सामाजिक
पीडितांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी,संकटकाळी देवासारखा “दत्त” म्हणून मदतीला धावणारा जण सामान्यांचा नेता “देवदत्त”

आजच्या काळात सर्वसामान्य जणांचे आसू पुसत संकटकाळी सर्वसामान्यांच्या मदतीला धावणारी निस्वार्थी मंडळी थोडीच असतात. सर्वसामान्यांच्या सुखदुःखात धावून जाऊन मदतीचा हात तर दूरच, पण आपुलकीचे चार शब्द बोलणेही आजच्या नेत्यांना जमत नाही. परंतु या काळातही सर्वसामान्यांना आपले म्हणणारी अनेक सामाजिक व राजकीय क्षेत्रांत अनेक मंडळी कार्यरत आहेत. त्यात एक नाव येते ते म्हणजे, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम

घटना इतरांच्या दृष्टीने तशी साधीच पण घटना कोणतीही असो आनंदाचे सर्वच सोबती असतात पण दुःख प्रसंगी जे उभे राहतात तेच खरे मित्र, “म्हणतात ना….” बुडत्याला काडीचा आधार”, अशाच वेळी पीडित कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात त्यांना आधार देऊन सावरण्यासाठी देवासारखे दत्त म्हणून उभे ठाकले ते “देवदत्त”
याबाबत सविस्तर वृत्त असे समजते की,घोडेगाव पासून सुमारे चार कि मीटर अंतरावर असलेल्या बाभुळवाडी (साल)येथे राहत असलेल्या श्री.गुलाब देवराम कदम यांचा शेतातील बैलांचा गोठा जाळून खाक झाला यात दोन बैल यासह अनेक वस्तू जाळून खाक झाल्याची दुःखद घटना घडली

( आगच्या भक्ष्यस्थानी पडलेला गोठा)
बैल हा प्राणी शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एक सदस्यच असतो. आपल्याकडे असलेल्या पाळीव प्राण्यांना निटपणे वैरण पाणी दिले कि नाही. याची चौकशी केल्याशिवाय किंवा त्यांना खाऊ घातल्या शिवाय बळीराज्याच्या पोटात कधीच अन्नाचा घास जाणार नाही. अशातच आपले दोन बैल आगीच्या भक्ष्यस्थानी पडले म्हटल्यावर शेतकऱ्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला म्हणणे वावगे ठरणार नाही.

(शेतकरी कुटुंबाचे सांत्वन करताना देवदत्त निकम)
याबाबत असे कळते की, दुपारच्या वेळी अज्ञात व्यक्तिने गुलाब कदम यांच्या शेतातले बांधाचे गवत पेटवले . त्यावेळी हवा जास्त असल्यामुळे इतर शेतातील बांध पेटु लागले व दुपारी घरी कोणीही नसल्यामुळे जवळच असलेल्या गोठ्याला आग लागली यात श्री.गुलाब कदम यांच्या गोठ्यातील दोन बैल,शेतीची अवजारे ,धान्य,पाईप व ईतर आंब्याची झाडे हे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले यामुळे पीडित शेतकऱ्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला .या घटनेची बातमी पुणे जिल्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांना मिळाल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या सुरू असलेल्या राजकीय धामधूमिकडे दुर्लक्ष करीत देवदत्त निकम यांनी साल गावात जाऊन संबंधित पीडित कुटुंबियांची भेट घेऊन विचारपूस केली.

दरम्यान पीडित कुटुंबियांना शासकीय पातळी वरून तातडीची मदत मिळावी यासाठी घोडेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक.भालेकरसाहेब व तहसीलदार आंबेगाव यांच्यासोबत चर्चा करून पीडित कुटुंबियांना मदत मिळण्याविषयी विनंती केली. त्याचप्रमाणें कदम कुटुंबियांना प्राथमिक स्वरूपात आर्थिक मदत व्हावी यासाठी रुपये पाच हजार मदत रोख स्वरूपात देऊन मदतीचा हात पुढे केला.

या वेळी घोडेगाव शिवसेना (उद्धव ठाकरे) शहर प्रमुख नंदकुमार बोऱ्हाडे, जेष्ठ नेते बबन राव गव्हाणे ,सागर गव्हाणे,अतुल गव्हाणे,वसंत गव्हाणे,,शिवदास गव्हाणे,कचर गव्हाणे, ,मिनाबाई गव्हाणे ,गिरीश मते,विशाल वाबळे आदी मान्यवर घटना स्थळी उपस्थित होते
सामाजिक
“महिला बांधकाम कामगारांसाठी” शासनाकडून मिळणाऱ्या मदतीवर डल्ला मारणारे काथाकथित एजंट व पुढारी म्हणजे “शिव” जन्मभूमीतील सध्याचे रांझ्याचे पाटील का?

मंचर दि. (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या काळात एका महिलेवर अत्याचार करणाऱ्या पाटलाचे छत्रपतींनी हात पाय छाटले होते. परंतू त्याच छत्रपतींचे नाव घेऊन छत्रपती शिवरायांची जन्म भूमी असलेल्या जुन्नर तालुक्यात बांधकाम कामगार महिलांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या मदतीतून काही एजंटांनी व कथित गावपुढाऱ्यांनी हात ओले करण्याचा सपाटा लावला असताना या होणाऱ्या गैरव्यवहारावर प्रकाश झोत टाकणाऱ्या पत्रकारावर जीवघेणा हल्ला केला जातो व त्याच एजंटांची बाजू घेण्यासाठी काही कथित गाव पुढारी पत्रकारावर बेछुट खोटे आरोप करण्याचा प्रयत्न करतात हि खरी शरमेची गोस्ट बाब आहे

दरम्यान सर्वसामान्य बांधकाम कामगारांचा आर्थिक स्थर उंचावण्यासाठी शासनाने बांधकाम कामगार योजना आणली या योजनेचा खरा अर्थ असा कि, रोजंदारीवर काम करणारे बांधकाम कामगार मजूर वर्गातील कुटुंबाना आर्थिक सहाय्य मिळावे व यातून त्यांची मुले शिकुन सक्षम व्हावीत या दृष्टीकोनातून शासनाने बांधकाम कामगानांच्या उत्कर्षासाठी आणलेल्या या योजनेचा काही एजंटांनी कथाकथित राजकीय पुढऱ्यांच्या आशीर्वादाने गोरस धंदा बनविल्याचा प्रकार समोर येत आहे.

सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यामध्ये सुरु असलेली बांधकाम कामगार योजनेमध्ये कामगारांना मिळणाऱ्या मदतीतून चांगली मोठी रक्कम कथाकथित एजंट लोकांना दयावी लागते व यात अनेक कथाकथित स्थानिक पुढाऱ्यांचा सहभाग असल्याचे बोलले जाते.व हे कथाकथित गाव पुढारी समाजसेवेचा खोटा आवडत आणत गरिबांच्या टाळूवरील लोणी खात असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

दरम्यान नुकत्याच एका इलेक्ट्रानिक वाहिनेने सुरु असलेल्या बांधकाम कामगार योजनेतील या गैरव्यवहाराचा भांडाफोड केला. या नंतर त्या पत्रकारावर काही एजंट लोक यांनी हल्ला केला व काही कथित गाव पुढऱ्यांच्या मदतीने बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. व हि घटना छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्म स्थान असलेल्या जुन्नर तालुक्यात घडली.यामध्ये या राजकीय नेत्यांनी महिलांना त्रास दिल्याचा आरोप केला खरे तर हे गाव पुढारी ज्या नेत्याचे कार्यकर्ते आहेत त्याच नेत्याची एक क्लिप काही महिन्यापूर्वी प्रसारीत झाली होती.यामुळे जसा नेता तसा कार्यकर्ता अशी चर्चा नागरिक दाबक्या आवाजात करीत आहेत.
दरम्यान या कथाकथित पुढऱ्याच्या या लाजिरवान्या कृत्याचा सर्वच स्थरावरून निषेध केला जात असून . या प्रकरणाची उच्च स्तरीय कसून चौकशी करावी. सुरु असलेल्या या योजनेत खरंच किती बांधकाम कामगार आहेत का? या सर्व बाबींची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे
सामाजिक
ऊस उत्पादनाच्या वाढीसाठी “भीमाशंकर सह. साखर कारखान्याचे” ऊस लागवड धोरण जाहीर -अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांची माहिती

मंचर दि. (प्रतिनिधी) भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे लागवड हंगाम २०२५-२६ साठी ऊस लागवडीचे धोरण जाहिर झाले असून त्याची अंमलबजावणी दि. १ जून २०२५ पासून करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.

“उत्पादकता वाढ़ लक्ष योजना”
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीचे दृष्ठिने कारखान्यामार्फत “दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील ऊस उत्पादकता वाढ लक्ष २०२०” ही महत्वाकांक्षी ऊस विकास योजना राबविणेत येत आहे अशी माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष अँड.प्रदीप वळसे यांनी सांगितले
भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माध्यमातून सुरु करण्यात येत असलेल्या या ऊस लागवड जाहीर धोरणबाबात अधिक माहिती देताना बेंडे यांनी सांगितले की, दि. १ जून २०२५ ते ३० ऑक्टोबर २०२५ पर्यंतच्या कालावधीमध्ये को.एम.०२६५ तर दि. १ जून २०२५ ते ३० एप्रिल २०२६ पर्यंतच्या कालावधीमध्ये को.८६०३२ ऊस लागवडीस व नोंदीस परवानगी देण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे दि. १ ऑगस्ट २०२५ ते ३० एप्रिल २०२६ अखेर पर्यंतच्या कालावधीमध्ये व्हीएसआय ०८००५ या ऊस लागवडीस परवानगी देण्यात आली आहे. दि. १ सप्टेंबर २०२५ ते ३० एप्रिल २०२६ अखेर पर्यंतच्या कालावधीमध्ये एम.एस. १०००१, को. ९०५७, या ऊस लागवडीस परवानगी देण्यात आली आहे. को.व्हीएसआय १८१२१, फुले ऊस १५०१२, फुले ऊस १५००६, फुले ऊस १३००७, को.एम. ११०८२ इ. शिफारशीत ऊस लागवडीस दि. १ जून २०२५ ते दि. ३० एप्रिल २०२६ पर्यंत परवानगी देण्यात आली आहे.
कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद व ऊस उत्पादक यांना मागणीप्रमाणे उपलब्धतेनुसार लागवड धोरणाप्रमाणे दि. १ जून २०२५ पासून बेणे वाटप करण्यात येणार आहे व खासगी ऊस लागवडीच्या नोंदी घेण्यात येणार आहेत. त्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस लागवड करावयाच्या क्षेत्राचा ७/१२ उतारा व आवश्यक कागदपत्रे पूर्तता संबधित विभागीय शेतकी कार्यालयात जाऊन करावी. खासगी ऊस लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी चार दिवसाचे आत संबंधित गट ऑफिसमध्ये जाऊन ऊस नोंद करावयाची आहे.
दरम्यान उशीरा ऊस लागवड नोंद करणेस आलेल्या ऊस उत्पादकांची ऊस नोंदीसाठी आलेची तारीख हीच ऊस लागवड तारीख म्हणून नोंद करण्यात येईल. कारखान्यामार्फत कार्यक्षेत्र व परिसरामध्ये धोरणानुसार उधारीने / रोखीने राबविणेत येणाऱ्या ऊस विकास योजने अंतर्गत माती परीक्षण सुविधा, ताग बियाणे वाटप, ऊस बेणे वाटप, रासायनिक खते पुरवठा, द्रवरुप जीवाणू खते, ऊस रोपे वाटप, खासगी ऊस लागवड अर्थसहाय्य, प्रेसमड, खोडवा व्यवस्थापनामध्ये पाचट कुट्टी सुविधा, ठिबक सिंचन योजना, व्हीएसआय उत्पादित मल्टीमायक्रोन्युट्रीएंट, मल्टीमॅक्रोन्युट्रीएंट, ह्युमक ॲसिड, वसंत उर्जा, जैविक कीटकनाशके बी.व्ही.एम., इ.पी.एन. इ. निविष्ठांचा पुरवठा, हंगामवार ऊस पीक स्पर्धा इ. ऊस विकास योजनांचा लाभ सर्व ऊस उत्पादकांनी घ्यावा. ऊस पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेणेस इच्छुक शेतकऱ्यांनी प्रवेश शुल्क रक्कम रु.१००/- डिसेंबर २०२५ अखेर भरणा करून स्पर्धेसाठी नाव नोंदणी करावी.
त्याचप्रमाणे एकात्मिक कीड व्यवस्थापन योजनेमध्ये ऊस पिकामध्ये हुमणी कीडीचे नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी गोळा केलेले हुमणी कीडीचे भुंगेरे कारखान्यामार्फत प्रति किलो रु.३००/- प्रमाणे जून २०२५ अखेर खरेदी केले जाणार असून सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी हुमणीचे भुंगेरे गोळा करुन एकात्मिक हुमणी कीड नियंत्रण करावे. तरी वरील लागवड धोरणानुसार जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उसाची लागवड करावी व कारखाना ऊस विकास योजनांचा लाभ घ्यावा. ऊस विकास योजनेच्या अधिक माहितीसाठी विभागीय शेतकी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन बेंडे यांनी केले आहे.
सामाजिक
अवकाळी पावसाच्या नुकसानीचे आंबेगावमध्ये “तलाठी करणार पंचनामे” – नायब तहसीलदार वाघ

मंचर दि.29 (सदानंद शेवाळे): अवकाळी ऐन उन्हाळ्यात आलेल्या पावसामुळे आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम व पूर्व भागात मुसळधार पावसामुळे आंबा जांभूळ केळी मका बाजरी भुईमूग व पालेभाज्या वर्गीय पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे प्रत्येक गावातील गाव कामगार तलाठी आपापल्या सजातील नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करतील अशी माहिती आंबेगाव तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार सचिन वाघ यांनी बोभाटा शी बोलताना दिली.
मागील पंधरा दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे अनेक ठिकाणी बांध फुटले आहेत रस्ते वाहून गेले आहेत तर वीज पडल्याने कांदा बराखी जळून गेली आहे पालेभाज्या वर्गीय पिके कोबी फ्लावर कोथिंबीर मेथी शापू सह अनेक पालेभाज्या पाण्यात पोहत आहेत.

संप काळातही “कृषी सहाय्यक” करणार पंचनामे
कामगार तलाठी आपापल्या सजा मध्ये पंचनामे करणार आहेत त्यांना सहाय्य करण्यासाठी सहाय्यक कृषी अधिकारी संपावर असतानाही आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत मदत करणार असल्याची माहिती घोडेगाव कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान आंबेगाव तालुक्यात पूर्व भागात पाणी उपलब्ध असल्याने तालुक्यातील सुमारे 3 हजार 750 एकर क्षेत्रावर उन्हाळी बाजरी पिकाची पेरणी करण्यात आली होती परंतू अवकाळी पावसाने उन्हाळ्यात हमखास उत्पन्न देणारे बाजरीचे पीक भुईसपाट झाले आहे बाजरीच्या कणसांना चौरे ( कोंब ) फुटले आहेत तर जनावरांचा वाळलेल्या चारा वैरण पाण्यात भिजत आहे या वैरणीवर कुज व बुरशी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे दुभत्या व भाकड जनावरांना हिवाळ्यात व उन्हाळ्यात वाळलेल्या चाऱ्याची मोठी टंचाई यंदा भासणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.त्याचप्रमाणे सुमारे दोन हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे अतोनात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे अशी माहिती तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
-
राजकीय1 year ago
वीस वर्षांपूर्वी राजकारणात स्वतःला सिद्ध करण्यासाठी वेगळे झालेले “त्रिदेव”, पुन्हा आंबेगावच्या आसमंतात एकत्रित झळकणार
-
राजकीय1 year ago
“टायगर इज बॅक” शिरुर लोकसभेच्या मैदानात खळबळ माजणार..!
-
राजकीय7 months ago
वळसे पाटील यांना मोठा धक्का : शरद बँकेचे संचालक जयसिंग थोरात यांचा शरद पवार गटात जाहीर प्रवेश
-
राजकीय1 year ago
आयात उमेदवारांपेक्षा निष्ठावंतांना संधी द्या; उद्योगपती देवेंद्र शहा यांच्या नावाची शिरूर लोकसभेसाठी चर्चा…….
-
राजकीय7 months ago
आंबेगाव मध्ये महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर : निवडणुकीत सहभाग न घेण्याचा शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचा निर्णय
-
राजकीय1 year ago
अढळरावांनी, वळसे पाटलांची भेट घेऊन केली चौकशी
-
राजकीय10 months ago
भोसरी विधानसभा क्षेत्रातील असंख्य नाराज कार्यकर्ते भाजपाला ठोकणार रामराम: उबाठा सेनेत करणार प्रवेश?
-
सामाजिक1 year ago
“माणसात देव शोधत, सर्वसामान्यांच्या हितासाठी प्रयत्नशील राहणारा, माणसातील “देवमाणूस”….