singa8

rp8888

singa8

slot demo

slot qris

singa8

rp8888

https://bertrodriguez-museum.org

https://journal.uecommercebintaro.ac.id/

singa8

singa8

singa8

singa8

singa8

singa8

singa8

singa8

92GLORY

http://vecas.org.vn/id/

https://admire.ch/vendor/

Connect with us

सामाजिक

“स्थानिक नेतृत्वाच्या मनमानी व अविश्वासाहर्य कारभाराने”, शिवसैनिकांचा “उबाटा” सेनेवरील हरविलेला विश्वास, खासदार संजय राऊत यांच्या दौऱ्याने परत मिळणार का….?

Published

on

मंचर दि. (प्रतिनिधी) राज्यामध्ये शिवसेनेत फूट पडून राजकीय स्थलांतरानंतर पोरक्या पडलेल्या ऊ बा टा सेनेच्या शिवसैनिकांच्या विश्वासाचे स्थानिक सक्षमनेतृत्वाने धिंदोडे उडवले असून सद्या उद्धव सेनेची अवस्था हि आत्मविश्वास हरवलेल्या एखाद्या मारतूकड्या पिंजाऱ्यातील  वाघाप्रमाणे झाली आहे. स्थानिक नेतृत्वाकडून वारंवार विश्वासघात झालेल्या शिवसेना ठाकरे गटाच्याकार्यकर्त्यांमध्ये खासदार संजय राऊत यांचे आंबेगाव, शिरूर,जुन्नर च्या दौऱ्याने  काही बदल घडणार का? हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे

गेल्या काही वर्षापासून शिवसेना म्हणजे एक चविचा विषय झालेला आहे. ज्या शिवसेनाविषयी अनेक शिवसैनिक अना भाका खाऊन आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवण्याची तयारी ठेवतअसत, त्याच शिवसेला आज गद्दारीची वाळावी लागली असून शिवसेना रुपी हा वटवृक्ष येथील स्थानिक अप्रामाणिक नेतृत्व व गद्दारीमुळे जुन्नर, आंबेगाव तालुक्यात तरी रसातळाला जात आहे असे म्हणणे अनेकांच्या मते वावगे ठरणार नाही.

दरम्यान जुन्नर आंबेगाव साठी शिवसेनेने दिलेल्या नेतृत्वावर साध्या शिवसैनिकांचाही विश्वास नाही त्यामुळे ज्यांनी शिवसेना रुपी हा वृक्ष जिवंत ठेवण्यासाठी व बहारण्यासाठी जीवाचे राण केले ते कट्टर शिवसैनिक आजही शिवसेनेच्या प्रवाहातून बाजूला गेले आहेत. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी यांनी आंबेगाव तालुक्यात १९८४ साली “घोडेगाव” येथे पहिल्यांदा जाहीर सभा घेत  हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व हा नारा दिला होता. त्या शिवसेनेची आता गद्दारी वा अप्रामानिक पणाच्या कर्तृत्व शून्य पदाधिकाऱ्यांच्या स्वार्थी मनोदायामुळे वाटोळे झाले आहे. अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य शिवसैनिकांनातून ऐकावयास मिळत आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ज्यांनी जाहीर गद्दारी केली. कागदोपत्री खोटे अहवाल दाखवून वरिष्ठांची दिशाभूल करीत निवडणुकीत आपले हात ओले केले अशी कथाकथित नेतृत्व आज उजळ माथ्याने पक्षाच्या वरिष्ठ्यांचे मागे पुढे फिरत एकनिष्ठतेचा पाठ देत आहेत. म्हणतात ना… सो चुहे खाके… बिल्ली चली हज को…. या उक्ती प्रमाणे सध्या स्थिती आहे व या बाबत मुंबईतील सेना भवनात देखील  अनेकांनी  सांगून पाहिले व नेतृत्व बदलाची मागणी केली  परंतू येथे न्याय मिळण्या ऐवजी या कथाकथित पुढऱ्यांना निष्ठावंताची पखाल चढवून काही वरिष्ठ नेते त्यांची बाजू घेत आहेत मग यात नक्की काय? मर्म दडले आहे.हे जाणून घ्यायला कोणत्या चमकदार आरश्या ची गरज नक्कीच नाही.

 उद्धव ठाकरे सेनेत सध्या सर्वत्र  अशा काही तीन माकडाची उत्पत्ती झाली आहे कि, तेसर्व जाणूनही  डोळ्यावर, तोंडावर व कानावर हात ठेवून बसले आहेत. जसे तुम्ही काही केले आम्ही पाहिले नाही, तुम्ही काय? बोलले आम्ही ऐकले नाही, म्हणून आम्ही काही बोलत नाही अशी स्थिती झाली असल्याची चर्चा आहे. आज दुर्दैवाने सांगावेसे वाटते कि, जुन्नर आंबेगाव व शिरूर तालुक्यातील बेचाळीस गावांत शिवसेना (उद्धव सेना) कुठेही कार्यरत नाही. ज्या शाखा आहेत त्या फक्त कागदोपत्री आहेत. आलेल्या राऊत साहेबांनी खरोखरच गावोगावी जाऊन व्यवस्थित आढावा घेतला तर शिवसेनेची झालेली दैनिय अवस्था पाहवणार नाही. हे नक्की……

स्थानिक नेते फक्त वरिष्ठ आल्यानंतर त्यांना खुश करण्यासाठी कागदी घोडे नाचवत शिवसेनेच्या गाव तेथे शाखा व शाखा प्रमुख अस्तित्वात आहेत. कागदोपत्री खोटी वस्तुस्थिती मांडून वरिष्ठ नेत्यांना अंधारत ठेवत आहेत असे करून माजी मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना कमकुवत ठेवण्यामागे येथील स्थानिक पक्ष  नेतृत्वाचा नक्की वैयक्तिक स्वार्थ आहे का? याची चौकशी होणे गरजेचे आहे.

दरम्यान सध्या स्थानिक नेतृत्वार विश्वास नसल्याने नाईलाजास्तव अनेक कार्यकर्ते शांत बसून आहेत. जुन्नर तालुकाप्रमुख माऊली खंडागळे यांनी खूप काही गमावून हि जुन्नर तालुक्यात शिवसेना जिवंत ठेवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केला आहे. पुढील काळात जुन्नर आंबेगाव शिरूर  तालुक्याचे शिवसैनिक जागृत करून कार्यरत करण्यासाठी निस्वार्थी सक्षम नेतृत्व आंबेगाव जुन्नर व शिरूर तालुक्यास देण्यास खासदार संजय राऊत अयशस्वी ठरले तर  पुढील काळात या भागात सक्षम पक्ष बांधणी करणे शिवसेना उबाटा गटाला नक्कीच दुरास्पद होईल असे राजकीय वर्तुळातील जाणकारांचे मत आहे

Continue Reading
1 Comment

1 Comment

  1. प्रा.अनिल नारायण निघोट

    May 24, 2025 at 3:25 pm

    तीस वर्ष ज्या शिवसेनेसाठी दिली,त्याच शिवसेनेचं अस्तित्व पुसण्याचं काम वरीष्ठ,संपर्किंच्या वशिल्यानं फक्त स्वतःपुरतं पहाणारे लादलेलं नेतृत्व ,ना विश्वासानं पहावं असं वाटतच नसल्याने गावागावात शिवसैनिक पहायला मिळणं पण अवघड झालंय कारण त्यांचाच द्वेष,विरोधकांशी सलगी, वर कित्येक तक्रारी पण केराची टोपली,निष्ठावंत शिवसैनिकांना किंमत ऊरली नाही, मिरवणारे राजकारण हाच धंदा करणारांना ऊद्धवजी पण मातोश्रीवर प्रवेश देऊन हे सांगतील त्यांला पदाधिकारी नेमतात,आधीच्यांचं काय झालं विचारायला नको का? वर शिवसैनिकांना अंधारात ठेवुन डायरेक्ट जाहीर पण नव्वद टक्के नेमणूका बाकी पण ज्यांचा द्वेष ते त्वरित बाजुला,जुन्नर, मावळ चे भाजप बंडखोर त्याच भाजपात मानानं मिरवतात पण ज्यांनी तीस वर्ष दिवसरात्र शिवसेनेचाच विचार करुन शेकडो मेळावे सभां,आधिवेशनांस ऊपस्थिती लावून बाळासाहेब ठाकरेंचे विचार जपत लाखो रुपये खर्चुन तालुकाभर कार्यक्रम उपक्रम घेत,सर्वांना मानाचं स्थान देत शिवसैनिक तितुका मेळवावा या भावनेनं कित््येक फ्लेक्स लावत गावोगावी शिवसेना फुटीनंतर ऊद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष विविध सामाजिक कार्यक्रमातुन पोहोचण्याचा प्रयत्न केला, ते आपल्याला काही पक्षकार्य करायचं नसलं तरी डोईजड होताहेत वाटल्यावर हस्तकांमार्फत तक्रारी करुन वशिल्यानं त्वरीत कारवाई !पण बेचाळीस गावातील तालुका स्तरीय माजी पदाधिकारी महाविकास आघाडीऐवजी वळसेंना पाठींबा देऊनही परत मानानं फ्लेक्स वर झळकतोय हे सोयीचं दुटप्पी धोरण फक्त शिवसेनेसाठी मनापासून जीवाचं रान करणारांना मात्र बाहेचा रस्ता,मग हकालपट्टीनंतर हे कधी शिवसेनेत घेतले? की पक्षनेत्रुत्वास संपर्कींच्या वशिल्यानं भुरळ घातली कोणास ठाऊक आधी एकानं भोळेभाबडे शिवसैनिक वापरुन घेतले,पैशाची चटकवाले त्यांच्याबरोबर बाजूला ऊडी मारुन गेले,आता तरी निष्ठावंत शिवसैनिकास किंमत येईल वाटलं तर पक्ष लक्ष च देत नसल्याने लोकसभा विधानसभा निवडणुकीत मलिदयाची चटक लागलेले वगळता, कुणाचे मिंधे न होणारे स्वाभिमानी शिवसैनिक पूर्ण थंडावलेत, प्रत्येक निवडणुकीत ज्यांचं काम केलं, ज्यासाठी राष्ट्रवादी च्या साम दाम दंड भेदाचा सामना करुन वाईटपणा घेऊन भविष्याची रोजीरोटीची धुळदान करुन घेतली,त्यांच्याच चटया ऊचलायची वेळ शिवसैनिकांवर ऊद्धवजींनी आणली, आताही गावागावात शिवसैनिक कुठंय दुर्बिण घेऊन सापडत नाही, ऐंशी टक्के राष्ट्रवादी च्या दोन्ही गटांनी गुंडाळलेत,कोण कुठं तेच कळत नाही,कसली निष्ठा न कसलं काय ? निष्ठावंतांवर ईतर ठिकाणी जाण्याची वेळ आणली पण त्यातुन भगवा सोडणार नाही म्हणारांची गोची झाली,या हाडाच्दाया शिवसैनिकांना काही पोटासाठी ,घरं भरण्यासाठी शिवसनेत नाही,तर त्यांना शिवसेनेचं बाळकडु आहे
    पद शिवसेनेचे पण काम राष्ट्रवादीचं,निवडणूका पार पडुन शेकडो दिवस झाले,ना मिटिंग ना आंदोलन ना कार्यक्रम आता कुठं जाग आलीय,पण विरोधकांच्या पाकीटांसाठी शिवसेना दावणीला,कायम विरोधकांचं हित मग शिवसैनिकांचा विश्वास च संपला,चार दहा वशिल्यानं निवडलेले पदाधिकारी म्हणजे शिवसेना?

Leave a Reply

Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सामाजिक

शासनाने “आद्य क्रांतिवीर होनाजी केंगले” यांचे जांभरी येथे राष्ट्रीय स्मारक बांधवे,: जागतिक आदिवासी दिनानिमित्त मागणी

Published

on

भीमाशंकर दि (प्रतिनिधी)आदिवासी समाज्याच्या न्याय हक्कासाठी आपल्या रक्ताचे बलिदान देणाऱ्या वीर  क्रांतिकारक होनाजी केंगले, बिरासा मुंडा तसेच राघोजी भांगरे यांच्या स्मुर्ती जपत जागतिक आदिवासी क्रांती दिन जांभोरी ता. आंबेगाव येथे  मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

 इंग्रजी सत्तेच्या विरोधात बंड पुकारत गरीब दिन दुबळ्या आदिवासी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देत रक्त सांडणाऱ्या  आदिवासी क्रांतिकारकांची जन्मभूमी जांभोरी हे गाव असून आदिवासी समाज्याचा धाण्या वाघ आदिवासी क्रांतिकारक होनाजी केंगले. बिरसा मुंडा राघोजी भांगरे निसर्गवासी माजी सभापती शंकरराव विठ्ठल केंगले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करून त्यांच्या स्मृतीना आवाहन करण्यासाठी येथील दूध डेअरी पासून आद्यक्रांतिकारक होनाजी केंगले यांच्या स्मारकपर्यंत प्रचंड  रैली काढण्यात आली.

दरम्यान या वेळी प्रतिमेचे पूजन करताना जांभोरी गावच्या सरपंच सुनंदाताई पारधी.उपसरपंच बबन केंगले. पोलिस पाटील नवनाथ केंगले. बिरसा ब्रिगेड शाखा जांभोरीचे अध्यक्ष सुनिल गिरंगे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले. लखन पारधी. सागर काठे. शिक्षक पतसंस्थेचे आंबेगाव तालुका सभापती संजय केंगले. विकास पोटे. भिमा केंगले. शांताराम केंगले. दत्ता गिरंगे. किसन शेळके. पेसा अध्यक्ष मारुती केंगले. अंकुश गिरंगे. मिना केंगले. लताबाई केंगले. राजेंद्र उभे. दिगंबर केंगले. गणपत काठे. तंटामुक्ती अध्यक्ष नामदेव भोकटे. निवृत्ती केंगले. निलेश गिरंगे. नितीन गिरंगे. विठ्ठल पारधी कांताराम केंगले लक्ष्मण केंगले बबन केंगले . जांभोरी गावचे सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. 

त्याचप्रमाणे जांभोरी गाव हे आदिवासी क्रांतिकारकांची जन्मभूमी म्हणुन ओळखली जाते. याठीकाणी होनाजी केंगले यांचे स्मारक शासनाने निर्माण करावे अशी मागणी जांभोरी ग्रामस्थानी शासन दरबारी केली असून तत्कालीन मुख्यमंत्री. एकनाथराव शिंदे साहेब. तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब. तत्कालीन सहकारमंत्री गृहमंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब माजी खासदार शिवाजी दादा आढळराव पाटील साहेब खासदार डॉ. अमोल कोल्हे साहेब यांना निवेदन गेल्या वर्षी देण्यात आल्या असून शासन दरबारी पाठपुरावा केला जात आहे याबाबत शासनाने तात्काळ दखल घेऊन जांभोरी येथे राष्ट्रीय स्मारक बांधवे ज्यामुळे भावी पिढीला या आदिवासी क्रांतिकारकाच्या त्यागाची व बलिदानाची  गाथा समजेल व यातून पुढील युवा पिढीत देशभक्ती  वाढीस लागेल  

दरम्यान या कार्यकामाचे आयोजन बिरसा ब्रिगेड शाखा जांभोरी. जांभोरी ग्रामविकास फाऊंडेशन जांभोरी.ग्रामविकास प्रतिष्ठान जांभोरी नांदुरकीचीवाडी. व्यंकोजी दूध उत्पादक सहकारी संस्था जांभोरी. ग्रामपंचायत कार्यालय जांभोरी. यांनी केले. कार्यक्रमानिमित आदिवासी दिवसाबद्दल माहिती विकास पोटे यांनी सांगितली तर सुत्र संचालन अंकूश गिरंगे यांनी केले.

Continue Reading

सामाजिक

“हिरडा खरेदी” आणि “भीमाशंकर” रस्त्याच्या दुरवस्थेवरून, संतप्त आदिवासी जनतेकडून तळेघर येथे रास्ता रोको

Published

on

मंचर दि.(प्रतिनिधी): श्री क्षेत्र भीमाशंकर रस्त्याची दुरावस्था व  त्याचप्रमाणे हिरड्याची बंद असलेली खरेदी यांसह विविध मागण्यासाठी  तळेघर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट), बिरसा ब्रिगेड, अखिल भारतीय किसान सभा आणि ट्रायबल फोरम यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 

आदिवासी बांधवांचे उपजीविकेचे प्रमुख साधन असलेल्या हिरड्याची बंद असलेली खरेदी योग्य किंमतीने तातडीने सुरू करावी त्याचप्रमाणे श्री क्षेत्र भीमाशंकर रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली. सध्या श्रावण मास सुरु असलेल्याने देशाच्या कानकोपऱ्यातून लाखो शिवभक्त शिवज्योर्तिलिंगाचे दर्शनासाठी येत आहेत. परंतू भीमाशंकरकडे जाणाऱ्या  रस्त्याची मोठ्याप्रमानावर दुरावस्था झाली असून, या रस्त्याची दुरुस्ती करावी, या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.आंदोलनात मोठ्याप्रमानावर आदिवासी बांधव सहभागी झाले होते

दरम्यान आदिवासी विकास विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनादरम्यान  कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी घोडेगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम,तालुकाध्यक्ष धोंडीभाऊ भोर, महिला अध्यक्ष पूजा वळसे, युवक अध्यक्ष विशाल वाबळे, किसान सभेचे सचिव अशोक पेकारी, बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष संतोष तिटकारे, ट्रायबल फोरमचे अध्यक्ष सखाराम हिले, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब बाणखेले, सदानंद शेवाळे (पाटील),शेतकरी नेते माउली ढोमे, पुरुषोत्तम फदाले, शिवराम केंगले, दीपक चिमटे,के. के. तिटकारे, गणेश खाणदेशी, कृष्णा वडेकर, लखन पारधी उपस्थित होते.

“हिरडा खरेदीसाठी हमीभाव मिळावा” 

माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी हिरडा खरेदीसाठी हमीभाव मिळावा आणि खरेदी लवकरसुरू व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वारंवार बैठका घेतल्या. तसेच मंचर-भीमाशंकर रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विकास विभागाला आदेश दिल्यापासून तात्पुरते खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले आहे, अशी माहिती माजी पंचायत समिती सभापती आणि आदिवासी नेते संजय गवारी यांनी दिली.

Continue Reading

सामाजिक

अडिवरे येथे “आदिवासी स्त्रीयांसाठी मोफत आरोग्य शिबीर संपन्न”.

Published

on

डिंभे दि (प्रतिनिधी)- आदिवासी स्त्रियांचे  आरोग्य सुधारण्यासाठी आडीवरे ता. आंबेगाव येथे स्त्रियांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यांस महिलाकडून उत्कृष्ठ प्रतिसाद मिळाल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अमोल अंकुश यांनी दिली.

  आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी पश्चिम पाट्यातील डिंभे धरणाच्या आतील बाजूस दुर्गम भागात असलेल्या आडीवरे येथील  प्राथमिक आरोग्य केंद्रावर अडिवरे  स्त्री रोग निदान आणि उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात विशेषतः पावसाळ्यात आदिवासी भागा मध्ये शेतात काम करणाऱ्या महिला वर्गा मध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या त्वचेचे आजार व साथी चे आजार  पायांना कुहे होने,सर्दी,ताप,डोके दुखी, सांधे दुखी, हिमोग्लोबिन कमी होने ई. आजारा च्या तपासण्या सदर करून महिलांना मोफत औषधोपचार करण्यात आले. यात सुमारे ९३ महिलांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या.

दरम्यान या शिबिराचे उद्घाटन आदिवासी सेवक मा.शंकरराव मुदगुन यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते मा.अमोल अंकुश मार्गदर्शनाखाली करण्यात आले या शिबिरास मा.चंद्रकांत बांबळे सेवा निवृत्त कर्मचारी संघटना अध्यक्ष, मा.सखाराम गभाले (बाजार समिती संचालक) मा.संगिता किर्वे ( सरपंच), मा.रामदास भोकटे, जावजी कोकणे ई मान्यवर उपस्थित होते.

 शिबिरामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र अडिवरे येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दशरथ चौरे आणि डॉक्टर प्रथमेश भोर यांनी महिलांच्या विविध आजाराविषयी माहिती देऊन त्यांच्या आरोग्य समस्या विषयी मार्गदर्शन केले या शिबिरासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र अडिवरे येथील आरोग्य निरीक्षक श्री गोविंद भारमळ.आरोग्य निरीक्षक ( हिवताप विभाग ) श्री अजय बोराडे. आरोग्य सहायिका श्रीमती विजया शिंदे. आरोग्य सेवक श्री दत्ता कंठाळे रामचंद्र असवले आरोग्य सेविका श्रीमती पोटे मॅडम, उघडे मॅडम, गिरे मॅडम सर्व आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक श्रीमती वंदना तळपे, स्वाती कोकणे यांचे सहकार्य मिळाले. शिबिरासाठी महा लॅब मंचर यांच्यावतीने प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून अविनाश पारधी यांनी काम पाहिले 

Continue Reading
Advertisement

Trending

Best Replica Watches UK

Copyright © 2024 BobhataNews.in