Connect with us

राजकीय

वळसे पाटलांच्या “अष्टविजयासाठी यावेळी  दमछाक का? झाली,” श्रेयवादापेक्षा, आत्मचिंतन गरजेचे….

Published

on

मंचर दि. (प्रतिनिधी) राज्यात भाजपा समवेत महायुतीला प्रचंड नव्हे अभूतपूर्व यश मिळाले परंतु आंबेगाव तालुक्यात दिलीप वळसे पाटील यांची मात्र  हा अष्ट विजय मिळविताना प्रचंड दमछाक झाली या अटीतटीच्या निवडणुकीवर श्रेया घेण्यासाठी धडपडण्यापेक्षा  झालेल्या निसटत्या विजयावर आत्मचिंतन गरजेचे आहे.

 गेली पस्तीस वर्षे चढत्या क्रमाणे निवडून येणारे वळसे पाटील यावेळी मात्र थोडक्यात बचावले. हा वळसे पाटलांचा विजय म्हणजे जीवावर आले पण  बोटावर निभावले अशीच काहीशी स्थिती झाली असताना मात्र  लीड कमी झाले याची जबाबदारी स्वीकारण्यापेक्षा आमच्यामुळेच विजय झाला असे अनेक दावे प्रतिदावे महायुतीतील विविध कार्यकर्त्यांकडून होत आहेत हिच मोठी आश्चर्याची गोष्ट आहे 

 आंबेगाव तालुक्यात वळसे पाटलांची मते मिळविण्यासाठी झालेला संघर्ष पहाता तालुक्यात त्यांच्या बाबत असलेली विरोधी लाट मावळून  विजय म्हणजे त्यांचे पूर्व पुण्यच म्हणावे लागेल कारण सुमारे सत्तर हजाराचे लीड तोडून हा विजय  अवघा सुमारे पंधराशे मतांनी झाला आहे. झालेला विजय साजरा करावा त्याबद्दल काहीच दुमत नाही परंतु हा मिळालेला विजय आमच्यामुळे मिळाला असे सांगण्यासाठी आता अनेकांची श्रेयाची मोठी लढाई सुरु झाली आहे असे दिसते. तालुक्यात अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना हा विजय मिळाला आहे यात शंका नाही यासाठी वळसे पाटील व त्यांच्या अष्टप्रधान मंडळाने केलेले योग्य व अचूक नियोजन होय असे म्हणणे वावगे ठरणार नाही 

गेली अनेक वर्षापासुन एक गाणे तालुक्यात ऐकले जाते ते म्हणजे “कोणी कितीही करा हल्ला दिलीप रावांचा मजबूत किल्ला” खरेतर या किल्ल्याचे अनेक बुरुज अक्षरशः निकामी झाले असल्याचे या निवडणुकीत लक्षात आले आहे तरीही श्रेय घेण्याची व फुकटच्या तोंडाच्या वाफा सोडण्याची वृत्ती, अजूनही लाभार्थी कार्यकर्त्यांची गेलेली नाही याचे कारण असे  कि,  निवडणूक झाल्यानंतर हा विजय आमच्यामुळे झाला असेच सांगत आहेत म्हणतात ना… यशाचे सर्वच धनी होतात. पण किती श्रेय घ्यावे किमान यालाही मर्यादा असतात.वळसे पाटलांच्या विजयाचे श्रेय ज्यांना द्यायला हवे, ते बिचारे गप्प आहेत ते आपले काम प्रमाणिक पणे करून बाजूला हि झाले… असो 

खरेतर या निसटत्या विजयाचा उत्साह साजरा करताना  मतांची टक्केवारी एव्हडी कमी का? झाली हे शोधणे अतिशय गरजेचे आहे. कारण तालुक्यात वळसे पाटलांनी गेल्या पस्तीस वर्षाच्या कालावधित विविध गावात असलेला पाणी प्रश्न, घोडनदीवर कोल्हापूरी पद्धतीचे बंधारे, डिंभे धरण कालवा निर्मिती  विविध  नळपाणी पुरवठा योजना वसतिगृहे, हॉस्पिटल,गावोगावी रस्त्यांचे जाळे,इंजिनिअरिंग कॉलेज बँक पतसंस्था, यातून उद्योग व्यवसायास प्रोत्साहन आदी विविध विकास कामे केली तरीही यावेळी इतका विरोध का?व्हावा याचे आत्मपरीक्षण होणे गरजेचे आहे. 

याचा अर्थ असा कि खरच कार्यकर्त्यांनी योग्य व प्रमाणिकपणे काम केले असतें तर हा विजय निसटता नक्कीच नसता.हे हि  खरेच  परंतु चमचा चमचा मिळविण्यासाठी सभोवताली गोंडा घोळणारी  लाभार्थी किंवा मलिदा गँग या विषयी झालेला प्रचार पहाता यातून  वळसे पाटलांनी आंबेगाव तालुक्यातील जनतेचा विश्वास पुन्हा जिंकण्यासाठी  जमिनीवरून काम करणे गरजेचे आहे. कारण हा निसटता विजय बरेच काही शिकवून जातो परंतु त्याचे चिंतन करून योग्य अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.

Continue Reading
1 Comment

1 Comment

  1. मा.संतोषभाऊ बोऱ्हाडे

    November 27, 2024 at 1:15 pm

    खरंतर हा विजय फक्त कागदावरच आहे . तांत्रिकदृष्ट्या तो पराभवच आहे .परंतु विजय हा विजयच असतो . हरकत नाही .आठ जिल्हा परिषदांपैकी घोडेगाव जिल्हा परिषद आणि मंचर जिल्हा परिषदेमध्ये जे साहेबांना लीड मिळालं खास करून घोडेगावच्या लोकांनी जे दिलं .ते माननीय कैलासबुवा काळे यांच्या नेतृत्वामुळे . 35 वर्ष साहेबांबरोबर राहिलेल्या माणसांनी साहेबांच काम केलं नाही . पण गेले सात-आठ वर्षांपूर्वी साहेबांबरोबर गेलेले कैलासबुवा यांनी मात्र प्रामाणिकपणाने काम केलं .आणि साहेबांना निवडून येण्यासाठी मदत झाली ज्या घोडेगाव वरती सतत अन्याय झाला त्याच घोडेगावकरांनी साहेबाला तारले .निदान आता तरी घोडेगाव वरती अन्याय होणार नाही घोडेगाव वर दुर्लक्ष होणार नाही .याची काळजी माननीय वळसे साहेबांनी घेतली पाहिजे .असं मला एक घोडेगावचा सुजाण नागरिक म्हणून सांगावसं वाटतं .पटलं तर घ्या नाही पटलं तर पुढे जनता आहेच .???

Leave a Reply

Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

राजकीय

हे कार्यकर्ते… “खरंच जनहितार्थी कि लाभार्थी”?

Published

on

मंचर दि (प्रतिनिधी)राज्याच्या राजकारणात वळसे पाटलांना स्थान मिळाले नाही म्हणून वळसे पाटलांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी  पक्ष नेतृत्वाकडे कोणतीही दाद मागण्या ऐवजी .आपल्या नेत्यावर अन्याय होऊनही निमूटपणे मूग गिळून गप्प बसणारे हे कार्यकर्ते वर्षानुवर्षे सत्तेचा लाडू चाखत असूनही जेव्हा नेत्यावर अन्याय अन्याय होतो. तरीही गप्प असतील तर ते खरंच  जनहितार्थी लाभार्थी  कि, स्वार्थी ?

 राज्याच्या राजकारणात गेली पस्तीस वर्षे असणारे एकेकाळचे शरद पवार यांचे खंदे समर्थक दिलीप वळसे पाटील यांना यावर्षी मात्र राज्य मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नाही खऱ्या अर्थाने राज्याच्या उत्कर्षांसाठी नियोजनबद्ध काम करणाऱ्या व्यक्तीला महाराष्ट्र मुकाला असे म्हणावायास हरकत नाही कारण वळसे पाटलांनी ज्या खात्याचे काम पाहिले त्या खात्याचा कारभार उत्तम पप्रकारे करून खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील जनतेला न्याय दिला असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. 

या वेळी मात्र महायुतीच्या काळात त्यांना मंत्री मंडळातून डावळण्यात आले यामागे कोणतीही व काहीहि कारणे असतील. परंतु महाराष्ट राज्य  एका चांगल्या व्यक्तीला प्रभावी व्यक्तिमहत्वाला मुकला हेही खरेच. वळसे पाटलांनी त्यांच्या कारकिर्दीत ज्या खात्याचे काम पाहिलं त्या खात्याची प्रगती झाली आहे इतिहास आहे. अशा कर्तृत्वान व्यक्तीला बाजूला ठेवणे हे पक्ष नेतृत्वाचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल.

दरम्यान राज्य मंत्रिमंडळ विस्तारात माजी मंत्री छगन भुजबळ यांचे नाव नाही म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र डोक्यावर घेतला ओ बि सी वर अन्याय झाला. असे सांगत पक्ष नेतृत्वावर आगपाखाड केली व आपण काहीही करू शकतो हे दाखवत पक्ष नेतृत्वाच्या निर्णयाचा निषेध केला व जोडे मारो आंदोलन करून धिक्कार हि अनेक कार्यकर्त्यांनी केला.परंतु आंबेगाव तालुक्यात मात्र वळसे पाठलांच्या कार्यकर्त्यांकडून साधा निषेधही नोंदवीला गेला नाही.

आंबेगाव,जुन्नर, खेड, शिरूर तालुक्यात वळसे पाटलांचे शेकडो कार्यकर्ते आहेत.परंतु वळसे पाटलांची मंत्री पदी वर्णी लागली नाही. यावर कार्यकर्त्याकडून मंत्रिपदच्या मागणीसाठी प्रचंड हल्लाबोल होणं गरजेचं होत. परंतु  यावर बोलण्याचे धारिष्टय कोणत्याही कार्यकर्त्यामध्ये नाही. याचाच अर्थ वळसे पाटलांनी जे कार्यकर्ते जपले त्या कार्यकर्त्यांची भूमिका  फक्त “टी फॉर टॅट” अशीच होती कि काय? असा प्रश्न विचाराला जातं आहे. 

गेली अनेक वर्ष ते वळसेपाटलांच्या सोबत राहून समोर आल्यावर फक्त ” देखल्या देवाला दंडवत” घालत फक्त  सत्तेचा मलिदा चाखणारे लाभार्थी कार्यकर्ते वळसे पाटलांजवळ होते हि सांगण्यासाठी कोण्या जोतिष्याची आवश्यकता नसावी. कारण वळसे पाटलांना डावलले जातं असताना त्यांच्या बाजूने खंबीर भूमिका घेत रस्त्यावर येण्याचे धाडस एकाही कार्यकर्त्यांने दाखविले नाही किंवा या  लाभार्थी  कार्यकर्त्यांना  वळसे पाटलांना मंत्री पदापासुन डावळून त्याच्यावर अन्याय केला जातं आहे.  असेही वाटले नाही. किंवा त्यांची बाजू पक्ष नेर्तृत्वासमोर मांडण्याची हिंम्मतहि कोण्या कार्यकर्त्यांची झाली नाही हि मोठी शोकांतिका आहे.

दरम्यान काल झालेल्या आभार मेळाव्यात एकमेकांची उणी दुनी काढून आपण किती समर्थक हे दाखविण्याची जणू स्पर्धाच सुरु होती. परंतु त्यात साहेबांवर पक्ष नेतृत्वाने अन्याय केला असून त्यावर पक्ष नेतृत्वाला जाब विचारावा असा साधा मुद्दाही कोणी मांडला नाही. खरंतर वळसे पाटलांना याची खंत नक्कीच असेल पण काय करणार? एकही कार्यकर्ता काहीच बोलला नाही यावरून असेच दिसते कि,  साहेबांना मिळालेले बहुतांशी कार्यकर्ते फक्त जनहितार्थी नसून लाभार्थी आहेत का? अशा आशयाची चर्चा सर्वत्र सुरु आहे.

Continue Reading

राजकीय

माजी खासदार शिवाजीराव आढळराव ठरताहेत? “किंगमेकर”

Published

on

मंचर दि. (प्रतिनिधी) लोकसभेतील पराभवाचा वचपा काढत, खासदार अमोल कोल्हे यांचा शिरूरलोकसभा मतदार संघावर आपली एकहाती वर्चस्व निर्माण करण्याच्या संकल्पचा “अश्व” रोखून धरत,माजी खासदार शिवाजीराव आढळराव हे किंग मेकर ठरले असल्याची चर्चा सर्वत्र आहे.

 विधानसभेची रणधुमाळी संपली, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले महायुतीत आनंदी आनंद साजरा होत असताना मात्र विधानसभा काळात शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे यांनी फोडलेल्या गगनभेदी डरकाळ्या पराभवाच्या गर्तेत शांत झाल्या या लोकसभा मतदार संघात विजयाची पताका फडकविणारे शिरूर लोकसभेचे खासदार व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे स्टार प्रचारक अमोल कोल्हे यांचे पश्चिम महाराष्ट्राचा ओ बी सी चा नेता होण्याचे स्वप्न मात्र धुळीलाच मिळाले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

मागील दोन लोकसभा निवडणुकीत माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांना पराजयाची धूळ चारणारे तसेच प्रती संभाजी म्हणून आपली प्रतिमा मालिकांच्या माध्यमातून तयार करून सर्वसामान्य जनतेच्या गळ्यातील ताईत झालेले, खासदार  अमोल कोल्हे यांना यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी विधानसभेच्या रणांगणात मात देली व विधान सभेत आपल्याच  विचाराचे लोकप्रतिनिधी विजयी करून शिरूर लोकसभेवर आपला वरचष्मा असल्याचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी दाखवून दिले असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.

लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर खासदार आढळराव थोडे बॅक फूट वर गेले होते. त्यांचे राजकारण मर्यादीत झाले. अशा अशयाच्या चर्चा देखील सर्वत्र झाल्या.परंतु नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत खासदार शिवाजीराव आढळराव यांनी प्रचंड कष्ट घेत आंबेगाव,शिरूर, भोसरी,जुन्नर व हडपसर येथे आपल्या विचाराचे प्रतिनिधी निवडून आणून खासदार कोल्हे यांना चांगलाच झटका दिला असल्याचे बोलले जाते.

दरम्यान जुन्नर, हडपसर, आंबेगाव भोसरी हे मतदार संघ विधानसभेत विरोधात जाणे म्हणजे कोल्हे यांच्या पुढील राजकीय  वाटचालीच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे. असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यात कोल्हे यांना मतदारांनी लोकसभा मतदार संघात निवडून येताना जेव्हढी मते पडली त्या पेक्षा सुमारे दोन लाख कमी मते विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या वेळी आघाडीच्या उमेदवारांना  मतदान झालेले आहे.

दरम्यान  राज्याचे तात्कालीन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी दिलेली जबाबदारी माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी सार्थ करीत आपल्या विचाराचे उमेदवार निवडून आणले आहेत तर पुढील काळात खासदार कोल्हे यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी केलेल्या विविध घोषणा पूर्ण करणे करणे गरजेचे आहे. त्यात इंद्रायणी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, भोसरी ते खेड रस्ता या दोन गोष्टी उत्तर पुणे जिल्यातील मतदारांच्या दृष्टीने महत्वाच्या घोषणा आहेत. या घोषणा बाबत खासदार कोल्हे यांनी जागरूक राहून हि कामे युद्ध पातळीवर करणे त्यांच्या राजकीय सौख्याचे दृष्टीने गरजेचे आहे. परंतु केंद्रात व राज्यात विरोधी विचार सरणीचे सरकार असताना खासदार कोल्हे हे महत्व कांक्षी प्रकल्प कसे पूर्ण करणार? व  शिरूरच्या जनतेला कसा? न्याय मिळवून देणार हे पहाणे कुतूहलचे ठरणार आहे.

Continue Reading

राजकीय

“राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे फोटो शासकीय कार्यालयात लावावेत”:जेष्ठ नेते अशोक काळे यांची प्रशासनाकडे मागणी 

Published

on

मंचर दि(प्रतिनिधी) सत्य अहिंसा व शांततेचा भारताला नव्हे तर जगाला संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे फोटो व संदेश सर्व शासकीय नियमशासकीय कार्यालयांमध्ये त्वरित लावावे या मागणीचे निवेदन तहसीलदार आंबेगाव यांना काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोक आप्पा काळे पाटील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विजयराव आढारी यांनी दिले आहे.

जगाला शांततेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे फोटो सध्या तालुक्यामध्ये संपूर्ण शासकीय  निमशासकीय  कार्यालयात दिसत नाहीत गेले काही काळापासुन सर्व संस्थांमध्ये जगाला शांततेचा संदेश देणारे राष्ट्रपुरुष महात्मा गांधी यांचे फोटो व संदेश होते परंतु हे फोटो व संदेश काही दिवसापासून काही शासकीय कार्यालयांमधून हटवले गेलेले आहेत किंवा काढले गेलेले निदर्शनास येत आहे असे काळे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

 दरम्यान सर्व शासकीय नियम शासकीय कार्यालयांमध्ये महात्मा गांधीजींचे फोटो व संदेश लावावे जावेत असे आवाहन केले असून या प्रसंगी पाटणचे उपसरपंच कुंडलिक कुंडलिक असवले त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य दगडू मते सुनील शेळके रामदास मते गणेश खानदेशी बाळासाहेब इंदोरे बंटी मोरडे आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

 यासंदर्भातल्या निवेदनाच्या प्रती  राष्ट्रपती द्रोपदी मुर्दौ  राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते व काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे महाराष्ट्राचे राज्यपाल त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनाही पाठवले असून देशपातळीवरती व राज्य पातळीवरती या संदर्भामध्ये तातडीने कार्यवाही करावी व त्या दृष्टीने शासनाकडे पाठपुरावा करावा अशी विनंती ही संबंधित निवेदनामध्ये केलेले आहे.

दरम्यान याबाबत तालुका पातळीवर डिसेंबर अखेर कार्यवाही न झाल्यास राज्यघटनेनुसार परमपूज्य गांधींनी आखून दिलेल्या मार्गानुसार  राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते ज्या शासकीय कार्यालयामध्ये परमपूज्य गांधीजींचा फोटो नसेल त्या ठिकाणी आंदोलन करण्याचा मानस व्यक्त केलेला आहे या संदर्भात पो स्टेशन घोडेगाव ग्रामीणरुग्णालया घोडेगाव रजिस्टर आँफीस प्रकल्प कार्यालय यांना निवेदन देण्यात आले आहे.

Continue Reading
Advertisement

Trending