singa8

rp8888

singa8

slot demo

slot qris

singa8

rp8888

https://bertrodriguez-museum.org

https://journal.uecommercebintaro.ac.id/

singa8

singa8

singa8

singa8

singa8

singa8

singa8

singa8

92GLORY

http://vecas.org.vn/id/

https://admire.ch/vendor/

Connect with us

राजकीय

राष्ट्रवादीतील प्रवेशाने माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांचा शिरुर लोकसभेतील यशाचा मार्ग सोपा……

Published

on

शिरुर लोकसभा मतदार संघात माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या  राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मधील प्रवेशाने राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणावर बदलत असून आढळरावांच्या यशाचा मार्ग सुखर होण्याची चिन्हे दिसत आहेत.

 माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी शिवसेना (शिंदे गट) सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे शिरुर लोकसभा मतदार संघात वेगवेगळ्या विचार प्रवाहांना सुरवात झाली आहे. अनेक मतदारांच्या मते आढळराव यांनी शिवसेना सोडायला नको होती, अनेकांच्या मते आढळराव यांनी पक्ष बदलाचा घेतलेला निर्णय योग्यच आहे अशाप्रकारच्या विविध चर्चांना मोठया प्रमाणावर उधाण आले आहे. काही जण हे आपले राजकीय समीकरण मांढताना माजी खासदार आढळराव यांना कसा तोटा होईल याचाच विचार मांडत आपली नाराजी काही अंशी व्यक्त करीत आहेत परंतु सध्यातरी शिरुर लोकसभा मतदार संघाचा विचार करता, माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये आपल्या कार्यकर्त्यासोबत प्रवेश करण्याचा घेतलेला निर्णय माजी खासदार आढळराव यांना भावी काळात संसद सदस्य होण्यासाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे.असे अनेकांचे मत आहे.

अनेक मतदारांचे मते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लढवलेल्या मागील २००४ ते २०१९ पर्यंतच्या सर्व निवडणुकांच्या विजयाचा विचार करता व त्यांना मिळालेली मते पहाता विजयी मते मिळण्याचा आलेख खूपच चढता दिसून येतो. तर २००१९ ते २०२४ च्या दरम्यान झालेल्या निवडणुकीत मतदानाचे बाबतीत पाहिल्यास  सध्याचे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना- एकूण मते 634554 इतकी पडली आहेत. तर  माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांना- 576002 इतकी पडलेली आहेत.  म्हणजेच माजी खासदार शिवाजीराव आढाळराव यांचा मागील निवडणुकीत – 58252 इतक्या मतांनी पराभव झाला. यातील प्रमुख कारणे काही कारणे मतदारांचे मते  अशी कि, राजगुरूनगर सिन्नर बायपास हायवे मधील थांबलेली बाह्य वळण रस्त्यांची कामे या वेळी पूर्ण झाली नव्हती. मागील निवडणूक काळात त्यावेळी उत्तर पुणे जिल्ह्यात  उन्हाळी सुट्टीचे दिवस सुरू होते त्यातच या परिसरात विविघ गावोगावच्या ग्रामदैवतांच्या यात्रा व त्यात लग्नसराईचे दिवस सुरू होते. त्यामुळे, राजगुरूनगर गाव, खेड घाट, मंचर, नारायणगाव या परिसरात होणाऱ्या वाहातुक कोंडीमुळे नागरिकांमध्ये मोठी नाराजी  निर्माण झालेली होती. त्यामुळे खेड जुन्नर आंबेगाव  या तीन तालुक्यात हे विरोधी मतदानाचे एक  प्रमुख कारण ठरले, त्याचप्रमाणे माजी खासदार आढळराव यांच्या काही महत्वाच्या कार्यकर्त्यांमध्ये आलेली विसंगती व त्यामुळे निर्माण झालेले तणाव , त्याच बरोबर पुढिल उमेदवार एका विशिष्ट्य समाज्याचा असल्यामुळे जातीपातीचे अनुषंगाने राजकारण झाल्याचे बोलले जाते व त्याचाही फटका मतदानावर पडल्याचे बोलले जाते . 

 त्याच प्रमाणे आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे ज्याचे सहकार मंत्री वळसे पाटील तसेच सोबत इतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी भक्कम मोर्चे बांधणी केली. व  त्या तुलनेत आढळरावांकडे सर्व मतदार संघात कार्यकर्ते यांचा संच खूपच अपुरा होता. “म्हणतात ना”, कोणताही खेळ असो व युद्ध जिंकण्यासाठी,  वेळेवर योग्य नियोजन करणारे प्रशिक्षित अभ्यासू व्यक्ती असणे आवश्यक असते परंतु यांचा मोठ्या प्रमाणावर अभाव माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्याकडे २०१९ च्या निवडणुकीत दिसून आला. सन२००४ ते २०१८ या दरम्यान झालेल्या पहिल्या तीन निवडणुकांमध्ये  शिवसेना सहसंपर्क प्रमुख दिवंगत नेते अविनाश राहणे यासारखी योग्य नेतृत्व करणारी व कार्यकर्त्यांशी जवळून संपर्क असलेली प्रत्येक आपत्कालीन स्थिवर योग्य पर्याय काढणारी मंडळी माजी खासदार आढळराव यांच्यासोबत होती.

पण २०१९ मध्ये असे जवळचे समजले जाणारे अनेक महत्वाचे कार्यकर्ते दुरावले होते तर या संधीचा फायदा घेत तालुक्यातील काही  महत्वाच्या कार्यकर्त्यांना माजी खासदार आढळराव यांच्यापासून तोडण्यात नामदार दिलीप वळसे पाटील यशस्वी झाले होते. त्या कार्यकर्त्यांनी आढळरावांची मतदान मिळविण्यासाठी वापरली जाणारी रणनीती व या साठी मतदार संघात आढळराव यांना मदत करणारी शक्तीस्थाने यांची  सर्व माहिती वळसे पाटलांना पुरविल्यामुळे (घरचा भेदी लंका ढाय या युक्ती प्रमाणे) शिरुर लोकसभा मतदार संघातून मतदान रुपात मिळणारी रसद रोखण्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यशस्वी झाला .

    आंबेगाव तालुका हा आपला बालेकिल्ला व येथील आपले कार्यकर्ते योग्य नियोजन करतील असे  समजून, आढळराव यांनी येथील सर्व  कामकाजाच्या निर्णयाची जबाबदारी येथील काही स्थानिक कार्यकर्त्यांवर सोडली. त्यामुळे येथेही कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊन मतभेद निर्माण झाले त्यामुळे   मतदानात फटका बसला असल्याचे सांगितले जाते. त्यातच पुढील उमेदवार अभिनेता असल्याने व त्याच काळांत विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांची टेलिव्हजन वर सुरू असलेली व सर्वाना भावलेल्या  “छत्रपती संभाजी महाराज” मालिकेत विद्यमान खासदार हे “छत्रपती संभाजी महाराज” यांची प्रमुख भूमिका बजावत होते व त्याचाही काही प्रमाणात खासदार अमोल कोल्हे यांना फायदा झाला असल्याचे सांगितले जाते. माजी खासदार आढळराव यांच्या बाबत मगिल वेळी अशी प्रतिकुल स्थिती असतानाही  खासदार अमोल कोल्हे  यांना मिळालेली विजयी मतांची संख्या पहात एव्हड्या मोठ्या मतदार संघाच्या दृष्टीने खासदार अमोल कोल्हे यांना मिळालेली मतदानाची आघाडी अतिशय नगण्य होती.

 दरम्यान आजची स्थिती पाहता सड्याची माजी खासदार आढळराव  यांची स्थिती खूपच बळकट आहे. यात प्रामुख्याने पराजय झाल्यानंतरही आढळराव यांनी खचून न जाता पुन्हा नव्या जोमाने कामाला सुरुवात केली. मतदार संघातील प्रत्येक गाव वाडी वस्तीवर जाऊन त्यांनी मतदारांनशी वैयक्तिक संपर्क ठेवला व सर्व मतदार संघ पिंजून काढला. 

 मुळ शिवसेनेत फूट पडल्यानंतर सर्वत्र राजकीय दृष्टीने दोलायमान परिस्थिती असताना माजी खासदार आढळराव यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे समवेत जाणे पसंत केले व त्यामुळे त्यांनी सत्तेचा फायदा घेत संपुर्ण मतदार संघातील गावोगावच्या करकर्त्यांशी संपर्क ठेऊन योग्य नियोजन करीत सर्व मतदार संघासाठी भरपुर निधी शासमाकडून आणला. त्यामुळे खासदार नसतानाही अनेक गावे वाड्यावस्त्यांवर त्यांनी प्रचंड प्रमाणावर विकासाची कामे मंजूर करून घेतली त्यामुळे एक सकारात्मक लाट माजी खासदार आढळराव यांच्या विषयी निर्माण झाली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुमारे चार व आमदार भाजपाचे एक असे पाच आमदार शिरुर लोकसभा मतदार संघात असल्यामुळे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचे या मतदार संघात असलेले जाळे व नामदार वळसे पाटील यांची व्ह्यूवरचना तसेच उद्योगपती देवेंद्र शाह यांचे नियोजन आणि कार्यकर्त्यांमध्ये दुणावलेला उत्साह  यामुळे आढळरावांचा स्थिती प्रचंड सकारात्मक असून ही निवडणूक आढळराव यांच्या दृष्टीने सुखकर दिसत असल्याचे वातावरण सध्या पहावयास मिळत आहे .

त्या तुलनेत विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्या बाबत विचार करता मतदार संघात शरद पवार गट व उद्धव ठाकरे यांच्या बद्दल प्रचंड सहानुभूती लाट आहे तरी शरद पवार व उद्धव ठाकरे गट यांच्या पक्षाकडे मतदार संघामध्ये सक्षम सेनापती नसल्याने त्यांच्या बाबत असलेल्या त्या साहनुभूतीचा फायदा कोल्हे यांना मिळविणे सद्यातरी कठीण दिसते. व त्यातच सक्षम कार्यकर्त्यांचे जाळे खासदार अमोल कोल्हे यांच्या कडे दिसून येत नाही. त्यामुळे अमोल कोल्हे यांच्याकडे शरद पवार गट व उद्धव ठाकरे गटाचे प्रामाणिक कार्यकर्ते असले तरी ते त्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्यात अपयशी ठरताना दिसत असून याचा फायदा माजी खासदार आढळराव यांना होताना दिसत आहे असे चित्र सध्या मतदार संघात पहावयास मिळत आहे.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

राजकीय

हे कार्यकर्ते… “खरंच जनहितार्थी कि लाभार्थी”?

Published

on

मंचर दि (प्रतिनिधी)राज्याच्या राजकारणात वळसे पाटलांना स्थान मिळाले नाही म्हणून वळसे पाटलांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी  पक्ष नेतृत्वाकडे कोणतीही दाद मागण्या ऐवजी .आपल्या नेत्यावर अन्याय होऊनही निमूटपणे मूग गिळून गप्प बसणारे हे कार्यकर्ते वर्षानुवर्षे सत्तेचा लाडू चाखत असूनही जेव्हा नेत्यावर अन्याय अन्याय होतो. तरीही गप्प असतील तर ते खरंच  जनहितार्थी लाभार्थी  कि, स्वार्थी ?

 राज्याच्या राजकारणात गेली पस्तीस वर्षे असणारे एकेकाळचे शरद पवार यांचे खंदे समर्थक दिलीप वळसे पाटील यांना यावर्षी मात्र राज्य मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नाही खऱ्या अर्थाने राज्याच्या उत्कर्षांसाठी नियोजनबद्ध काम करणाऱ्या व्यक्तीला महाराष्ट्र मुकाला असे म्हणावायास हरकत नाही कारण वळसे पाटलांनी ज्या खात्याचे काम पाहिले त्या खात्याचा कारभार उत्तम पप्रकारे करून खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील जनतेला न्याय दिला असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. 

या वेळी मात्र महायुतीच्या काळात त्यांना मंत्री मंडळातून डावळण्यात आले यामागे कोणतीही व काहीहि कारणे असतील. परंतु महाराष्ट राज्य  एका चांगल्या व्यक्तीला प्रभावी व्यक्तिमहत्वाला मुकला हेही खरेच. वळसे पाटलांनी त्यांच्या कारकिर्दीत ज्या खात्याचे काम पाहिलं त्या खात्याची प्रगती झाली आहे इतिहास आहे. अशा कर्तृत्वान व्यक्तीला बाजूला ठेवणे हे पक्ष नेतृत्वाचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल.

दरम्यान राज्य मंत्रिमंडळ विस्तारात माजी मंत्री छगन भुजबळ यांचे नाव नाही म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र डोक्यावर घेतला ओ बि सी वर अन्याय झाला. असे सांगत पक्ष नेतृत्वावर आगपाखाड केली व आपण काहीही करू शकतो हे दाखवत पक्ष नेतृत्वाच्या निर्णयाचा निषेध केला व जोडे मारो आंदोलन करून धिक्कार हि अनेक कार्यकर्त्यांनी केला.परंतु आंबेगाव तालुक्यात मात्र वळसे पाठलांच्या कार्यकर्त्यांकडून साधा निषेधही नोंदवीला गेला नाही.

आंबेगाव,जुन्नर, खेड, शिरूर तालुक्यात वळसे पाटलांचे शेकडो कार्यकर्ते आहेत.परंतु वळसे पाटलांची मंत्री पदी वर्णी लागली नाही. यावर कार्यकर्त्याकडून मंत्रिपदच्या मागणीसाठी प्रचंड हल्लाबोल होणं गरजेचं होत. परंतु  यावर बोलण्याचे धारिष्टय कोणत्याही कार्यकर्त्यामध्ये नाही. याचाच अर्थ वळसे पाटलांनी जे कार्यकर्ते जपले त्या कार्यकर्त्यांची भूमिका  फक्त “टी फॉर टॅट” अशीच होती कि काय? असा प्रश्न विचाराला जातं आहे. 

गेली अनेक वर्ष ते वळसेपाटलांच्या सोबत राहून समोर आल्यावर फक्त ” देखल्या देवाला दंडवत” घालत फक्त  सत्तेचा मलिदा चाखणारे लाभार्थी कार्यकर्ते वळसे पाटलांजवळ होते हि सांगण्यासाठी कोण्या जोतिष्याची आवश्यकता नसावी. कारण वळसे पाटलांना डावलले जातं असताना त्यांच्या बाजूने खंबीर भूमिका घेत रस्त्यावर येण्याचे धाडस एकाही कार्यकर्त्यांने दाखविले नाही किंवा या  लाभार्थी  कार्यकर्त्यांना  वळसे पाटलांना मंत्री पदापासुन डावळून त्याच्यावर अन्याय केला जातं आहे.  असेही वाटले नाही. किंवा त्यांची बाजू पक्ष नेर्तृत्वासमोर मांडण्याची हिंम्मतहि कोण्या कार्यकर्त्यांची झाली नाही हि मोठी शोकांतिका आहे.

दरम्यान काल झालेल्या आभार मेळाव्यात एकमेकांची उणी दुनी काढून आपण किती समर्थक हे दाखविण्याची जणू स्पर्धाच सुरु होती. परंतु त्यात साहेबांवर पक्ष नेतृत्वाने अन्याय केला असून त्यावर पक्ष नेतृत्वाला जाब विचारावा असा साधा मुद्दाही कोणी मांडला नाही. खरंतर वळसे पाटलांना याची खंत नक्कीच असेल पण काय करणार? एकही कार्यकर्ता काहीच बोलला नाही यावरून असेच दिसते कि,  साहेबांना मिळालेले बहुतांशी कार्यकर्ते फक्त जनहितार्थी नसून लाभार्थी आहेत का? अशा आशयाची चर्चा सर्वत्र सुरु आहे.

Continue Reading

राजकीय

माजी खासदार शिवाजीराव आढळराव ठरताहेत? “किंगमेकर”

Published

on

मंचर दि. (प्रतिनिधी) लोकसभेतील पराभवाचा वचपा काढत, खासदार अमोल कोल्हे यांचा शिरूरलोकसभा मतदार संघावर आपली एकहाती वर्चस्व निर्माण करण्याच्या संकल्पचा “अश्व” रोखून धरत,माजी खासदार शिवाजीराव आढळराव हे किंग मेकर ठरले असल्याची चर्चा सर्वत्र आहे.

 विधानसभेची रणधुमाळी संपली, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले महायुतीत आनंदी आनंद साजरा होत असताना मात्र विधानसभा काळात शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे यांनी फोडलेल्या गगनभेदी डरकाळ्या पराभवाच्या गर्तेत शांत झाल्या या लोकसभा मतदार संघात विजयाची पताका फडकविणारे शिरूर लोकसभेचे खासदार व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे स्टार प्रचारक अमोल कोल्हे यांचे पश्चिम महाराष्ट्राचा ओ बी सी चा नेता होण्याचे स्वप्न मात्र धुळीलाच मिळाले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

मागील दोन लोकसभा निवडणुकीत माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांना पराजयाची धूळ चारणारे तसेच प्रती संभाजी म्हणून आपली प्रतिमा मालिकांच्या माध्यमातून तयार करून सर्वसामान्य जनतेच्या गळ्यातील ताईत झालेले, खासदार  अमोल कोल्हे यांना यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी विधानसभेच्या रणांगणात मात देली व विधान सभेत आपल्याच  विचाराचे लोकप्रतिनिधी विजयी करून शिरूर लोकसभेवर आपला वरचष्मा असल्याचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी दाखवून दिले असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.

लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर खासदार आढळराव थोडे बॅक फूट वर गेले होते. त्यांचे राजकारण मर्यादीत झाले. अशा अशयाच्या चर्चा देखील सर्वत्र झाल्या.परंतु नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत खासदार शिवाजीराव आढळराव यांनी प्रचंड कष्ट घेत आंबेगाव,शिरूर, भोसरी,जुन्नर व हडपसर येथे आपल्या विचाराचे प्रतिनिधी निवडून आणून खासदार कोल्हे यांना चांगलाच झटका दिला असल्याचे बोलले जाते.

दरम्यान जुन्नर, हडपसर, आंबेगाव भोसरी हे मतदार संघ विधानसभेत विरोधात जाणे म्हणजे कोल्हे यांच्या पुढील राजकीय  वाटचालीच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे. असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यात कोल्हे यांना मतदारांनी लोकसभा मतदार संघात निवडून येताना जेव्हढी मते पडली त्या पेक्षा सुमारे दोन लाख कमी मते विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या वेळी आघाडीच्या उमेदवारांना  मतदान झालेले आहे.

दरम्यान  राज्याचे तात्कालीन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी दिलेली जबाबदारी माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी सार्थ करीत आपल्या विचाराचे उमेदवार निवडून आणले आहेत तर पुढील काळात खासदार कोल्हे यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी केलेल्या विविध घोषणा पूर्ण करणे करणे गरजेचे आहे. त्यात इंद्रायणी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, भोसरी ते खेड रस्ता या दोन गोष्टी उत्तर पुणे जिल्यातील मतदारांच्या दृष्टीने महत्वाच्या घोषणा आहेत. या घोषणा बाबत खासदार कोल्हे यांनी जागरूक राहून हि कामे युद्ध पातळीवर करणे त्यांच्या राजकीय सौख्याचे दृष्टीने गरजेचे आहे. परंतु केंद्रात व राज्यात विरोधी विचार सरणीचे सरकार असताना खासदार कोल्हे हे महत्व कांक्षी प्रकल्प कसे पूर्ण करणार? व  शिरूरच्या जनतेला कसा? न्याय मिळवून देणार हे पहाणे कुतूहलचे ठरणार आहे.

Continue Reading

राजकीय

“राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे फोटो शासकीय कार्यालयात लावावेत”:जेष्ठ नेते अशोक काळे यांची प्रशासनाकडे मागणी 

Published

on

मंचर दि(प्रतिनिधी) सत्य अहिंसा व शांततेचा भारताला नव्हे तर जगाला संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे फोटो व संदेश सर्व शासकीय नियमशासकीय कार्यालयांमध्ये त्वरित लावावे या मागणीचे निवेदन तहसीलदार आंबेगाव यांना काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोक आप्पा काळे पाटील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विजयराव आढारी यांनी दिले आहे.

जगाला शांततेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे फोटो सध्या तालुक्यामध्ये संपूर्ण शासकीय  निमशासकीय  कार्यालयात दिसत नाहीत गेले काही काळापासुन सर्व संस्थांमध्ये जगाला शांततेचा संदेश देणारे राष्ट्रपुरुष महात्मा गांधी यांचे फोटो व संदेश होते परंतु हे फोटो व संदेश काही दिवसापासून काही शासकीय कार्यालयांमधून हटवले गेलेले आहेत किंवा काढले गेलेले निदर्शनास येत आहे असे काळे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

 दरम्यान सर्व शासकीय नियम शासकीय कार्यालयांमध्ये महात्मा गांधीजींचे फोटो व संदेश लावावे जावेत असे आवाहन केले असून या प्रसंगी पाटणचे उपसरपंच कुंडलिक कुंडलिक असवले त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य दगडू मते सुनील शेळके रामदास मते गणेश खानदेशी बाळासाहेब इंदोरे बंटी मोरडे आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

 यासंदर्भातल्या निवेदनाच्या प्रती  राष्ट्रपती द्रोपदी मुर्दौ  राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते व काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे महाराष्ट्राचे राज्यपाल त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनाही पाठवले असून देशपातळीवरती व राज्य पातळीवरती या संदर्भामध्ये तातडीने कार्यवाही करावी व त्या दृष्टीने शासनाकडे पाठपुरावा करावा अशी विनंती ही संबंधित निवेदनामध्ये केलेले आहे.

दरम्यान याबाबत तालुका पातळीवर डिसेंबर अखेर कार्यवाही न झाल्यास राज्यघटनेनुसार परमपूज्य गांधींनी आखून दिलेल्या मार्गानुसार  राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते ज्या शासकीय कार्यालयामध्ये परमपूज्य गांधीजींचा फोटो नसेल त्या ठिकाणी आंदोलन करण्याचा मानस व्यक्त केलेला आहे या संदर्भात पो स्टेशन घोडेगाव ग्रामीणरुग्णालया घोडेगाव रजिस्टर आँफीस प्रकल्प कार्यालय यांना निवेदन देण्यात आले आहे.

Continue Reading
Advertisement

Trending

Best Replica Watches UK

Copyright © 2024 BobhataNews.in