मंचर दि (प्रतिनिधी ) आंबेगाव तालुक्यात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. जिल्हाप्रमुख यांच्याकडून सहकार्य होत नाही असे कारण सांगत दत्ता गांजाळे यांनी राम राम ठोकत तालुका प्रमुख पदाचा राजिनामा दिला असून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन वर्षापूर्वी शिवसेनेत मोठी पडझड असताना मात्र आद्यापही उद्धव ठाकरेना संघटना सावरण्याचा सुरु गावसलेला दिसत नाही. त्यामुळे गेली काही महिन्यापासुन कुठेना कुठेतरी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा शिलेदार पक्ष सोडून शिंदे गटात प्रवेश करीत आहे.त्यामुळे खरचंच मातोश्रीचे लक्ष नक्की कोठे? आहे हेच कळत नाही. आंबेगाव तालुक्यात शिवसेनेचे दिवंगत नेते अविनाश रहाणे यांच्या निधनानंतर आंबेगाव तालुक्यात शिवसेनेची मोठी वाताहत होत चालली असल्याचे पहावायास मिळत आहे.
दरम्यान गेल्या महिन्यामध्ये शिवसेना उबाटा पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांचा नुकताच दौरा झाला. या दौऱ्यानंतर उबाटा सेनेत काहीतरी सकारात्मक बदल होतील अशी शिवसैनिकांना अपेक्षा होती.कारण याच दौऱ्यादरम्यान झालेल्या शिवसैनिकांच्या मेळाव्या मध्ये जिल्हा प्रमुख यांनी पंधरा दिवसांत संघटनेची मजबूत बांधणी करण्याचे आश्वासन दिले होते. परंतू त्या अश्वासणाचा जणू चुराडा झाला असल्याचे दिसत आहे. कारण संघटना बांधणी दूरच दस्तूर खुद तालुका प्रमुख दत्ता गांजाळे यांनी जिल्हा प्रमुख मदत करत नसल्याचे कारण कारण सांगत पक्षाला जय महाराष्ट केला आहे. परंतू ते आपल्या कार्यकर्त्यासोबत शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. याबाबत तालुका प्रमुख गांजाळे यांनी मी पक्षाशी एकनिष्ठ असून शिवसैनिक म्हणून काम करणार असल्याचे गांजाळे यांनी सांगितले.तसेच जिल्हा प्रमुख यांच्याशी संपर्क साधन्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही
दरम्यान शिवसेना शिंदे गटातील काही तालुका पातळीवरील नेत्यांचा हि गांजाळे यांच्या प्रवेशावर विरोध असल्याचे समजते त्यामुळे गांजाळे यांची शिंदे गटातील नेत्यांसोबत काही अंतर्गत डिल (चर्चा) सुरु असून त्यावर अंतिम शिक्कामोर्तब होणे बाकी असल्याचीही चर्चा सुरु आहे.एकंदरीत उत्तर पुणे जिल्ह्यात उद्धव ठाकरे सेनेकडे आंबेगाव तालुक्यात सक्षम नेतृत्व नाही. त्यामुळे तालुक्यात पक्षीय पदाधिकाऱ्यांमध्ये सुदोपसुंदी सुरु असून त्याचे परिणाम पक्ष वाढी वर होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पुढील काळात सर्व कार्यकारणी बरखास्त करून नव्याने जिल्हाकार्यकारणीपासुन नेमणूका करण्याची आवश्यकता असल्याचे जाणकारांनाचे मत आहे.
दरम्यान सध्याचे जिल्हा प्रमुख यांच्यावर मात्र विश्वास ठेवून काम करण्यास कोणीही तयार नाही. तालुक्यात उ.बा.टा. सेनेकडे निष्ठावंत शिवसैनिकांची संख्या मोठी आहे परंतू संघटनेकडे जिल्हा पातळीवर अथवा तालुका पातळीवर विश्वासाहर्य नेतृत्व नसल्यामुळे शिवसैनिकहि स्तब्ध आहे. या
आतातरी ऊद्धवजींनी कुणालाही नीट काम करु न देणारे, सर्व शिवसेना आघाडयांत ढवळाढवळ करून प्रत्येक आघाडी पदाधिकारी निवडीत वशिल्याने नेमणूकांसाठी संबंधित आघाडीप्रमुखांस , शिवसैनिकांस विश्वासात न घेणारे ,जवळचे पण तालुक्यात न रहाणारांनाही कोणत्या ना कोणत्या आघाडीत पैसेवाला पाहुन पद देणारांना ऊद्धवजी बदला , हजारो शिवसैनिक मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे बाहेर पडुन विरोधकांना बाळासाहेबांच्या आक्रमकतेने आव्हान देतील ,नाहीतर शिवसेना दिवसेंदिवस बिनकामी पदाधिकारींमुळं अजून च क्षीण होताना पहाण्याचं , ज्यांनी आवाज कुणाचा शिवसेनेचा या गगनभेदी घोषणा दिल्या, राष्ट्रवादीच्या विरोधकांना मुहतोड जवाब दिला .त्यांच्या नशिबी राष्ट्रवादीच्याच चटया ऊचलायची वेळ येईल.
मंचर दि. (प्रतिनिधी) पक्षाचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री भीमाशंकर येथे दर्शनाला येणार असताना जिल्हाप्रमुख व माजी सरपंचांच्या नियोजनावर पाणी पाडत जेष्ठ पदाधिकार्याने केलेल्या कुरघुडीमुळे आंबेगाव तालुक्यात शिंदेच्या शिवसेनेलाही गट बाजीचे ग्रहण लागल्याची चर्चाच तालुक्यात सर्वत्र सुरु जगली आहे.
“सत्तेचे सगळेच चहाते असतात. “शिंदेची शिवसेना,सत्तेत असल्यापासुन त्यापक्षाकडे सध्या भरती सुरु आहे. पण यामुळे पक्ष बळकट होण्या ऐवजी सर्वत्र गट बाजीला उधान आले असल्याचे बोलले जात असून, त्याचा प्रत्यक्ष प्रत्यय पुणे जिल्यातील आंबेगाव तालुक्यात दिसून आल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे.”
“म्हणतात णा कानामागून मागून आली आणि तिखट झाली” या म्हणी प्रमाणे आगोदर पक्षात असलेल्या आपल्या सहकार्याना व जेष्ठ पदाधिकाऱ्यांना नव्याने पक्षात आलेल्या कार्यकर्त्यांची खोड मोडण्यात मजा येते असेच म्हणावे लागेत म्हणूनच विश्वासात न घेताचे कारण पुढे करत क्काही जेष्ठ पदाधीकाऱ्यांनी नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख व उबाटा पक्षातून शिंदे च्या पक्षात आलेल्या माजी सरपंचांची खोड मोडण्यासाठीच केला उतात्याप मात्र यशस्वी झाला असेच म्हणावे लागेल
घडले असे कि,मंचर शहराचे माजी सरपंच आणी शिंदे सेनेचे नवनिर्वाचित जिल्हा प्रमुख यांनी राज्याचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आपल्या एकनिष्ठतेची छाप पाडून आपले वर्चस्व वाढविण्याचा घाट घातल्याची कुणकुण काही जेष्ठ नेत्यांना लागल्या नंतर तालुक्यात राजकीय कुरघुडी ला सुरवात झाली. नवनिर्वाचित जिल्हा प्रमुख व माजी सरपंच यांनी घोडेगाव येथे मोठी बॅनरबाजी करीत सत्काराचे आयोजनही केले. पण ज्या ठिकाणी उपमुख्यमंत्री यांचे वाहन सत्कारासाठी थांबणार होते. त्याचे अगोदरच्या स्थळी उप मुख्यमंत्र्यांचा ताफा थांबावून काही जेष्ठ पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्र्यांचा सत्कार केला व सत्कार झाला असे सांगत उपमुख्यमंत्र्यांचा ताफा काढून दिला.
दरम्यान पुढे सत्कारच्या नियोजित स्थळी उपमुख्यमंत्री यांचा ताफा आल्यानंतर जमलेल्या शिव सैनिकांनी जयजयकारच्या घोषणा दिल्या त्याच सोबत ढोल ताशांचा आवाज झाला. जेसीबी ने फुलांची पुष्पावृष्टी हि करण्यात आली पण सत्कार अगोदरच झाला आहे असे समजत उपमुख्यमंत्री साहेबांनी याकडे दुर्लक्ष केले व गाडीच्या काचा हि खाली ना करता गाड्याचा ताफा तसाच पुढे सरकत श्री क्षेत्र भीमाशंकर शिवज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी रवाना झाला याठिकाणी जमलेल्या शिवसैनिकांची, कार्यकर्त्यांची यामुळे घोर निराशा झाली व नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख व नव्यानेच शिंदेच्या शिवसेनेत सामील झालेले मंचरच्या त्या नेत्याचा उपमुख्यमंत्री साहेबांचा सत्कार करण्याच्या त्या सर्व नियोजनावर पाणी पडले.
दरम्यान यातूनचा आंबेगाव तालुक्यात सध्या वर्चस्वची लढाई शिंदे गटात सुरु झाली असल्याची चर्चा सुरु झाली आहे. अशीच एकमेकांत सुरु असलेली कुरघुडी शिवसेना शिंदे गटास मात्र येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकामध्ये महागात पडू शकते अशी शक्यता सर्वत्र वर्तविली जात आहे यातून शिंदेच्या शिवसेनेतही गटा तटाचे राजकारण मोठ्या प्रमाणावर सुरु असलेले दिसून येत आहे.
मंचर दि. (सदानंद शेवाळे)- गेल्या दोन दिवसापासुन डिंभे धरण परीक्षेत्रात सुरु असलेल्या पावासामुळे धरणातील पाण्याची पातली वाढल्यामुळे घोड नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला असून नदिकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन कुकडी प्रकल्प अभियंता यांनी केले आहे
दरम्यान डिंभे धरण पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरु असल्यामुळे डिंभे धरण क्षेत्रातील ओढ्या नाल्यांना मोठ्याप्रमाणा वर पाणी आले असल्यामुळे डिंभे धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत चालली आहे सध्या धरणामध्ये ९४% पाणी असून खबरदारीच्छा उपाय म्हणून धरणातून आज दि १९/८/२०२५ रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास ३००० क्यूसेस ने पाण्याचा विसर्ग घोड नदी पात्रात करण्यात आला आहे. धरणातील पाणी पातळी झपाट्याने वाढत असून सध्या धरणातून तीन हजार क्यूसेस पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे.
.दरम्यान पावसाचा वाढता जोर पहाता घोड नदीपात्रात डिंभे धरणातून विसर्ग वाढवण्याची देखील शक्यता आहे.त्यामुळे, नदीकाठच्या गावांतील सतर्क राहावे.तसेच नदीपात्रात किंवा नदीकाठी कोणीही जाऊ नये व आपल्या जनावरांना जाऊ देऊ नये.त्याचप्रमाणे आपल्या गावातील लोकांना ही माहिती कळावी म्हणून सतर्कतेचा इशारा पूर नियंत्रण कक्ष कार्यकारी अभियंता कुकडी पाटबंधारे विभाग नारायणगाव यांचे वतीने देण्यात आला आहे.
भीमाशंकर दि (प्रतिनिधी)आदिवासी समाज्याच्या न्याय हक्कासाठी आपल्या रक्ताचे बलिदान देणाऱ्या वीर क्रांतिकारक होनाजी केंगले, बिरासा मुंडा तसेच राघोजी भांगरे यांच्या स्मुर्ती जपत जागतिक आदिवासी क्रांती दिन जांभोरी ता. आंबेगाव येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
इंग्रजी सत्तेच्या विरोधात बंड पुकारत गरीब दिन दुबळ्या आदिवासी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देत रक्त सांडणाऱ्या आदिवासी क्रांतिकारकांची जन्मभूमी जांभोरी हे गाव असून आदिवासी समाज्याचा धाण्या वाघ आदिवासी क्रांतिकारक होनाजी केंगले. बिरसा मुंडा राघोजी भांगरे निसर्गवासी माजी सभापती शंकरराव विठ्ठल केंगले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करून त्यांच्या स्मृतीना आवाहन करण्यासाठी येथील दूध डेअरी पासून आद्यक्रांतिकारक होनाजी केंगले यांच्या स्मारकपर्यंत प्रचंड रैली काढण्यात आली.
दरम्यान या वेळी प्रतिमेचे पूजन करताना जांभोरी गावच्या सरपंच सुनंदाताई पारधी.उपसरपंच बबन केंगले. पोलिस पाटील नवनाथ केंगले. बिरसा ब्रिगेड शाखा जांभोरीचे अध्यक्ष सुनिल गिरंगे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले. लखन पारधी. सागर काठे. शिक्षक पतसंस्थेचे आंबेगाव तालुका सभापती संजय केंगले. विकास पोटे. भिमा केंगले. शांताराम केंगले. दत्ता गिरंगे. किसन शेळके. पेसा अध्यक्ष मारुती केंगले. अंकुश गिरंगे. मिना केंगले. लताबाई केंगले. राजेंद्र उभे. दिगंबर केंगले. गणपत काठे. तंटामुक्ती अध्यक्ष नामदेव भोकटे. निवृत्ती केंगले. निलेश गिरंगे. नितीन गिरंगे. विठ्ठल पारधी कांताराम केंगले लक्ष्मण केंगले बबन केंगले . जांभोरी गावचे सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
त्याचप्रमाणे जांभोरी गाव हे आदिवासी क्रांतिकारकांची जन्मभूमी म्हणुन ओळखली जाते. याठीकाणी होनाजी केंगले यांचे स्मारक शासनाने निर्माण करावे अशी मागणी जांभोरी ग्रामस्थानी शासन दरबारी केली असून तत्कालीन मुख्यमंत्री. एकनाथराव शिंदे साहेब. तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब. तत्कालीन सहकारमंत्री गृहमंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब माजी खासदार शिवाजी दादा आढळराव पाटील साहेब खासदार डॉ. अमोल कोल्हे साहेब यांना निवेदन गेल्या वर्षी देण्यात आल्या असून शासन दरबारी पाठपुरावा केला जात आहे याबाबत शासनाने तात्काळ दखल घेऊन जांभोरी येथे राष्ट्रीय स्मारक बांधवे ज्यामुळे भावी पिढीला या आदिवासी क्रांतिकारकाच्या त्यागाची व बलिदानाची गाथा समजेल व यातून पुढील युवा पिढीत देशभक्ती वाढीस लागेल
दरम्यान या कार्यकामाचे आयोजन बिरसा ब्रिगेड शाखा जांभोरी. जांभोरी ग्रामविकास फाऊंडेशन जांभोरी.ग्रामविकास प्रतिष्ठान जांभोरी नांदुरकीचीवाडी. व्यंकोजी दूध उत्पादक सहकारी संस्था जांभोरी. ग्रामपंचायत कार्यालय जांभोरी. यांनी केले. कार्यक्रमानिमित आदिवासी दिवसाबद्दल माहिती विकास पोटे यांनी सांगितली तर सुत्र संचालन अंकूश गिरंगे यांनी केले.
प्रा.अनिल निघोट
June 27, 2025 at 1:28 pm
आतातरी ऊद्धवजींनी कुणालाही नीट काम करु न देणारे, सर्व शिवसेना आघाडयांत ढवळाढवळ करून प्रत्येक आघाडी पदाधिकारी निवडीत वशिल्याने नेमणूकांसाठी संबंधित आघाडीप्रमुखांस , शिवसैनिकांस विश्वासात न घेणारे ,जवळचे पण तालुक्यात न रहाणारांनाही कोणत्या ना कोणत्या आघाडीत पैसेवाला पाहुन पद देणारांना ऊद्धवजी बदला , हजारो शिवसैनिक मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे बाहेर पडुन विरोधकांना बाळासाहेबांच्या आक्रमकतेने आव्हान देतील ,नाहीतर शिवसेना दिवसेंदिवस बिनकामी पदाधिकारींमुळं अजून च क्षीण होताना पहाण्याचं , ज्यांनी आवाज कुणाचा शिवसेनेचा या गगनभेदी घोषणा दिल्या, राष्ट्रवादीच्या विरोधकांना मुहतोड जवाब दिला .त्यांच्या नशिबी राष्ट्रवादीच्याच चटया ऊचलायची वेळ येईल.