरडा हिरड्याला बाजार भाव आता सध्या  १०० रुपये इतका भाव आहे परंतू आदिवासी भागात पावसामुळे हिरडा पीक मोठ्याप्रमानावर सडून खराब झाले आहे. मे ते ऑक्टोबर सलग ५ महिच्या कालावधित झालेल्या मुसळधार पावसामुळे भातपिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊन भात पीक वाया गेले आहे तर अनेक ठिकाणी भातशेती पावसामुळे सडून गेली आहे.त्यामुळे पिकांची पंचनामे करून आदिवासी शेतकऱ्याला मदतीचा हात मिळावा यासाठी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले तालुक्याचे तहसिलदार कार्यालयास दिले असून निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी साहेब. प्रांत अधिकारी गोविंद शिंदे साहेब आंबेगाव तालुक्याचे आमदार व  माजी गृहमंत्री  दिलीपराव वळसे पाटील यांना देण्यात आले असून याबाबत त्वरित कार्यवाही ना झाल्यास नाजिकच्या काळात शेकऱ्यांच्या हितासाठी  भिमाशंकर रस्त्यावर तीव्र आंदोलनाचा इशारा केंगले यांनी दिला आहे.

Continue Reading

सामाजिक

जांभोरी येथे कुस्ती तालीम इमारत भूमिपूजन सोहळा संपन्न

Published

on

घोडेगाव दि (प्रतिनिधी ) जांभोरी (ता आंबेगाव)पासून जवळच असलेल्या माचीचीवाडी या ठिकाणी कुस्तीसाठी तालीम इमारतिचा भूमिपूजन समारंभ उत्साहात पार पाडला

आजच्या धाकधकीच्या काळात तरुणांई मोबाईल व गेम यात अडकून ना रहाता शारीरिक तंदृस्तीकडे आकर्षित व्हावी या हेतूने सुरु होत असलेल्या कुस्ती तालीम इमारतीसाठी  येथील वसंत वालकोळी,बबन केंगले, भिवा वालकोळी, अनंता वालकोळी, यांनी ११गुंठे जमीन दिली आहे त्याचप्रमाणे  महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री सहकारमंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील यांनी दहा लाख रुपयांचा निधी तालमीच्या प्रत्यक्ष बांध कामासाठी मंजूर केला आहे यासाठी आदिवासी भागाचे नेते सुभाषराव मोरमारे साहेब  संजय गवारी, प्रकाश घोलप, यांनी परीश्रम घेतले आहेत

 दरम्यान जांभोरी गावचे लोकनियुक्त सरपंच सुनंदाताई पारधी, पोलिस पाटील  नवनाथ केंगले, पोलिस पाटील सोनाली पोटे, ज्ञानेश्वर पारधी. पुनाजी पारधी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले,  श्री व्यंकोजी कुस्तीगीर तालीम संघटना जांभोरीचे अध्यक्ष भिवा वालकोळी, शिवाजी केंगले , सखाराम केंगले,  खरेदी विक्री संघाचे संचालक शामराव बांबळे, ग्रामपंचायत सदस्य दुंदा भोकटे, ग्रामपंचायत सदस्य शिवराम केंगले,किसन पोटे, अनंता वालकोळी, सुनिल वालकोळी, नामदेव भोकटे, घोडेगाव  पोलिस शिवाजी जनार्दन  केंगले, सुरेश केंगले,संजय केंगले, ग्रामसेवक सुनिल पारधी, कृषी सेवक सुनिल लोहकरे, भिवा केंगले, चंद्रकांत केंगले, पांडुरंग केंगले,राज केंगले,गफुरशेठ तांबोळी,सर्व जांभोरी ग्रामस्थ उपस्थित होते. 

Continue Reading

सामाजिक

हजारो कोस दूर असूनही संकटप्रसंगी आपल्या मायभूमीतील माणसांच्या  मदतीला धावणारी आंबेगावची कन्या….सौ.माधुरी श्रीकांत पवार

Published

on

मंचर दि. (प्रतिनिधी) -“नवदुर्गेचा सन्मान तू…परोपकारची खाण तू…. सर्वांचा अभिमान तू…….श्री शक्तीचा मान तू…… जन्मभूमीची ठेवी जाण तू”….. संपूर्ण महाराष्ट्रावर महा पुराचे संकट आले असताना हजारो कोस दूर अमेरिकेत असूनही आपल्या माय भूमितील आपल्या माणसांच्या मदतीसाठी धावणारी आंबेगाव ची कन्या “माधुरी ताई ” हि खरोखरच सर्वांचे प्रेरणादायी स्थान ठरली आहे.

गेल्या काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात  पावसाने थैमान माजविले असून यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून संपूर्ण महाराष्ट्रातील शेकडो कुटुंबे महापुराच्या तडाख्याने रस्त्यावर आली आहेत. महाराष्ट्रात निर्माण झालेल्या महापुराणे अनेक जण बेघर झाले आहेत अशा हतबल परिस्थितीत परोपकारच्या शिकवणीतून निर्माण झालेल्या माधुरी श्रीकांत पवार यांनी आपल्या मायभूमीचे पांग फेडण्याचा प्रयत्न केला आहे. तिच्या या निर्णयाने तिच्या जन्मदात्या मातापित्याचे उर अगदी अभिमानाने भरून आले असेल यात शंका नाही

आपल्या माय भूमितील आपल्या माणसाबद्द्ल मधुर्याचा ओलावा असलेल्या माधुरी ताईने  तीला शक्य होईल तेव्हढी मदत करीत आपले कर्तव्य बाजावण्याचा प्रयत्न केला आहे. ती आपल्या संभाषणात सांगते कि,

“मी “माधुरी श्रीकांत पवार”महाराष्ट्रातील अतिवृष्टी मुळे झालेल्या पूरग्रस्त घटना व नुकसान टीव्हीवर पाहत होते खूप वाईट वाटत होते, तसेच व्हाट्सअप वर  वळसे पाटील साहेबांनी केलेल्या आवहानामुळे माझ्या जन्मभूमीत असलेल्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीने माझ्या शेतकऱ्यांची फार मोठ्या प्रमाणात हानी झाली. सर्वात मोठे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यांना मी माझे आदर्श व सतत समाजाचा विचार करणारे माननीय दिलीपराव वळसे पाटील साहेब माजी गृहमंत्री यांच्या प्रेरणेने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना छोटीशी मदत माझ्या कृतीप्रमाणे पाठवीत आहे.”

 खरेतर “माधुरी ताई”  यांनी केलेली मदत हि पुरांनातील त्या टिटवीची आठवण करून देते कि जिने आपल्या मुलांना वाचविण्यासाठी समुद्र अटविण्याचा निर्धार केला शेवटी परमेश्वराला हि येऊन तिची मदत करावी लागली. आज या ताईंनी केलीली मदत हि अनेकांना आपल्या मायभूमी बद्द्लचे कर्तव्य बजावण्याची शिकवण देते यात शंका नाही. हा देश माझा आहे या देशाला देव भूमी म्हटले गेले आहे या ठिकाणी जन्म मिळणे हि  खरेतर सन्मानांची गोष्ट आहे. माधुरी यांनी केलेले हे कार्य सर्वांसाठी एक शिकवण आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यामुळे माधुरी पवार यांच्या प्रमाणे आपापल्या परीने मदत करा.चला सारे एक होऊया आपल्या देश बांधवांना पुन्हा उभे करण्यासाठी मदतीचा हात देऊया…..

Continue Reading
Advertisement

Trending

Best Replica Watches UK