singa8

rp8888

singa8

slot demo

slot qris

singa8

rp8888

https://bertrodriguez-museum.org

https://journal.uecommercebintaro.ac.id/

singa8

singa8

singa8

singa8

singa8

singa8

singa8

singa8

92GLORY

http://vecas.org.vn/id/

https://admire.ch/vendor/

Connect with us

सामाजिक

भारतीय डेअरी उद्योगाला प्रगतीची  “गरुड भरारी” देणारा श्वेतक्रांतीचा आणखी एक जनक “देवेंद्र शाह”

Published

on

मंचर दि. (संजय कोकणे यांजकडून) भारतीय श्वेतक्रांतीचे जनक म्हणून “डॉ.वर्गिस कुरियन” यांचे नाव आदराने घेतले जाते. त्याचप्रमाणे “भारतीय  डेअरी उद्योगाला” यशाच्या शिखरांवर नेण्यासाठी अविरत अहोरात्र,अथक, प्रामाणिक, प्रयत्न करणारे “धवल क्रांतिचे” दुसरे जनक म्हणून पराग (गोवर्धन) उद्योग समूहाचे संस्थापक, प्रसिद्ध उद्योगपती “देवेंद्र शाह” यांचे नाव समोर येते.

दरम्यान “देवेंद्र शाह” यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर डेअरी उद्योग क्षेत्रात  “गरुड भरारी” घेत जगाच्या बाजारपेठेत भारतीय डेअरी उद्योगाला नवी दिशा देत एक सन्मान जनक स्थान मिळवून दिले, व त्यातून भारतीय शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक  उत्कर्षांचे दिवस आणले.जीवनात एखाद्या ध्येयाने प्रेरित  होऊन अहोरात्र काम करीत, प्रयत्नाची पराकष्ठा करणारे थोडेच असतात. जीवनाचे ध्येय मिळविण्यासाठी  माणसाकडे  जबरदस्त  इच्छा शक्ती असावी लागते.  कारण माणूस स्वतः स्वतःच नशीब घडवितो असे  म्हणतात.  आपण  समाज्याचे देणे  लागतो या भूमिकेतून व एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित झालेल्या शाह यांनी  अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत येणाऱ्या आव्हानांना न जु्मानता अहोरात्र संघर्ष करून भारतीय डेअरी उद्योगात आपलें  अनन्य साधारण स्थान निर्माण केले.म्हणूनच आज  डेअरी उद्योग क्षेत्राच्या क्षितिजावर देवेंद्र शाह यांचे नाव सुवर्णाक्षरात नाव कोरले आहे.

 साधारणतः १९९२ या कालखंडात “देवेंद्र शाह” यांनी पराग डेअरी या उद्योगाची स्थापना करून, प्रचंड अडचणीत असलेला दूध व्यवसाय स्वीकारला व  या व्यवसायाच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना एक सक्षम आयुष्य जगण्याचा मार्ग शाह यांनी दाखविला. कारण याच कालावधीमध्ये  महाराष्ट्रात मध्ये दुधाला खाडा पद्धती सुरु होती. त्या खडा पद्धतीमध्ये दूध संघाने न स्वीकारलेले दूध शेतकऱ्यांना रस्त्यावर फेकून द्यावे लागतं होते अशा काळात संघाने न स्वीकारलेले दूध विकत घेऊन जबरदस्त इच्छाशक्ती, आवश्यक लवचिकता तसेच एखादे ध्येय  साध्य  करण्यासाठी लागणारा  धीर, सहनशिलता, अशा अनेक गुणांच्या जोरावर या उद्योगपतिने डेअरी व्यवसायात यशाचे शिखर गाठले त्यामुळे पराग समूह आशिया खंडातील नावाजलेला उद्योग झाला आज या उद्योगाची   वार्षिक उलाधाल सुमारे दहा हजार कोटिंच्या दिशेने झेप घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. 

आज भारतात नव्हे तर जगाच्या बाजार पेठेमध्ये अनेक देशामध्ये गोवर्धन, प्राईड ऑफ काऊ, गो चीझ, अवतार, अशा विविध नावाने तूप,बटर,दूध,दही,लस्सी,ताक, पनीर,प्रोटीन पावडर,चीझ, पेढे, काजू कतली  आदी  दुग्धजण्य उत्पादने उपलब्ध असून बाजारात या उत्पादनांना  ग्राहकांमध्ये प्रचंड मागणी आहे.त्याच प्रमाणे ग्राहकांना स्वच्छ निर्भेळ ताजे दूध मिळावे व शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवे  यासाठी “भाग्यलक्ष्मी डेअरी फार्म” या नावाने सुमारे साडे तीन हजार गाईंचा गोठा निर्माण केला आहे. व त्याद्वारे “प्राईड ऑफ काऊ” नावाने दुध व दुग्ध जन्य पदार्थाचा पुरवठा सुरु असून, अल्पवाधितच हे पदार्थ जगाच्या बाजारपेठेत लोकप्रिय झाले आहेत.

डेअरी क्षेत्रात आपण प्रगती करत असताना, ग्रामीण भागातील ज्या मायबाप शेतकऱ्यांनी “गोवर्धन कंपनीच्या” उत्कर्षांसाठी अविरत साथ दिली. या सर्व शेतकऱ्यांचे आपण काहीतरी देणे लागतो. या सामाजिक जाणीवेतून व निरपेक्ष भावानेतून, या शेतकऱ्यांचे  आर्थिक उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने  गायीच्या दुधाच्या उत्पादनात वाढ़ होणे आवश्यक होते. म्हणून “भाग्यलक्ष्मी डेअरी फार्म” येथे गाय दूध वाढीसाठी संशोधन करून, दूध उत्पादन वाढविले कारण गाय जेवढे दूध देते. तेव्हडाच खर्च तिच्या पालन पोषणावर होतो. यातून शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सुधारू शकत नाही. म्हणून “शाह” यांनी पंजाब, हरियाना भागातील गायी विकत आणल्या व त्यांच्या दुधाच्या  उत्पादनात वाढ़ करण्यासाठी संशोधन केले. व यात त्यांना यशहि मिळाले . एकेकाळी भारतात गायीच्या दूधाचे उत्पादन प्रती दिवसाला चार लिटर होते. तेच आता संपूर्ण भारताचा विचार करता प्रतिदिन आठ लिटर आहे. तर महाराष्ट्रापूरती दूध उत्पादन सरांसरी प्रती गायी दूध उत्पादन क्षमता बारा लिटर एव्हढी झाली आहे.

दरम्यान दूध उत्पादना पासून तर दुग्धजन्य पदार्थाच्या निर्मिती पर्यंत तसेच त्या दुग्धजन्य पदार्थाना जागतिक बाजार पेठ निर्माण करण्यापर्यंत “देवेंद्र शाह” यांनी डेअरी उद्योगात प्रचंड उत्क्रांती घडवून आणली. भारतीय डेअरी उद्योगामध्ये गरुडपंखाची ताकत यांनी आपल्या कार्य शैलीतून निर्माण केली. व संपूर्ण जग भारतीय डेअरी उद्योगाच्या आवाख्यात आणले म्हणूनच “देवेंद्र शाह” हे “डॉ कुरियन” नंतर दुसरे श्वेत क्रांतिचे जनक ठरले आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुढील कारकिर्दीस लक्ष लक्ष मंगलमय हार्दिक शुभेच्छा…..

Continue Reading
3 Comments

3 Comments

  1. अशोक मोढवे

    September 21, 2024 at 5:27 am

    आंबेगाव तालुक्याचे नाव देशाचे शिखरावर नेणाऱ्या उद्योजकाला कोटी कोटी शुभेच्छा तुम जियो हजारो साल के दिन हो पचास हजार

  2. मा.संतोषभाऊ बोऱ्हाडे

    September 22, 2024 at 4:32 pm

    आंबेगाव तालुक्याचे नाव आणि जगाच्या शिखरावरती नेणारे देवेंद्र शेठ शहा या आंबेगाव तालुक्याचे सुपुत्र आहेत . हे आंबेगाव तालुक्याचे भाग्य आहे असं म्हणायला काहीही हरकत नाही .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सामाजिक

शासनाने “आद्य क्रांतिवीर होनाजी केंगले” यांचे जांभरी येथे राष्ट्रीय स्मारक बांधवे,: जागतिक आदिवासी दिनानिमित्त मागणी

Published

on

भीमाशंकर दि (प्रतिनिधी)आदिवासी समाज्याच्या न्याय हक्कासाठी आपल्या रक्ताचे बलिदान देणाऱ्या वीर  क्रांतिकारक होनाजी केंगले, बिरासा मुंडा तसेच राघोजी भांगरे यांच्या स्मुर्ती जपत जागतिक आदिवासी क्रांती दिन जांभोरी ता. आंबेगाव येथे  मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

 इंग्रजी सत्तेच्या विरोधात बंड पुकारत गरीब दिन दुबळ्या आदिवासी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देत रक्त सांडणाऱ्या  आदिवासी क्रांतिकारकांची जन्मभूमी जांभोरी हे गाव असून आदिवासी समाज्याचा धाण्या वाघ आदिवासी क्रांतिकारक होनाजी केंगले. बिरसा मुंडा राघोजी भांगरे निसर्गवासी माजी सभापती शंकरराव विठ्ठल केंगले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करून त्यांच्या स्मृतीना आवाहन करण्यासाठी येथील दूध डेअरी पासून आद्यक्रांतिकारक होनाजी केंगले यांच्या स्मारकपर्यंत प्रचंड  रैली काढण्यात आली.

दरम्यान या वेळी प्रतिमेचे पूजन करताना जांभोरी गावच्या सरपंच सुनंदाताई पारधी.उपसरपंच बबन केंगले. पोलिस पाटील नवनाथ केंगले. बिरसा ब्रिगेड शाखा जांभोरीचे अध्यक्ष सुनिल गिरंगे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले. लखन पारधी. सागर काठे. शिक्षक पतसंस्थेचे आंबेगाव तालुका सभापती संजय केंगले. विकास पोटे. भिमा केंगले. शांताराम केंगले. दत्ता गिरंगे. किसन शेळके. पेसा अध्यक्ष मारुती केंगले. अंकुश गिरंगे. मिना केंगले. लताबाई केंगले. राजेंद्र उभे. दिगंबर केंगले. गणपत काठे. तंटामुक्ती अध्यक्ष नामदेव भोकटे. निवृत्ती केंगले. निलेश गिरंगे. नितीन गिरंगे. विठ्ठल पारधी कांताराम केंगले लक्ष्मण केंगले बबन केंगले . जांभोरी गावचे सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. 

त्याचप्रमाणे जांभोरी गाव हे आदिवासी क्रांतिकारकांची जन्मभूमी म्हणुन ओळखली जाते. याठीकाणी होनाजी केंगले यांचे स्मारक शासनाने निर्माण करावे अशी मागणी जांभोरी ग्रामस्थानी शासन दरबारी केली असून तत्कालीन मुख्यमंत्री. एकनाथराव शिंदे साहेब. तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब. तत्कालीन सहकारमंत्री गृहमंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब माजी खासदार शिवाजी दादा आढळराव पाटील साहेब खासदार डॉ. अमोल कोल्हे साहेब यांना निवेदन गेल्या वर्षी देण्यात आल्या असून शासन दरबारी पाठपुरावा केला जात आहे याबाबत शासनाने तात्काळ दखल घेऊन जांभोरी येथे राष्ट्रीय स्मारक बांधवे ज्यामुळे भावी पिढीला या आदिवासी क्रांतिकारकाच्या त्यागाची व बलिदानाची  गाथा समजेल व यातून पुढील युवा पिढीत देशभक्ती  वाढीस लागेल  

दरम्यान या कार्यकामाचे आयोजन बिरसा ब्रिगेड शाखा जांभोरी. जांभोरी ग्रामविकास फाऊंडेशन जांभोरी.ग्रामविकास प्रतिष्ठान जांभोरी नांदुरकीचीवाडी. व्यंकोजी दूध उत्पादक सहकारी संस्था जांभोरी. ग्रामपंचायत कार्यालय जांभोरी. यांनी केले. कार्यक्रमानिमित आदिवासी दिवसाबद्दल माहिती विकास पोटे यांनी सांगितली तर सुत्र संचालन अंकूश गिरंगे यांनी केले.

Continue Reading

सामाजिक

“हिरडा खरेदी” आणि “भीमाशंकर” रस्त्याच्या दुरवस्थेवरून, संतप्त आदिवासी जनतेकडून तळेघर येथे रास्ता रोको

Published

on

मंचर दि.(प्रतिनिधी): श्री क्षेत्र भीमाशंकर रस्त्याची दुरावस्था व  त्याचप्रमाणे हिरड्याची बंद असलेली खरेदी यांसह विविध मागण्यासाठी  तळेघर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट), बिरसा ब्रिगेड, अखिल भारतीय किसान सभा आणि ट्रायबल फोरम यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 

आदिवासी बांधवांचे उपजीविकेचे प्रमुख साधन असलेल्या हिरड्याची बंद असलेली खरेदी योग्य किंमतीने तातडीने सुरू करावी त्याचप्रमाणे श्री क्षेत्र भीमाशंकर रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली. सध्या श्रावण मास सुरु असलेल्याने देशाच्या कानकोपऱ्यातून लाखो शिवभक्त शिवज्योर्तिलिंगाचे दर्शनासाठी येत आहेत. परंतू भीमाशंकरकडे जाणाऱ्या  रस्त्याची मोठ्याप्रमानावर दुरावस्था झाली असून, या रस्त्याची दुरुस्ती करावी, या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.आंदोलनात मोठ्याप्रमानावर आदिवासी बांधव सहभागी झाले होते

दरम्यान आदिवासी विकास विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनादरम्यान  कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी घोडेगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम,तालुकाध्यक्ष धोंडीभाऊ भोर, महिला अध्यक्ष पूजा वळसे, युवक अध्यक्ष विशाल वाबळे, किसान सभेचे सचिव अशोक पेकारी, बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष संतोष तिटकारे, ट्रायबल फोरमचे अध्यक्ष सखाराम हिले, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब बाणखेले, सदानंद शेवाळे (पाटील),शेतकरी नेते माउली ढोमे, पुरुषोत्तम फदाले, शिवराम केंगले, दीपक चिमटे,के. के. तिटकारे, गणेश खाणदेशी, कृष्णा वडेकर, लखन पारधी उपस्थित होते.

“हिरडा खरेदीसाठी हमीभाव मिळावा” 

माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी हिरडा खरेदीसाठी हमीभाव मिळावा आणि खरेदी लवकरसुरू व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वारंवार बैठका घेतल्या. तसेच मंचर-भीमाशंकर रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विकास विभागाला आदेश दिल्यापासून तात्पुरते खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले आहे, अशी माहिती माजी पंचायत समिती सभापती आणि आदिवासी नेते संजय गवारी यांनी दिली.

Continue Reading

सामाजिक

अडिवरे येथे “आदिवासी स्त्रीयांसाठी मोफत आरोग्य शिबीर संपन्न”.

Published

on

डिंभे दि (प्रतिनिधी)- आदिवासी स्त्रियांचे  आरोग्य सुधारण्यासाठी आडीवरे ता. आंबेगाव येथे स्त्रियांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यांस महिलाकडून उत्कृष्ठ प्रतिसाद मिळाल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अमोल अंकुश यांनी दिली.

  आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी पश्चिम पाट्यातील डिंभे धरणाच्या आतील बाजूस दुर्गम भागात असलेल्या आडीवरे येथील  प्राथमिक आरोग्य केंद्रावर अडिवरे  स्त्री रोग निदान आणि उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात विशेषतः पावसाळ्यात आदिवासी भागा मध्ये शेतात काम करणाऱ्या महिला वर्गा मध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या त्वचेचे आजार व साथी चे आजार  पायांना कुहे होने,सर्दी,ताप,डोके दुखी, सांधे दुखी, हिमोग्लोबिन कमी होने ई. आजारा च्या तपासण्या सदर करून महिलांना मोफत औषधोपचार करण्यात आले. यात सुमारे ९३ महिलांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या.

दरम्यान या शिबिराचे उद्घाटन आदिवासी सेवक मा.शंकरराव मुदगुन यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते मा.अमोल अंकुश मार्गदर्शनाखाली करण्यात आले या शिबिरास मा.चंद्रकांत बांबळे सेवा निवृत्त कर्मचारी संघटना अध्यक्ष, मा.सखाराम गभाले (बाजार समिती संचालक) मा.संगिता किर्वे ( सरपंच), मा.रामदास भोकटे, जावजी कोकणे ई मान्यवर उपस्थित होते.

 शिबिरामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र अडिवरे येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दशरथ चौरे आणि डॉक्टर प्रथमेश भोर यांनी महिलांच्या विविध आजाराविषयी माहिती देऊन त्यांच्या आरोग्य समस्या विषयी मार्गदर्शन केले या शिबिरासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र अडिवरे येथील आरोग्य निरीक्षक श्री गोविंद भारमळ.आरोग्य निरीक्षक ( हिवताप विभाग ) श्री अजय बोराडे. आरोग्य सहायिका श्रीमती विजया शिंदे. आरोग्य सेवक श्री दत्ता कंठाळे रामचंद्र असवले आरोग्य सेविका श्रीमती पोटे मॅडम, उघडे मॅडम, गिरे मॅडम सर्व आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक श्रीमती वंदना तळपे, स्वाती कोकणे यांचे सहकार्य मिळाले. शिबिरासाठी महा लॅब मंचर यांच्यावतीने प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून अविनाश पारधी यांनी काम पाहिले 

Continue Reading
Advertisement

Trending

Best Replica Watches UK

Copyright © 2024 BobhataNews.in