singa8

rp8888

singa8

slot demo

slot qris

singa8

rp8888

https://bertrodriguez-museum.org

https://journal.uecommercebintaro.ac.id/

singa8

singa8

singa8

singa8

singa8

singa8

singa8

singa8

92GLORY

http://vecas.org.vn/id/

https://admire.ch/vendor/

Connect with us

सामाजिक

“स्वार्थी असुयेपोटी”, समाज विघातक वृतींकडून “गोवर्धन कंपनीला” बदनाम करण्याचा डाव?

Published

on

मंचर दि. (प्रतिनिधी) आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथील आदिवासी आश्रम शाळेत अळया सापडलेली दुधाची पॅकेट ही उंदरांनी  कुरतडलेली होती. असे आश्रम शाळेचे मुख्याध्यापक यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे परंतु स्थानिक पातळीवरील  वैयक्तिक असुयेपोटी अथवा संवग प्रसिद्धीसाठी “गोवर्धन” कंपनीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे.

आदिवासी संघटना “बिरासा ब्रिगेड” चे कार्यकर्ते यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे कि, घोडेगाव येथील आश्रम शाळेत गेले असता त्याठिकाणी स्टॉक रूमला भेट दिली व त्याठिकाणी असलेल्या गोवर्धन टेट्रा पॅक मधील दुधात  अळ्या असल्याचे निदर्शनास आले असल्याचे म्हटले आहे. या निवेदनात त्यांनी हेही म्हटले कि चांगल्या पॅक मध्ये सुद्धा अळ्या आढळून आल्या परंतु शाळेचे मुख्याध्यापक यांनी आपल्या लेखी निवेदनात असेही म्हटले आहे कि, उंदरांनी कुरतडलेली पॅक वगळता इतर कोणत्याही पॅक मध्ये अळ्या आढळलेल्या नाहीत, तसेच त्यांनी निवेदनात इतर पॅक फोडल्यानंतर त्यात सूक्ष्म अळी दिसली असेही म्हटले आहे परंतु एखादी सूक्ष्म वस्तू पहावायाची असल्यास त्यास मायक्रोस्कोप वरून तपासणी केल्यासच ती वस्तू कशी आहे. हे समजू शकते तर मग त्या दुधाची  आरोग्य अधिकाऱ्यांकडून तपासणी होणे  आवश्यक होते. परंतु शाळेच्या मुख्याध्यापक अथवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तसेही केले नाही. अगोदरच्या काळापासून पदाधिकाऱ्यांच्या भेटी पर्यंत  ज्या  कोणत्याही मुलांनी तेथील  दूध प्यायले त्यामुळे कोणत्याही  मुलाकडून आरोग्याविषयी तक्रार करण्यात आलेली नाही.असेही मुख्याध्यापक यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान  बिरासा ब्रिगेड चे पदाधिकारी ज्या दिवशी आश्रम शाळेत गेले होते त्याचे दोन दिवस अगोदर उंदराने कुरतडलेली  चार ते सहा पाकिटे बाजूला ठेवून देण्यात आली होती. याचाच दुसरा अर्थअसाही होऊ शकतो कि, उंदरांनी कुरतडलेली टेट्रापॅक दुधाची पाकिटे  खराब होऊन त्या खराब पाकिटात अळ्या निर्माण झाल्या  असल्याची माहिती  अगोदरच या कार्यकर्त्यांना होती. म्हणूनच काही विघटक प्रवृत्तीनी कंपनीचे नाव बदनाम करून आपला वैयक्तिक स्वार्थ अथवा सवंग प्रसिद्धीच्या हव्यासापोटी ही जाणीवपूर्वक कृती या कार्यकर्त्यांनी केली असावी अशी शक्यता नकारता येत नाही. कारण कंपनीचा मूळप्लॅन्ट हा आंबेगाव तालुक्यातच असून स्थानिक मतभेदामुळे काही विघातक शक्तींनी  जाणीव पूर्वक  नियोजन करून कंपनीचे नाव बदनाम करण्याचा हा डाव असावा अशी चर्चा तालुक्यात सर्वत्र सुरु आहे. 

  “टेट्रा पॅकमध्ये विक्री केल्या जाणाऱ्या दुध सुरक्षित असून त्यात भरपूर पोषक तत्व  मोठ्या प्रमानावर असतात. उच्च तापमानावर हे दूध गरम करून काही थंड करून हे टेट्रा पॅकिंग केले जाते. टेट्रा पॅक मध्ये असलेले दूध सुरक्षित व आरोग्यदायी मानले जाते. या संदर्भात जागतिक स्तरावर टेट्रा पॅक चे नामांकन आहे”. 

दरम्यान “गोवर्धन”कंपनीचे देशाच्याच बाजार पेठेत नव्हे तर संपूर्ण जगाच्या बाजार पेठेत मोठ्या प्रमानावर दुग्धजन्य पदार्थांची मोठ्या प्रमाणात  विक्री केली जातं आहे. त्यामुळे बिरासा ब्रिगेड च्या नावाखाली जाणीव पूर्वक कंपनीची प्रतीमा खराब करण्याचा प्रयत्न काही समाज विघातकाकडून केला जातं असावा असेही अनेक जाणकारांचे मत आहे.

 दरम्यान कंपनी व्यवस्थापनाने या खोडसाळ कृत्याची दाखल घेतली असून काही व्यक्तींनी स्वार्थी वृत्ती व असुयेपोटी केलेल्या बदनामी बद्दल न्यायालयात दाद मागणार असल्याचेही समजते. 

Continue Reading
1 Comment

1 Comment

  1. हितचिंतक

    August 6, 2024 at 12:57 pm

    सर्वसामान्य शेतकऱ्याचे दूध पंचवीस रुपये भावाने घेऊन आदिवासी भागात ते दूध आश्रम शाळेत 132 रुपये च्या भावाने मलिदां गँग विकत आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या टाळू वरचे लोणी खाण्याचे काम गोवर्धन करत आहे
    जर आश्रम शाळेचे दुध्यक्ष बत्तीस रुपयांनी विकले जात असेल तर त्यावर प्रक्रिया करण्यासाठी किती खर्च येत आहे आणि मग शेतकऱ्याचे दूध फक्त पंचवीस रुपये भावाने घेऊन 107 रुपये प्रॉफिट फक्त गोवर्धन समूहाला होत आहे
    आदिवासी भागातील शेतकऱ्यांनी गायी घेतल्या आणि आदिवासी भागातील शेतकऱ्यांच्या पोरांना त्या गायचा दूध पिण्यासाठी घातलं तर तिची शेतकऱ्याला देखील उच्च रेट मिळू शकतो या कारणाने सर्वसामान्य शेतकरी आणि गोवर्धन च्या मध्ये मलिदा गॅंग सक्रिय झालेली आहे त्या मलिदा गँगचा भांडाफोड होईल

Leave a Reply

Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सामाजिक

आदिवासी भागातील शेतकऱ्याच्या शेतीचे पंचांनामे करून त्वरित नुकसान भरपाई द्यावी -मारुती केंगले

Published

on

डिंभे दि. (प्रतिनिधी) आंबेगाव तालुक्याचे पश्चिम आदिवासी भागातील बळीराजाचे एकमेव उत्पन भात व हिरडा पिकांचे नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने प्रचंड नुकसान झाले असून याचे पंचांनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे वतीने मारुती  केंगले यांनी केली आहे.

नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱऱ्यांच्या कुटुंबाच्या तोडचा घासच पाळवीला आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड अतोनात नुकसान होऊन शेतकरी देशोधडीला लागल्याचे दिसत आहे. अशा कठीण प्रसंगी शासकीय मदतीची शेतकऱ्यांना गरज आहे पण शासनाकडून अद्यापही कोणत्याही मदतीबाबत दिलासादायक घोषणा अद्यापहि झालेली नाही त्यामुळे ऐन दीपावळीच्या काळात अनेकांची घरे दिव्यांनी उजाळालेली असतील परंतू महाराष्ट्रातील बळीराजच्या घरात अंधार असेल अशीच काही परिस्थिती दिसत आहे.

 तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात एकमेव पिक भात शेती आणि हिरडा हिरड्याला बाजार भाव आता सध्या  १०० रुपये इतका भाव आहे परंतू आदिवासी भागात पावसामुळे हिरडा पीक मोठ्याप्रमानावर सडून खराब झाले आहे. मे ते ऑक्टोबर सलग ५ महिच्या कालावधित झालेल्या मुसळधार पावसामुळे भातपिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊन भात पीक वाया गेले आहे तर अनेक ठिकाणी भातशेती पावसामुळे सडून गेली आहे.त्यामुळे पिकांची पंचनामे करून आदिवासी शेतकऱ्याला मदतीचा हात मिळावा यासाठी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले तालुक्याचे तहसिलदार कार्यालयास दिले असून निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी साहेब. प्रांत अधिकारी गोविंद शिंदे साहेब आंबेगाव तालुक्याचे आमदार व  माजी गृहमंत्री  दिलीपराव वळसे पाटील यांना देण्यात आले असून याबाबत त्वरित कार्यवाही ना झाल्यास नाजिकच्या काळात शेकऱ्यांच्या हितासाठी  भिमाशंकर रस्त्यावर तीव्र आंदोलनाचा इशारा केंगले यांनी दिला आहे.

Continue Reading

सामाजिक

जांभोरी येथे कुस्ती तालीम इमारत भूमिपूजन सोहळा संपन्न

Published

on

घोडेगाव दि (प्रतिनिधी ) जांभोरी (ता आंबेगाव)पासून जवळच असलेल्या माचीचीवाडी या ठिकाणी कुस्तीसाठी तालीम इमारतिचा भूमिपूजन समारंभ उत्साहात पार पाडला

आजच्या धाकधकीच्या काळात तरुणांई मोबाईल व गेम यात अडकून ना रहाता शारीरिक तंदृस्तीकडे आकर्षित व्हावी या हेतूने सुरु होत असलेल्या कुस्ती तालीम इमारतीसाठी  येथील वसंत वालकोळी,बबन केंगले, भिवा वालकोळी, अनंता वालकोळी, यांनी ११गुंठे जमीन दिली आहे त्याचप्रमाणे  महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री सहकारमंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील यांनी दहा लाख रुपयांचा निधी तालमीच्या प्रत्यक्ष बांध कामासाठी मंजूर केला आहे यासाठी आदिवासी भागाचे नेते सुभाषराव मोरमारे साहेब  संजय गवारी, प्रकाश घोलप, यांनी परीश्रम घेतले आहेत

 दरम्यान जांभोरी गावचे लोकनियुक्त सरपंच सुनंदाताई पारधी, पोलिस पाटील  नवनाथ केंगले, पोलिस पाटील सोनाली पोटे, ज्ञानेश्वर पारधी. पुनाजी पारधी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले,  श्री व्यंकोजी कुस्तीगीर तालीम संघटना जांभोरीचे अध्यक्ष भिवा वालकोळी, शिवाजी केंगले , सखाराम केंगले,  खरेदी विक्री संघाचे संचालक शामराव बांबळे, ग्रामपंचायत सदस्य दुंदा भोकटे, ग्रामपंचायत सदस्य शिवराम केंगले,किसन पोटे, अनंता वालकोळी, सुनिल वालकोळी, नामदेव भोकटे, घोडेगाव  पोलिस शिवाजी जनार्दन  केंगले, सुरेश केंगले,संजय केंगले, ग्रामसेवक सुनिल पारधी, कृषी सेवक सुनिल लोहकरे, भिवा केंगले, चंद्रकांत केंगले, पांडुरंग केंगले,राज केंगले,गफुरशेठ तांबोळी,सर्व जांभोरी ग्रामस्थ उपस्थित होते. 

Continue Reading

सामाजिक

हजारो कोस दूर असूनही संकटप्रसंगी आपल्या मायभूमीतील माणसांच्या  मदतीला धावणारी आंबेगावची कन्या….सौ.माधुरी श्रीकांत पवार

Published

on

मंचर दि. (प्रतिनिधी) -“नवदुर्गेचा सन्मान तू…परोपकारची खाण तू…. सर्वांचा अभिमान तू…….श्री शक्तीचा मान तू…… जन्मभूमीची ठेवी जाण तू”….. संपूर्ण महाराष्ट्रावर महा पुराचे संकट आले असताना हजारो कोस दूर अमेरिकेत असूनही आपल्या माय भूमितील आपल्या माणसांच्या मदतीसाठी धावणारी आंबेगाव ची कन्या “माधुरी ताई ” हि खरोखरच सर्वांचे प्रेरणादायी स्थान ठरली आहे.

गेल्या काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात  पावसाने थैमान माजविले असून यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून संपूर्ण महाराष्ट्रातील शेकडो कुटुंबे महापुराच्या तडाख्याने रस्त्यावर आली आहेत. महाराष्ट्रात निर्माण झालेल्या महापुराणे अनेक जण बेघर झाले आहेत अशा हतबल परिस्थितीत परोपकारच्या शिकवणीतून निर्माण झालेल्या माधुरी श्रीकांत पवार यांनी आपल्या मायभूमीचे पांग फेडण्याचा प्रयत्न केला आहे. तिच्या या निर्णयाने तिच्या जन्मदात्या मातापित्याचे उर अगदी अभिमानाने भरून आले असेल यात शंका नाही

आपल्या माय भूमितील आपल्या माणसाबद्द्ल मधुर्याचा ओलावा असलेल्या माधुरी ताईने  तीला शक्य होईल तेव्हढी मदत करीत आपले कर्तव्य बाजावण्याचा प्रयत्न केला आहे. ती आपल्या संभाषणात सांगते कि,

“मी “माधुरी श्रीकांत पवार”महाराष्ट्रातील अतिवृष्टी मुळे झालेल्या पूरग्रस्त घटना व नुकसान टीव्हीवर पाहत होते खूप वाईट वाटत होते, तसेच व्हाट्सअप वर  वळसे पाटील साहेबांनी केलेल्या आवहानामुळे माझ्या जन्मभूमीत असलेल्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीने माझ्या शेतकऱ्यांची फार मोठ्या प्रमाणात हानी झाली. सर्वात मोठे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यांना मी माझे आदर्श व सतत समाजाचा विचार करणारे माननीय दिलीपराव वळसे पाटील साहेब माजी गृहमंत्री यांच्या प्रेरणेने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना छोटीशी मदत माझ्या कृतीप्रमाणे पाठवीत आहे.”

 खरेतर “माधुरी ताई”  यांनी केलेली मदत हि पुरांनातील त्या टिटवीची आठवण करून देते कि जिने आपल्या मुलांना वाचविण्यासाठी समुद्र अटविण्याचा निर्धार केला शेवटी परमेश्वराला हि येऊन तिची मदत करावी लागली. आज या ताईंनी केलीली मदत हि अनेकांना आपल्या मायभूमी बद्द्लचे कर्तव्य बजावण्याची शिकवण देते यात शंका नाही. हा देश माझा आहे या देशाला देव भूमी म्हटले गेले आहे या ठिकाणी जन्म मिळणे हि  खरेतर सन्मानांची गोष्ट आहे. माधुरी यांनी केलेले हे कार्य सर्वांसाठी एक शिकवण आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यामुळे माधुरी पवार यांच्या प्रमाणे आपापल्या परीने मदत करा.चला सारे एक होऊया आपल्या देश बांधवांना पुन्हा उभे करण्यासाठी मदतीचा हात देऊया…..

Continue Reading
Advertisement

Trending

Best Replica Watches UK