singa8

rp8888

singa8

slot demo

slot qris

singa8

rp8888

https://bertrodriguez-museum.org

https://journal.uecommercebintaro.ac.id/

singa8

singa8

singa8

singa8

singa8

singa8

singa8

singa8

92GLORY

http://vecas.org.vn/id/

https://admire.ch/vendor/

Connect with us

सामाजिक

“मी म्हणजे जनसेवक, इतर सर्व लाभार्थी,”हीच भूमिका बाळगणारे तर खरे “स्वार्थी”

Published

on

मंचर दि. (प्रतिनिधी)जोपर्यंत स्वतःला  लाभाची  पदे उपभोगास मिळतात,  तो पर्यंत आम्ही “एकनिष्ठ समाजसेवक”, पण आपलें पद  दुसऱ्यांकडे मिळाले, तो दुसरा मात्र लाभार्थी असा एक जावई शोध लावणाऱ्या अशा काही अल्प संतुष्ट् लोकांना “आद्य लाभार्थी” म्हणावे लागेल. व अशा “आद्य लाभार्थी” स्वयंघोषित कथाकथित पुढऱ्यांच्या स्वार्थी भूमिकेमुळे तालुक्यातील वित्तीय संस्थासह , जनतेचे सामाजिक सौख्य  अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

“विधायतेतून मोक्ष मिळतो, तर स्वार्थातून कापाळ मोक्ष” शेवटी तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार…..अ-कारणपणे (काहीशा स्वार्थी भूमिकेतून) काही “आद्य लाभार्थी”कडून  सुरु केलेल्या असुयेच्या  राजकारणाने आंबेगाव तालुक्यातील सुसंस्कृतपणावर मलिनता येऊ लागली आहे.असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. तालुक्याचे काहीही होवो माझा स्वार्थ साध्य  झालाच पाहिजे  अशीच काहीशी वृत्ती तालुक्यातील या “आद्यलाभार्थी” मुळे बळावू लागल्याचे दिसून येत आहे. यात कोण चूक कोण बरोबर यात जाणे हिताचे नाही पण तालुक्यात सुरु असलेली मतभिन्नता आता मनःभेदापर्यंत येऊन पोहचली आहे. मतभेद संपविता येतात पण मनःभेद मात्र हृदयावर जणू,  पाषाणावर (दगडावर)छन्नी हातोडीने कोरलेल्या  खुणा निर्माण करून जातात. व यातून निर्माण होणारी “असुया” अग्नीप्रमाणे  हृदयातील होमकुंडात कायम प्रज्वलीत राहते . तोच अहंकारचा अग्नी  इतरां अगोदर स्वतः चे  सर्वस्व संपवून टाकू शकतो याचा अंदाज या  “आद्य लाभार्थी” ना  समजला तर सर्वांनाच्याच हिताचे होईल. यात शंका नाही.

एके काळी राजकारणामुळे एकमेकांचे तोंड न पाहाणारे दोन मित्र आता एकमेकांसाठी मैत्रीच्या  अनाभका घेत आहेत, तर कालपर्यंत आपल्या गुरुसमान नेत्याचे प्रत्येक कार्यक्रमात नाव घेतल्याशिवाय क्षणहि  वाया जाऊ न देणारा कार्यकर्ता,आज मात्र  गुरुच्या विरोधात बेफाम बोलत आहे. हि समाज हिताची विधायक वैचारीक लढाई नसून फक्त वर्चस्व व स्वार्थासाठीची लढाई कुणासाठी आहे यात शंका नसून  यातून  नक्की कोणते विधायक कार्य होईल कि कुणाचा फायदा होईल याकडे तालुक्यातील जनतेने लक्ष देणे गरजेचे आहे.

        लाभार्थी नक्क्की कोणाला म्हणणार?

सध्या तालुक्यात लाभार्थी कार्यकर्ते हा “शब्द”सर्वत्र  विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून सातात्याने  उच्चाराला जातो. परंतु लाभार्थी या  शब्दाचा उच्चार करणारे आजचे विरोधकच काही काळापूर्वी तालुक्यातील अनेक नावाजलेल्या संस्थावर विविध उच्च पदे भोगत, सत्तेचा माज करत होते. तेच एकेकाळ स्वतःला  निष्ठावंत म्हणणारे आजचे विरोधक म्हणजेच अगोदरचे लाभार्थीच होते. हेच ते आद्य लाभार्थी आता  आपल्या नेत्याला नावे ठेवत त्यांच्या घराचे वासे मोजत आहेत मग खरे गद्दार कोण हाही एक प्रश्न नक्कीच निर्माण होतो. हे आजचे विरोधक असलेल्या या “आद्य लाभार्थीची” भूमिका म्हणजे  .  म्हणतात ना… “सौ चुहे खाके बिल्ली चली हज को” अशीच काहीशी स्थिती  आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. 

 काल पर्यंत नेत्यांची  मर्जी सांभाळून पदे उपभोगताना आम्ही एकनिष्ठ आहोत असे सांगणारे सध्याचे विरोधक(आद्य लाभार्थी) मात्र पदावरून पाय उतार झाल्यानंतर ते पद इतरांना मिळाल्यावर, दुसरा व्यक्ती मात्र लगेच “लाभार्थी” असल्याची बोंबाबोंब करत नागरिकांनातून सहानुभूती   मिळविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतो परंतु या आद्य लाभर्थिंच्या बदलत्या हवामाना प्रमाणे मारल्या जाणाऱ्या माकडउड्यां पाहुन मात्र  जनतेचे मनोरंजनच होत आहे. यात शंका नाही.

तालुक्यातील संस्था उभ्या करण्यासाठी अनेकांना घाम गाळावा लागला रक्ताचे पाणी करावे लागले. त्यामुळे तालुक्यात अनेक युवकांना रोजगार प्राप्त झाला म्हणातात ना.. ” मोडणे सोपे पण,जोडणे मात्र अवघड” मग तालुक्यात नावारूपाला आलेल्या   संस्थांवर जाहीर वक्तव्य करून त्यांची गच्छंती करण्यापेक्षा आपण त्या संस्थेमध्ये संचालक अथवा पदाधिकारी असताना त्याविषयी संचालक मंडळासमोर विरोध दाखवून समाज हिताचे काम करणे म्हणजे समाज कार्य होईल कि ते जाहीर सभांमधून विरोधी वक्तव्य करून हे समजणे आवश्यक आहे. सत्तेतून राजकारण व राजकारणांतून सत्ता मिळविण्यासाठी म्हणा किंवा एखाद्या असुयेपोटी होणाऱ्या आरोपांमुळे  नावलौकिक पावलेल्या   संस्थाच्या मुळावर घाव घालून त्या संस्थाचा पाया निकामी करू नये, कारण याच संस्थामध्ये काम करीत असलेले कामगार याच  तालुक्यातील काही तरुण असून ते आपली  स्वतःच्या बौद्धिक शौक्षणिक  कार्यक्षमता सिद्ध करून प्रामाणिकपणे  काम करीत आहेत.मग हेही तुम्हाला लाभार्थी वाटतात का? 

तालुक्यात अनेक संस्थांच्या माध्यमातून तालुक्यातील तसेच तालुक्याबाहेरील  शेकडो गरजवंत  कुटुंबं आपला उदरनिर्वाह करीत आहेत. त्या तरुणांना आपलें विरोधक म्हणत त्यांना लाभार्थी अशी उपामा देणे विरोधकांना कितपत योग्य वाटते याचा विचार होणे गरजेचे आहे.काही कथाकथित पुढऱ्यांच्या  स्वार्थी राजकारणामुळे संस्थांच्या अस्तित्वाला धक्का बसला तर तालुक्याती जनता या काथकथित पुढऱ्यांना कधीच माफ करणार नाही.त्यामुळे  तालुक्याच्या मुळावर जाणारे राजकारण करण्यापेक्षा विधायक काम करून पुढील पिढी सक्षम करण्यासाठी राजकारण होणे अपेक्षित आहे.

Continue Reading
3 Comments

3 Comments

  1. Sudhir kale

    September 7, 2024 at 2:20 pm

    Very nice. Keep it up
    Good wishes.

  2. मा.संतोषभाऊ बोऱ्हाडे

    September 7, 2024 at 2:34 pm

    लेखकांनी मांडलेले मत शंभर टक्के खरं आहे . परंतु लाभार्थी किंवा आद्य लाभार्थी हा जो काही प्रकार चालू आहे .ही एकमेकांची विरोधक मानण्यापेक्षा या दोन्ही टोळ्या एकाच घरातले आहेत आणि ह्या टोळ्या एकमेकांना संपवण्यासाठी जे काही राजकारण करत आहेत त्याचा आंबेगाव तालुक्याच्या जनतेला वीट आलेला असून आंबेगाव तालुक्यातील जनतेने उद्या दोन्ही टोळ्यांना बाजूला सारून जर तिसरा पर्याय जर निवडला तर आश्चर्य वाटायला नको एवढंच तालुक्यातील जनतेच्या वतीने मला सांगूशी वाटतं .

  3. प्रशांत

    September 7, 2024 at 8:21 pm

    एक पुरुष घर पाहतो वय झाले कि तो एक ना एक दिवस घरी बसतोच म्हणजे कुटुंब थांबत नाही पुढची पिढी मुले ते कुटुंब डगमगत का होईना सांभाळतात पुढे घेऊन जातातच बंद नाय पडू देत

Leave a Reply

Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सामाजिक

आदिवासी भागातील शेतकऱ्याच्या शेतीचे पंचांनामे करून त्वरित नुकसान भरपाई द्यावी -मारुती केंगले

Published

on

डिंभे दि. (प्रतिनिधी) आंबेगाव तालुक्याचे पश्चिम आदिवासी भागातील बळीराजाचे एकमेव उत्पन भात व हिरडा पिकांचे नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने प्रचंड नुकसान झाले असून याचे पंचांनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे वतीने मारुती  केंगले यांनी केली आहे.

नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱऱ्यांच्या कुटुंबाच्या तोडचा घासच पाळवीला आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड अतोनात नुकसान होऊन शेतकरी देशोधडीला लागल्याचे दिसत आहे. अशा कठीण प्रसंगी शासकीय मदतीची शेतकऱ्यांना गरज आहे पण शासनाकडून अद्यापही कोणत्याही मदतीबाबत दिलासादायक घोषणा अद्यापहि झालेली नाही त्यामुळे ऐन दीपावळीच्या काळात अनेकांची घरे दिव्यांनी उजाळालेली असतील परंतू महाराष्ट्रातील बळीराजच्या घरात अंधार असेल अशीच काही परिस्थिती दिसत आहे.

 तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात एकमेव पिक भात शेती आणि हिरडा हिरड्याला बाजार भाव आता सध्या  १०० रुपये इतका भाव आहे परंतू आदिवासी भागात पावसामुळे हिरडा पीक मोठ्याप्रमानावर सडून खराब झाले आहे. मे ते ऑक्टोबर सलग ५ महिच्या कालावधित झालेल्या मुसळधार पावसामुळे भातपिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊन भात पीक वाया गेले आहे तर अनेक ठिकाणी भातशेती पावसामुळे सडून गेली आहे.त्यामुळे पिकांची पंचनामे करून आदिवासी शेतकऱ्याला मदतीचा हात मिळावा यासाठी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले तालुक्याचे तहसिलदार कार्यालयास दिले असून निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी साहेब. प्रांत अधिकारी गोविंद शिंदे साहेब आंबेगाव तालुक्याचे आमदार व  माजी गृहमंत्री  दिलीपराव वळसे पाटील यांना देण्यात आले असून याबाबत त्वरित कार्यवाही ना झाल्यास नाजिकच्या काळात शेकऱ्यांच्या हितासाठी  भिमाशंकर रस्त्यावर तीव्र आंदोलनाचा इशारा केंगले यांनी दिला आहे.

Continue Reading

सामाजिक

जांभोरी येथे कुस्ती तालीम इमारत भूमिपूजन सोहळा संपन्न

Published

on

घोडेगाव दि (प्रतिनिधी ) जांभोरी (ता आंबेगाव)पासून जवळच असलेल्या माचीचीवाडी या ठिकाणी कुस्तीसाठी तालीम इमारतिचा भूमिपूजन समारंभ उत्साहात पार पाडला

आजच्या धाकधकीच्या काळात तरुणांई मोबाईल व गेम यात अडकून ना रहाता शारीरिक तंदृस्तीकडे आकर्षित व्हावी या हेतूने सुरु होत असलेल्या कुस्ती तालीम इमारतीसाठी  येथील वसंत वालकोळी,बबन केंगले, भिवा वालकोळी, अनंता वालकोळी, यांनी ११गुंठे जमीन दिली आहे त्याचप्रमाणे  महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री सहकारमंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील यांनी दहा लाख रुपयांचा निधी तालमीच्या प्रत्यक्ष बांध कामासाठी मंजूर केला आहे यासाठी आदिवासी भागाचे नेते सुभाषराव मोरमारे साहेब  संजय गवारी, प्रकाश घोलप, यांनी परीश्रम घेतले आहेत

 दरम्यान जांभोरी गावचे लोकनियुक्त सरपंच सुनंदाताई पारधी, पोलिस पाटील  नवनाथ केंगले, पोलिस पाटील सोनाली पोटे, ज्ञानेश्वर पारधी. पुनाजी पारधी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले,  श्री व्यंकोजी कुस्तीगीर तालीम संघटना जांभोरीचे अध्यक्ष भिवा वालकोळी, शिवाजी केंगले , सखाराम केंगले,  खरेदी विक्री संघाचे संचालक शामराव बांबळे, ग्रामपंचायत सदस्य दुंदा भोकटे, ग्रामपंचायत सदस्य शिवराम केंगले,किसन पोटे, अनंता वालकोळी, सुनिल वालकोळी, नामदेव भोकटे, घोडेगाव  पोलिस शिवाजी जनार्दन  केंगले, सुरेश केंगले,संजय केंगले, ग्रामसेवक सुनिल पारधी, कृषी सेवक सुनिल लोहकरे, भिवा केंगले, चंद्रकांत केंगले, पांडुरंग केंगले,राज केंगले,गफुरशेठ तांबोळी,सर्व जांभोरी ग्रामस्थ उपस्थित होते. 

Continue Reading

सामाजिक

हजारो कोस दूर असूनही संकटप्रसंगी आपल्या मायभूमीतील माणसांच्या  मदतीला धावणारी आंबेगावची कन्या….सौ.माधुरी श्रीकांत पवार

Published

on

मंचर दि. (प्रतिनिधी) -“नवदुर्गेचा सन्मान तू…परोपकारची खाण तू…. सर्वांचा अभिमान तू…….श्री शक्तीचा मान तू…… जन्मभूमीची ठेवी जाण तू”….. संपूर्ण महाराष्ट्रावर महा पुराचे संकट आले असताना हजारो कोस दूर अमेरिकेत असूनही आपल्या माय भूमितील आपल्या माणसांच्या मदतीसाठी धावणारी आंबेगाव ची कन्या “माधुरी ताई ” हि खरोखरच सर्वांचे प्रेरणादायी स्थान ठरली आहे.

गेल्या काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात  पावसाने थैमान माजविले असून यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून संपूर्ण महाराष्ट्रातील शेकडो कुटुंबे महापुराच्या तडाख्याने रस्त्यावर आली आहेत. महाराष्ट्रात निर्माण झालेल्या महापुराणे अनेक जण बेघर झाले आहेत अशा हतबल परिस्थितीत परोपकारच्या शिकवणीतून निर्माण झालेल्या माधुरी श्रीकांत पवार यांनी आपल्या मायभूमीचे पांग फेडण्याचा प्रयत्न केला आहे. तिच्या या निर्णयाने तिच्या जन्मदात्या मातापित्याचे उर अगदी अभिमानाने भरून आले असेल यात शंका नाही

आपल्या माय भूमितील आपल्या माणसाबद्द्ल मधुर्याचा ओलावा असलेल्या माधुरी ताईने  तीला शक्य होईल तेव्हढी मदत करीत आपले कर्तव्य बाजावण्याचा प्रयत्न केला आहे. ती आपल्या संभाषणात सांगते कि,

“मी “माधुरी श्रीकांत पवार”महाराष्ट्रातील अतिवृष्टी मुळे झालेल्या पूरग्रस्त घटना व नुकसान टीव्हीवर पाहत होते खूप वाईट वाटत होते, तसेच व्हाट्सअप वर  वळसे पाटील साहेबांनी केलेल्या आवहानामुळे माझ्या जन्मभूमीत असलेल्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीने माझ्या शेतकऱ्यांची फार मोठ्या प्रमाणात हानी झाली. सर्वात मोठे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यांना मी माझे आदर्श व सतत समाजाचा विचार करणारे माननीय दिलीपराव वळसे पाटील साहेब माजी गृहमंत्री यांच्या प्रेरणेने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना छोटीशी मदत माझ्या कृतीप्रमाणे पाठवीत आहे.”

 खरेतर “माधुरी ताई”  यांनी केलेली मदत हि पुरांनातील त्या टिटवीची आठवण करून देते कि जिने आपल्या मुलांना वाचविण्यासाठी समुद्र अटविण्याचा निर्धार केला शेवटी परमेश्वराला हि येऊन तिची मदत करावी लागली. आज या ताईंनी केलीली मदत हि अनेकांना आपल्या मायभूमी बद्द्लचे कर्तव्य बजावण्याची शिकवण देते यात शंका नाही. हा देश माझा आहे या देशाला देव भूमी म्हटले गेले आहे या ठिकाणी जन्म मिळणे हि  खरेतर सन्मानांची गोष्ट आहे. माधुरी यांनी केलेले हे कार्य सर्वांसाठी एक शिकवण आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यामुळे माधुरी पवार यांच्या प्रमाणे आपापल्या परीने मदत करा.चला सारे एक होऊया आपल्या देश बांधवांना पुन्हा उभे करण्यासाठी मदतीचा हात देऊया…..

Continue Reading
Advertisement

Trending

Best Replica Watches UK