Connect with us

सामाजिक

जनतेच्या सेवेसाठी, तत्पर सदैव…होऊ पहाणाऱ्या, “पूर्वा” यांचे कार्य,भविष्यातील बांधणीसाठी ठरेल का? “अपूर्व”

Published

on

मंचर दि (प्रतिनिधी)- आंबेगाव तालुक्यात दरवेळी हजारोंच्या मतांधिक्याने विजयी होणारे राज्याचे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांना देवदत्त निकम यांच्याकडून अगदी निसटता विजय मिळाला त्यामुळे तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याच्या कार्यकर्त्यांना व नेत्यांना तालुक्यात त्यांची कमी झालेली  ताकद समजली हे नक्की…..परंतु आत्मचिंतन करून पुन्हा जनतेचा विश्वास संपादन करून घडी बसविण्यासाठी वळसे पाटलांनी कंबर कसली असून पुनर्णिमाणाचे काम करण्यासाठी चे “अपूर्व” कार्य   वळसे पाटलांच्या कन्या “पूर्वा” यांनी हाती घेतल्याचे दिसत आहे…

आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पक्ष पुन्हा बांधणी करण्यासाठी कार्यकर्ता संवाद मिळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. यानुसार तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील अडीवरे येथे  ‘कार्यकर्ता संवाद कार्यक्रम’ संपन्न झाला. यावेळी.पूर्वा वळसे पाटील यांनी कार्यकर्ते व ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधत .आदिवासी  भागातील नागरिकांच्या  विविध समस्या जाणून घेत त्याबाबत चर्चा केली.

   “अडिवरे येथे कातकरी वस्ती येथील दोन घरांचे अचानक आग लागल्याने नुकसान झालेल्या  कुटुंबियांना भेट देऊन  “अलका वळणे व सुवर्णा पवार” या दोन्ही महिलांना प्रत्येकी रु. २५०००/- मदत “पूर्वा वळसे” यांच्या उपस्थितीत देण्यात आली” 

माजी मंत्री आ.दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या माध्यमातून आहुपे खोऱ्यात सुरू असलेली विविध विकासकामे व प्रलंबित कामे यांचा आढावा घेण्यात आला त्याचप्रमाणे अनुसया महिला उन्नती केंद्र, मंचर यांच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात  येत असून  गरजू व पात्र लाभार्थ्यांसाठी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ  वृद्धपकाळ योजना आदींच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना मंजुरीचे आदेश देण्यात आले. 

दरम्यान जनजीवन मिशन अंतर्गत मुदतीत पूर्ण न होणाऱ्या कामांच्या ठेकेदारांना दंड लावण्यात यावा तसे दिरंगाई बाबत कारंवाई करावी तसेच रस्त्या च्या कडे ने नितृष्ठ दर्जाचे पाईप लाईन करणाऱ्या ठेकेदारांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत विजेचे खांब पावसाळ्याच्या आधी बदलेले जावेत तसेच पाणी योजने साठी वेगळी नवीन  डीपी देण्यात यावी पांचाळे गावच्या पुनर्वसणा साठी एका वेळी ८३ घरांना घरकुल योजनेतून निधी मिळावा फॉरेस्ट मुळे थांबलेलि आहुपे रस्त्या चे काम तात्काळ चालू करण्यात यावे.

   

      यावेळी रामदास वळसे, आदिवासी नेते अमोल अंकुश, पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष प्रकाशराव घोलप, युवक कार्याध्यक्ष निलेश बो-हाडे, माजी सभापती संजय गवारी, तिरपाड ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच सोमा दाते, अडीवरेचे सरपंच संगीताताई किर्वे, असाणेचे माजी उपसरपंच रामदास भोगटे, माळीनचे उपसरपंच हेमंत भालचिम, गणेश झांजरे, बोरघरचे सरपंच विजय जंगले, अनंथा साळवे, सखाराम गभाले, मुद्गुन गुरुजी, दत्ता गवारी, सुरेखाताई जढर, संतोष शेळके, नामदेव असवले, समीर घारे, काळू जढर शंकर लांगी आधी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. मंचर शहर अध्यक्ष धुभम बाणखेले व विविध खात्यांचे अधिकारी तसेच आहुपे, पिंपरगणे, तिरपाड, दिगद, कोंढरे, आसाने, माळीन, पंचाळे, अडिवरे, बोरघर फुलवडे या परिसरातील नागरिक उपस्थित होते. 

Continue Reading
2 Comments

2 Comments

  1. Rajesh Chandrakant Chaskar

    March 6, 2025 at 11:53 am

    जनतेने आपल्याला का नाकारले समजल्यावर जनतेच्या समस्या काय आहे हे जाणून घेणे तेवढेच महत्त्वाचं आज एसटी बस समस्या केवढी गंभीर आहे ह्या समस्येचं निवारण करायला लोकांना दुसऱ्या तालुक्याच्या आमदाराकडे जावा लागेल का?

  2. अमोल अंकुश

    March 6, 2025 at 12:34 pm

    पूर्वाताई यांचे नेतृत्व हे सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून युवा वर्गात लोकप्रिय होत असून दादा व साहेब यांना मानणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ताई काम करत आहेत यामुळे लवकरच राजकीय,सामाजिक क्षेत्रात चांगले काम करणारी युवा पिढी आपल्याला पाहावयास मिळेल.

Leave a Reply

Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सामाजिक

“महिला बांधकाम कामगारांसाठी” शासनाकडून मिळणाऱ्या मदतीवर डल्ला मारणारे काथाकथित एजंट व पुढारी  म्हणजे “शिव” जन्मभूमीतील सध्याचे रांझ्याचे पाटील का?

Published

on

मंचर दि. (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या काळात एका महिलेवर अत्याचार करणाऱ्या पाटलाचे छत्रपतींनी हात पाय छाटले होते. परंतू त्याच छत्रपतींचे नाव घेऊन छत्रपती शिवरायांची जन्म भूमी असलेल्या जुन्नर तालुक्यात बांधकाम कामगार महिलांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या मदतीतून काही एजंटांनी व कथित गावपुढाऱ्यांनी हात ओले करण्याचा सपाटा लावला असताना या होणाऱ्या गैरव्यवहारावर प्रकाश झोत टाकणाऱ्या पत्रकारावर जीवघेणा हल्ला केला जातो व त्याच एजंटांची बाजू घेण्यासाठी काही कथित गाव पुढारी पत्रकारावर बेछुट खोटे आरोप करण्याचा प्रयत्न करतात हि खरी शरमेची गोस्ट बाब आहे 

दरम्यान सर्वसामान्य बांधकाम कामगारांचा आर्थिक स्थर उंचावण्यासाठी शासनाने बांधकाम कामगार योजना आणली या योजनेचा खरा अर्थ असा कि, रोजंदारीवर काम करणारे बांधकाम कामगार मजूर वर्गातील  कुटुंबाना आर्थिक सहाय्य मिळावे व यातून त्यांची मुले शिकुन सक्षम व्हावीत  या दृष्टीकोनातून शासनाने बांधकाम कामगानांच्या उत्कर्षासाठी आणलेल्या या योजनेचा काही एजंटांनी कथाकथित राजकीय पुढऱ्यांच्या आशीर्वादाने गोरस धंदा बनविल्याचा प्रकार समोर येत आहे.

सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यामध्ये सुरु असलेली बांधकाम कामगार योजनेमध्ये कामगारांना मिळणाऱ्या मदतीतून चांगली मोठी रक्कम कथाकथित एजंट लोकांना दयावी लागते व यात अनेक कथाकथित स्थानिक पुढाऱ्यांचा सहभाग असल्याचे बोलले जाते.व  हे कथाकथित गाव पुढारी समाजसेवेचा खोटा आवडत आणत गरिबांच्या टाळूवरील लोणी खात असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

     दरम्यान नुकत्याच एका इलेक्ट्रानिक वाहिनेने सुरु असलेल्या बांधकाम कामगार योजनेतील या गैरव्यवहाराचा भांडाफोड केला. या नंतर त्या पत्रकारावर काही एजंट लोक यांनी हल्ला  केला व काही कथित गाव पुढऱ्यांच्या मदतीने बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. व हि घटना छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्म स्थान असलेल्या जुन्नर तालुक्यात घडली.यामध्ये या राजकीय नेत्यांनी महिलांना त्रास दिल्याचा आरोप केला खरे तर हे गाव पुढारी ज्या नेत्याचे कार्यकर्ते आहेत त्याच नेत्याची एक क्लिप काही महिन्यापूर्वी प्रसारीत झाली होती.यामुळे जसा नेता तसा कार्यकर्ता अशी चर्चा नागरिक दाबक्या आवाजात करीत आहेत.

दरम्यान या कथाकथित पुढऱ्याच्या या लाजिरवान्या कृत्याचा सर्वच स्थरावरून निषेध केला जात असून . या प्रकरणाची उच्च स्तरीय कसून चौकशी करावी. सुरु असलेल्या या योजनेत खरंच किती बांधकाम कामगार आहेत का?  या सर्व बाबींची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे

Continue Reading

सामाजिक

ऊस उत्पादनाच्या वाढीसाठी “भीमाशंकर सह. साखर कारखान्याचे” ऊस लागवड धोरण जाहीर -अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांची माहिती

Published

on

मंचर दि. (प्रतिनिधी) भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे लागवड हंगाम २०२५-२६ साठी ऊस लागवडीचे धोरण जाहिर झाले असून त्याची अंमलबजावणी दि. १ जून २०२५ पासून करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.

 “उत्पादकता वाढ़ लक्ष योजना”

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीचे दृष्ठिने कारखान्यामार्फत “दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील ऊस उत्पादकता वाढ लक्ष २०२०” ही महत्वाकांक्षी ऊस विकास योजना राबविणेत येत आहे अशी माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष अँड.प्रदीप वळसे यांनी सांगितले

     भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माध्यमातून सुरु करण्यात येत असलेल्या या ऊस लागवड जाहीर धोरणबाबात   अधिक माहिती देताना बेंडे यांनी सांगितले की,  दि. १ जून २०२५ ते ३० ऑक्टोबर २०२५  पर्यंतच्या कालावधीमध्ये को.एम.०२६५ तर दि. १ जून २०२५ ते ३० एप्रिल २०२६ पर्यंतच्या कालावधीमध्ये   को.८६०३२ ऊस लागवडीस व नोंदीस परवानगी देण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे  दि. १ ऑगस्ट २०२५ ते ३० एप्रिल २०२६ अखेर पर्यंतच्या कालावधीमध्ये व्हीएसआय ०८००५ या ऊस लागवडीस परवानगी देण्यात आली आहे. दि. १ सप्टेंबर २०२५ ते ३० एप्रिल २०२६ अखेर पर्यंतच्या कालावधीमध्ये एम.एस. १०००१, को. ९०५७,  या ऊस लागवडीस परवानगी देण्यात आली आहे. को.व्हीएसआय १८१२१, फुले ऊस १५०१२, फुले ऊस १५००६, फुले ऊस १३००७, को.एम. ११०८२ इ. शिफारशीत ऊस लागवडीस दि. १ जून २०२५ ते दि. ३० एप्रिल २०२६ पर्यंत परवानगी देण्यात आली आहे.

              कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद व ऊस उत्पादक यांना मागणीप्रमाणे उपलब्धतेनुसार लागवड धोरणाप्रमाणे दि. १ जून २०२५ पासून बेणे वाटप करण्यात येणार आहे व खासगी ऊस लागवडीच्या नोंदी घेण्यात येणार आहेत. त्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस लागवड करावयाच्या क्षेत्राचा ७/१२ उतारा व आवश्यक कागदपत्रे पूर्तता संबधित विभागीय शेतकी कार्यालयात जाऊन करावी. खासगी ऊस लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी चार दिवसाचे आत संबंधित गट ऑफिसमध्ये जाऊन ऊस नोंद करावयाची आहे. 

दरम्यान उशीरा ऊस लागवड नोंद करणेस आलेल्या ऊस उत्पादकांची ऊस नोंदीसाठी आलेची तारीख हीच ऊस लागवड तारीख म्हणून नोंद करण्यात येईल. कारखान्यामार्फत कार्यक्षेत्र व परिसरामध्ये धोरणानुसार उधारीने / रोखीने राबविणेत येणाऱ्या ऊस विकास योजने अंतर्गत माती परीक्षण सुविधा, ताग बियाणे वाटप, ऊस बेणे वाटप,  रासायनिक खते पुरवठा, द्रवरुप जीवाणू खते, ऊस रोपे वाटप, खासगी ऊस लागवड अर्थसहाय्य, प्रेसमड, खोडवा व्यवस्थापनामध्ये पाचट कुट्टी सुविधा, ठिबक सिंचन योजना, व्हीएसआय उत्पादित मल्टीमायक्रोन्युट्रीएंट, मल्टीमॅक्रोन्युट्रीएंट, ह्युमक ॲसिड, वसंत उर्जा, जैविक कीटकनाशके बी.व्ही.एम., इ.पी.एन. इ. निविष्ठांचा पुरवठा, हंगामवार ऊस पीक स्पर्धा इ. ऊस विकास योजनांचा लाभ सर्व ऊस उत्पादकांनी घ्यावा.  ऊस पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेणेस इच्छुक  शेतकऱ्यांनी  प्रवेश शुल्क रक्कम रु.१००/-  डिसेंबर २०२५ अखेर भरणा करून स्पर्धेसाठी नाव नोंदणी करावी.

              त्याचप्रमाणे एकात्मिक कीड व्यवस्थापन योजनेमध्ये ऊस पिकामध्ये हुमणी कीडीचे नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी गोळा केलेले हुमणी कीडीचे भुंगेरे कारखान्यामार्फत प्रति किलो रु.३००/- प्रमाणे जून २०२५ अखेर खरेदी केले जाणार असून सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी हुमणीचे भुंगेरे गोळा करुन एकात्मिक हुमणी कीड नियंत्रण करावे. तरी वरील लागवड धोरणानुसार जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उसाची लागवड करावी व कारखाना ऊस विकास योजनांचा लाभ घ्यावा. ऊस विकास योजनेच्या अधिक माहितीसाठी विभागीय शेतकी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन  बेंडे यांनी केले आहे.

Continue Reading

सामाजिक

अवकाळी पावसाच्या नुकसानीचे आंबेगावमध्ये “तलाठी करणार पंचनामे” –  नायब तहसीलदार वाघ

Published

on

मंचर दि.29 (सदानंद शेवाळे): अवकाळी ऐन उन्हाळ्यात आलेल्या पावसामुळे आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम व पूर्व भागात मुसळधार पावसामुळे आंबा जांभूळ केळी मका बाजरी भुईमूग व पालेभाज्या वर्गीय पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे प्रत्येक गावातील गाव कामगार तलाठी आपापल्या सजातील नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करतील अशी माहिती आंबेगाव  तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार सचिन वाघ यांनी बोभाटा शी बोलताना दिली.

   मागील पंधरा दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे अनेक ठिकाणी बांध फुटले आहेत रस्ते वाहून गेले आहेत तर वीज पडल्याने कांदा बराखी  जळून गेली आहे पालेभाज्या वर्गीय पिके कोबी फ्लावर कोथिंबीर मेथी शापू सह अनेक पालेभाज्या पाण्यात पोहत आहेत.

 

संप काळातही “कृषी सहाय्यक” करणार पंचनामे 

 कामगार तलाठी आपापल्या सजा मध्ये पंचनामे करणार आहेत त्यांना सहाय्य करण्यासाठी सहाय्यक कृषी अधिकारी संपावर असतानाही आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत मदत करणार असल्याची माहिती घोडेगाव कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान आंबेगाव तालुक्यात  पूर्व भागात पाणी उपलब्ध असल्याने तालुक्यातील सुमारे 3 हजार 750 एकर क्षेत्रावर उन्हाळी बाजरी पिकाची पेरणी करण्यात आली होती  परंतू अवकाळी पावसाने  उन्हाळ्यात हमखास उत्पन्न देणारे बाजरीचे पीक भुईसपाट झाले आहे बाजरीच्या कणसांना चौरे ( कोंब ) फुटले आहेत तर जनावरांचा वाळलेल्या चारा वैरण पाण्यात भिजत आहे या वैरणीवर कुज व बुरशी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे   दुभत्या व भाकड जनावरांना हिवाळ्यात व उन्हाळ्यात  वाळलेल्या चाऱ्याची मोठी टंचाई यंदा भासणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.त्याचप्रमाणे  सुमारे दोन हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे अतोनात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे अशी माहिती तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

Continue Reading
Advertisement

Trending