Connect with us

राजकीय

आयात उमेदवारांपेक्षा निष्ठावंतांना संधी द्या; उद्योगपती देवेंद्र शहा यांच्या नावाची शिरूर लोकसभेसाठी चर्चा…….

Published

on

पुणे जिल्ह्यात येणाऱ्या चार लोकसभा मतदार संघामध्यें शिरूर लोकसभेविषयी जोरदार चर्चा आहे सध्या महाविकासआघाडी कडे  शरद पवार गटाचे  उमेदवार सध्याचे खासदार अमोल कोल्हे यांना उमेदवारी जाहीर झाली  असून त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.

 महायुतीकडे मात्र अद्याप उमेदवार निश्चित झालेला नाही अशी स्थिती आहे.  त्यात ही जागा कोण लढविणार हाच महत्वाचा प्रश्न आहे 

महायुतीतील शिंदे गटाचे इच्छुक उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव येथून निवडणूक लढविण्यास प्रचंड इच्छुक आहेत परंतू ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे जाण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे या ठिकाणी अजित पवार गटाकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे यात माजी खासदार आढळराव ही निवडणूक लढविण्यास इतके उतावीळ आहेत की वेळ प्रसंगी  शिंदे सेनेला राम राम ठोकून पक्ष बदलून राष्ट्रवादी अजित पवार गटातही जाण्याची त्यांची तयारी आहे परंतु अशी चर्चा आहे परंतु अजित पवार गटातील अनेक आमदार व वरिष्ठ कार्यकर्त्यांचा आढळराव पाटलांना प्रचंड विरोध असल्याचे बोलले जाते.त्यामुळे आयात उमेदवार नको असे अभियान कार्यकर्त्यांनी सुरू ठेवले दिसत आहे  म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार हे आढळराव यांना  पक्षात घेण्यासाठी इच्छुक नाहीत असे समजते त्यात अजित पवार गट पूर्वीचे राष्ट्रवादी पक्षांतील परंतु सध्या भाजपात असलेले प्रदीप कंद यांना उमेदवारी देणार अशी चर्चा होती. परंतु तिलाही पूर्णविराम मिळताना दिसत आहे. त्याचप्रमाणे प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्याही नावाची जोरदार चर्चा मागील काळात रंगली होती परंतु सध्या तीही मागे पडली आहे व  सद्य स्थितीला पक्षाला उभारी देणारा उमेदवार शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

 

दरम्यान पक्षाने सक्षम उमेदवार दाखविला नाही तर या जागेवरही शिंदे गट किंवा भाजपा भाजपा आपला उमेदवार उभा करण्याची शक्यता नाकारता येत नाही व हि जागा अजित पवार गट सोडण्याच्या तयारीत नाही त्यामूळे या जागेवर राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता दाट आहे. व व अजीत पवार यांनी त्यांनाच हिरवा कंदील दाखविला असल्याची चर्चा सुरू झाली आहे . दिलीप वळसे पाटील एक सक्षम पर्याय होऊ शकतील कारण ते या जागेवरुन विजयी झाले तर शिरूर लोकसभेच्या विकासासाठी ते केंद्रात  भरीव काम करू शकतील या बाबत जनतेच्या मनात कोणतेही दुमत नाही वळसे पाटील खासदार झाले तर शिरुर लोकसभा मतदार संघाचा विकास ते अतिशय उत्कृष्ट पद्धतीने करतील हा सर्वांनाच विश्वास आहे

 परंतु सध्या वळसे पाटलांचे वय पहाता त्यांना  शारीरिक स्थिती पाहता ते लोकसभेसाठी तयार होण्याची शक्यता खूपच कमी आहे अशा द्विधा स्थितीत पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी वळसे पाटलांच्या तालमीत तयार झालेला राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे असलेल्या एका सक्षम उमेदवाराविषयी     दबक्या सुरात मतदार संघात चर्चा असून तो उमेदवार म्हणजे वळसे पाटील यांचे अत्यंत  जवळचे कार्यकर्ते शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष व गोवर्धन या सुप्रसिद्ध प्रकल्पाचे चेअरमन प्रसिद्ध उद्योगपती देवेंद्र शहा होत

 आंबेगावतालुक्यासह खेड जुन्नर शिरूर या भागात देवेंद्र शहा मागील कारकिर्दीचा आढावा घेतला असता असे दिसते की आंबेगाव जुन्नर खेड शिरूर तालुक्यात अनेक ठिकाणी त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांनी मागील सुमारे पस्तीस वर्षाच्या कालावधीत पक्षासाठी मोठे योगदान दिले आहे तसेच चारही तालुक्यातील अनेक शेतकरी, व्यवसायिक  अथवा  कार्यकर्ते हे त्यांच्याशी कोणत्याना कोणत्यातरी कारणाने जोडले गेलेले आहेत सर्वसामान्य नागरिकांना मदत करणे बे – रोजगारांना  रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, अडचणीत असलेला कोणताही व्यक्ती त्यांचाकडे गेला तर त्याला सर्वोतोपरी मदत त्यांच्याकडून केली जाते अशी आजवर त्यांची ख्याती आहे. करोना महामारी च्या काळात त्यांनी अनेक ठिकाणी स्वखर्चाने अन्न छत्रे चालवून अनेक गोरगरिबांना उत्कृष्ट दर्जाचे अन्नदान केले तसेच या परिसरातील गरीब गरजू हुशार विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्फत शिक्षणासाठी मोठी मदत मिळत असून अनेक विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झालेला आहे 

जगप्रसिद्ध गोवर्धन दूध प्रकल्पाच्या माध्यमातून लाखो शेतकरी त्यांच्याशी जोडले गेलेले आहेत दूध क्षेत्रात प्रचंड उत्क्रांती घडवत त्यांनी खेड जुन्नर शिरूर भोसरी आंबेगाव तालुक्यासह नगर जिल्ह्यातील लाखो शेतकऱयांना व तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे

 गोवर्धन दूध प्रकल्पावर अनेक छोटे मोठे उद्योग आज कार्यरत आहेत व त्या माध्यमातून अनेक कुटुंबाना रोजगार उपलब्ध झाला आहे. तसेच शरद सहकारी बँकेच्या अध्यक्ष म्हणूनही ते काम करत असून त्यांनी अनेक बेरोजगार युवकांना कर्ज काढून देऊन त्यांना व्यवसायाच्या नवनव्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यातील अनेक जण यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपाला हि आलेले आहेत. देवेंद्र शाह हे एक असे रसायन आहे की  खेड जुन्नर आंबेगाव  तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागापासून पुर्व भागातील सर्व गावामध्ये त्यांचेवर प्रेम करणारे शेकडो कार्यकर्त्यांचा संच देवेंद्र शाह याना त्यांच्या समाजकार्यातून मिळाला आहे. 

शिरूर लोकसभा मतदार संघात    सर्वसामान्य शेतकरी, तरुण, व्यवसायिक उद्योजक याच्या मनात शहा बद्दल प्रचंड  आपुलकीचे भाव आहेत.पुणे जिल्ह्यातील अनेक बहुतांश छोटे मोठे व्यापारी त्यांच्या प्रचारासाठी येऊ शकतील  त्याचप्रमाणे पुणे जिल्यातील भाजपा, राष्ट्रवादी(शरद पवार व अजित पावर गट) काँग्रेस, शिवसेना(ठाकरे व शिंदे गट),मनसे ,रिपाई अशा सर्वच पक्षातील बहुसंख्य कार्यकर्त्यासोबत त्यांचे अतिशय सलोख्याचे संबंध आहेत.त्यामुळे त्यांचाही अंतर्गत पाठिंबा मिळण्याची शक्यता मोठी आहे. त्यातच  ते वळसे पाटलांचे जवळचे स्नेही असून वळसे पाटील शरद पवार यांच्या कामाची पद्धत त्यांना अंगीकृत आहे त्याचप्रमाणे  ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचेहि  निकटवर्तीय म्हणून समजले जातात. त्यामुळे देवेंद्र शाह या मतदार संघातून विजयी  झाल्यावर शिरूर लोकसभा मतदार संघाच्या विकासाची पर्वणी सुरू होईल यात शंका नाही

  दरम्यान सद्यस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजीत पवार गटासाठी हा उमेदवार अमोल कोल्हे यांना चांगली झुंज देऊ शकतो अशी चर्चा मतदारांमध्ये आहे लोकसभेचे वातावरण रंगात येत आहे सर्वच पक्ष लोकसभेच्या महाभारतासाठी रणांगणात उतरत आहेत सत्ताधारी भाजपा तर चारशे पारच्या डरकाळ्या फोडत आहे देश पातळीवर राममंदिर, मणिपूर दंगल, शेतकरी ,एम एस पी आदी मुद्यावर राजकीय वातावरण तापणार हे नक्की परंतु महाराष्ट्रात मात्र राजकीय उलथापालथ झाली आहे म्हणतात ना सख्खा भाऊ पक्का वैरी अशीच काहीशी स्थिती महाराष्ट्रात आहे राज्यातील महत्वाच्या दोन पक्षात बंडाळी घडवून विभागणी करण्यात भाजपाला यश आले आहे  येनकेन करून भाजपाला आपला “शत प्रतिशत भाजपा ” हा नारा यशस्वी करायचा आहे असे दिसून येते

 त्यामुळे छोटे- छोटे पक्ष फोडून त्यातील महत्वाचे सरदार आपल्या कडे वळविण्यात भाजपा यशस्वी झाला असून कोणी यास   भाजपा चे “नितीहीन” राजकारण म्हणत असेल परंतु भाजपा नेते यास “कृष्ण नीती” या गोंडस नावाने संबोधत  सारवासारव करीत आहेत मात्र हीच कृष्ण नीती  जनतेच्या पचनी पडलेली नसल्याने जनतेत नाराजीचा मोठा सूर आहे त्यात भाजपा ला मित्र पक्षासमवेत 45 चा जादुई आकडा राज्यात मिळवायचा आहे त्यामुळे भाजपा मिरीट वर  निवडून येणाऱ्या उमेदवारांचा शोध घेऊन त्यांना उभे करण्याचा प्रयत्न करीत आहे मित्र पक्षांना ज्या जागा देणार त्या जागावरही सक्षम उमेदवार मित्र पक्ष कसा ऊभा करील यासाठी भाजपचा हस्तक्षेप दिसतात आहे त्यातच  पुणें जिल्ह्यावर भाजपाचे खुपच सुक्ष्म लक्ष दिसत आहे.

एकंदरीत शिरूर लोकसभेची परिस्थिती पहाता या मतदारसंघात अमोल कोल्हे यांना शह देण्यासाठी देवेंद्र शाह हे जॉईंट किलर ठरू शकतील अशी चर्चा सर्वत्र आहे. याबाबत शहा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही त्यामुळे सत्तेच्या सारीपाटात कोणत्या सोंगट्या वापरल्या जाणार असल्याचे चित्र  नजीकच्या आठ दिवसात स्पष्ट होईल यात शंका नाही

Continue Reading
1 Comment

1 Comment

  1. Bobhata News

    March 18, 2024 at 12:05 pm

    जनतेच्या अपेक्षांना महत्व बाकी जशी दृष्टी तशी सृष्टी

Leave a Reply

Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

राजकीय

हे कार्यकर्ते… “खरंच जनहितार्थी कि लाभार्थी”?

Published

on

मंचर दि (प्रतिनिधी)राज्याच्या राजकारणात वळसे पाटलांना स्थान मिळाले नाही म्हणून वळसे पाटलांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी  पक्ष नेतृत्वाकडे कोणतीही दाद मागण्या ऐवजी .आपल्या नेत्यावर अन्याय होऊनही निमूटपणे मूग गिळून गप्प बसणारे हे कार्यकर्ते वर्षानुवर्षे सत्तेचा लाडू चाखत असूनही जेव्हा नेत्यावर अन्याय अन्याय होतो. तरीही गप्प असतील तर ते खरंच  जनहितार्थी लाभार्थी  कि, स्वार्थी ?

 राज्याच्या राजकारणात गेली पस्तीस वर्षे असणारे एकेकाळचे शरद पवार यांचे खंदे समर्थक दिलीप वळसे पाटील यांना यावर्षी मात्र राज्य मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नाही खऱ्या अर्थाने राज्याच्या उत्कर्षांसाठी नियोजनबद्ध काम करणाऱ्या व्यक्तीला महाराष्ट्र मुकाला असे म्हणावायास हरकत नाही कारण वळसे पाटलांनी ज्या खात्याचे काम पाहिले त्या खात्याचा कारभार उत्तम पप्रकारे करून खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील जनतेला न्याय दिला असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. 

या वेळी मात्र महायुतीच्या काळात त्यांना मंत्री मंडळातून डावळण्यात आले यामागे कोणतीही व काहीहि कारणे असतील. परंतु महाराष्ट राज्य  एका चांगल्या व्यक्तीला प्रभावी व्यक्तिमहत्वाला मुकला हेही खरेच. वळसे पाटलांनी त्यांच्या कारकिर्दीत ज्या खात्याचे काम पाहिलं त्या खात्याची प्रगती झाली आहे इतिहास आहे. अशा कर्तृत्वान व्यक्तीला बाजूला ठेवणे हे पक्ष नेतृत्वाचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल.

दरम्यान राज्य मंत्रिमंडळ विस्तारात माजी मंत्री छगन भुजबळ यांचे नाव नाही म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र डोक्यावर घेतला ओ बि सी वर अन्याय झाला. असे सांगत पक्ष नेतृत्वावर आगपाखाड केली व आपण काहीही करू शकतो हे दाखवत पक्ष नेतृत्वाच्या निर्णयाचा निषेध केला व जोडे मारो आंदोलन करून धिक्कार हि अनेक कार्यकर्त्यांनी केला.परंतु आंबेगाव तालुक्यात मात्र वळसे पाठलांच्या कार्यकर्त्यांकडून साधा निषेधही नोंदवीला गेला नाही.

आंबेगाव,जुन्नर, खेड, शिरूर तालुक्यात वळसे पाटलांचे शेकडो कार्यकर्ते आहेत.परंतु वळसे पाटलांची मंत्री पदी वर्णी लागली नाही. यावर कार्यकर्त्याकडून मंत्रिपदच्या मागणीसाठी प्रचंड हल्लाबोल होणं गरजेचं होत. परंतु  यावर बोलण्याचे धारिष्टय कोणत्याही कार्यकर्त्यामध्ये नाही. याचाच अर्थ वळसे पाटलांनी जे कार्यकर्ते जपले त्या कार्यकर्त्यांची भूमिका  फक्त “टी फॉर टॅट” अशीच होती कि काय? असा प्रश्न विचाराला जातं आहे. 

गेली अनेक वर्ष ते वळसेपाटलांच्या सोबत राहून समोर आल्यावर फक्त ” देखल्या देवाला दंडवत” घालत फक्त  सत्तेचा मलिदा चाखणारे लाभार्थी कार्यकर्ते वळसे पाटलांजवळ होते हि सांगण्यासाठी कोण्या जोतिष्याची आवश्यकता नसावी. कारण वळसे पाटलांना डावलले जातं असताना त्यांच्या बाजूने खंबीर भूमिका घेत रस्त्यावर येण्याचे धाडस एकाही कार्यकर्त्यांने दाखविले नाही किंवा या  लाभार्थी  कार्यकर्त्यांना  वळसे पाटलांना मंत्री पदापासुन डावळून त्याच्यावर अन्याय केला जातं आहे.  असेही वाटले नाही. किंवा त्यांची बाजू पक्ष नेर्तृत्वासमोर मांडण्याची हिंम्मतहि कोण्या कार्यकर्त्यांची झाली नाही हि मोठी शोकांतिका आहे.

दरम्यान काल झालेल्या आभार मेळाव्यात एकमेकांची उणी दुनी काढून आपण किती समर्थक हे दाखविण्याची जणू स्पर्धाच सुरु होती. परंतु त्यात साहेबांवर पक्ष नेतृत्वाने अन्याय केला असून त्यावर पक्ष नेतृत्वाला जाब विचारावा असा साधा मुद्दाही कोणी मांडला नाही. खरंतर वळसे पाटलांना याची खंत नक्कीच असेल पण काय करणार? एकही कार्यकर्ता काहीच बोलला नाही यावरून असेच दिसते कि,  साहेबांना मिळालेले बहुतांशी कार्यकर्ते फक्त जनहितार्थी नसून लाभार्थी आहेत का? अशा आशयाची चर्चा सर्वत्र सुरु आहे.

Continue Reading

राजकीय

माजी खासदार शिवाजीराव आढळराव ठरताहेत? “किंगमेकर”

Published

on

मंचर दि. (प्रतिनिधी) लोकसभेतील पराभवाचा वचपा काढत, खासदार अमोल कोल्हे यांचा शिरूरलोकसभा मतदार संघावर आपली एकहाती वर्चस्व निर्माण करण्याच्या संकल्पचा “अश्व” रोखून धरत,माजी खासदार शिवाजीराव आढळराव हे किंग मेकर ठरले असल्याची चर्चा सर्वत्र आहे.

 विधानसभेची रणधुमाळी संपली, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले महायुतीत आनंदी आनंद साजरा होत असताना मात्र विधानसभा काळात शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे यांनी फोडलेल्या गगनभेदी डरकाळ्या पराभवाच्या गर्तेत शांत झाल्या या लोकसभा मतदार संघात विजयाची पताका फडकविणारे शिरूर लोकसभेचे खासदार व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे स्टार प्रचारक अमोल कोल्हे यांचे पश्चिम महाराष्ट्राचा ओ बी सी चा नेता होण्याचे स्वप्न मात्र धुळीलाच मिळाले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

मागील दोन लोकसभा निवडणुकीत माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांना पराजयाची धूळ चारणारे तसेच प्रती संभाजी म्हणून आपली प्रतिमा मालिकांच्या माध्यमातून तयार करून सर्वसामान्य जनतेच्या गळ्यातील ताईत झालेले, खासदार  अमोल कोल्हे यांना यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी विधानसभेच्या रणांगणात मात देली व विधान सभेत आपल्याच  विचाराचे लोकप्रतिनिधी विजयी करून शिरूर लोकसभेवर आपला वरचष्मा असल्याचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी दाखवून दिले असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.

लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर खासदार आढळराव थोडे बॅक फूट वर गेले होते. त्यांचे राजकारण मर्यादीत झाले. अशा अशयाच्या चर्चा देखील सर्वत्र झाल्या.परंतु नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत खासदार शिवाजीराव आढळराव यांनी प्रचंड कष्ट घेत आंबेगाव,शिरूर, भोसरी,जुन्नर व हडपसर येथे आपल्या विचाराचे प्रतिनिधी निवडून आणून खासदार कोल्हे यांना चांगलाच झटका दिला असल्याचे बोलले जाते.

दरम्यान जुन्नर, हडपसर, आंबेगाव भोसरी हे मतदार संघ विधानसभेत विरोधात जाणे म्हणजे कोल्हे यांच्या पुढील राजकीय  वाटचालीच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे. असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यात कोल्हे यांना मतदारांनी लोकसभा मतदार संघात निवडून येताना जेव्हढी मते पडली त्या पेक्षा सुमारे दोन लाख कमी मते विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या वेळी आघाडीच्या उमेदवारांना  मतदान झालेले आहे.

दरम्यान  राज्याचे तात्कालीन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी दिलेली जबाबदारी माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी सार्थ करीत आपल्या विचाराचे उमेदवार निवडून आणले आहेत तर पुढील काळात खासदार कोल्हे यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी केलेल्या विविध घोषणा पूर्ण करणे करणे गरजेचे आहे. त्यात इंद्रायणी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, भोसरी ते खेड रस्ता या दोन गोष्टी उत्तर पुणे जिल्यातील मतदारांच्या दृष्टीने महत्वाच्या घोषणा आहेत. या घोषणा बाबत खासदार कोल्हे यांनी जागरूक राहून हि कामे युद्ध पातळीवर करणे त्यांच्या राजकीय सौख्याचे दृष्टीने गरजेचे आहे. परंतु केंद्रात व राज्यात विरोधी विचार सरणीचे सरकार असताना खासदार कोल्हे हे महत्व कांक्षी प्रकल्प कसे पूर्ण करणार? व  शिरूरच्या जनतेला कसा? न्याय मिळवून देणार हे पहाणे कुतूहलचे ठरणार आहे.

Continue Reading

राजकीय

“राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे फोटो शासकीय कार्यालयात लावावेत”:जेष्ठ नेते अशोक काळे यांची प्रशासनाकडे मागणी 

Published

on

मंचर दि(प्रतिनिधी) सत्य अहिंसा व शांततेचा भारताला नव्हे तर जगाला संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे फोटो व संदेश सर्व शासकीय नियमशासकीय कार्यालयांमध्ये त्वरित लावावे या मागणीचे निवेदन तहसीलदार आंबेगाव यांना काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोक आप्पा काळे पाटील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विजयराव आढारी यांनी दिले आहे.

जगाला शांततेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे फोटो सध्या तालुक्यामध्ये संपूर्ण शासकीय  निमशासकीय  कार्यालयात दिसत नाहीत गेले काही काळापासुन सर्व संस्थांमध्ये जगाला शांततेचा संदेश देणारे राष्ट्रपुरुष महात्मा गांधी यांचे फोटो व संदेश होते परंतु हे फोटो व संदेश काही दिवसापासून काही शासकीय कार्यालयांमधून हटवले गेलेले आहेत किंवा काढले गेलेले निदर्शनास येत आहे असे काळे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

 दरम्यान सर्व शासकीय नियम शासकीय कार्यालयांमध्ये महात्मा गांधीजींचे फोटो व संदेश लावावे जावेत असे आवाहन केले असून या प्रसंगी पाटणचे उपसरपंच कुंडलिक कुंडलिक असवले त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य दगडू मते सुनील शेळके रामदास मते गणेश खानदेशी बाळासाहेब इंदोरे बंटी मोरडे आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

 यासंदर्भातल्या निवेदनाच्या प्रती  राष्ट्रपती द्रोपदी मुर्दौ  राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते व काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे महाराष्ट्राचे राज्यपाल त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनाही पाठवले असून देशपातळीवरती व राज्य पातळीवरती या संदर्भामध्ये तातडीने कार्यवाही करावी व त्या दृष्टीने शासनाकडे पाठपुरावा करावा अशी विनंती ही संबंधित निवेदनामध्ये केलेले आहे.

दरम्यान याबाबत तालुका पातळीवर डिसेंबर अखेर कार्यवाही न झाल्यास राज्यघटनेनुसार परमपूज्य गांधींनी आखून दिलेल्या मार्गानुसार  राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते ज्या शासकीय कार्यालयामध्ये परमपूज्य गांधीजींचा फोटो नसेल त्या ठिकाणी आंदोलन करण्याचा मानस व्यक्त केलेला आहे या संदर्भात पो स्टेशन घोडेगाव ग्रामीणरुग्णालया घोडेगाव रजिस्टर आँफीस प्रकल्प कार्यालय यांना निवेदन देण्यात आले आहे.

Continue Reading
Advertisement

Trending