singa8

rp8888

singa8

slot demo

slot qris

singa8

rp8888

https://bertrodriguez-museum.org

https://journal.uecommercebintaro.ac.id/

singa8

singa8

singa8

singa8

singa8

singa8

singa8

singa8

92GLORY

http://vecas.org.vn/id/

https://admire.ch/vendor/

Connect with us

सामाजिक

कथाकथित पुढारी व काही संघटनांचे स्वार्थी पदाधिकारयांमुळे आंबेगावाच्या अर्थकरणाला बसतेय खिळ…

Published

on

मंचर दि. (प्रतिनिधी ) सध्या आंबेगाव तालुक्यात कार्यरत असलेल्या संस्थावर काही राजकीय व्यक्ती अथवा काथा कथित संघटना अनअकलनीय बेछुट आरोप करून बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे आरोप किती? खरे, किती? खोटे यापेक्षा या आरोपांमुळे, तालुक्यातील संस्थांच्या नावाला बट्टा लावून राजकीय मंडळी आपली राजकीय पोळी भाजण्याचा घाणेरडा प्रयत्न होत असल्याचे दिसत आहे. 

म्हणतात ना… युद्धात व राजकारणात सर्व काही माफ असते हे जरी खरे असले तरी, कोणतेही युद्ध किंवा राजकारण नीतिमत्तेला धरूनच खेळले जावे अशी शिकवण या भारत वर्षात या अगोदर झालेल्या संत महापुरुषांनी दिली. देव व दैत्य कुळापासुन देव दानवांचे वैर होते परंतु ती युद्धे सुद्धा नितीने खेळली गेली अशी पूरानांमध्ये अनेक उदाहरणे आहेत.

सध्या राज्यात विधान सभा निवडणुकींचा काळ सुरु झाला आहे. त्यामुळे  आंबेगाव तालुक्यात विधानसभा निवडणुकीचा धुराला उडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे विरोधक सत्ताधाऱ्यांची  शक्तीस्थळे निकामी करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे. सत्ताधाऱ्यांची शक्तीस्थळे म्हणजे तालुक्यातील विविध संथा होत आंबेगाव तालुक्यात बँक पतसंस्था दूध उद्योग, शेतीप्रक्रिया उद्योग शौक्षणिक संस्था तसेच आदी विविध कंपन्या काम करीत आहेत. यावर सत्ताधाऱ्यांचे वर्चस्व असले तरी यांच्यावर बेछुट आरोप करणे गैरच आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

जुन्या पिढीतील अनेक व्यक्तींनी  तालुक्याच्या उन्नतीसाठी या संस्थाची स्थापना केली. परंतु आज या संस्थाच्या माध्यमातून तालुक्यातील अर्थकारण मोठ्या प्रमानावर सुरु आहे आज आंबेगाव तालुक्यातील शेकडो सुशिक्षित तरुण व त्यांची कुटुंबे  या संस्थावर अवलंबून आहेत. कदाचित यासंस्था तालुक्यात कार्यरत नसत्या तर या तालुक्याची स्थिती एखाद्या उजाड माळराणापेक्षा वेगळी नसती. तालुक्यात शेती व्यतिरिक्त दुसरे कोणतेही रोजंदारीचे साधन उपलब्ध नसते. आपल्या जवळच्या तरुणांना रोजगारासाठी इतरत्र जावे लागले असतें ही वस्तुस्थिती नकारता येणार नाही. असे असताना या संस्थाबाबत असलेली आपली लढाई न्यायालय अथवा शासन दरबारी लढण्याऐवजी कसलाही विचार ना करता या संस्थाच्या कामाविषयी त्यांच्या क्षमते विषयी व्यवस्थित शहानिषा न करता आरोप केले जातं आहेत या तालुक्याच्या दृष्टीने योग्य नाही अशी चर्चा सर्वत्र असून या बाबत कानोसा घेऊन कोणत्याही राजकारण्याने विचार पूर्वक पाऊले उचलणे गरजेचे आहे.

दरम्यान राज्यातील काही नेते तालुक्यातील कथाकथित पुढारी व काही संघटनाच्या स्वार्थी पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून या संस्थावर जाहीर चिखल फेक करीत आहेत यातून या संस्थावर त्याचा परिणाम होऊन त्याने तालुक्याच्या अर्थाकरणाचे नुकसान होत आहे. याची कदाचित त्या कथाकथित पुढारी व संघटनाच्या लालची पदाधिकाऱ्यांना  नसावी. निवडणुका आल्या कि जातं धर्म पंथ आदि विषयांवर राजकारण करणारे राजकीय नेते जर तालुक्यातील संस्थांनाच्या मुळावर घाव घालत असतील व या चाललेल्या बेबंद शाहिला जर त्या संस्थामधील काम करणारा व्यक्ती मुकुटने सहन करीत असेल तर तो काम करणारा व त्या संस्थेवर अवलंबून असणारा कर्मचारी खाल्लेल्या ताटात घाण करतो आहे असे म्हणणे वावागे ठरणार नाही. जी शेतजमीन आपणाला अन्न देते तिला आपण आईचा दर्जा देतो. मग ज्या संस्थेच्या जीवावर आपल्या कुटुंबाचा उदार निर्वाह चालतो तिच्या प्रति आपली काही जबाबदारी नाही का? याचा विचार होणे आवश्यक् आहे. व तो तालुक्यातील प्रत्येक नागरिकांने करावायाची गरज आहे.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सामाजिक

शासनाने “आद्य क्रांतिवीर होनाजी केंगले” यांचे जांभरी येथे राष्ट्रीय स्मारक बांधवे,: जागतिक आदिवासी दिनानिमित्त मागणी

Published

on

भीमाशंकर दि (प्रतिनिधी)आदिवासी समाज्याच्या न्याय हक्कासाठी आपल्या रक्ताचे बलिदान देणाऱ्या वीर  क्रांतिकारक होनाजी केंगले, बिरासा मुंडा तसेच राघोजी भांगरे यांच्या स्मुर्ती जपत जागतिक आदिवासी क्रांती दिन जांभोरी ता. आंबेगाव येथे  मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

 इंग्रजी सत्तेच्या विरोधात बंड पुकारत गरीब दिन दुबळ्या आदिवासी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देत रक्त सांडणाऱ्या  आदिवासी क्रांतिकारकांची जन्मभूमी जांभोरी हे गाव असून आदिवासी समाज्याचा धाण्या वाघ आदिवासी क्रांतिकारक होनाजी केंगले. बिरसा मुंडा राघोजी भांगरे निसर्गवासी माजी सभापती शंकरराव विठ्ठल केंगले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करून त्यांच्या स्मृतीना आवाहन करण्यासाठी येथील दूध डेअरी पासून आद्यक्रांतिकारक होनाजी केंगले यांच्या स्मारकपर्यंत प्रचंड  रैली काढण्यात आली.

दरम्यान या वेळी प्रतिमेचे पूजन करताना जांभोरी गावच्या सरपंच सुनंदाताई पारधी.उपसरपंच बबन केंगले. पोलिस पाटील नवनाथ केंगले. बिरसा ब्रिगेड शाखा जांभोरीचे अध्यक्ष सुनिल गिरंगे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले. लखन पारधी. सागर काठे. शिक्षक पतसंस्थेचे आंबेगाव तालुका सभापती संजय केंगले. विकास पोटे. भिमा केंगले. शांताराम केंगले. दत्ता गिरंगे. किसन शेळके. पेसा अध्यक्ष मारुती केंगले. अंकुश गिरंगे. मिना केंगले. लताबाई केंगले. राजेंद्र उभे. दिगंबर केंगले. गणपत काठे. तंटामुक्ती अध्यक्ष नामदेव भोकटे. निवृत्ती केंगले. निलेश गिरंगे. नितीन गिरंगे. विठ्ठल पारधी कांताराम केंगले लक्ष्मण केंगले बबन केंगले . जांभोरी गावचे सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. 

त्याचप्रमाणे जांभोरी गाव हे आदिवासी क्रांतिकारकांची जन्मभूमी म्हणुन ओळखली जाते. याठीकाणी होनाजी केंगले यांचे स्मारक शासनाने निर्माण करावे अशी मागणी जांभोरी ग्रामस्थानी शासन दरबारी केली असून तत्कालीन मुख्यमंत्री. एकनाथराव शिंदे साहेब. तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब. तत्कालीन सहकारमंत्री गृहमंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब माजी खासदार शिवाजी दादा आढळराव पाटील साहेब खासदार डॉ. अमोल कोल्हे साहेब यांना निवेदन गेल्या वर्षी देण्यात आल्या असून शासन दरबारी पाठपुरावा केला जात आहे याबाबत शासनाने तात्काळ दखल घेऊन जांभोरी येथे राष्ट्रीय स्मारक बांधवे ज्यामुळे भावी पिढीला या आदिवासी क्रांतिकारकाच्या त्यागाची व बलिदानाची  गाथा समजेल व यातून पुढील युवा पिढीत देशभक्ती  वाढीस लागेल  

दरम्यान या कार्यकामाचे आयोजन बिरसा ब्रिगेड शाखा जांभोरी. जांभोरी ग्रामविकास फाऊंडेशन जांभोरी.ग्रामविकास प्रतिष्ठान जांभोरी नांदुरकीचीवाडी. व्यंकोजी दूध उत्पादक सहकारी संस्था जांभोरी. ग्रामपंचायत कार्यालय जांभोरी. यांनी केले. कार्यक्रमानिमित आदिवासी दिवसाबद्दल माहिती विकास पोटे यांनी सांगितली तर सुत्र संचालन अंकूश गिरंगे यांनी केले.

Continue Reading

सामाजिक

“हिरडा खरेदी” आणि “भीमाशंकर” रस्त्याच्या दुरवस्थेवरून, संतप्त आदिवासी जनतेकडून तळेघर येथे रास्ता रोको

Published

on

मंचर दि.(प्रतिनिधी): श्री क्षेत्र भीमाशंकर रस्त्याची दुरावस्था व  त्याचप्रमाणे हिरड्याची बंद असलेली खरेदी यांसह विविध मागण्यासाठी  तळेघर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट), बिरसा ब्रिगेड, अखिल भारतीय किसान सभा आणि ट्रायबल फोरम यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 

आदिवासी बांधवांचे उपजीविकेचे प्रमुख साधन असलेल्या हिरड्याची बंद असलेली खरेदी योग्य किंमतीने तातडीने सुरू करावी त्याचप्रमाणे श्री क्षेत्र भीमाशंकर रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली. सध्या श्रावण मास सुरु असलेल्याने देशाच्या कानकोपऱ्यातून लाखो शिवभक्त शिवज्योर्तिलिंगाचे दर्शनासाठी येत आहेत. परंतू भीमाशंकरकडे जाणाऱ्या  रस्त्याची मोठ्याप्रमानावर दुरावस्था झाली असून, या रस्त्याची दुरुस्ती करावी, या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.आंदोलनात मोठ्याप्रमानावर आदिवासी बांधव सहभागी झाले होते

दरम्यान आदिवासी विकास विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनादरम्यान  कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी घोडेगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम,तालुकाध्यक्ष धोंडीभाऊ भोर, महिला अध्यक्ष पूजा वळसे, युवक अध्यक्ष विशाल वाबळे, किसान सभेचे सचिव अशोक पेकारी, बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष संतोष तिटकारे, ट्रायबल फोरमचे अध्यक्ष सखाराम हिले, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब बाणखेले, सदानंद शेवाळे (पाटील),शेतकरी नेते माउली ढोमे, पुरुषोत्तम फदाले, शिवराम केंगले, दीपक चिमटे,के. के. तिटकारे, गणेश खाणदेशी, कृष्णा वडेकर, लखन पारधी उपस्थित होते.

“हिरडा खरेदीसाठी हमीभाव मिळावा” 

माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी हिरडा खरेदीसाठी हमीभाव मिळावा आणि खरेदी लवकरसुरू व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वारंवार बैठका घेतल्या. तसेच मंचर-भीमाशंकर रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विकास विभागाला आदेश दिल्यापासून तात्पुरते खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले आहे, अशी माहिती माजी पंचायत समिती सभापती आणि आदिवासी नेते संजय गवारी यांनी दिली.

Continue Reading

सामाजिक

अडिवरे येथे “आदिवासी स्त्रीयांसाठी मोफत आरोग्य शिबीर संपन्न”.

Published

on

डिंभे दि (प्रतिनिधी)- आदिवासी स्त्रियांचे  आरोग्य सुधारण्यासाठी आडीवरे ता. आंबेगाव येथे स्त्रियांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यांस महिलाकडून उत्कृष्ठ प्रतिसाद मिळाल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अमोल अंकुश यांनी दिली.

  आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी पश्चिम पाट्यातील डिंभे धरणाच्या आतील बाजूस दुर्गम भागात असलेल्या आडीवरे येथील  प्राथमिक आरोग्य केंद्रावर अडिवरे  स्त्री रोग निदान आणि उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात विशेषतः पावसाळ्यात आदिवासी भागा मध्ये शेतात काम करणाऱ्या महिला वर्गा मध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या त्वचेचे आजार व साथी चे आजार  पायांना कुहे होने,सर्दी,ताप,डोके दुखी, सांधे दुखी, हिमोग्लोबिन कमी होने ई. आजारा च्या तपासण्या सदर करून महिलांना मोफत औषधोपचार करण्यात आले. यात सुमारे ९३ महिलांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या.

दरम्यान या शिबिराचे उद्घाटन आदिवासी सेवक मा.शंकरराव मुदगुन यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते मा.अमोल अंकुश मार्गदर्शनाखाली करण्यात आले या शिबिरास मा.चंद्रकांत बांबळे सेवा निवृत्त कर्मचारी संघटना अध्यक्ष, मा.सखाराम गभाले (बाजार समिती संचालक) मा.संगिता किर्वे ( सरपंच), मा.रामदास भोकटे, जावजी कोकणे ई मान्यवर उपस्थित होते.

 शिबिरामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र अडिवरे येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दशरथ चौरे आणि डॉक्टर प्रथमेश भोर यांनी महिलांच्या विविध आजाराविषयी माहिती देऊन त्यांच्या आरोग्य समस्या विषयी मार्गदर्शन केले या शिबिरासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र अडिवरे येथील आरोग्य निरीक्षक श्री गोविंद भारमळ.आरोग्य निरीक्षक ( हिवताप विभाग ) श्री अजय बोराडे. आरोग्य सहायिका श्रीमती विजया शिंदे. आरोग्य सेवक श्री दत्ता कंठाळे रामचंद्र असवले आरोग्य सेविका श्रीमती पोटे मॅडम, उघडे मॅडम, गिरे मॅडम सर्व आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक श्रीमती वंदना तळपे, स्वाती कोकणे यांचे सहकार्य मिळाले. शिबिरासाठी महा लॅब मंचर यांच्यावतीने प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून अविनाश पारधी यांनी काम पाहिले 

Continue Reading
Advertisement

Trending

Best Replica Watches UK

Copyright © 2024 BobhataNews.in