सामाजिक
“वैदिक” मंत्राच्या जयघोषत,प्रसिद्ध उद्योगपती “देवेंद्र शाह”यांची सुकन्या चि.सौं. कां,”अक्षाली” व चि.” साकेत” यांचा शुभविवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न…..!!!

ॐ मङ्गलम् भगवान विष्णुः , मङ्गलम् गरुणध्वजः, मङ्गलम् पुण्डरी काक्षः मङ्गलाय तनो हरिः
पारंपारीक रितिरिवाजानुसार मंगल कार्याची आराध्य देवता विघ्नहर्ता “श्री गणेशाला” प्रथम वंदन करून “वैदिक” मंत्राच्या घोषात देव,ब्राम्हण, माता, पिता,संतश्रेष्ठ,वरिष्ठ मान्यवर यांचे शुभाशीर्वाद घेत नातेवाईक व आप्तेष्ठ यांच्या उपस्थितीमध्ये चि. साकेत व चि. सौं कां अक्षाली यांचा विवाह सोहळा मोठया उत्साहात संपन्न झाला.

“साकेत”हे नाव भगवान श्रीकृष्णांना संबोधले जाते ज्यांना आपण या विश्वाचा पालनहार तर सनातन धर्मात यांस ब्रम्ह म्हणतात. तर “अक्षाली” (अक्ष +अली) म्हणजे ज्याचा क्षय होत नाही असे ते देवस्वरूप होय म्हणजेच अनादी काळापर्यंत निरंतर कायमस्वरूपी टिकून राहणारे व ज्याचा क्षय होत नाही (अक्ष -म्हणजेच क्षय न होणारे,अली – म्हणजेच देवस्वरूप ) असे ते म्हणजेच “अक्षाली” होय, भगवान श्रीकृष्ण हे श्री विष्णू यांचे रूप होत त्यांना या ब्रह्मांडाचा निर्माता म्हणजेच “ब्रम्ह” होय . म्हणजे ते जे चिरकाल निरंतर टिकून राहते त्याचा कधीही नाश होत नाही असे “अक्षयब्रम्ह” होय. हे विवाह बंधनात बांधलेल्या वधुवर चि. सौ.कां. अक्षाली व चि. साकेत यांच्या नावातून स्पष्ट होते. “

आपले बंधू धाकटे बंधू “प्रीतम शाह ” यांच्या साथीने, निरंतरपणे प्रचंड श्रम करून, स्वकर्तुत्वाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत,डेअरी व्यवसायात अदभूत गरुड झेप घेत “गोवर्धन” नावाचा सुप्रसिद्ध ब्रॅण्ड निर्माण केला. व भारतात नव्हे, तर भारताबाहेर जगाच्या बाजार पेठेत अनेक देशात,आपलें स्वतंत्र वेगळे वर्चस्व सिद्ध केले. तसेच सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती निरंतर अथक परीश्रम करून अनपेक्षित यश संपादन करू शकतो असा विश्वास पुढील युवा पिढीच्या मनात निर्माण केला.
आशिया खंडात आपल्या व्यवसायच्या माध्यमातून ज्यांना मिल्क मॅन या उपाधीने ओळखले जाते. ते पुणे जिह्यातील आंबेगाव तालुक्याचे सुपुत्र, प्रसिद्ध उद्योगपती “देवेंद्र शेठ” शाह यांची व्दितीय कन्या “अक्षाली” हिने लक्ष्मी च्या रूपाने गुप्ता परिवारातील चि.साकेत यांच्या जीवनात प्रवेश केला. यांचा अदभुत अप्रतिम असा विवाह सोहळा वैदिक मंत्रांच्या जयघोषात दोन्ही कुटुंबातील सांगेसोयरे आप्तेष्ठ नातेवाईक यांच्या उपस्थितीत देव ब्राम्हण माता पिता यांच्या शुभआशीर्वादाने मोठया उत्साहात देशाची संमृद्ध नगरी मुंबई येथे नुकताच पार पडला. या विवाह सोहळ्याप्रसंगी पारंपारीक रितिरिवाजाचे अनुकरण करून राजेशाही थाटात हा विवाह सोहळा संपन्न झाला

दरम्यान या विवाह सोहळ्यानिमित्त व तदनंतर झालेल्या कार्यक्रमात शाह परिवाराच्या आनंदात सहभागी होण्यासाठी सर्वसामान्य व्यक्ती पासून कला, क्रीडा शौक्षणिक तसेच राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर मंडळी उपस्थित होती. शाह परिवाराकडून झालेल्या सर्व कार्यक्रमामध्ये उपस्थित अतिथी चा योग्य सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रसंगी देशाचे कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, देशाचे माजी कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार, सौ प्रतिभा पवार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे (पाटील ), खासदार सुप्रियाताई सुळे, सौ. किरण ताई वळसे(पाटील), खासदार सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल,माजी खासदार शिवाजीराव आढळराव (पाटील )मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री बाळासाहेब थोरात,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,माजी आमदार गणेश नाईक आमदार सत्यजित तांबे, आमदार मंगल प्रभात लोढा, आमदार संग्राम जगताप, आमदार अशोकराव पवार, आमदार अतुल बेनके , यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
सामाजिक
आदिवासी भागातील शेतकऱ्याच्या शेतीचे पंचांनामे करून त्वरित नुकसान भरपाई द्यावी -मारुती केंगले

डिंभे दि. (प्रतिनिधी) आंबेगाव तालुक्याचे पश्चिम आदिवासी भागातील बळीराजाचे एकमेव उत्पन भात व हिरडा पिकांचे नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने प्रचंड नुकसान झाले असून याचे पंचांनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे वतीने मारुती केंगले यांनी केली आहे.
नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱऱ्यांच्या कुटुंबाच्या तोडचा घासच पाळवीला आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड अतोनात नुकसान होऊन शेतकरी देशोधडीला लागल्याचे दिसत आहे. अशा कठीण प्रसंगी शासकीय मदतीची शेतकऱ्यांना गरज आहे पण शासनाकडून अद्यापही कोणत्याही मदतीबाबत दिलासादायक घोषणा अद्यापहि झालेली नाही त्यामुळे ऐन दीपावळीच्या काळात अनेकांची घरे दिव्यांनी उजाळालेली असतील परंतू महाराष्ट्रातील बळीराजच्या घरात अंधार असेल अशीच काही परिस्थिती दिसत आहे.
तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात एकमेव पिक भात शेती आणि हिरडा हिरड्याला बाजार भाव आता सध्या १०० रुपये इतका भाव आहे परंतू आदिवासी भागात पावसामुळे हिरडा पीक मोठ्याप्रमानावर सडून खराब झाले आहे. मे ते ऑक्टोबर सलग ५ महिच्या कालावधित झालेल्या मुसळधार पावसामुळे भातपिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊन भात पीक वाया गेले आहे तर अनेक ठिकाणी भातशेती पावसामुळे सडून गेली आहे.त्यामुळे पिकांची पंचनामे करून आदिवासी शेतकऱ्याला मदतीचा हात मिळावा यासाठी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले तालुक्याचे तहसिलदार कार्यालयास दिले असून निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी साहेब. प्रांत अधिकारी गोविंद शिंदे साहेब आंबेगाव तालुक्याचे आमदार व माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांना देण्यात आले असून याबाबत त्वरित कार्यवाही ना झाल्यास नाजिकच्या काळात शेकऱ्यांच्या हितासाठी भिमाशंकर रस्त्यावर तीव्र आंदोलनाचा इशारा केंगले यांनी दिला आहे.
सामाजिक
जांभोरी येथे कुस्ती तालीम इमारत भूमिपूजन सोहळा संपन्न

घोडेगाव दि (प्रतिनिधी ) जांभोरी (ता आंबेगाव)पासून जवळच असलेल्या माचीचीवाडी या ठिकाणी कुस्तीसाठी तालीम इमारतिचा भूमिपूजन समारंभ उत्साहात पार पाडला
आजच्या धाकधकीच्या काळात तरुणांई मोबाईल व गेम यात अडकून ना रहाता शारीरिक तंदृस्तीकडे आकर्षित व्हावी या हेतूने सुरु होत असलेल्या कुस्ती तालीम इमारतीसाठी येथील वसंत वालकोळी,बबन केंगले, भिवा वालकोळी, अनंता वालकोळी, यांनी ११गुंठे जमीन दिली आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री सहकारमंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील यांनी दहा लाख रुपयांचा निधी तालमीच्या प्रत्यक्ष बांध कामासाठी मंजूर केला आहे यासाठी आदिवासी भागाचे नेते सुभाषराव मोरमारे साहेब संजय गवारी, प्रकाश घोलप, यांनी परीश्रम घेतले आहेत
दरम्यान जांभोरी गावचे लोकनियुक्त सरपंच सुनंदाताई पारधी, पोलिस पाटील नवनाथ केंगले, पोलिस पाटील सोनाली पोटे, ज्ञानेश्वर पारधी. पुनाजी पारधी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले, श्री व्यंकोजी कुस्तीगीर तालीम संघटना जांभोरीचे अध्यक्ष भिवा वालकोळी, शिवाजी केंगले , सखाराम केंगले, खरेदी विक्री संघाचे संचालक शामराव बांबळे, ग्रामपंचायत सदस्य दुंदा भोकटे, ग्रामपंचायत सदस्य शिवराम केंगले,किसन पोटे, अनंता वालकोळी, सुनिल वालकोळी, नामदेव भोकटे, घोडेगाव पोलिस शिवाजी जनार्दन केंगले, सुरेश केंगले,संजय केंगले, ग्रामसेवक सुनिल पारधी, कृषी सेवक सुनिल लोहकरे, भिवा केंगले, चंद्रकांत केंगले, पांडुरंग केंगले,राज केंगले,गफुरशेठ तांबोळी,सर्व जांभोरी ग्रामस्थ उपस्थित होते.
सामाजिक
हजारो कोस दूर असूनही संकटप्रसंगी आपल्या मायभूमीतील माणसांच्या मदतीला धावणारी आंबेगावची कन्या….सौ.माधुरी श्रीकांत पवार

मंचर दि. (प्रतिनिधी) -“नवदुर्गेचा सन्मान तू…परोपकारची खाण तू…. सर्वांचा अभिमान तू…….श्री शक्तीचा मान तू…… जन्मभूमीची ठेवी जाण तू”….. संपूर्ण महाराष्ट्रावर महा पुराचे संकट आले असताना हजारो कोस दूर अमेरिकेत असूनही आपल्या माय भूमितील आपल्या माणसांच्या मदतीसाठी धावणारी आंबेगाव ची कन्या “माधुरी ताई ” हि खरोखरच सर्वांचे प्रेरणादायी स्थान ठरली आहे.
गेल्या काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने थैमान माजविले असून यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून संपूर्ण महाराष्ट्रातील शेकडो कुटुंबे महापुराच्या तडाख्याने रस्त्यावर आली आहेत. महाराष्ट्रात निर्माण झालेल्या महापुराणे अनेक जण बेघर झाले आहेत अशा हतबल परिस्थितीत परोपकारच्या शिकवणीतून निर्माण झालेल्या माधुरी श्रीकांत पवार यांनी आपल्या मायभूमीचे पांग फेडण्याचा प्रयत्न केला आहे. तिच्या या निर्णयाने तिच्या जन्मदात्या मातापित्याचे उर अगदी अभिमानाने भरून आले असेल यात शंका नाही
आपल्या माय भूमितील आपल्या माणसाबद्द्ल मधुर्याचा ओलावा असलेल्या माधुरी ताईने तीला शक्य होईल तेव्हढी मदत करीत आपले कर्तव्य बाजावण्याचा प्रयत्न केला आहे. ती आपल्या संभाषणात सांगते कि,
“मी “माधुरी श्रीकांत पवार”महाराष्ट्रातील अतिवृष्टी मुळे झालेल्या पूरग्रस्त घटना व नुकसान टीव्हीवर पाहत होते खूप वाईट वाटत होते, तसेच व्हाट्सअप वर वळसे पाटील साहेबांनी केलेल्या आवहानामुळे माझ्या जन्मभूमीत असलेल्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीने माझ्या शेतकऱ्यांची फार मोठ्या प्रमाणात हानी झाली. सर्वात मोठे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यांना मी माझे आदर्श व सतत समाजाचा विचार करणारे माननीय दिलीपराव वळसे पाटील साहेब माजी गृहमंत्री यांच्या प्रेरणेने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना छोटीशी मदत माझ्या कृतीप्रमाणे पाठवीत आहे.”
खरेतर “माधुरी ताई” यांनी केलेली मदत हि पुरांनातील त्या टिटवीची आठवण करून देते कि जिने आपल्या मुलांना वाचविण्यासाठी समुद्र अटविण्याचा निर्धार केला शेवटी परमेश्वराला हि येऊन तिची मदत करावी लागली. आज या ताईंनी केलीली मदत हि अनेकांना आपल्या मायभूमी बद्द्लचे कर्तव्य बजावण्याची शिकवण देते यात शंका नाही. हा देश माझा आहे या देशाला देव भूमी म्हटले गेले आहे या ठिकाणी जन्म मिळणे हि खरेतर सन्मानांची गोष्ट आहे. माधुरी यांनी केलेले हे कार्य सर्वांसाठी एक शिकवण आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यामुळे माधुरी पवार यांच्या प्रमाणे आपापल्या परीने मदत करा.चला सारे एक होऊया आपल्या देश बांधवांना पुन्हा उभे करण्यासाठी मदतीचा हात देऊया…..
-
राजकीय2 years ago
वीस वर्षांपूर्वी राजकारणात स्वतःला सिद्ध करण्यासाठी वेगळे झालेले “त्रिदेव”, पुन्हा आंबेगावच्या आसमंतात एकत्रित झळकणार
-
राजकीय1 year ago
“टायगर इज बॅक” शिरुर लोकसभेच्या मैदानात खळबळ माजणार..!
-
राजकीय11 months ago
वळसे पाटील यांना मोठा धक्का : शरद बँकेचे संचालक जयसिंग थोरात यांचा शरद पवार गटात जाहीर प्रवेश
-
राजकीय2 years ago
आयात उमेदवारांपेक्षा निष्ठावंतांना संधी द्या; उद्योगपती देवेंद्र शहा यांच्या नावाची शिरूर लोकसभेसाठी चर्चा…….
-
राजकीय12 months ago
आंबेगाव मध्ये महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर : निवडणुकीत सहभाग न घेण्याचा शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचा निर्णय
-
राजकीय1 year ago
अढळरावांनी, वळसे पाटलांची भेट घेऊन केली चौकशी
-
राजकीय1 year ago
भोसरी विधानसभा क्षेत्रातील असंख्य नाराज कार्यकर्ते भाजपाला ठोकणार रामराम: उबाठा सेनेत करणार प्रवेश?
-
सामाजिक1 year ago
“माणसात देव शोधत, सर्वसामान्यांच्या हितासाठी प्रयत्नशील राहणारा, माणसातील “देवमाणूस”….