सामाजिक
बळीराजासह, विविध क्षेत्रातील उद्योजकांना नवी दिशा देणारा तेजस्वी “प्रकाश” मय आधारवड…!!!

मंचर दि. (प्रतिनिधी)- जागतिक पातळीवर नावाजलेल्या “पराग उद्योग” समूहाचे मार्गदर्शक, तसेच आपल्या नवनवीन कल्पनेतून शेतकरी तसेच व्यापारी जगतास नवी ऊर्जा देणारे प्रसिद्ध व्यापारी “प्रकाश शाह” नावाचा आधारवढ हारपल्याने सर्वस्थरातून हळहळ व्यक्त होत आहे.
उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड, जुन्नर, शिरूर, आंबेगाव परिसरात ऐशीच्या दशकात ज्यांनी सिमला परिसरातून “बटाटा” बियाणे उपलब्ध करून देऊन,शेती व्यवसायास वेगळी चालना दिली. तसेच त्यासोबत स्थानिक व्यापाराला एक नवी दिशा दाखविली. व्यापारात, उद्योगात आपल्या मुलांप्रमाणे इतरही नवउद्योजकांना ज्यानी, मोलाचे बहुमोल मार्गदर्शन केले व आपल्या अथांग विचारसरणीतून नवनवीन कल्पनाची निर्मिती करीत उद्योग व्यवसायात नवीन ऊर्जा आणली. जसे आकाशाप्रमाणे अथांग असलेल्या आपल्या विचार सरणीतून सर्वत्र तेजस्वी प्रकाश निर्माण करणारे मंचर येथील प्रतिष्ठित व्यापारी “प्रकाश शाह” हे म्हणजे सर्वांच्या दृष्टीने “आधारवड” होते. त्यांच्या जाण्याने सर्व स्थरातून हळहळ व्यक्त केली गेली.
“ज्याचे कर्तृत्व प्रचंड महाकाय आकाशाएव्हढे असते तो (प्र+ आकाश = प्रकाश) तसेच अज्ञाणाचा अंधकार दूर करीत, आपल्या ‘तेजस्वी’ ज्ञानाने सर्वांना अविरत प्रेरणा देणारा तो हि “प्रकाश” च होय
सुमारे १९८० सालाचे काळात दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जाणाऱ्या आंबेगाव तालुक्यातील शेतकरी वर्ग पिढीजात पारंपारीक पद्धतीने शेती करून आपला उदार निर्वाह करीत होता, यात बदल घडविण्याच्या हेतूने, कमी पाण्यात दर्जेदार वाढीक उत्पादन मिळावे या विचारणे प्रेरित होऊन, प्रकाशभाई शाह यांनी येथील भौगोलिक स्थितीचे निरीक्षण करून या भागातील शेती उत्पादनात नवीन “वाण” आणून आर्थिक उत्पन्न वाढवावे या दृष्टीने मोलाचे प्रयत्न केले.
दरम्यान या परिसरातील शेती उत्पादन क्षेत्रात पारंपारीक असलेला “बळीराजा” समृद्ध व्हावा,या दृष्टीने प्रकाश भाई यांनी आपल्या शोध वृत्तीच्या माध्यमातून देशाच्या बाजार पेठेत विविध राज्यात असणाऱ्या विविध जातींच्या पिकाचा अभ्यास केला. व त्या माध्यमातून, दरवर्षी पारंपारीक पद्धतीने बाजरी, ज्वारी, भुईमूग, अशी पिके घेणाऱ्या खेड, जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यास नवीन पीक उत्पादांनासाठी उपलब्ध केले. त्याचप्रमाणे हे नवीन पीक निवडताना, प्रकाशभाई यांनी येथील जमिनीची गुणवंत्ता पाहून या परिसरात सिमला प्रदेशातील ” बटाटा” बियानाचा वाण आंबेगाव तालुक्याच्या बाजारपेठेत आणला. त्याकाळात उच्च दर्जाचा योग्य “बटाटा बियाणे” येथील शेतकऱ्यांना देऊन प्रकाशशेठ यांनी शेती क्षेत्रात उत्तर पुणे जिल्ह्यात त्याकाळात क्रांतीच घडवून आणली असे म्हणणे वावागे ठरणार नाही.
शेतकरी वर्गाचे हित जोपासणे व शेतीवर आधारीत उद्योग उभे करण्यात शाह परिवार अग्रेसर ठरला आहे. शेती उत्पादणास एक नवी दिशा देणाऱ्या प्रकाशभाई यांनी नव्वद च्या दशकात दुधाचे अतिरिक्त असलेले उत्पादन पहाता त्या काळात असलेली दुधाच्या खाडा पद्धतीमुळे या भागातील दूध व्यवसाय अडचणीत आला होता.या काळात आपला जेष्ठ मुलगा “देवेंद्र” यांना योग्य मार्गदर्शन करीत दूध व्यवसायाची संकल्पना राबवत प्रकाश शाह यांनी दूध डेअरी व्यवसायाची प्रगतीसाठी प्रयत्न केले. यात प्रकाशशेठ यांचा दुसरा मुलगा “प्रीतम” यांनीही मोलाची साथ दिली. आपला मुलगा देवेंद्र यांच्या सातत्य पूर्ण प्रयत्नातून हा व्यवसायाचे एका मोठ्या कंपनीमध्ये रूपांतर झाले असून गोवर्धन या नावाने देशाच्या नव्हेतर जगाच्या बाजारात या कंपनीने नाव लौकिक निर्माण केला आहे. स्थानिक लोकांच्या उन्नतीच्या दृष्टीकोनातून निर्माण झालेल्या या उद्योगामुळे खेड जुन्नर आंबेगाव तालुक्यातीलच नव्हेतर पुणे नगर नाशिक आदी जिल्यातील लाखो शेतकऱ्यांना दुधाच्या माध्यमातून हक्काचे उत्पन्न मिळवून देण्यासाठी डेअरी उद्योग निर्माण केला.
परिस्थिती कशीही असो त्यातून यशस्वी रित्या मार्ग कसा काढावा व त्यातून व्यापार यशस्वी कसा करावा? याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रकाशशेठ होत. त्यांच्या जाण्याने त्यांच्या हितचिंतकच्या नव्हे तर अनेकांच्या जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे व ती पुन्हा भरून येणे दुर्लभच आहे. असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
सामाजिक
शासनाने “आद्य क्रांतिवीर होनाजी केंगले” यांचे जांभरी येथे राष्ट्रीय स्मारक बांधवे,: जागतिक आदिवासी दिनानिमित्त मागणी

भीमाशंकर दि (प्रतिनिधी)आदिवासी समाज्याच्या न्याय हक्कासाठी आपल्या रक्ताचे बलिदान देणाऱ्या वीर क्रांतिकारक होनाजी केंगले, बिरासा मुंडा तसेच राघोजी भांगरे यांच्या स्मुर्ती जपत जागतिक आदिवासी क्रांती दिन जांभोरी ता. आंबेगाव येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

इंग्रजी सत्तेच्या विरोधात बंड पुकारत गरीब दिन दुबळ्या आदिवासी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देत रक्त सांडणाऱ्या आदिवासी क्रांतिकारकांची जन्मभूमी जांभोरी हे गाव असून आदिवासी समाज्याचा धाण्या वाघ आदिवासी क्रांतिकारक होनाजी केंगले. बिरसा मुंडा राघोजी भांगरे निसर्गवासी माजी सभापती शंकरराव विठ्ठल केंगले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करून त्यांच्या स्मृतीना आवाहन करण्यासाठी येथील दूध डेअरी पासून आद्यक्रांतिकारक होनाजी केंगले यांच्या स्मारकपर्यंत प्रचंड रैली काढण्यात आली.

दरम्यान या वेळी प्रतिमेचे पूजन करताना जांभोरी गावच्या सरपंच सुनंदाताई पारधी.उपसरपंच बबन केंगले. पोलिस पाटील नवनाथ केंगले. बिरसा ब्रिगेड शाखा जांभोरीचे अध्यक्ष सुनिल गिरंगे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले. लखन पारधी. सागर काठे. शिक्षक पतसंस्थेचे आंबेगाव तालुका सभापती संजय केंगले. विकास पोटे. भिमा केंगले. शांताराम केंगले. दत्ता गिरंगे. किसन शेळके. पेसा अध्यक्ष मारुती केंगले. अंकुश गिरंगे. मिना केंगले. लताबाई केंगले. राजेंद्र उभे. दिगंबर केंगले. गणपत काठे. तंटामुक्ती अध्यक्ष नामदेव भोकटे. निवृत्ती केंगले. निलेश गिरंगे. नितीन गिरंगे. विठ्ठल पारधी कांताराम केंगले लक्ष्मण केंगले बबन केंगले . जांभोरी गावचे सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

त्याचप्रमाणे जांभोरी गाव हे आदिवासी क्रांतिकारकांची जन्मभूमी म्हणुन ओळखली जाते. याठीकाणी होनाजी केंगले यांचे स्मारक शासनाने निर्माण करावे अशी मागणी जांभोरी ग्रामस्थानी शासन दरबारी केली असून तत्कालीन मुख्यमंत्री. एकनाथराव शिंदे साहेब. तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब. तत्कालीन सहकारमंत्री गृहमंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब माजी खासदार शिवाजी दादा आढळराव पाटील साहेब खासदार डॉ. अमोल कोल्हे साहेब यांना निवेदन गेल्या वर्षी देण्यात आल्या असून शासन दरबारी पाठपुरावा केला जात आहे याबाबत शासनाने तात्काळ दखल घेऊन जांभोरी येथे राष्ट्रीय स्मारक बांधवे ज्यामुळे भावी पिढीला या आदिवासी क्रांतिकारकाच्या त्यागाची व बलिदानाची गाथा समजेल व यातून पुढील युवा पिढीत देशभक्ती वाढीस लागेल
दरम्यान या कार्यकामाचे आयोजन बिरसा ब्रिगेड शाखा जांभोरी. जांभोरी ग्रामविकास फाऊंडेशन जांभोरी.ग्रामविकास प्रतिष्ठान जांभोरी नांदुरकीचीवाडी. व्यंकोजी दूध उत्पादक सहकारी संस्था जांभोरी. ग्रामपंचायत कार्यालय जांभोरी. यांनी केले. कार्यक्रमानिमित आदिवासी दिवसाबद्दल माहिती विकास पोटे यांनी सांगितली तर सुत्र संचालन अंकूश गिरंगे यांनी केले.
सामाजिक
“हिरडा खरेदी” आणि “भीमाशंकर” रस्त्याच्या दुरवस्थेवरून, संतप्त आदिवासी जनतेकडून तळेघर येथे रास्ता रोको

मंचर दि.(प्रतिनिधी): श्री क्षेत्र भीमाशंकर रस्त्याची दुरावस्था व त्याचप्रमाणे हिरड्याची बंद असलेली खरेदी यांसह विविध मागण्यासाठी तळेघर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट), बिरसा ब्रिगेड, अखिल भारतीय किसान सभा आणि ट्रायबल फोरम यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
आदिवासी बांधवांचे उपजीविकेचे प्रमुख साधन असलेल्या हिरड्याची बंद असलेली खरेदी योग्य किंमतीने तातडीने सुरू करावी त्याचप्रमाणे श्री क्षेत्र भीमाशंकर रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली. सध्या श्रावण मास सुरु असलेल्याने देशाच्या कानकोपऱ्यातून लाखो शिवभक्त शिवज्योर्तिलिंगाचे दर्शनासाठी येत आहेत. परंतू भीमाशंकरकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठ्याप्रमानावर दुरावस्था झाली असून, या रस्त्याची दुरुस्ती करावी, या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.आंदोलनात मोठ्याप्रमानावर आदिवासी बांधव सहभागी झाले होते
दरम्यान आदिवासी विकास विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी घोडेगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम,तालुकाध्यक्ष धोंडीभाऊ भोर, महिला अध्यक्ष पूजा वळसे, युवक अध्यक्ष विशाल वाबळे, किसान सभेचे सचिव अशोक पेकारी, बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष संतोष तिटकारे, ट्रायबल फोरमचे अध्यक्ष सखाराम हिले, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब बाणखेले, सदानंद शेवाळे (पाटील),शेतकरी नेते माउली ढोमे, पुरुषोत्तम फदाले, शिवराम केंगले, दीपक चिमटे,के. के. तिटकारे, गणेश खाणदेशी, कृष्णा वडेकर, लखन पारधी उपस्थित होते.
“हिरडा खरेदीसाठी हमीभाव मिळावा”
माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी हिरडा खरेदीसाठी हमीभाव मिळावा आणि खरेदी लवकरसुरू व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वारंवार बैठका घेतल्या. तसेच मंचर-भीमाशंकर रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विकास विभागाला आदेश दिल्यापासून तात्पुरते खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले आहे, अशी माहिती माजी पंचायत समिती सभापती आणि आदिवासी नेते संजय गवारी यांनी दिली.
सामाजिक
अडिवरे येथे “आदिवासी स्त्रीयांसाठी मोफत आरोग्य शिबीर संपन्न”.

डिंभे दि (प्रतिनिधी)- आदिवासी स्त्रियांचे आरोग्य सुधारण्यासाठी आडीवरे ता. आंबेगाव येथे स्त्रियांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यांस महिलाकडून उत्कृष्ठ प्रतिसाद मिळाल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अमोल अंकुश यांनी दिली.
आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी पश्चिम पाट्यातील डिंभे धरणाच्या आतील बाजूस दुर्गम भागात असलेल्या आडीवरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर अडिवरे स्त्री रोग निदान आणि उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात विशेषतः पावसाळ्यात आदिवासी भागा मध्ये शेतात काम करणाऱ्या महिला वर्गा मध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या त्वचेचे आजार व साथी चे आजार पायांना कुहे होने,सर्दी,ताप,डोके दुखी, सांधे दुखी, हिमोग्लोबिन कमी होने ई. आजारा च्या तपासण्या सदर करून महिलांना मोफत औषधोपचार करण्यात आले. यात सुमारे ९३ महिलांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या.
दरम्यान या शिबिराचे उद्घाटन आदिवासी सेवक मा.शंकरराव मुदगुन यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते मा.अमोल अंकुश मार्गदर्शनाखाली करण्यात आले या शिबिरास मा.चंद्रकांत बांबळे सेवा निवृत्त कर्मचारी संघटना अध्यक्ष, मा.सखाराम गभाले (बाजार समिती संचालक) मा.संगिता किर्वे ( सरपंच), मा.रामदास भोकटे, जावजी कोकणे ई मान्यवर उपस्थित होते.
शिबिरामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र अडिवरे येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दशरथ चौरे आणि डॉक्टर प्रथमेश भोर यांनी महिलांच्या विविध आजाराविषयी माहिती देऊन त्यांच्या आरोग्य समस्या विषयी मार्गदर्शन केले या शिबिरासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र अडिवरे येथील आरोग्य निरीक्षक श्री गोविंद भारमळ.आरोग्य निरीक्षक ( हिवताप विभाग ) श्री अजय बोराडे. आरोग्य सहायिका श्रीमती विजया शिंदे. आरोग्य सेवक श्री दत्ता कंठाळे रामचंद्र असवले आरोग्य सेविका श्रीमती पोटे मॅडम, उघडे मॅडम, गिरे मॅडम सर्व आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक श्रीमती वंदना तळपे, स्वाती कोकणे यांचे सहकार्य मिळाले. शिबिरासाठी महा लॅब मंचर यांच्यावतीने प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून अविनाश पारधी यांनी काम पाहिले
-
राजकीय1 year ago
वीस वर्षांपूर्वी राजकारणात स्वतःला सिद्ध करण्यासाठी वेगळे झालेले “त्रिदेव”, पुन्हा आंबेगावच्या आसमंतात एकत्रित झळकणार
-
राजकीय1 year ago
“टायगर इज बॅक” शिरुर लोकसभेच्या मैदानात खळबळ माजणार..!
-
राजकीय10 months ago
वळसे पाटील यांना मोठा धक्का : शरद बँकेचे संचालक जयसिंग थोरात यांचा शरद पवार गटात जाहीर प्रवेश
-
राजकीय1 year ago
आयात उमेदवारांपेक्षा निष्ठावंतांना संधी द्या; उद्योगपती देवेंद्र शहा यांच्या नावाची शिरूर लोकसभेसाठी चर्चा…….
-
राजकीय10 months ago
आंबेगाव मध्ये महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर : निवडणुकीत सहभाग न घेण्याचा शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचा निर्णय
-
राजकीय1 year ago
अढळरावांनी, वळसे पाटलांची भेट घेऊन केली चौकशी
-
राजकीय12 months ago
भोसरी विधानसभा क्षेत्रातील असंख्य नाराज कार्यकर्ते भाजपाला ठोकणार रामराम: उबाठा सेनेत करणार प्रवेश?
-
सामाजिक1 year ago
“माणसात देव शोधत, सर्वसामान्यांच्या हितासाठी प्रयत्नशील राहणारा, माणसातील “देवमाणूस”….