सामाजिक
UPI Payment Rules 2024 | UPI Payment साठी लागू झालेले १० नवीन नियम

UPI Payment Rules 2024- आपल्या देशात जवळपास 40 कोटींच्या घरात यूपीआय युजर आहेत भाजी मार्केट पासून हॉटेलपर्यंत सगळीकडेच आपण मोबाईल वरून पेमेंट करतो त्यामुळे खिशात कॅश नसायची आपल्याला 2023 मध्ये यूपीआय वापरून सोळा लाख कोटींपेक्षा जास्त व्यवहार झाले पण यासोबत आजकाल करण्याचे प्रमाण सुद्धा वाढलं सायबर क्राईमच्या आकड्यानुसार या 16 लाख कोटींच्या व्यवहारांपैकी 30000 कोटी रुपयांची चोरी केली गेली आता एवढे व्यवहार वाढणार तर चोरीचा प्रमाण सुद्धा वाढणार म्हणूनच ते कंट्रोल करण्यासाठी आणि सिक्युरिटी वाढावी म्हणून यूपीआय वर काही नवीन रूल्स अप्लाय केले जाणार आहेत जे एक जानेवारी 2024 पासून लागू होतील आरबीआयने एमपीसीआयच्या मार्फतरण होणाऱ्या सर्व प्रकारच्या यूपीआय पेमेंट सिस्टीम मध्ये एक जानेवारी 2024 पासून लिमिट कमी करण्यापासून ते ॲप बंद करण्यापर्यंत कोणते बदल केले ते आपण पाहूयात.
UPI Payment Rules 2024 खालीलप्रमाणे:
Rule no-1 | UPI Lock- पहिला नियम असा की 2023 मध्ये तुम्ही न वापरलेले सर्व युपी ॲप्स लॉक होतील:
UPI Payment Rules 2024 नुसार हा नियम असा की जर गुगल पे, फोन पे, पेटीएम, ॲमेझॉन पे, भीम (Google Pay, Phonepe, Paytm, Amazon Pay, Bhim) यापैकी कोणताही अँप तुमच्या फोनमध्ये असेल आणि संपूर्ण वर्षात तुम्ही एकदाही याचा वापर केला नसेल तर तो सिक्युरिटी रीजन साठी RBI-आरबीआय द्वारा रद्द केला जाईल म्हणजेच जर तुम्ही एक जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 च्या आतमध्ये एकही व्यवहार केला नसेल तर तो आप रद्द केला जाईल.
Rule no-2 | UPI Payment Rules 2024-Daily Limit on UPI Payment- डेली पेमेंट लिमिट यूपीआय पेमेंट वर आता लिमिटेशन लावण्यात येणार :
UPI Payment Rules 2024 नुसार UPI वरील डेली पेमेंट लिमिट आता कमी केले जाणार आहे हे लिमिट आता फक्त एक लाखांपर्यंत असेल एक लाखांवरचा कोणताही व्यवहार तुम्ही आता यूपीआय वापरून करू शकणार नाही.
Rule no-3 | Special Payment Limit- स्पेशल पेमेंट लिमिट हे पाच लाखांपर्यंत केलं जाणार:
UPI Payment Rules 2024 नुसार तिसरा आहे स्पेशल पेमेंट लिमिट स्पेशल पेमेंट लिमिट हे पाच लाखांपर्यंत केलं जाणारे स्पेशल पेमेंट म्हणजे शाळा कॉलेज हॉस्पिटल मधली फी तिथले बिल हे सर्व व्यवहार इथला पेमेंट तुम्ही एक दिवसात पाच लाखांपर्यंत करू शकता.
Rule no-4 | Transaction Settlement Time- ट्रांजेक्शन सेटलमेंट टाईम :
चौथा आहे ट्रांजेक्शन सेटलमेंट टाईम ट्रांजेक्शन सेटलमेंट टाईम खूप महत्त्वाचा बदल असणार आहे. वाढता सायबर गुन्हा लक्षात घेऊन तो रोखण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा बदल समजला जातो. जानेवारी 2024 पासून 2000 पेक्षा जास्त रकमेचे व्यवहार पूर्ण होण्यासाठी चार तास लागणार आहेत, आत्तापर्यंत या सिस्टीम मध्ये UPI ने केलेले पेमेंट लगेच समोरच्या व्यक्तीच्या अकाउंट मध्ये जमा व्हायचं, पण आता 2024 पासून कोणत्याही नवीन व्यक्तीशी केलेला यूपीआय व्यवहार पूर्ण व्हायला ४ तास लागणार आहे. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखे आहे की जर तुम्ही कोणाशीही नेहमी व्यवहार करत असाल तर हा नियम तुमच्यासाठी लागू होणार नाहीये. हा नियम फक्त आणि फक्त नवीन लोकांसोबत होणाऱ्या दोन हजार रुपयांच्या वरच्या व्यवहारासाठी लागू होणार आहे. आता नवीन व्यक्ती म्हणजे कोणीही असू शकतं जसं की कोणता दुकानदार, किराणावाला, हॉटेल, रेस्टॉरंट असे लोक असतील. पण इथे हा प्रश्न येतो की जर या व्यवहाराला एवढा वेळ लागणार असेल तर हे सर्वजण त्यांच्या ग्राहकांसाठी युपीआय पेमेंटचा ऑप्शन ओपन ठेवतील की नाही.
Rule no-5 | UPI Transaction Cancel Option- यूपीआय ट्रांजेक्शन कॅन्सल ऑप्शन हा सुद्धा खूप महत्त्वाचा बदल आहे:
UPI ट्रांजेक्शन कॅन्सल ऑप्शन हा वरती सांगितलेल्या पॉईंट सोबत कनेक्टेड आहे या तुम्ही जर कोणत्याही नवीन व्यक्तीसोबत यूपीआय व्यवहार केला असेल तर तो तुम्ही ४ तासाच्या आत कॅन्सल करू शकता आणि ते पैसे पुन्हा आपल्या अकाउंटला रीवर्ट करू शकता किंवा जमा करू शकता याचा मोठा फायदा असा की जर तुमचे पैसे कोणी फसवून त्यांच्या अकाउंट मध्ये घेतले असतील किंवा तुमच्याकडून चुकून पैसे पाठवले गेले असतील तर ते ट्रांजेक्शन तुम्ही ४ तासाच्या आत कॅन्सल करून परत स्वतःच्या अकाउंट मध्ये जमा करू शकता.
UPI Payment Rules 2024 नुसार तिसरा आहे स्पेशल पेमेंट लिमिट स्पेशल पेमेंट लिमिट हे पाच लाखांपर्यंत केलं जाणारे स्पेशल पेमेंट म्हणजे शाळा कॉलेज हॉस्पिटल मधली फी तिथले बिल हे सर्व व्यवहार इथला पेमेंट तुम्ही एक दिवसात पाच लाखांपर्यंत करू शकता.
Rule no-3 | Special Payment Limit- स्पेशल पेमेंट लिमिट हे पाच लाखांपर्यंत केलं जाणार:
UPI Payment Rules 2024 नुसार तिसरा आहे स्पेशल पेमेंट लिमिट स्पेशल पेमेंट लिमिट हे पाच लाखांपर्यंत केलं जाणारे स्पेशल पेमेंट म्हणजे शाळा कॉलेज हॉस्पिटल मधली फी तिथले बिल हे सर्व व्यवहार इथला पेमेंट तुम्ही एक दिवसात पाच लाखांपर्यंत करू शकता.
याचा तोटा असाही होऊ शकतो की जसं की एखाद्या कॅफे किंवा रेस्टॉरंट ला जेवायला गेलात तर तिथे एखादे एखाद्या वेळेस तुमचा UPI पेमेंट ऑप्शन स्वीकारणार नाही आणि तुम्हाला आधी सारखं क्रेडिट किंवा डेबिट कार्ड पेमेंट करावे लागेल किंवा एखादा दुकानदार तुम्ही पेमेंट केल्यानंतर चार तासांनी वस्तूची डिलिव्हरी देऊ शकतो. तुम्ही ट्रांजेक्शन कॅन्सल केलं तर काय होणार ही भीती असेल म्हणून ते अशी रिस्क घेणे टाळू शकतात.
Rule no-6 | Bank Account Name will be displayed on UPI- बँक अकाउंट नेम यूपीआय मध्ये डिस्प्ले होणार:
बँक अकाउंट नेम यूपीआय मध्ये डिस्प्ले होणार आता तुम्ही कुठे यूपीआय पेमेंट करायला गेलात तर त्या विक्रेत्याचा खरं नाव तुम्हाला पेमेंट करताना दिसणार म्हणजे बँक डिटेल्स मध्ये असलेलं खरं नाव तुम्हाला दिसणार त्यामुळे यापुढे ट्रान्सपरन्सी वाढणारे.
Rule no-7 | UPI Credit Line Payment- यूपीआय क्रेडिट लाईन पेमेंट:
सातवा आहे यूपीआय क्रेडिट लाईन पेमेंट(UPI Credit Line Payment) करायला बँक मध्ये पैसे असणे इम्पॉर्टंट होतं आतापर्यंत तुम्ही तुमच्या अकाउंटला पैसे असतील तरच पेमेंट करू शकत होतात. पण आता UPI Payment Rules 2024 नुसार 2024 पासून तुम्ही बँकेला रिक्वेस्ट करून क्रेडिट घेऊ शकता. याचा फायदा असा की जर तुमच्या अकाउंटला कमी पैसे शिल्लक असतील तर तुम्ही क्रेडिट घेऊन जास्त पेमेंट करू शकता. ही सर्विस बँक तुम्हाला तुमचा सिव्हिल स्कोर (CIBIL Score) आणि ट्रॅक रेकॉर्ड चेक करून ही फॅसिलिटी प्रोव्हाइड करू शकतो. थोडक्यात सांगायचं तर यूपीआयचं आता क्रेडिट कार्ड सारखा वापर करता येऊ शकतो.
Rule no-8 | UPI ATM- यूपीआय एटीएम:
आठवा नियम असा आहे की RBI आता यूपीआय एटीएम (UPI ATM) आणत आहे. यासाठी RBI ने जपान मधल्या हिताची कंपनीसोबत कोल्याबोरेट (Collaborated with Hitachi Company) केल्या आहे त्यामुळे लवकरच यूपीआय एटीएम (UPI ATM) भारतात सगळीकडे प्रोव्हाइड केले जाईल. ज्यामुळे जसं तुम्ही क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड वापरून एटीएम मधून केस काढता आता त्याचप्रमाणे तुम्हाला यूपीआय क्यूआर कोड स्कॅन (UPI QR Code Scan) करून एटीएम मधून पैसे काढता येणार आहे.
Rule no-9 | UPI Transaction Charges- यूपीआय ट्रांजेक्शन चार्ज:
नववा आहे यूपीआय ट्रांजेक्शन चार्ज (UPI Transaction Charges) जर कोणी यूपीआय क्रेडिट लिमिट (UPI Credit Limit) वापरून किंवा क्रेडिट कार्ड वापरून यूपीआय वॉलेटमध्ये पैसे जमा केले म्हणजे आता ही सर्विस फक्त पेटीएमला अवेलेबल आहे पण जर का युपीआय वॉलेटमध्ये तुम्ही पैसे जमा केले असतील तर त्यातून यूपीआय पेमेंट केलं असेल तर त्या विक्रेत्याला 1.1% सर्विस चार्ज द्यावा लागेल हा सुद्धा महत्त्वाचा बदल होणार. सर्विसेसला इम्प्लिमेंटेशन मध्ये येणाऱ्या सर्व प्रॉब्लेमचा अभ्यास करून हे नवीन रूल्स एन. एफ. टी. आर. टी. जी. एस. (NEFT RTGS) या ऑनलाइन पेमेंट साठी सुद्धा लागू होण्याची शक्यता आहे आणि लवकरच आरबीआय च्या वतीने UPI Payment Rules 2024 त्याबद्दल ऑफिशियल अनाउन्समेंट सुद्धा केल्या जाऊ शकतात.
Rule no-10 | UPI Tap & Pay Option- यूपीआय साठी आता टॅप अँड पे ऑप्शन येऊ शकतो:
UPI Payment Rules 2024 नुसार UPI साठी आता टॅप अँड पे ऑप्शन येऊ शकतो. 2024 साठी यूपीआयचे नियम बदललेत त्यामुळे जसा तुम्ही डेबिट किंवा क्रेडिट कार्ड ऑप्शन वापरता तसा आता यूपीआय द्वारा पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना लवकरच टॅप अँड पे सुविधा मिळू शकते. यात तुम्हाला तुमचा मोबाईल पेमेंट मशीनवर टच करावा लागेल आणि मग पेमेंट होणार नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (National Payment Corporation of India) ने ही सर्विस देणारी प्रोसेस सुरू केली असे सांगितले जात आहे. जानेवारी 2024 पासून UPI Payment मध्ये होणारेत आणि जे आपण रोजच्या व्यवहारांसाठी इझीली वापरतो आता याचा ग्राहक म्हणून आपल्याला किती फायदा आणि किती तोटा होणार आहे ते आपल्याला हे वापरून समजेल पण तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि या होणाऱ्या चेंजेस बद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स करून सांगा
सामाजिक
“महिला बांधकाम कामगारांसाठी” शासनाकडून मिळणाऱ्या मदतीवर डल्ला मारणारे काथाकथित एजंट व पुढारी म्हणजे “शिव” जन्मभूमीतील सध्याचे रांझ्याचे पाटील का?

मंचर दि. (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या काळात एका महिलेवर अत्याचार करणाऱ्या पाटलाचे छत्रपतींनी हात पाय छाटले होते. परंतू त्याच छत्रपतींचे नाव घेऊन छत्रपती शिवरायांची जन्म भूमी असलेल्या जुन्नर तालुक्यात बांधकाम कामगार महिलांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या मदतीतून काही एजंटांनी व कथित गावपुढाऱ्यांनी हात ओले करण्याचा सपाटा लावला असताना या होणाऱ्या गैरव्यवहारावर प्रकाश झोत टाकणाऱ्या पत्रकारावर जीवघेणा हल्ला केला जातो व त्याच एजंटांची बाजू घेण्यासाठी काही कथित गाव पुढारी पत्रकारावर बेछुट खोटे आरोप करण्याचा प्रयत्न करतात हि खरी शरमेची गोस्ट बाब आहे

दरम्यान सर्वसामान्य बांधकाम कामगारांचा आर्थिक स्थर उंचावण्यासाठी शासनाने बांधकाम कामगार योजना आणली या योजनेचा खरा अर्थ असा कि, रोजंदारीवर काम करणारे बांधकाम कामगार मजूर वर्गातील कुटुंबाना आर्थिक सहाय्य मिळावे व यातून त्यांची मुले शिकुन सक्षम व्हावीत या दृष्टीकोनातून शासनाने बांधकाम कामगानांच्या उत्कर्षासाठी आणलेल्या या योजनेचा काही एजंटांनी कथाकथित राजकीय पुढऱ्यांच्या आशीर्वादाने गोरस धंदा बनविल्याचा प्रकार समोर येत आहे.

सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यामध्ये सुरु असलेली बांधकाम कामगार योजनेमध्ये कामगारांना मिळणाऱ्या मदतीतून चांगली मोठी रक्कम कथाकथित एजंट लोकांना दयावी लागते व यात अनेक कथाकथित स्थानिक पुढाऱ्यांचा सहभाग असल्याचे बोलले जाते.व हे कथाकथित गाव पुढारी समाजसेवेचा खोटा आवडत आणत गरिबांच्या टाळूवरील लोणी खात असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

दरम्यान नुकत्याच एका इलेक्ट्रानिक वाहिनेने सुरु असलेल्या बांधकाम कामगार योजनेतील या गैरव्यवहाराचा भांडाफोड केला. या नंतर त्या पत्रकारावर काही एजंट लोक यांनी हल्ला केला व काही कथित गाव पुढऱ्यांच्या मदतीने बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. व हि घटना छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्म स्थान असलेल्या जुन्नर तालुक्यात घडली.यामध्ये या राजकीय नेत्यांनी महिलांना त्रास दिल्याचा आरोप केला खरे तर हे गाव पुढारी ज्या नेत्याचे कार्यकर्ते आहेत त्याच नेत्याची एक क्लिप काही महिन्यापूर्वी प्रसारीत झाली होती.यामुळे जसा नेता तसा कार्यकर्ता अशी चर्चा नागरिक दाबक्या आवाजात करीत आहेत.
दरम्यान या कथाकथित पुढऱ्याच्या या लाजिरवान्या कृत्याचा सर्वच स्थरावरून निषेध केला जात असून . या प्रकरणाची उच्च स्तरीय कसून चौकशी करावी. सुरु असलेल्या या योजनेत खरंच किती बांधकाम कामगार आहेत का? या सर्व बाबींची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे
सामाजिक
ऊस उत्पादनाच्या वाढीसाठी “भीमाशंकर सह. साखर कारखान्याचे” ऊस लागवड धोरण जाहीर -अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांची माहिती

मंचर दि. (प्रतिनिधी) भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे लागवड हंगाम २०२५-२६ साठी ऊस लागवडीचे धोरण जाहिर झाले असून त्याची अंमलबजावणी दि. १ जून २०२५ पासून करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.

“उत्पादकता वाढ़ लक्ष योजना”
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीचे दृष्ठिने कारखान्यामार्फत “दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील ऊस उत्पादकता वाढ लक्ष २०२०” ही महत्वाकांक्षी ऊस विकास योजना राबविणेत येत आहे अशी माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष अँड.प्रदीप वळसे यांनी सांगितले
भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माध्यमातून सुरु करण्यात येत असलेल्या या ऊस लागवड जाहीर धोरणबाबात अधिक माहिती देताना बेंडे यांनी सांगितले की, दि. १ जून २०२५ ते ३० ऑक्टोबर २०२५ पर्यंतच्या कालावधीमध्ये को.एम.०२६५ तर दि. १ जून २०२५ ते ३० एप्रिल २०२६ पर्यंतच्या कालावधीमध्ये को.८६०३२ ऊस लागवडीस व नोंदीस परवानगी देण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे दि. १ ऑगस्ट २०२५ ते ३० एप्रिल २०२६ अखेर पर्यंतच्या कालावधीमध्ये व्हीएसआय ०८००५ या ऊस लागवडीस परवानगी देण्यात आली आहे. दि. १ सप्टेंबर २०२५ ते ३० एप्रिल २०२६ अखेर पर्यंतच्या कालावधीमध्ये एम.एस. १०००१, को. ९०५७, या ऊस लागवडीस परवानगी देण्यात आली आहे. को.व्हीएसआय १८१२१, फुले ऊस १५०१२, फुले ऊस १५००६, फुले ऊस १३००७, को.एम. ११०८२ इ. शिफारशीत ऊस लागवडीस दि. १ जून २०२५ ते दि. ३० एप्रिल २०२६ पर्यंत परवानगी देण्यात आली आहे.
कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद व ऊस उत्पादक यांना मागणीप्रमाणे उपलब्धतेनुसार लागवड धोरणाप्रमाणे दि. १ जून २०२५ पासून बेणे वाटप करण्यात येणार आहे व खासगी ऊस लागवडीच्या नोंदी घेण्यात येणार आहेत. त्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस लागवड करावयाच्या क्षेत्राचा ७/१२ उतारा व आवश्यक कागदपत्रे पूर्तता संबधित विभागीय शेतकी कार्यालयात जाऊन करावी. खासगी ऊस लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी चार दिवसाचे आत संबंधित गट ऑफिसमध्ये जाऊन ऊस नोंद करावयाची आहे.
दरम्यान उशीरा ऊस लागवड नोंद करणेस आलेल्या ऊस उत्पादकांची ऊस नोंदीसाठी आलेची तारीख हीच ऊस लागवड तारीख म्हणून नोंद करण्यात येईल. कारखान्यामार्फत कार्यक्षेत्र व परिसरामध्ये धोरणानुसार उधारीने / रोखीने राबविणेत येणाऱ्या ऊस विकास योजने अंतर्गत माती परीक्षण सुविधा, ताग बियाणे वाटप, ऊस बेणे वाटप, रासायनिक खते पुरवठा, द्रवरुप जीवाणू खते, ऊस रोपे वाटप, खासगी ऊस लागवड अर्थसहाय्य, प्रेसमड, खोडवा व्यवस्थापनामध्ये पाचट कुट्टी सुविधा, ठिबक सिंचन योजना, व्हीएसआय उत्पादित मल्टीमायक्रोन्युट्रीएंट, मल्टीमॅक्रोन्युट्रीएंट, ह्युमक ॲसिड, वसंत उर्जा, जैविक कीटकनाशके बी.व्ही.एम., इ.पी.एन. इ. निविष्ठांचा पुरवठा, हंगामवार ऊस पीक स्पर्धा इ. ऊस विकास योजनांचा लाभ सर्व ऊस उत्पादकांनी घ्यावा. ऊस पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेणेस इच्छुक शेतकऱ्यांनी प्रवेश शुल्क रक्कम रु.१००/- डिसेंबर २०२५ अखेर भरणा करून स्पर्धेसाठी नाव नोंदणी करावी.
त्याचप्रमाणे एकात्मिक कीड व्यवस्थापन योजनेमध्ये ऊस पिकामध्ये हुमणी कीडीचे नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी गोळा केलेले हुमणी कीडीचे भुंगेरे कारखान्यामार्फत प्रति किलो रु.३००/- प्रमाणे जून २०२५ अखेर खरेदी केले जाणार असून सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी हुमणीचे भुंगेरे गोळा करुन एकात्मिक हुमणी कीड नियंत्रण करावे. तरी वरील लागवड धोरणानुसार जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उसाची लागवड करावी व कारखाना ऊस विकास योजनांचा लाभ घ्यावा. ऊस विकास योजनेच्या अधिक माहितीसाठी विभागीय शेतकी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन बेंडे यांनी केले आहे.
सामाजिक
अवकाळी पावसाच्या नुकसानीचे आंबेगावमध्ये “तलाठी करणार पंचनामे” – नायब तहसीलदार वाघ

मंचर दि.29 (सदानंद शेवाळे): अवकाळी ऐन उन्हाळ्यात आलेल्या पावसामुळे आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम व पूर्व भागात मुसळधार पावसामुळे आंबा जांभूळ केळी मका बाजरी भुईमूग व पालेभाज्या वर्गीय पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे प्रत्येक गावातील गाव कामगार तलाठी आपापल्या सजातील नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करतील अशी माहिती आंबेगाव तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार सचिन वाघ यांनी बोभाटा शी बोलताना दिली.
मागील पंधरा दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे अनेक ठिकाणी बांध फुटले आहेत रस्ते वाहून गेले आहेत तर वीज पडल्याने कांदा बराखी जळून गेली आहे पालेभाज्या वर्गीय पिके कोबी फ्लावर कोथिंबीर मेथी शापू सह अनेक पालेभाज्या पाण्यात पोहत आहेत.

संप काळातही “कृषी सहाय्यक” करणार पंचनामे
कामगार तलाठी आपापल्या सजा मध्ये पंचनामे करणार आहेत त्यांना सहाय्य करण्यासाठी सहाय्यक कृषी अधिकारी संपावर असतानाही आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत मदत करणार असल्याची माहिती घोडेगाव कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान आंबेगाव तालुक्यात पूर्व भागात पाणी उपलब्ध असल्याने तालुक्यातील सुमारे 3 हजार 750 एकर क्षेत्रावर उन्हाळी बाजरी पिकाची पेरणी करण्यात आली होती परंतू अवकाळी पावसाने उन्हाळ्यात हमखास उत्पन्न देणारे बाजरीचे पीक भुईसपाट झाले आहे बाजरीच्या कणसांना चौरे ( कोंब ) फुटले आहेत तर जनावरांचा वाळलेल्या चारा वैरण पाण्यात भिजत आहे या वैरणीवर कुज व बुरशी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे दुभत्या व भाकड जनावरांना हिवाळ्यात व उन्हाळ्यात वाळलेल्या चाऱ्याची मोठी टंचाई यंदा भासणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.त्याचप्रमाणे सुमारे दोन हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे अतोनात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे अशी माहिती तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
-
राजकीय1 year ago
वीस वर्षांपूर्वी राजकारणात स्वतःला सिद्ध करण्यासाठी वेगळे झालेले “त्रिदेव”, पुन्हा आंबेगावच्या आसमंतात एकत्रित झळकणार
-
राजकीय1 year ago
“टायगर इज बॅक” शिरुर लोकसभेच्या मैदानात खळबळ माजणार..!
-
राजकीय7 months ago
वळसे पाटील यांना मोठा धक्का : शरद बँकेचे संचालक जयसिंग थोरात यांचा शरद पवार गटात जाहीर प्रवेश
-
राजकीय1 year ago
आयात उमेदवारांपेक्षा निष्ठावंतांना संधी द्या; उद्योगपती देवेंद्र शहा यांच्या नावाची शिरूर लोकसभेसाठी चर्चा…….
-
राजकीय7 months ago
आंबेगाव मध्ये महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर : निवडणुकीत सहभाग न घेण्याचा शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचा निर्णय
-
राजकीय1 year ago
अढळरावांनी, वळसे पाटलांची भेट घेऊन केली चौकशी
-
राजकीय10 months ago
भोसरी विधानसभा क्षेत्रातील असंख्य नाराज कार्यकर्ते भाजपाला ठोकणार रामराम: उबाठा सेनेत करणार प्रवेश?
-
सामाजिक1 year ago
“माणसात देव शोधत, सर्वसामान्यांच्या हितासाठी प्रयत्नशील राहणारा, माणसातील “देवमाणूस”….