सामाजिक
“स्वार्थी असुयेपोटी”, समाज विघातक वृतींकडून “गोवर्धन कंपनीला” बदनाम करण्याचा डाव?

मंचर दि. (प्रतिनिधी) आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथील आदिवासी आश्रम शाळेत अळया सापडलेली दुधाची पॅकेट ही उंदरांनी कुरतडलेली होती. असे आश्रम शाळेचे मुख्याध्यापक यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे परंतु स्थानिक पातळीवरील वैयक्तिक असुयेपोटी अथवा संवग प्रसिद्धीसाठी “गोवर्धन” कंपनीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे.
आदिवासी संघटना “बिरासा ब्रिगेड” चे कार्यकर्ते यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे कि, घोडेगाव येथील आश्रम शाळेत गेले असता त्याठिकाणी स्टॉक रूमला भेट दिली व त्याठिकाणी असलेल्या गोवर्धन टेट्रा पॅक मधील दुधात अळ्या असल्याचे निदर्शनास आले असल्याचे म्हटले आहे. या निवेदनात त्यांनी हेही म्हटले कि चांगल्या पॅक मध्ये सुद्धा अळ्या आढळून आल्या परंतु शाळेचे मुख्याध्यापक यांनी आपल्या लेखी निवेदनात असेही म्हटले आहे कि, उंदरांनी कुरतडलेली पॅक वगळता इतर कोणत्याही पॅक मध्ये अळ्या आढळलेल्या नाहीत, तसेच त्यांनी निवेदनात इतर पॅक फोडल्यानंतर त्यात सूक्ष्म अळी दिसली असेही म्हटले आहे परंतु एखादी सूक्ष्म वस्तू पहावायाची असल्यास त्यास मायक्रोस्कोप वरून तपासणी केल्यासच ती वस्तू कशी आहे. हे समजू शकते तर मग त्या दुधाची आरोग्य अधिकाऱ्यांकडून तपासणी होणे आवश्यक होते. परंतु शाळेच्या मुख्याध्यापक अथवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तसेही केले नाही. अगोदरच्या काळापासून पदाधिकाऱ्यांच्या भेटी पर्यंत ज्या कोणत्याही मुलांनी तेथील दूध प्यायले त्यामुळे कोणत्याही मुलाकडून आरोग्याविषयी तक्रार करण्यात आलेली नाही.असेही मुख्याध्यापक यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान बिरासा ब्रिगेड चे पदाधिकारी ज्या दिवशी आश्रम शाळेत गेले होते त्याचे दोन दिवस अगोदर उंदराने कुरतडलेली चार ते सहा पाकिटे बाजूला ठेवून देण्यात आली होती. याचाच दुसरा अर्थअसाही होऊ शकतो कि, उंदरांनी कुरतडलेली टेट्रापॅक दुधाची पाकिटे खराब होऊन त्या खराब पाकिटात अळ्या निर्माण झाल्या असल्याची माहिती अगोदरच या कार्यकर्त्यांना होती. म्हणूनच काही विघटक प्रवृत्तीनी कंपनीचे नाव बदनाम करून आपला वैयक्तिक स्वार्थ अथवा सवंग प्रसिद्धीच्या हव्यासापोटी ही जाणीवपूर्वक कृती या कार्यकर्त्यांनी केली असावी अशी शक्यता नकारता येत नाही. कारण कंपनीचा मूळप्लॅन्ट हा आंबेगाव तालुक्यातच असून स्थानिक मतभेदामुळे काही विघातक शक्तींनी जाणीव पूर्वक नियोजन करून कंपनीचे नाव बदनाम करण्याचा हा डाव असावा अशी चर्चा तालुक्यात सर्वत्र सुरु आहे.
“टेट्रा पॅकमध्ये विक्री केल्या जाणाऱ्या दुध सुरक्षित असून त्यात भरपूर पोषक तत्व मोठ्या प्रमानावर असतात. उच्च तापमानावर हे दूध गरम करून काही थंड करून हे टेट्रा पॅकिंग केले जाते. टेट्रा पॅक मध्ये असलेले दूध सुरक्षित व आरोग्यदायी मानले जाते. या संदर्भात जागतिक स्तरावर टेट्रा पॅक चे नामांकन आहे”.
दरम्यान “गोवर्धन”कंपनीचे देशाच्याच बाजार पेठेत नव्हे तर संपूर्ण जगाच्या बाजार पेठेत मोठ्या प्रमानावर दुग्धजन्य पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री केली जातं आहे. त्यामुळे बिरासा ब्रिगेड च्या नावाखाली जाणीव पूर्वक कंपनीची प्रतीमा खराब करण्याचा प्रयत्न काही समाज विघातकाकडून केला जातं असावा असेही अनेक जाणकारांचे मत आहे.
दरम्यान कंपनी व्यवस्थापनाने या खोडसाळ कृत्याची दाखल घेतली असून काही व्यक्तींनी स्वार्थी वृत्ती व असुयेपोटी केलेल्या बदनामी बद्दल न्यायालयात दाद मागणार असल्याचेही समजते.
सामाजिक
शासनाने “आद्य क्रांतिवीर होनाजी केंगले” यांचे जांभरी येथे राष्ट्रीय स्मारक बांधवे,: जागतिक आदिवासी दिनानिमित्त मागणी

भीमाशंकर दि (प्रतिनिधी)आदिवासी समाज्याच्या न्याय हक्कासाठी आपल्या रक्ताचे बलिदान देणाऱ्या वीर क्रांतिकारक होनाजी केंगले, बिरासा मुंडा तसेच राघोजी भांगरे यांच्या स्मुर्ती जपत जागतिक आदिवासी क्रांती दिन जांभोरी ता. आंबेगाव येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

इंग्रजी सत्तेच्या विरोधात बंड पुकारत गरीब दिन दुबळ्या आदिवासी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देत रक्त सांडणाऱ्या आदिवासी क्रांतिकारकांची जन्मभूमी जांभोरी हे गाव असून आदिवासी समाज्याचा धाण्या वाघ आदिवासी क्रांतिकारक होनाजी केंगले. बिरसा मुंडा राघोजी भांगरे निसर्गवासी माजी सभापती शंकरराव विठ्ठल केंगले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करून त्यांच्या स्मृतीना आवाहन करण्यासाठी येथील दूध डेअरी पासून आद्यक्रांतिकारक होनाजी केंगले यांच्या स्मारकपर्यंत प्रचंड रैली काढण्यात आली.

दरम्यान या वेळी प्रतिमेचे पूजन करताना जांभोरी गावच्या सरपंच सुनंदाताई पारधी.उपसरपंच बबन केंगले. पोलिस पाटील नवनाथ केंगले. बिरसा ब्रिगेड शाखा जांभोरीचे अध्यक्ष सुनिल गिरंगे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले. लखन पारधी. सागर काठे. शिक्षक पतसंस्थेचे आंबेगाव तालुका सभापती संजय केंगले. विकास पोटे. भिमा केंगले. शांताराम केंगले. दत्ता गिरंगे. किसन शेळके. पेसा अध्यक्ष मारुती केंगले. अंकुश गिरंगे. मिना केंगले. लताबाई केंगले. राजेंद्र उभे. दिगंबर केंगले. गणपत काठे. तंटामुक्ती अध्यक्ष नामदेव भोकटे. निवृत्ती केंगले. निलेश गिरंगे. नितीन गिरंगे. विठ्ठल पारधी कांताराम केंगले लक्ष्मण केंगले बबन केंगले . जांभोरी गावचे सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

त्याचप्रमाणे जांभोरी गाव हे आदिवासी क्रांतिकारकांची जन्मभूमी म्हणुन ओळखली जाते. याठीकाणी होनाजी केंगले यांचे स्मारक शासनाने निर्माण करावे अशी मागणी जांभोरी ग्रामस्थानी शासन दरबारी केली असून तत्कालीन मुख्यमंत्री. एकनाथराव शिंदे साहेब. तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब. तत्कालीन सहकारमंत्री गृहमंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब माजी खासदार शिवाजी दादा आढळराव पाटील साहेब खासदार डॉ. अमोल कोल्हे साहेब यांना निवेदन गेल्या वर्षी देण्यात आल्या असून शासन दरबारी पाठपुरावा केला जात आहे याबाबत शासनाने तात्काळ दखल घेऊन जांभोरी येथे राष्ट्रीय स्मारक बांधवे ज्यामुळे भावी पिढीला या आदिवासी क्रांतिकारकाच्या त्यागाची व बलिदानाची गाथा समजेल व यातून पुढील युवा पिढीत देशभक्ती वाढीस लागेल
दरम्यान या कार्यकामाचे आयोजन बिरसा ब्रिगेड शाखा जांभोरी. जांभोरी ग्रामविकास फाऊंडेशन जांभोरी.ग्रामविकास प्रतिष्ठान जांभोरी नांदुरकीचीवाडी. व्यंकोजी दूध उत्पादक सहकारी संस्था जांभोरी. ग्रामपंचायत कार्यालय जांभोरी. यांनी केले. कार्यक्रमानिमित आदिवासी दिवसाबद्दल माहिती विकास पोटे यांनी सांगितली तर सुत्र संचालन अंकूश गिरंगे यांनी केले.
सामाजिक
“हिरडा खरेदी” आणि “भीमाशंकर” रस्त्याच्या दुरवस्थेवरून, संतप्त आदिवासी जनतेकडून तळेघर येथे रास्ता रोको

मंचर दि.(प्रतिनिधी): श्री क्षेत्र भीमाशंकर रस्त्याची दुरावस्था व त्याचप्रमाणे हिरड्याची बंद असलेली खरेदी यांसह विविध मागण्यासाठी तळेघर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट), बिरसा ब्रिगेड, अखिल भारतीय किसान सभा आणि ट्रायबल फोरम यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
आदिवासी बांधवांचे उपजीविकेचे प्रमुख साधन असलेल्या हिरड्याची बंद असलेली खरेदी योग्य किंमतीने तातडीने सुरू करावी त्याचप्रमाणे श्री क्षेत्र भीमाशंकर रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली. सध्या श्रावण मास सुरु असलेल्याने देशाच्या कानकोपऱ्यातून लाखो शिवभक्त शिवज्योर्तिलिंगाचे दर्शनासाठी येत आहेत. परंतू भीमाशंकरकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठ्याप्रमानावर दुरावस्था झाली असून, या रस्त्याची दुरुस्ती करावी, या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.आंदोलनात मोठ्याप्रमानावर आदिवासी बांधव सहभागी झाले होते
दरम्यान आदिवासी विकास विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी घोडेगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम,तालुकाध्यक्ष धोंडीभाऊ भोर, महिला अध्यक्ष पूजा वळसे, युवक अध्यक्ष विशाल वाबळे, किसान सभेचे सचिव अशोक पेकारी, बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष संतोष तिटकारे, ट्रायबल फोरमचे अध्यक्ष सखाराम हिले, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब बाणखेले, सदानंद शेवाळे (पाटील),शेतकरी नेते माउली ढोमे, पुरुषोत्तम फदाले, शिवराम केंगले, दीपक चिमटे,के. के. तिटकारे, गणेश खाणदेशी, कृष्णा वडेकर, लखन पारधी उपस्थित होते.
“हिरडा खरेदीसाठी हमीभाव मिळावा”
माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी हिरडा खरेदीसाठी हमीभाव मिळावा आणि खरेदी लवकरसुरू व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वारंवार बैठका घेतल्या. तसेच मंचर-भीमाशंकर रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विकास विभागाला आदेश दिल्यापासून तात्पुरते खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले आहे, अशी माहिती माजी पंचायत समिती सभापती आणि आदिवासी नेते संजय गवारी यांनी दिली.
सामाजिक
अडिवरे येथे “आदिवासी स्त्रीयांसाठी मोफत आरोग्य शिबीर संपन्न”.

डिंभे दि (प्रतिनिधी)- आदिवासी स्त्रियांचे आरोग्य सुधारण्यासाठी आडीवरे ता. आंबेगाव येथे स्त्रियांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यांस महिलाकडून उत्कृष्ठ प्रतिसाद मिळाल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अमोल अंकुश यांनी दिली.
आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी पश्चिम पाट्यातील डिंभे धरणाच्या आतील बाजूस दुर्गम भागात असलेल्या आडीवरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर अडिवरे स्त्री रोग निदान आणि उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात विशेषतः पावसाळ्यात आदिवासी भागा मध्ये शेतात काम करणाऱ्या महिला वर्गा मध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या त्वचेचे आजार व साथी चे आजार पायांना कुहे होने,सर्दी,ताप,डोके दुखी, सांधे दुखी, हिमोग्लोबिन कमी होने ई. आजारा च्या तपासण्या सदर करून महिलांना मोफत औषधोपचार करण्यात आले. यात सुमारे ९३ महिलांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या.
दरम्यान या शिबिराचे उद्घाटन आदिवासी सेवक मा.शंकरराव मुदगुन यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते मा.अमोल अंकुश मार्गदर्शनाखाली करण्यात आले या शिबिरास मा.चंद्रकांत बांबळे सेवा निवृत्त कर्मचारी संघटना अध्यक्ष, मा.सखाराम गभाले (बाजार समिती संचालक) मा.संगिता किर्वे ( सरपंच), मा.रामदास भोकटे, जावजी कोकणे ई मान्यवर उपस्थित होते.
शिबिरामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र अडिवरे येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दशरथ चौरे आणि डॉक्टर प्रथमेश भोर यांनी महिलांच्या विविध आजाराविषयी माहिती देऊन त्यांच्या आरोग्य समस्या विषयी मार्गदर्शन केले या शिबिरासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र अडिवरे येथील आरोग्य निरीक्षक श्री गोविंद भारमळ.आरोग्य निरीक्षक ( हिवताप विभाग ) श्री अजय बोराडे. आरोग्य सहायिका श्रीमती विजया शिंदे. आरोग्य सेवक श्री दत्ता कंठाळे रामचंद्र असवले आरोग्य सेविका श्रीमती पोटे मॅडम, उघडे मॅडम, गिरे मॅडम सर्व आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक श्रीमती वंदना तळपे, स्वाती कोकणे यांचे सहकार्य मिळाले. शिबिरासाठी महा लॅब मंचर यांच्यावतीने प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून अविनाश पारधी यांनी काम पाहिले
-
राजकीय1 year ago
वीस वर्षांपूर्वी राजकारणात स्वतःला सिद्ध करण्यासाठी वेगळे झालेले “त्रिदेव”, पुन्हा आंबेगावच्या आसमंतात एकत्रित झळकणार
-
राजकीय1 year ago
“टायगर इज बॅक” शिरुर लोकसभेच्या मैदानात खळबळ माजणार..!
-
राजकीय10 months ago
वळसे पाटील यांना मोठा धक्का : शरद बँकेचे संचालक जयसिंग थोरात यांचा शरद पवार गटात जाहीर प्रवेश
-
राजकीय1 year ago
आयात उमेदवारांपेक्षा निष्ठावंतांना संधी द्या; उद्योगपती देवेंद्र शहा यांच्या नावाची शिरूर लोकसभेसाठी चर्चा…….
-
राजकीय10 months ago
आंबेगाव मध्ये महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर : निवडणुकीत सहभाग न घेण्याचा शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचा निर्णय
-
राजकीय1 year ago
अढळरावांनी, वळसे पाटलांची भेट घेऊन केली चौकशी
-
राजकीय12 months ago
भोसरी विधानसभा क्षेत्रातील असंख्य नाराज कार्यकर्ते भाजपाला ठोकणार रामराम: उबाठा सेनेत करणार प्रवेश?
-
सामाजिक1 year ago
“माणसात देव शोधत, सर्वसामान्यांच्या हितासाठी प्रयत्नशील राहणारा, माणसातील “देवमाणूस”….
हितचिंतक
August 6, 2024 at 12:57 pm
सर्वसामान्य शेतकऱ्याचे दूध पंचवीस रुपये भावाने घेऊन आदिवासी भागात ते दूध आश्रम शाळेत 132 रुपये च्या भावाने मलिदां गँग विकत आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या टाळू वरचे लोणी खाण्याचे काम गोवर्धन करत आहे
जर आश्रम शाळेचे दुध्यक्ष बत्तीस रुपयांनी विकले जात असेल तर त्यावर प्रक्रिया करण्यासाठी किती खर्च येत आहे आणि मग शेतकऱ्याचे दूध फक्त पंचवीस रुपये भावाने घेऊन 107 रुपये प्रॉफिट फक्त गोवर्धन समूहाला होत आहे
आदिवासी भागातील शेतकऱ्यांनी गायी घेतल्या आणि आदिवासी भागातील शेतकऱ्यांच्या पोरांना त्या गायचा दूध पिण्यासाठी घातलं तर तिची शेतकऱ्याला देखील उच्च रेट मिळू शकतो या कारणाने सर्वसामान्य शेतकरी आणि गोवर्धन च्या मध्ये मलिदा गॅंग सक्रिय झालेली आहे त्या मलिदा गँगचा भांडाफोड होईल