singa8

rp8888

singa8

slot demo

slot qris

singa8

rp8888

https://bertrodriguez-museum.org

https://journal.uecommercebintaro.ac.id/

singa8

singa8

singa8

singa8

singa8

singa8

singa8

singa8

92GLORY

http://vecas.org.vn/id/

https://admire.ch/vendor/

Connect with us

सामाजिक

आंबेगावचा फुललेला “वसंत”…काळाच्या पडद्याआड…..! -जेष्ठ पत्रकार विठ्ठल जाधव यांनी वाहिली श्रद्धांजली

Published

on

पुणे दि -(प्रतिनिधी)जिल्हा परिषद पंचायत समित्यांचा प्रशासक काळ संपून मार्च 1992 मध्ये निवडणुका झाल्या. वसंतराव भागुजी भालेराव, बीएससी ऍग्री झालेला हा युवक आंबेगाव पंचायत समितीचा सभापती झाला. या दरम्यान मी ‘लोकसत्ता’ चा बातमीदार होतो. त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य अशी एकत्र मिळून पंचायत समिती होती. आज आमदारांना  विकास कामांचे अधिकार एकवटले आहे. त्यावेळी पंचायत राज व्यवस्थेमध्ये आमदारांपेक्षाही किंबहुना थोडे जादा अधिकार पंचायत समिती सभापतींना होते. वसंतराव सभापती असले तरी त्यांच्यापुढे तगडे विरोधक त्यावेळी होते. सभापती हे जिल्हा परिषदेचे देखील पदसिद्ध सदस्य असल्याने त्याकाळी वसंतराव हे उच्चशिक्षित आणि मुद्देसूद मांडणी यामुळे सभागृहात ते लक्षवेधी ठरवायचे. 

आंबेगाव पंचायत समितीचे सभापती असताना वसंतराव यांनी अनेक चांगले बदल आणि धोरणात्मक निर्णय त्यांनी घेतले. विशेषता त्याकाळी आदिवासी भागामध्ये  रस्ते, उन्हाळ्यात वाड्यावर त्यांवर सुरू करावे लागणारे टँकर, प्राथमिक शाळांच्या खोल्या, गुणवत्ता वाढीचे प्रकल्प.अंगणवाड्या इमारती, शेती विषयक योजना आणि विशेषता खरीप हंगामा आढावा बैठकीमध्ये सभापती भालेराव यांचे असणारे अभ्यासपूर्ण विवेचन हे वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील चकित पाडणारे असायचे. पाणीटंचाई, खरीप हंगाम आढावा बैठकांना जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हाधिकारी, आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेच्या सर्व सभापती उपस्थित असायचे. अशावेळी भालेराव यांनी मांडलेले मुद्दे हेच बैठकीचे दिशादर्शक ठरायचे. अशा बैठकांमध्ये आंबेगाव चा हा’ वसंत ‘नेहमी फुललेला असायचा. त्यामुळे त्यांची छाप सगळ्यांवर पडायची.

  लोकप्रतिनिधी म्हणून शासकीय वाहन असलेले सभापती हे तालुक्यामध्ये एकमेव पदाधिकारी असायचे. सदस्यांकडे स्वतःची चार चाकी सोडा, दुचाकी देखील  नव्हती. सभेला उशीर झाला. आणि मुक्कामी एसटी घोडेगाव किंवा मंचर वरून निघून गेली तर  अनेकदा भालेराव हे शासकीय  वाहन इतर सहकारी सदस्यांना त्यांच्या घरी जाण्यासाठी पाठवून द्यायचे आणि स्वतः मात्र इतर व्यवस्था करून कळंबला जायचे. पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेची सभा असेल तर हातात कागदपत्रांची फाईल, डायरी घेऊन ते सभेला जायचे. 

अभ्यासू, रुबाबदार व्यक्तिमत्व आणि कामाचे वेगळेपण यामुळे अल्पावधीतच त्यांची आंबेगाव तालुक्याला आणि जिल्ह्याला देखील ओळख झाली. सभापती होण्यासाठी अनेक जण इच्छुक असायचे, परंतु भालेराव यांना हटवणे तालुक्यातील नेतृत्वाला त्यावेळी अशक्य झाले.

 मी पुण्यात सामना मध्ये दाखल झालो. त्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये भेट व्हायची. पत्रकार विठ्ठल जाधव ही माझी ओळख असली तरी मला ते आवर्जून विठ्ठलराव म्हणायचे. पुण्यातील पत्रकारितेमध्ये आपले कुणीतरी आहे. याचे त्यांना विशेष वाटायचे. आंबेगाव मध्ये सभापती भालेराव हे भविष्यातील स्पर्धक आहेत. हे ओळखून त्यांना राजकीय दृष्ट्या दाबण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. अनेक राजकीय चढउतारा आणि नेते बघितले.मात्र त्यांनी स्वतःचे कर्तुत्व आणि अधिष्ठानाच्या जोरावर सभापती पदाची कारकीर्द यशस्वी आणि गौरवास्पद केली. 

1997 नंतरची त्यांची राजकीय वाटचाल ही नेहमीच कुणाला तरी फायदा करून देणारी ठरली. प्रत्येक निवडणुकीत त्यांची भूमिका ही महत्त्वाची राहिली. काही कालखंड ते स्थानिक राजकारणात व्यस्त राहिले. नंतरच्या टप्प्यात सहकार आणि बाजार समितीच्या राजकारणामध्ये सक्रिय होऊन ते आंबेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर सभापती झाले. मंचर बाजार आवाराला नवा आयाम देण्यामध्ये सर्वात मोठा वाटा राहिला. शेतकरी केंद्रस्थानी म्हणून त्यांनी नव्याने गाळे आणि बाजार उभारणी केली. बाजार समितीच्या कामासाठी अनेकदा ते पुण्यात जिल्हा सहकार उपनिबंधक आणि पणन संचालक कार्यालयामध्ये वारंवार भेटवायचे. नवीन काय करतोय ते सांगायचे. जनहिताची त्यांची ही धडपड अखेरपर्यंत कायम होती. वसंतराव हा झेप घेणारा माणूस. स्पष्ट आणि परखड बोलणारा.पॉवर पॉलिटिक्स मध्ये अशा माणसांना नेहमीच अंडरस्टमेंट केले जाते. वसंतरावांना त्याही गोष्टीला सामोरे जावे लागले. परंतु तरीदेखील वसंतराव यांची राजकीय कार्तिक दही संस्मरणीय आणि दिशादर्शक ठरली. एक-दीड वर्षापूर्वी त्यांची अशीच भेट झाली. आजारपणाच्या मर्यादा स्पष्टपणे दिसत होत्या. तरी देखील मोठ्या उत्साहाने आणि दमदारपणे बोलताना त्यांनी अनेक गोष्टींना उजाळा दिला. वसंतराव यांचे अकाली जाणे मनाला वेदना देणारे, जनमानसात वसंतराव यांनी आपल्या कार्यकर्तुत्वामधून उमटवलेला ठसा प्रत्येकाच्या स्मरणात राहील.

Continue Reading
1 Comment

1 Comment

  1. मा.संतोषभाऊ बोऱ्हाडे

    September 20, 2024 at 11:41 am

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !

Leave a Reply

Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सामाजिक

शासनाने “आद्य क्रांतिवीर होनाजी केंगले” यांचे जांभरी येथे राष्ट्रीय स्मारक बांधवे,: जागतिक आदिवासी दिनानिमित्त मागणी

Published

on

भीमाशंकर दि (प्रतिनिधी)आदिवासी समाज्याच्या न्याय हक्कासाठी आपल्या रक्ताचे बलिदान देणाऱ्या वीर  क्रांतिकारक होनाजी केंगले, बिरासा मुंडा तसेच राघोजी भांगरे यांच्या स्मुर्ती जपत जागतिक आदिवासी क्रांती दिन जांभोरी ता. आंबेगाव येथे  मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

 इंग्रजी सत्तेच्या विरोधात बंड पुकारत गरीब दिन दुबळ्या आदिवासी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देत रक्त सांडणाऱ्या  आदिवासी क्रांतिकारकांची जन्मभूमी जांभोरी हे गाव असून आदिवासी समाज्याचा धाण्या वाघ आदिवासी क्रांतिकारक होनाजी केंगले. बिरसा मुंडा राघोजी भांगरे निसर्गवासी माजी सभापती शंकरराव विठ्ठल केंगले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करून त्यांच्या स्मृतीना आवाहन करण्यासाठी येथील दूध डेअरी पासून आद्यक्रांतिकारक होनाजी केंगले यांच्या स्मारकपर्यंत प्रचंड  रैली काढण्यात आली.

दरम्यान या वेळी प्रतिमेचे पूजन करताना जांभोरी गावच्या सरपंच सुनंदाताई पारधी.उपसरपंच बबन केंगले. पोलिस पाटील नवनाथ केंगले. बिरसा ब्रिगेड शाखा जांभोरीचे अध्यक्ष सुनिल गिरंगे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले. लखन पारधी. सागर काठे. शिक्षक पतसंस्थेचे आंबेगाव तालुका सभापती संजय केंगले. विकास पोटे. भिमा केंगले. शांताराम केंगले. दत्ता गिरंगे. किसन शेळके. पेसा अध्यक्ष मारुती केंगले. अंकुश गिरंगे. मिना केंगले. लताबाई केंगले. राजेंद्र उभे. दिगंबर केंगले. गणपत काठे. तंटामुक्ती अध्यक्ष नामदेव भोकटे. निवृत्ती केंगले. निलेश गिरंगे. नितीन गिरंगे. विठ्ठल पारधी कांताराम केंगले लक्ष्मण केंगले बबन केंगले . जांभोरी गावचे सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. 

त्याचप्रमाणे जांभोरी गाव हे आदिवासी क्रांतिकारकांची जन्मभूमी म्हणुन ओळखली जाते. याठीकाणी होनाजी केंगले यांचे स्मारक शासनाने निर्माण करावे अशी मागणी जांभोरी ग्रामस्थानी शासन दरबारी केली असून तत्कालीन मुख्यमंत्री. एकनाथराव शिंदे साहेब. तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब. तत्कालीन सहकारमंत्री गृहमंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब माजी खासदार शिवाजी दादा आढळराव पाटील साहेब खासदार डॉ. अमोल कोल्हे साहेब यांना निवेदन गेल्या वर्षी देण्यात आल्या असून शासन दरबारी पाठपुरावा केला जात आहे याबाबत शासनाने तात्काळ दखल घेऊन जांभोरी येथे राष्ट्रीय स्मारक बांधवे ज्यामुळे भावी पिढीला या आदिवासी क्रांतिकारकाच्या त्यागाची व बलिदानाची  गाथा समजेल व यातून पुढील युवा पिढीत देशभक्ती  वाढीस लागेल  

दरम्यान या कार्यकामाचे आयोजन बिरसा ब्रिगेड शाखा जांभोरी. जांभोरी ग्रामविकास फाऊंडेशन जांभोरी.ग्रामविकास प्रतिष्ठान जांभोरी नांदुरकीचीवाडी. व्यंकोजी दूध उत्पादक सहकारी संस्था जांभोरी. ग्रामपंचायत कार्यालय जांभोरी. यांनी केले. कार्यक्रमानिमित आदिवासी दिवसाबद्दल माहिती विकास पोटे यांनी सांगितली तर सुत्र संचालन अंकूश गिरंगे यांनी केले.

Continue Reading

सामाजिक

“हिरडा खरेदी” आणि “भीमाशंकर” रस्त्याच्या दुरवस्थेवरून, संतप्त आदिवासी जनतेकडून तळेघर येथे रास्ता रोको

Published

on

मंचर दि.(प्रतिनिधी): श्री क्षेत्र भीमाशंकर रस्त्याची दुरावस्था व  त्याचप्रमाणे हिरड्याची बंद असलेली खरेदी यांसह विविध मागण्यासाठी  तळेघर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट), बिरसा ब्रिगेड, अखिल भारतीय किसान सभा आणि ट्रायबल फोरम यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 

आदिवासी बांधवांचे उपजीविकेचे प्रमुख साधन असलेल्या हिरड्याची बंद असलेली खरेदी योग्य किंमतीने तातडीने सुरू करावी त्याचप्रमाणे श्री क्षेत्र भीमाशंकर रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली. सध्या श्रावण मास सुरु असलेल्याने देशाच्या कानकोपऱ्यातून लाखो शिवभक्त शिवज्योर्तिलिंगाचे दर्शनासाठी येत आहेत. परंतू भीमाशंकरकडे जाणाऱ्या  रस्त्याची मोठ्याप्रमानावर दुरावस्था झाली असून, या रस्त्याची दुरुस्ती करावी, या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.आंदोलनात मोठ्याप्रमानावर आदिवासी बांधव सहभागी झाले होते

दरम्यान आदिवासी विकास विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनादरम्यान  कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी घोडेगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम,तालुकाध्यक्ष धोंडीभाऊ भोर, महिला अध्यक्ष पूजा वळसे, युवक अध्यक्ष विशाल वाबळे, किसान सभेचे सचिव अशोक पेकारी, बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष संतोष तिटकारे, ट्रायबल फोरमचे अध्यक्ष सखाराम हिले, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब बाणखेले, सदानंद शेवाळे (पाटील),शेतकरी नेते माउली ढोमे, पुरुषोत्तम फदाले, शिवराम केंगले, दीपक चिमटे,के. के. तिटकारे, गणेश खाणदेशी, कृष्णा वडेकर, लखन पारधी उपस्थित होते.

“हिरडा खरेदीसाठी हमीभाव मिळावा” 

माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी हिरडा खरेदीसाठी हमीभाव मिळावा आणि खरेदी लवकरसुरू व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वारंवार बैठका घेतल्या. तसेच मंचर-भीमाशंकर रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विकास विभागाला आदेश दिल्यापासून तात्पुरते खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले आहे, अशी माहिती माजी पंचायत समिती सभापती आणि आदिवासी नेते संजय गवारी यांनी दिली.

Continue Reading

सामाजिक

अडिवरे येथे “आदिवासी स्त्रीयांसाठी मोफत आरोग्य शिबीर संपन्न”.

Published

on

डिंभे दि (प्रतिनिधी)- आदिवासी स्त्रियांचे  आरोग्य सुधारण्यासाठी आडीवरे ता. आंबेगाव येथे स्त्रियांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यांस महिलाकडून उत्कृष्ठ प्रतिसाद मिळाल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अमोल अंकुश यांनी दिली.

  आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी पश्चिम पाट्यातील डिंभे धरणाच्या आतील बाजूस दुर्गम भागात असलेल्या आडीवरे येथील  प्राथमिक आरोग्य केंद्रावर अडिवरे  स्त्री रोग निदान आणि उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात विशेषतः पावसाळ्यात आदिवासी भागा मध्ये शेतात काम करणाऱ्या महिला वर्गा मध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या त्वचेचे आजार व साथी चे आजार  पायांना कुहे होने,सर्दी,ताप,डोके दुखी, सांधे दुखी, हिमोग्लोबिन कमी होने ई. आजारा च्या तपासण्या सदर करून महिलांना मोफत औषधोपचार करण्यात आले. यात सुमारे ९३ महिलांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या.

दरम्यान या शिबिराचे उद्घाटन आदिवासी सेवक मा.शंकरराव मुदगुन यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते मा.अमोल अंकुश मार्गदर्शनाखाली करण्यात आले या शिबिरास मा.चंद्रकांत बांबळे सेवा निवृत्त कर्मचारी संघटना अध्यक्ष, मा.सखाराम गभाले (बाजार समिती संचालक) मा.संगिता किर्वे ( सरपंच), मा.रामदास भोकटे, जावजी कोकणे ई मान्यवर उपस्थित होते.

 शिबिरामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र अडिवरे येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दशरथ चौरे आणि डॉक्टर प्रथमेश भोर यांनी महिलांच्या विविध आजाराविषयी माहिती देऊन त्यांच्या आरोग्य समस्या विषयी मार्गदर्शन केले या शिबिरासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र अडिवरे येथील आरोग्य निरीक्षक श्री गोविंद भारमळ.आरोग्य निरीक्षक ( हिवताप विभाग ) श्री अजय बोराडे. आरोग्य सहायिका श्रीमती विजया शिंदे. आरोग्य सेवक श्री दत्ता कंठाळे रामचंद्र असवले आरोग्य सेविका श्रीमती पोटे मॅडम, उघडे मॅडम, गिरे मॅडम सर्व आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक श्रीमती वंदना तळपे, स्वाती कोकणे यांचे सहकार्य मिळाले. शिबिरासाठी महा लॅब मंचर यांच्यावतीने प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून अविनाश पारधी यांनी काम पाहिले 

Continue Reading
Advertisement

Trending

Best Replica Watches UK

Copyright © 2024 BobhataNews.in