Connect with us

सामाजिक

“भिर्र”…. “झाली”…. बैलगाडा शर्यतीवरील बंदीचे  निषेधार्थ झालेल्या आंदोलनाच्या गुन्ह्यातून माजी खा. शिवाजीराव आढळराव याच्यासह ६७ जणांची निर्दोष मुक्तता:” पेठे भरवत आनंद साजरा”….

Published

on

मंचर प्रतिनिधी : संपूर्ण महाराष्ट्रात बंद करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यती पुन्हा सुरु करण्यासाठी मंचर ता आंबेगाव येत झालेल्या आंदोलनात माजी खा शिवाजीराव आढळराव यांच्यासह ६७ शेतकऱ्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यातून खेड सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. त्यामुळे शेतकऱ्यांनी भिर्र…… झाली…..म्हणत व एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा केला.

या बाबत सविस्तर वृत्त असे कि, सुमारे वीस वर्षापूर्वी अनेक प्राणीमित्र संघटनांनी बैलावर होत असलेल्या अत्याचारा  विरोधात न्यायालयात दाद मगीतलीयावर न्यायालयाने प्राणी मित्र संघटनाची बाजी समजावून घेत बैल गाडा शर्यतीवर बंदी घातली यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र स्वरूपाची नाराजी पसरून मंचर ता आंबेगाव या ठिकाणी बैल गाडा संघटनांचे वतीने आंदोलन करण्यात आले होते यात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, दिवंगत नेते माजी खासदार किसनराव बाणखेले यांच्यासह सुमारे ६७जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. बैल गाडा शर्यतीला शासनाने मंजुरी देऊनही या शेतकऱ्यावरील गुन्हे शासनाकडून मागे घेण्यात आले नव्हते  तब्बल वीस वर्षानंतर खेड सत्र न्यायालयाचे सत्र न्यायाधीश ए. एस सय्यद यांनी पुराव्या अभावी सर्व बैलगाडा मालकांची निर्दोष मुक्तता केली.

सुमारे वीस वर्षापासून अविरत सुरु असलेल्या या लढ्याला अखेर न्याय मिळाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी माकजी खासदार व म्हाडाचे  अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासोबत एकमेकांना पेठे भरवत आनंद साजरा केला या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेत आपले मत व्यक्त करताना माजी खा आढळराव पाटील म्हणाले कि, मी पहिल्यांदाच खासदार झालो  असताना पहिल्याच टर्मच्या सात महिन्यात बैल गाड्यावर बंदी आली या वेळी झालेले आंदोलन शांतपणे होऊन सुद्धा तब्बल दोन वर्षा नंतर येथील राजकीय दाबावापोटी माझ्या सह सर्व आंदोलकांवर तीनशे सात कलम लावण्यात आले परंतू शेवटी सत्याचा हा नेहमीच विजय होतो त्या प्रमाणे आम्हाला न्याय मिळाला. 

  यावेळी  पुढे बोलताना माजी खा.आढळराव पुढे म्हणाले कि,“घोडीवर बसून अनेकांनी दावे केले की, माझ्यामुळे बैलगाडा शर्यती सुरू झाल्या. पण त्यात अजिबात तथ्य नाही. शर्यतीसाठी कोणाचा किती त्याग आहे. हे जनतेसमोर आहे.अशी टिका त्यांनी खासदार अमोल कोल्हे यांचे नाव नाव न घेता केली.

दरम्यान आढळराव पुढे म्हणाले कि, मी अनेक बैलगाडा घाटात उपस्थित असतो. सध्या बैलगाडा शर्यतीला बाजारो स्वरूप आले आहे का ?  या प्रश्नाला उत्तर देताना आढळराव पाटील म्हणाले, “उच्च न्यायालयाने व प्रशासनाने बैलगाडा शर्यतींना परवानगी दिली आहे. त्यासाठी अनेक निकष आहेत. बैलगाडा शर्यतीच्या ठिकाणी रुग्णवाहिका व पशुवैद्यकीय अधिकारी असणे बंधनकारक आहे. पण प्रत्यक्षात काहीच नसते तसेच देवाच्या यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीऐवजी वाढदिवसानिमित्त बैलगाडा शर्यती भरविल्या जातात.

 दरम्यान प्रशासन नियमाकडे दुर्लक्ष करत आहे. याबाबत जर पेटासारख्या संस्था पुन्हा कोर्टात गेल्या. तर बैलगाडा शर्यती पुन्हा अडचणीत येऊ शकतात.त्यासाठी सर्वांनी न्यायालय व शासनच्या आदेशाची अंमलबजावणी करावी.” तसेच गावोगावी भरणाऱ्या शर्यती या फक्त ग्रामदैवत यांच्यासाठी भरविण्यात याव्यात त्या फक्त एक ते दोन दिवसांच्या असाव्यात असे मत देखील आढळराव पाटील यांनी बोलताना मांडले

यावेळी बैलगाडा मालक व आढळराव पाटील यांनी एकमेकांना पेढे भरून जल्लोष  साजरा केला. यावेळी भैरवनाथ पतसंस्थेचे व्हॉईस चेअरमन सागर काजळे, पंचायत समितीचे माजी सदस्य रवींद्र करंजखेले, सुनील बाणखेले, शिवाजी राजगुरू आदी उपस्थित होते. 

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सामाजिक

“महिला बांधकाम कामगारांसाठी” शासनाकडून मिळणाऱ्या मदतीवर डल्ला मारणारे काथाकथित एजंट व पुढारी  म्हणजे “शिव” जन्मभूमीतील सध्याचे रांझ्याचे पाटील का?

Published

on

मंचर दि. (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या काळात एका महिलेवर अत्याचार करणाऱ्या पाटलाचे छत्रपतींनी हात पाय छाटले होते. परंतू त्याच छत्रपतींचे नाव घेऊन छत्रपती शिवरायांची जन्म भूमी असलेल्या जुन्नर तालुक्यात बांधकाम कामगार महिलांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या मदतीतून काही एजंटांनी व कथित गावपुढाऱ्यांनी हात ओले करण्याचा सपाटा लावला असताना या होणाऱ्या गैरव्यवहारावर प्रकाश झोत टाकणाऱ्या पत्रकारावर जीवघेणा हल्ला केला जातो व त्याच एजंटांची बाजू घेण्यासाठी काही कथित गाव पुढारी पत्रकारावर बेछुट खोटे आरोप करण्याचा प्रयत्न करतात हि खरी शरमेची गोस्ट बाब आहे 

दरम्यान सर्वसामान्य बांधकाम कामगारांचा आर्थिक स्थर उंचावण्यासाठी शासनाने बांधकाम कामगार योजना आणली या योजनेचा खरा अर्थ असा कि, रोजंदारीवर काम करणारे बांधकाम कामगार मजूर वर्गातील  कुटुंबाना आर्थिक सहाय्य मिळावे व यातून त्यांची मुले शिकुन सक्षम व्हावीत  या दृष्टीकोनातून शासनाने बांधकाम कामगानांच्या उत्कर्षासाठी आणलेल्या या योजनेचा काही एजंटांनी कथाकथित राजकीय पुढऱ्यांच्या आशीर्वादाने गोरस धंदा बनविल्याचा प्रकार समोर येत आहे.

सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यामध्ये सुरु असलेली बांधकाम कामगार योजनेमध्ये कामगारांना मिळणाऱ्या मदतीतून चांगली मोठी रक्कम कथाकथित एजंट लोकांना दयावी लागते व यात अनेक कथाकथित स्थानिक पुढाऱ्यांचा सहभाग असल्याचे बोलले जाते.व  हे कथाकथित गाव पुढारी समाजसेवेचा खोटा आवडत आणत गरिबांच्या टाळूवरील लोणी खात असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

     दरम्यान नुकत्याच एका इलेक्ट्रानिक वाहिनेने सुरु असलेल्या बांधकाम कामगार योजनेतील या गैरव्यवहाराचा भांडाफोड केला. या नंतर त्या पत्रकारावर काही एजंट लोक यांनी हल्ला  केला व काही कथित गाव पुढऱ्यांच्या मदतीने बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. व हि घटना छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्म स्थान असलेल्या जुन्नर तालुक्यात घडली.यामध्ये या राजकीय नेत्यांनी महिलांना त्रास दिल्याचा आरोप केला खरे तर हे गाव पुढारी ज्या नेत्याचे कार्यकर्ते आहेत त्याच नेत्याची एक क्लिप काही महिन्यापूर्वी प्रसारीत झाली होती.यामुळे जसा नेता तसा कार्यकर्ता अशी चर्चा नागरिक दाबक्या आवाजात करीत आहेत.

दरम्यान या कथाकथित पुढऱ्याच्या या लाजिरवान्या कृत्याचा सर्वच स्थरावरून निषेध केला जात असून . या प्रकरणाची उच्च स्तरीय कसून चौकशी करावी. सुरु असलेल्या या योजनेत खरंच किती बांधकाम कामगार आहेत का?  या सर्व बाबींची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे

Continue Reading

सामाजिक

ऊस उत्पादनाच्या वाढीसाठी “भीमाशंकर सह. साखर कारखान्याचे” ऊस लागवड धोरण जाहीर -अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांची माहिती

Published

on

मंचर दि. (प्रतिनिधी) भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे लागवड हंगाम २०२५-२६ साठी ऊस लागवडीचे धोरण जाहिर झाले असून त्याची अंमलबजावणी दि. १ जून २०२५ पासून करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.

 “उत्पादकता वाढ़ लक्ष योजना”

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीचे दृष्ठिने कारखान्यामार्फत “दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील ऊस उत्पादकता वाढ लक्ष २०२०” ही महत्वाकांक्षी ऊस विकास योजना राबविणेत येत आहे अशी माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष अँड.प्रदीप वळसे यांनी सांगितले

     भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माध्यमातून सुरु करण्यात येत असलेल्या या ऊस लागवड जाहीर धोरणबाबात   अधिक माहिती देताना बेंडे यांनी सांगितले की,  दि. १ जून २०२५ ते ३० ऑक्टोबर २०२५  पर्यंतच्या कालावधीमध्ये को.एम.०२६५ तर दि. १ जून २०२५ ते ३० एप्रिल २०२६ पर्यंतच्या कालावधीमध्ये   को.८६०३२ ऊस लागवडीस व नोंदीस परवानगी देण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे  दि. १ ऑगस्ट २०२५ ते ३० एप्रिल २०२६ अखेर पर्यंतच्या कालावधीमध्ये व्हीएसआय ०८००५ या ऊस लागवडीस परवानगी देण्यात आली आहे. दि. १ सप्टेंबर २०२५ ते ३० एप्रिल २०२६ अखेर पर्यंतच्या कालावधीमध्ये एम.एस. १०००१, को. ९०५७,  या ऊस लागवडीस परवानगी देण्यात आली आहे. को.व्हीएसआय १८१२१, फुले ऊस १५०१२, फुले ऊस १५००६, फुले ऊस १३००७, को.एम. ११०८२ इ. शिफारशीत ऊस लागवडीस दि. १ जून २०२५ ते दि. ३० एप्रिल २०२६ पर्यंत परवानगी देण्यात आली आहे.

              कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद व ऊस उत्पादक यांना मागणीप्रमाणे उपलब्धतेनुसार लागवड धोरणाप्रमाणे दि. १ जून २०२५ पासून बेणे वाटप करण्यात येणार आहे व खासगी ऊस लागवडीच्या नोंदी घेण्यात येणार आहेत. त्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस लागवड करावयाच्या क्षेत्राचा ७/१२ उतारा व आवश्यक कागदपत्रे पूर्तता संबधित विभागीय शेतकी कार्यालयात जाऊन करावी. खासगी ऊस लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी चार दिवसाचे आत संबंधित गट ऑफिसमध्ये जाऊन ऊस नोंद करावयाची आहे. 

दरम्यान उशीरा ऊस लागवड नोंद करणेस आलेल्या ऊस उत्पादकांची ऊस नोंदीसाठी आलेची तारीख हीच ऊस लागवड तारीख म्हणून नोंद करण्यात येईल. कारखान्यामार्फत कार्यक्षेत्र व परिसरामध्ये धोरणानुसार उधारीने / रोखीने राबविणेत येणाऱ्या ऊस विकास योजने अंतर्गत माती परीक्षण सुविधा, ताग बियाणे वाटप, ऊस बेणे वाटप,  रासायनिक खते पुरवठा, द्रवरुप जीवाणू खते, ऊस रोपे वाटप, खासगी ऊस लागवड अर्थसहाय्य, प्रेसमड, खोडवा व्यवस्थापनामध्ये पाचट कुट्टी सुविधा, ठिबक सिंचन योजना, व्हीएसआय उत्पादित मल्टीमायक्रोन्युट्रीएंट, मल्टीमॅक्रोन्युट्रीएंट, ह्युमक ॲसिड, वसंत उर्जा, जैविक कीटकनाशके बी.व्ही.एम., इ.पी.एन. इ. निविष्ठांचा पुरवठा, हंगामवार ऊस पीक स्पर्धा इ. ऊस विकास योजनांचा लाभ सर्व ऊस उत्पादकांनी घ्यावा.  ऊस पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेणेस इच्छुक  शेतकऱ्यांनी  प्रवेश शुल्क रक्कम रु.१००/-  डिसेंबर २०२५ अखेर भरणा करून स्पर्धेसाठी नाव नोंदणी करावी.

              त्याचप्रमाणे एकात्मिक कीड व्यवस्थापन योजनेमध्ये ऊस पिकामध्ये हुमणी कीडीचे नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी गोळा केलेले हुमणी कीडीचे भुंगेरे कारखान्यामार्फत प्रति किलो रु.३००/- प्रमाणे जून २०२५ अखेर खरेदी केले जाणार असून सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी हुमणीचे भुंगेरे गोळा करुन एकात्मिक हुमणी कीड नियंत्रण करावे. तरी वरील लागवड धोरणानुसार जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उसाची लागवड करावी व कारखाना ऊस विकास योजनांचा लाभ घ्यावा. ऊस विकास योजनेच्या अधिक माहितीसाठी विभागीय शेतकी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन  बेंडे यांनी केले आहे.

Continue Reading

सामाजिक

अवकाळी पावसाच्या नुकसानीचे आंबेगावमध्ये “तलाठी करणार पंचनामे” –  नायब तहसीलदार वाघ

Published

on

मंचर दि.29 (सदानंद शेवाळे): अवकाळी ऐन उन्हाळ्यात आलेल्या पावसामुळे आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम व पूर्व भागात मुसळधार पावसामुळे आंबा जांभूळ केळी मका बाजरी भुईमूग व पालेभाज्या वर्गीय पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे प्रत्येक गावातील गाव कामगार तलाठी आपापल्या सजातील नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करतील अशी माहिती आंबेगाव  तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार सचिन वाघ यांनी बोभाटा शी बोलताना दिली.

   मागील पंधरा दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे अनेक ठिकाणी बांध फुटले आहेत रस्ते वाहून गेले आहेत तर वीज पडल्याने कांदा बराखी  जळून गेली आहे पालेभाज्या वर्गीय पिके कोबी फ्लावर कोथिंबीर मेथी शापू सह अनेक पालेभाज्या पाण्यात पोहत आहेत.

 

संप काळातही “कृषी सहाय्यक” करणार पंचनामे 

 कामगार तलाठी आपापल्या सजा मध्ये पंचनामे करणार आहेत त्यांना सहाय्य करण्यासाठी सहाय्यक कृषी अधिकारी संपावर असतानाही आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत मदत करणार असल्याची माहिती घोडेगाव कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान आंबेगाव तालुक्यात  पूर्व भागात पाणी उपलब्ध असल्याने तालुक्यातील सुमारे 3 हजार 750 एकर क्षेत्रावर उन्हाळी बाजरी पिकाची पेरणी करण्यात आली होती  परंतू अवकाळी पावसाने  उन्हाळ्यात हमखास उत्पन्न देणारे बाजरीचे पीक भुईसपाट झाले आहे बाजरीच्या कणसांना चौरे ( कोंब ) फुटले आहेत तर जनावरांचा वाळलेल्या चारा वैरण पाण्यात भिजत आहे या वैरणीवर कुज व बुरशी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे   दुभत्या व भाकड जनावरांना हिवाळ्यात व उन्हाळ्यात  वाळलेल्या चाऱ्याची मोठी टंचाई यंदा भासणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.त्याचप्रमाणे  सुमारे दोन हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे अतोनात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे अशी माहिती तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

Continue Reading
Advertisement

Trending