singa8

rp8888

singa8

slot demo

slot qris

singa8

rp8888

https://bertrodriguez-museum.org

https://journal.uecommercebintaro.ac.id/

singa8

singa8

singa8

singa8

singa8

singa8

singa8

singa8

92GLORY

http://vecas.org.vn/id/

https://admire.ch/vendor/

Connect with us

सामाजिक

“विकास कामे हि जनतेच्या विकासासाठी” कि,लाभार्थी ठेकेदार, प्रशासकीय अधिकारी व लाचखोर कथाकथित पुढारी यांची पोटभरण्यासाठी?

Published

on

मंचर दि (प्रतिनिधी) लाभार्थी ठेकेदारांनाची पोटं भरण्याकरिता माय बाप जनतेने जी एस टी किंवा इन्कम टॅक्स च्या माध्यमातून राष्ट्र उभारणी साठी दिलेल्या पैशाचा लुटारू शासनकर्ते व प्रशासनाच्या माध्यमातून प्रचंड प्रमानावर लूट चालली आहे हि लूट थांबविण्याकरिता कदाचित सर्व सामान्यांनाना आपल्या हाती कायदा घेण्याची गरज पुढील काळात येऊ नये एव्हढेच….

दररोज कुठेना… कुठे विकासच्या नावाखाली चाललेली विकासाची बहुतांशी कामे अतिशय नित्कृष्ठ दर्जाची होत आहेत. सर्वसामान्य जनतेच्या विकास कामासाठी राज्यकर्ते निधी टाकतात कि आपल्या तालुक्यातील काही लाभार्थी ठेकेदारांची व त्यासोबत प्रशासकीय अधिकारी व कथाकथित पुढऱ्यांच्या विकासासाठी हे काही कळत नाही.राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यासोबत असणारे मंत्रिमंडळ राज्याच्या विकासाचा दावा करीत आहे. परंतु खरंच सुरु असलेल्या कामाचा दर्जा चांगला आहे का? या नित्कृष्ठ दरज्याच्या कामांना जबाबदारी कोण?  हा प्रश्न सर्वसामान्य जनता विचारत आहे.

आज राज्याच्या प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावांत सुरु असलेली कामे हि अतिशय नित्कृष्ठ दर्ज्याची सुरु आहेत. सर्वच ठिकाणी सुरु असलेल्या कामाचा दर्जा हा देश अथवा राज्य  सक्षम बनविण्यासाठी नसून स्थानिक लाभार्थी कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी व कथाकथित लाचखोर पुढाऱ्यांची पोटं भरण्यासाठी चाललेला उतात्याप असल्याचे दिसत आहे. अशी चर्चा सर्वत्र जनतेमध्ये सुरु आहे. सिंधुदुर्ग जिल्यात स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याची दुरावस्था पाहून अनेकांच्या मुठी नक्क्कीच वळल्या असतील यात शंका नाही व नाजिकच्या काळात या वळलेल्या मुठीनी या भ्रष्ट यंत्रणेला सुधारविण्यासाठी कायदा हातात घेण्याची वेळ येऊ नये इतकेच….

राज्यकर्ते जाहीर सभांतून कामासाठी एव्हढ्या कोटींचा निधी त्या विकास कामासाठी, तेव्हढ्या कोटींचा निधी दिल्याच्या वलग्ना करीत आहेत. परंतु हा निधी खरंचच  जनतेच्या जनतेच्या  विकासासाठी योग्य रीतीने  वापरला जातो का?  कि, आपल्या आवातीभोंवती खोटेनाटे गोडावे गात फिरणाऱ्या  लाभार्थी ठेकेदारांच्या विकासासाठी, याचे आत्मपरीक्षण राज्यकर्त्यांने करणे आवश्यक आहे. अन्यथा पुढील काळात या विकास कामाच्या धिगाऱ्याखाली जनता या लाभार्थी ठेकेदार, प्रशासकीय अधिकारी यांच्या सोबत राज्याकर्त्यांना गाडल्या शिवाय राहणार नाही अशी स्थिती सर्वत्र निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. 

सध्या आपण जगत असलेल्या  स्वातंत्र्यापेक्षा इंग्रजसत्ता बरी होती अशी म्हणण्याची वेळ जनतेवर आली आहे. असे म्हणण्यापेक्षा काही लोक तर हि प्रतिक्रिया व्यक्त करू लागले आहेत. याचाच अर्थ या पराकोटीच्या भ्रष्ट व्यवस्थेला सुधारविण्यासाठी व पुन्हा नव्याने या भ्रष्टाचारी राज्यकर्त्यांच्या छाताडावर नाचण्यासाठी व स्वतंत्र व सक्षम भारत उभा करण्यासाठी  पुन्हा भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, टिळक, गांधी,चाफेकर बंधू या सारख्या स्वतंत्र सैनिकांना या भारत भूमीत  जन्म घ्यावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

आजा महागाई, बेरोजगारी, भाष्टाचार, स्त्रीयांवर होणारे आत्याचाराचे स्वरूप पहाता पुन्हा देश या स्वार्थी सत्ताधाऱ्यांमुळे परतंत्र्यात जातं असल्याची भावना  सर्वासामान्य जनता आज कुठेना कुठे व्यक्त करताना दिसत आहे. त्यामुळे जनतेच्या मनात साठत चाललेल्या या ज्वाला मुखीचा उद्रेक होणे केव्हा तरी नक्कीच होईल कारण   जनतेचा मनावर होणारे हे अधाद पहाता पुन्हा देशात सुरु झालेल्या या काळरात्रीचा नायनाट करून सक्षम भारताची उष:काल करण्यासाठी प्रत्येक भारतीयाला पुढे यावे लागणार असून हि स्थिती नाजिकच्या काळात  लकवकरच उभी राहील यात शंका वाटत नाही 

Continue Reading
5 Comments

5 Comments

  1. अशोक मोढवे

    August 26, 2024 at 2:35 pm

    रोख ठोक भूमिका मांडली हे असं चालणार आंधळदळतंय कुत्र पीठ खातय खरंच इग्रजांचा राज्य चांगलं होतं

  2. मा.संतोषभाऊ बोऱ्हाडे

    August 26, 2024 at 3:15 pm

    अतिशय छान असं विश्लेषण आपण केलं . विकासाच्या नावाखाली जो काय भ्रष्टाचार चालू आहे . आणि लाभार्थ्यांचे पोट भरण्यासाठी विकस निधी वाटला जातोय .याबद्दल आपण रोखठोक भूमिका मांडली . त्याबद्दल आपले मनापासून मनसे अभिनंदन . असच लिखाण पुढे चालू राहू द्या .माझ्या आपणास मनःपूर्वक मनसे शुभेच्छा .

  3. Nilkanth Suresh Kale

    August 26, 2024 at 6:30 pm

    छान शब्द लेखन

  4. Nilkanth Suresh Kale

    August 26, 2024 at 6:31 pm

    रोख ठोक भूमिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सामाजिक

घोडेगावच्या न्यू इंग्लिश मेडियम स्कूलची “कु.दुर्गा आवटे” वक्तृत्व स्पर्धेत उत्तर पुणे जिल्ह्यात प्रथम…

Published

on

घोडेगाव दि. (प्रतिनिधी) रा. प. सबनीस मेमोरियल नारायणगाव ता जुन्नर यांच्या वतीने  घेण्यात आलेल्या तालुका स्तरीय वक्तृत्व स्पर्धेत घोडेगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल ची दुर्गा आवटे हिने प्रथम क्रमांक पटकविला

  उत्तर पुणे जिल्ह्यात खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील इंग्लिश मीडियम शाळांतील विद्यार्थ्यांसाठी नारायणगाव येथील अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मीडियम स्कूल येथे घेण्यात येणाऱ्या आलेल्या  इंग्लिश  भाषा वक्तृत्व स्पर्धेत घोडेगाव येथील आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचलित,न्यू इंग्लिश मीडियम स्कूल या विद्यालयातील कु. दूर्वा सुहास आवटे(इ.७वी)  या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक मिळवून 5000 रुपये रोख प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह असे बक्षीस पटकावले.

दरम्यान याच गटातून इयत्ता कु. समृद्धी दत्तात्रय डुकरे तिने उत्तेजनार्थ बक्षीस मिळवले. या विद्यार्थिनीला प्रशस्तीपत्रक, मानचिन्ह व २००० रुपये रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. तसेच इयत्ता आठवी ते दहावी या गटात कुमारी अनुष्का वसंत लांगी या विद्यार्थिनीने तृतीय क्रमांक पटकावला. ही विद्यार्थिनी प्रशस्तीपत्रक मानचिन्ह व ३०००हजार रुपये रोख अशा बक्षिसाची मानकरी ठरली.

या स्पर्धेत खेड,आंबेगाव, जुन्नर या तालुक्यातील एकूण ४० इंग्लिश मिडीयम शाळांच्या  विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता . पाचवी ते सातवी या गटात दोन व इयत्ता आठवी ते दहावी या गटात दोन विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता.त्यामध्ये  या विद्यालयातील विद्यार्थिनींनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत विजय संपादन केला. त्यांना इंग्रजी विषय शिक्षिका  सौ .सोनीका नायकोडी , सौ. स्मिता पवळे व सौ. मोनिका भालेराव यांनी मार्गदर्शन केले. 

दरम्यान विद्यार्थिनींच्या या उत्तुंग यशाबद्दल आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष  तुकाराम  काळे, उपाध्यक्ष   संजय आर्वीकर, कार्याध्यक्ष सुरेश  काळे, संस्थेचे सचिव  विश्वास काळे, जॉईंट सेक्रेटरी  प्रशांत  काळे, संस्थेचे खजिनदार सोमनाथ काळे, विद्यालयाचे चेअरमन  बाळासाहेब काळे, वस्तीगृह कमिटीचे चेअरमन सूर्यकांत गांधी समन्वय समिती चेअरमन राजेश काळे, संस्थेचे संचालक अजित काळे,  वैभव काळे व  अक्षय काळे तसेच जगदीश चंद्र महिंद्रा हायस्कूल विद्यालयाचे अध्यक्ष रामदास घोलप, विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती मेरीफ्लोरा डिसूजा, उपप्राचार्या रेखा आवारी, पर्यवेक्षिका सौ वंदना वायकर यांनी अभिनंदन केले . 

Continue Reading

सामाजिक

गोवर्धन” च्या उत्कर्षांसाठी अहोरात्र झगडाणारा सक्षम तारा… “प्रीतमभाई शाह”

Published

on

मंचर दि. (संजय कोकणे )कोणतीही संस्था अथवा संघटन उत्कृष्टपणे चालण्यासाठी एका सक्षम नेतृत्व आवश्यक आहे. संघटनाच्या अंतर्गत असणाऱ्या बारीक सारीक गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवून कंपनीचे उत्कर्षांचा ध्यास उरी बाळगून रात्रौदिवस देह भान विसरून काम करणारा गोवर्धन च्या कोंदनातील तारा…. गोवर्धन चे  व्यवस्थापकीय संचालक प्रीतम शाह…

  “प्रीतम शाह आपले थोरले बंधू देवेंद्र शाह सोबत”

शासनाकडून सुरु असलेल्या खाडा पद्धतीमुळे शेतकरी राजाच्या रस्त्यावर टाकले जाणाऱ्या दूधाला योग्य भाव मिळावा व त्याची आर्थिक स्थिती संपन्न व्हावी या् उद्देशाने पुणे जिल्ह्यातील मंचर सारख्या छोट्याशा गावातून कंपनीचे चेअरमन देवेंद्र शाह यांच्या संकल्पनेतून यांच्या सुमारे १९९२ सुमारास सुरु करण्यात आलेल्या “पराग मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट” या कंपनीने गगन भरारी घेत एका मोठ्या जागतिक दर्जाच्या कार्पोरेट कंपनीमध्ये रूपांतर झाले आहे. पराग मिल्क फूड्स हि देशातच नव्हे तर जगाच्या बाजारपेठेत एक लोकप्रिय ब्रँड झाला आहे. आज भारतासह जगातील विविध देशामध्ये ” गोवर्धन घी, गो चीझ, प्राईड ऑफ काउ,आवतार प्रोटीन पावडर आदी नावाने अनेक उत्पादने ग्राहकांच्या पसंतीला उतरलेली असून गोवर्धन ब्रँड जगभरातील ग्राहकांचा विश्वासाला पात्र ठरला आहे.

दरम्यान आज हजारे कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल करत कसलेली पराग मिल्क फूड्स म्हणजेच गोवर्धन डेअरी प्रगतीच्या शिखरावर पोहचण्याचे कारण म्हणजे आपले थोरले बंधू देवेंद्र शाह यांच्या खांद्याला खांदा लावून एकदिलाने एकविचारणे व संपूर्ण समर्पण भावनेने कंपनीच्या उत्कर्षांसाठी व विकासासाठी दिवस रात्र एक करून काम करणारे  कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणजेच व्यवस्थापकीय संचालक, ज्यांनी डोळ्यांत तेल घालून कंपनीच्या उत्कर्षांसाठी एकाग्रतेने व प्रमाणिक पणे  काम केले त्यामुळेच आज  गोवर्धन कंपनी जगाच्या बाजार पेठेत खंबीरपणे पाय रोवून आकाशी पुन्हा गरुड झेप घेण्यासाठी उभी आहे. 

पराग मिल्क फूड्स या कंपनीच्या स्थापनेपासून आज पर्यंत अनेक स्थित्यंतरे आली अनेक आव्हाने उभी राहिली परंतू अशा वेळी प्रीतम यांनी  कंपनीचे चेअरमन यांच्या  सोबतीला खंबीर पणे उभे राहून येणाऱ्या सर्व आव्हाणांना सक्षमपणे तोंड दिले वर कंपनीच्या यशासाठी सदोदित प्रयत्न केले म्हणूनच मागील पस्तीस वर्षापूर्वी सुरु असलेल्या  खडा पद्धतीचे दूध घेऊन कारभार करणारी पराग डेअरी आज मोठा वटवृक्ष झाली असून या कंपनीला  यशाच्या शिखरावर नेण्यासाठी या कंपनीच्या यशाच्या राज मुकूटातील दैदिप्यमान रत्न म्हणजेच कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रीतम शाह होत हे नाकरता येणार नाही त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना मंगलमय लक्ष लक्ष शुभेच्छा…..

Continue Reading

सामाजिक

भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे १५o व्या जयंती निमित्त मंचर येथे “रण फॉर युनिटी” स्पर्धेचे आयोजन

Published

on

मंचर दि.31 (प्रतिनिधी) :  सरदार वल्लभभाई पटेल यांचे १५० वी जयंती निमित्त देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षितता जपण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी आपल्या समर्पणाला प्रोत्साहन व बळकटी देण्यासाठी  मंचर पोलीस स्टेशनच्यावतीने रन फॉर युनिटी या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

देशाचे लोहपुरुष  व स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्रीसरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने मंचर येथे आयोजित  करण्यात आलेल्या रन फॉर युनिटी या कार्यक्रमांतर्गत आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत मंचर पोलीस स्टेशनचे 05  पोलीस अधिकारी, 40 पोलीस अंमलदार, आळेफाटा महामार्ग सुरक्षा पथकाचे 10 अंमलदार मंचर शहरातील तीन पोलीस भरती अकॅडमी यांचे 150 विद्यार्थी तसेच मंचर शहरातील ज्येष्ठ नागरिक तसेच इतर लोकांनी सहभाग घेतला होता. 

दरम्यान सदर मॅरेथाॅन स्पर्धा महिला गट व पुरुष गट असे दोन गटात आयोजीत करण्यात आली होती. महिलांसाठी तीन किलोमीटर तर पुरुषांसाठी पाच किलोमीटर असे अंतर निर्धारित करण्यात आले होते सदर स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज चौक मंचर येथून सुरु होऊन ते भिमाशंकर आयुर्वेदीक महाविद्यालय वडगाव काशिंबेग ते परत छत्रपती शिवाजी महाराज चौक मंचर अशी घेण्यात आली

त्याचप्रमाणे स्पर्धेमध्ये पुरुष गटामध्ये प्रथम क्रमांक – कु.सचिन भारद्धाज ,द्वितीय क्रमांक – कु. तुषार  योगराज कोनरे , तृतीय क्रमांक – कु ऋषभ कैलास निसाळ यांनी पटकवला. तसेच सदर स्पर्धेमध्ये महिला गटामध्ये प्रथम क्रमांक – कु.आर्या मनोज डोक, द्वितीय क्रमांक – कु.स्वरा संजय गाडे, तृतीय क्रमांक – कु शर्वरी प्रकाश थोरात यांनी पटकविला विजयी स्पर्धकांना  मंचर पोलीस स्टेशनच्या वतीने सन्मान चिन्ह, मेडल तसेच प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.

         त्याचप्रमाणे रन वे स्पर्धेत सहभाग घेतलेल्या पोलीस अधिकारी अंमलदार यांचा पैकी प्रथम क्रमांक – श्री.यशवंत यादव, (पोलीस उपनिरीक्षक मंचर पोलीस स्टेशन,), द्वितीय क्रमांक -श्री.विनोद जांभळे, पोहवा (मंचर पोलीस स्टेशन) तृतीय क्रमांक,- रूपाली मिंढे (महिला पोलीस अंमलदार मंचर पोलीस स्टेशन) यांना देखील गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. असल्याची माहिती मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी बोभाटा न्यूज शी बोलताना सांगितले.

Continue Reading
Advertisement

Trending

Best Replica Watches UK