singa8

rp8888

singa8

slot demo

slot qris

singa8

rp8888

https://bertrodriguez-museum.org

https://journal.uecommercebintaro.ac.id/

singa8

singa8

singa8

singa8

singa8

singa8

singa8

singa8

92GLORY

http://vecas.org.vn/id/

https://admire.ch/vendor/

Connect with us

सामाजिक

भारतीय डेअरी उद्योगाला प्रगतीची  “गरुड भरारी” देणारा श्वेतक्रांतीचा आणखी एक जनक “देवेंद्र शाह”

Published

on

मंचर दि. (संजय कोकणे यांजकडून) भारतीय श्वेतक्रांतीचे जनक म्हणून “डॉ.वर्गिस कुरियन” यांचे नाव आदराने घेतले जाते. त्याचप्रमाणे “भारतीय  डेअरी उद्योगाला” यशाच्या शिखरांवर नेण्यासाठी अविरत अहोरात्र,अथक, प्रामाणिक, प्रयत्न करणारे “धवल क्रांतिचे” दुसरे जनक म्हणून पराग (गोवर्धन) उद्योग समूहाचे संस्थापक, प्रसिद्ध उद्योगपती “देवेंद्र शाह” यांचे नाव समोर येते.

दरम्यान “देवेंद्र शाह” यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर डेअरी उद्योग क्षेत्रात  “गरुड भरारी” घेत जगाच्या बाजारपेठेत भारतीय डेअरी उद्योगाला नवी दिशा देत एक सन्मान जनक स्थान मिळवून दिले, व त्यातून भारतीय शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक  उत्कर्षांचे दिवस आणले.जीवनात एखाद्या ध्येयाने प्रेरित  होऊन अहोरात्र काम करीत, प्रयत्नाची पराकष्ठा करणारे थोडेच असतात. जीवनाचे ध्येय मिळविण्यासाठी  माणसाकडे  जबरदस्त  इच्छा शक्ती असावी लागते.  कारण माणूस स्वतः स्वतःच नशीब घडवितो असे  म्हणतात.  आपण  समाज्याचे देणे  लागतो या भूमिकेतून व एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित झालेल्या शाह यांनी  अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत येणाऱ्या आव्हानांना न जु्मानता अहोरात्र संघर्ष करून भारतीय डेअरी उद्योगात आपलें  अनन्य साधारण स्थान निर्माण केले.म्हणूनच आज  डेअरी उद्योग क्षेत्राच्या क्षितिजावर देवेंद्र शाह यांचे नाव सुवर्णाक्षरात नाव कोरले आहे.

 साधारणतः १९९२ या कालखंडात “देवेंद्र शाह” यांनी पराग डेअरी या उद्योगाची स्थापना करून, प्रचंड अडचणीत असलेला दूध व्यवसाय स्वीकारला व  या व्यवसायाच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना एक सक्षम आयुष्य जगण्याचा मार्ग शाह यांनी दाखविला. कारण याच कालावधीमध्ये  महाराष्ट्रात मध्ये दुधाला खाडा पद्धती सुरु होती. त्या खडा पद्धतीमध्ये दूध संघाने न स्वीकारलेले दूध शेतकऱ्यांना रस्त्यावर फेकून द्यावे लागतं होते अशा काळात संघाने न स्वीकारलेले दूध विकत घेऊन जबरदस्त इच्छाशक्ती, आवश्यक लवचिकता तसेच एखादे ध्येय  साध्य  करण्यासाठी लागणारा  धीर, सहनशिलता, अशा अनेक गुणांच्या जोरावर या उद्योगपतिने डेअरी व्यवसायात यशाचे शिखर गाठले त्यामुळे पराग समूह आशिया खंडातील नावाजलेला उद्योग झाला आज या उद्योगाची   वार्षिक उलाधाल सुमारे दहा हजार कोटिंच्या दिशेने झेप घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. 

आज भारतात नव्हे तर जगाच्या बाजार पेठेमध्ये अनेक देशामध्ये गोवर्धन, प्राईड ऑफ काऊ, गो चीझ, अवतार, अशा विविध नावाने तूप,बटर,दूध,दही,लस्सी,ताक, पनीर,प्रोटीन पावडर,चीझ, पेढे, काजू कतली  आदी  दुग्धजण्य उत्पादने उपलब्ध असून बाजारात या उत्पादनांना  ग्राहकांमध्ये प्रचंड मागणी आहे.त्याच प्रमाणे ग्राहकांना स्वच्छ निर्भेळ ताजे दूध मिळावे व शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवे  यासाठी “भाग्यलक्ष्मी डेअरी फार्म” या नावाने सुमारे साडे तीन हजार गाईंचा गोठा निर्माण केला आहे. व त्याद्वारे “प्राईड ऑफ काऊ” नावाने दुध व दुग्ध जन्य पदार्थाचा पुरवठा सुरु असून, अल्पवाधितच हे पदार्थ जगाच्या बाजारपेठेत लोकप्रिय झाले आहेत.

डेअरी क्षेत्रात आपण प्रगती करत असताना, ग्रामीण भागातील ज्या मायबाप शेतकऱ्यांनी “गोवर्धन कंपनीच्या” उत्कर्षांसाठी अविरत साथ दिली. या सर्व शेतकऱ्यांचे आपण काहीतरी देणे लागतो. या सामाजिक जाणीवेतून व निरपेक्ष भावानेतून, या शेतकऱ्यांचे  आर्थिक उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने  गायीच्या दुधाच्या उत्पादनात वाढ़ होणे आवश्यक होते. म्हणून “भाग्यलक्ष्मी डेअरी फार्म” येथे गाय दूध वाढीसाठी संशोधन करून, दूध उत्पादन वाढविले कारण गाय जेवढे दूध देते. तेव्हडाच खर्च तिच्या पालन पोषणावर होतो. यातून शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सुधारू शकत नाही. म्हणून “शाह” यांनी पंजाब, हरियाना भागातील गायी विकत आणल्या व त्यांच्या दुधाच्या  उत्पादनात वाढ़ करण्यासाठी संशोधन केले. व यात त्यांना यशहि मिळाले . एकेकाळी भारतात गायीच्या दूधाचे उत्पादन प्रती दिवसाला चार लिटर होते. तेच आता संपूर्ण भारताचा विचार करता प्रतिदिन आठ लिटर आहे. तर महाराष्ट्रापूरती दूध उत्पादन सरांसरी प्रती गायी दूध उत्पादन क्षमता बारा लिटर एव्हढी झाली आहे.

दरम्यान दूध उत्पादना पासून तर दुग्धजन्य पदार्थाच्या निर्मिती पर्यंत तसेच त्या दुग्धजन्य पदार्थाना जागतिक बाजार पेठ निर्माण करण्यापर्यंत “देवेंद्र शाह” यांनी डेअरी उद्योगात प्रचंड उत्क्रांती घडवून आणली. भारतीय डेअरी उद्योगामध्ये गरुडपंखाची ताकत यांनी आपल्या कार्य शैलीतून निर्माण केली. व संपूर्ण जग भारतीय डेअरी उद्योगाच्या आवाख्यात आणले म्हणूनच “देवेंद्र शाह” हे “डॉ कुरियन” नंतर दुसरे श्वेत क्रांतिचे जनक ठरले आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुढील कारकिर्दीस लक्ष लक्ष मंगलमय हार्दिक शुभेच्छा…..

Continue Reading
3 Comments

3 Comments

  1. अशोक मोढवे

    September 21, 2024 at 5:27 am

    आंबेगाव तालुक्याचे नाव देशाचे शिखरावर नेणाऱ्या उद्योजकाला कोटी कोटी शुभेच्छा तुम जियो हजारो साल के दिन हो पचास हजार

  2. मा.संतोषभाऊ बोऱ्हाडे

    September 22, 2024 at 4:32 pm

    आंबेगाव तालुक्याचे नाव आणि जगाच्या शिखरावरती नेणारे देवेंद्र शेठ शहा या आंबेगाव तालुक्याचे सुपुत्र आहेत . हे आंबेगाव तालुक्याचे भाग्य आहे असं म्हणायला काहीही हरकत नाही .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सामाजिक

आदिवासी भागातील शेतकऱ्याच्या शेतीचे पंचांनामे करून त्वरित नुकसान भरपाई द्यावी -मारुती केंगले

Published

on

डिंभे दि. (प्रतिनिधी) आंबेगाव तालुक्याचे पश्चिम आदिवासी भागातील बळीराजाचे एकमेव उत्पन भात व हिरडा पिकांचे नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने प्रचंड नुकसान झाले असून याचे पंचांनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे वतीने मारुती  केंगले यांनी केली आहे.

नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱऱ्यांच्या कुटुंबाच्या तोडचा घासच पाळवीला आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड अतोनात नुकसान होऊन शेतकरी देशोधडीला लागल्याचे दिसत आहे. अशा कठीण प्रसंगी शासकीय मदतीची शेतकऱ्यांना गरज आहे पण शासनाकडून अद्यापही कोणत्याही मदतीबाबत दिलासादायक घोषणा अद्यापहि झालेली नाही त्यामुळे ऐन दीपावळीच्या काळात अनेकांची घरे दिव्यांनी उजाळालेली असतील परंतू महाराष्ट्रातील बळीराजच्या घरात अंधार असेल अशीच काही परिस्थिती दिसत आहे.

 तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात एकमेव पिक भात शेती आणि हिरडा हिरड्याला बाजार भाव आता सध्या  १०० रुपये इतका भाव आहे परंतू आदिवासी भागात पावसामुळे हिरडा पीक मोठ्याप्रमानावर सडून खराब झाले आहे. मे ते ऑक्टोबर सलग ५ महिच्या कालावधित झालेल्या मुसळधार पावसामुळे भातपिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊन भात पीक वाया गेले आहे तर अनेक ठिकाणी भातशेती पावसामुळे सडून गेली आहे.त्यामुळे पिकांची पंचनामे करून आदिवासी शेतकऱ्याला मदतीचा हात मिळावा यासाठी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले तालुक्याचे तहसिलदार कार्यालयास दिले असून निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी साहेब. प्रांत अधिकारी गोविंद शिंदे साहेब आंबेगाव तालुक्याचे आमदार व  माजी गृहमंत्री  दिलीपराव वळसे पाटील यांना देण्यात आले असून याबाबत त्वरित कार्यवाही ना झाल्यास नाजिकच्या काळात शेकऱ्यांच्या हितासाठी  भिमाशंकर रस्त्यावर तीव्र आंदोलनाचा इशारा केंगले यांनी दिला आहे.

Continue Reading

सामाजिक

जांभोरी येथे कुस्ती तालीम इमारत भूमिपूजन सोहळा संपन्न

Published

on

घोडेगाव दि (प्रतिनिधी ) जांभोरी (ता आंबेगाव)पासून जवळच असलेल्या माचीचीवाडी या ठिकाणी कुस्तीसाठी तालीम इमारतिचा भूमिपूजन समारंभ उत्साहात पार पाडला

आजच्या धाकधकीच्या काळात तरुणांई मोबाईल व गेम यात अडकून ना रहाता शारीरिक तंदृस्तीकडे आकर्षित व्हावी या हेतूने सुरु होत असलेल्या कुस्ती तालीम इमारतीसाठी  येथील वसंत वालकोळी,बबन केंगले, भिवा वालकोळी, अनंता वालकोळी, यांनी ११गुंठे जमीन दिली आहे त्याचप्रमाणे  महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री सहकारमंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील यांनी दहा लाख रुपयांचा निधी तालमीच्या प्रत्यक्ष बांध कामासाठी मंजूर केला आहे यासाठी आदिवासी भागाचे नेते सुभाषराव मोरमारे साहेब  संजय गवारी, प्रकाश घोलप, यांनी परीश्रम घेतले आहेत

 दरम्यान जांभोरी गावचे लोकनियुक्त सरपंच सुनंदाताई पारधी, पोलिस पाटील  नवनाथ केंगले, पोलिस पाटील सोनाली पोटे, ज्ञानेश्वर पारधी. पुनाजी पारधी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले,  श्री व्यंकोजी कुस्तीगीर तालीम संघटना जांभोरीचे अध्यक्ष भिवा वालकोळी, शिवाजी केंगले , सखाराम केंगले,  खरेदी विक्री संघाचे संचालक शामराव बांबळे, ग्रामपंचायत सदस्य दुंदा भोकटे, ग्रामपंचायत सदस्य शिवराम केंगले,किसन पोटे, अनंता वालकोळी, सुनिल वालकोळी, नामदेव भोकटे, घोडेगाव  पोलिस शिवाजी जनार्दन  केंगले, सुरेश केंगले,संजय केंगले, ग्रामसेवक सुनिल पारधी, कृषी सेवक सुनिल लोहकरे, भिवा केंगले, चंद्रकांत केंगले, पांडुरंग केंगले,राज केंगले,गफुरशेठ तांबोळी,सर्व जांभोरी ग्रामस्थ उपस्थित होते. 

Continue Reading

सामाजिक

हजारो कोस दूर असूनही संकटप्रसंगी आपल्या मायभूमीतील माणसांच्या  मदतीला धावणारी आंबेगावची कन्या….सौ.माधुरी श्रीकांत पवार

Published

on

मंचर दि. (प्रतिनिधी) -“नवदुर्गेचा सन्मान तू…परोपकारची खाण तू…. सर्वांचा अभिमान तू…….श्री शक्तीचा मान तू…… जन्मभूमीची ठेवी जाण तू”….. संपूर्ण महाराष्ट्रावर महा पुराचे संकट आले असताना हजारो कोस दूर अमेरिकेत असूनही आपल्या माय भूमितील आपल्या माणसांच्या मदतीसाठी धावणारी आंबेगाव ची कन्या “माधुरी ताई ” हि खरोखरच सर्वांचे प्रेरणादायी स्थान ठरली आहे.

गेल्या काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात  पावसाने थैमान माजविले असून यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून संपूर्ण महाराष्ट्रातील शेकडो कुटुंबे महापुराच्या तडाख्याने रस्त्यावर आली आहेत. महाराष्ट्रात निर्माण झालेल्या महापुराणे अनेक जण बेघर झाले आहेत अशा हतबल परिस्थितीत परोपकारच्या शिकवणीतून निर्माण झालेल्या माधुरी श्रीकांत पवार यांनी आपल्या मायभूमीचे पांग फेडण्याचा प्रयत्न केला आहे. तिच्या या निर्णयाने तिच्या जन्मदात्या मातापित्याचे उर अगदी अभिमानाने भरून आले असेल यात शंका नाही

आपल्या माय भूमितील आपल्या माणसाबद्द्ल मधुर्याचा ओलावा असलेल्या माधुरी ताईने  तीला शक्य होईल तेव्हढी मदत करीत आपले कर्तव्य बाजावण्याचा प्रयत्न केला आहे. ती आपल्या संभाषणात सांगते कि,

“मी “माधुरी श्रीकांत पवार”महाराष्ट्रातील अतिवृष्टी मुळे झालेल्या पूरग्रस्त घटना व नुकसान टीव्हीवर पाहत होते खूप वाईट वाटत होते, तसेच व्हाट्सअप वर  वळसे पाटील साहेबांनी केलेल्या आवहानामुळे माझ्या जन्मभूमीत असलेल्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीने माझ्या शेतकऱ्यांची फार मोठ्या प्रमाणात हानी झाली. सर्वात मोठे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यांना मी माझे आदर्श व सतत समाजाचा विचार करणारे माननीय दिलीपराव वळसे पाटील साहेब माजी गृहमंत्री यांच्या प्रेरणेने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना छोटीशी मदत माझ्या कृतीप्रमाणे पाठवीत आहे.”

 खरेतर “माधुरी ताई”  यांनी केलेली मदत हि पुरांनातील त्या टिटवीची आठवण करून देते कि जिने आपल्या मुलांना वाचविण्यासाठी समुद्र अटविण्याचा निर्धार केला शेवटी परमेश्वराला हि येऊन तिची मदत करावी लागली. आज या ताईंनी केलीली मदत हि अनेकांना आपल्या मायभूमी बद्द्लचे कर्तव्य बजावण्याची शिकवण देते यात शंका नाही. हा देश माझा आहे या देशाला देव भूमी म्हटले गेले आहे या ठिकाणी जन्म मिळणे हि  खरेतर सन्मानांची गोष्ट आहे. माधुरी यांनी केलेले हे कार्य सर्वांसाठी एक शिकवण आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यामुळे माधुरी पवार यांच्या प्रमाणे आपापल्या परीने मदत करा.चला सारे एक होऊया आपल्या देश बांधवांना पुन्हा उभे करण्यासाठी मदतीचा हात देऊया…..

Continue Reading
Advertisement

Trending

Best Replica Watches UK