राजकीय
“पूर्वापार” सुरु असलेल्या वळसे घराण्याच्या राजकारणाचे तिसऱ्या पिढीतील “पूर्वा” यांचे माध्यमातून “नवीन ध्यासाने,नवे पर्व” सुरु होणार का?

मंचर दि (प्रतिनिधी ) पूर्वापार राजकारणाच्या क्षितिजावार असणाऱ्या वळसे घरण्याच्या तिसऱ्या पिढीच्या “पुर्वां “यांचे माध्यमातून नवीन ध्यासाने “नारी सक्षमी करणाचे नवे “पर्व” सुरु होणार? खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली राजकीय धडे घेणाऱ्या युवा नेत्या पूर्वा वळसे गावोगावी जाऊन आंबेगाव शिरूर तालुक्यातील मतदारांसोबत संवाद साधात असल्याचे दिसत आहे.

आंबेगाव तालुक्याच्या राजकारणात वळसे घराण्याचे वर्चस्व पूर्वापार सुरु असून या घरण्याची तिसरी पिढी राजकारणात समाविष्ठ होत आहे.असे सांगितले जाते कि, राज्याचे सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांचे वडील माजी आमदार कै.दत्तात्रय वळसे पाटील हे तात्कालीन राज्याचे मुख्यमंत्री शरद पवार यांचे जवळचे सहकारी त्याकाळात शरद पवारांना तालुक्यातून साथ देणाऱ्या खंदे समर्थकामध्ये माजी आमदार कै. दत्तात्रय वळसे पाटील होत व यांच्या खांदयाला खांदा लावून काम करणारे माजी आमदार बी डी काळे, विठ्ठलराव चिखले,हरी नारायण भोर,प्रकाशशेठ शाह, कानडे मुरलीधर, म्हातारबा जाधव, बाबुराव ढोबळे, बाबुराव थिटे, , बाबुराव बांगर, बाबुराव शेटे, विठ्ठलराव बाणखेले, रामभाऊ थोरात, माधवराव धुमाल, सावंत पाटील, महादू दामू भोर, गोपाळराव बारवे,हागवणे पाटील दत्तू(आबा)काळे, गेनबाबा काळे सूर्यकांत शाह, बी.डी. काळे, सतू हरी मंडलिक, रामकृष्ण बोऱ्हाडे, इंदाराम राक्षे, गाडेकर गुरुजी केंगले गुरुजी आदी मंडळींचा तालुक्याच्या जडण घडणीत मोलाचा वाटा होता.

दरम्यान माजी खासदार किसनराव बाणखेले यांनी तीन वेळा विधानसभेत प्रवेश केला या काळात एकदा कै.दत्तात्रय वळसे पाटलांचा किसनराव बाणखेले यांचेकडून पराभव झाला होता त्यावेळी दत्तात्रय वळसे यांनी आभार सभेत पुन्हा विजयी झाल्याशिवाय टोपी घालणार नाही अशी प्रतिज्ञा केली असल्याचे जुन्या पिढीच्या नागरिकांकडून सांगितले जाते. त्यानंतर तात्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वामध्ये नियोजन करीत १९८९च्या निवडणुकीत राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आंबेगाव विधान सभेत बाजी मारत राज्याच्या राजकारणात प्रवेश केला त्यानंतर आजातागायात त्यांनी प्रत्येक वेळी विधानसभेच्या रणसंग्रामात विरोधी पक्षातील उमेदवाराला धूळ चारली व आपला आंबेगावाचा किल्ला अभेदय ठेवला आहे.

दरम्यान तब्बल पस्तीस वर्षानंतर तालुक्याच्या राजकारणात वळसे घराण्याचा नवीन चेहरा पूर्वा यांच्या रूपाने पुढील नेतृत्व करण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. आगामी विधान सभा निवडणुकीत “नाईलाजास्तव” दिलीप वळसे पाटील निवडणूक लढाणार असल्याचे सांगितले जातं असले तरी, नवीन चेहरा म्हणून साहेबांची सुकन्या राष्टीय ग्रामीण संस्था संचालिका व आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेस च्या नेत्या “पूर्वा ” यांच्यारूपाने तालुक्याच्या राजकारणात नवीन नेतृत्व समाविष्ट होऊन “पूर्वा” यांच्या नवीन राजकीय पर्वाची राजकीय सुरुवात पुन्हा “नाईलाजास्तव” म्हणत होणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे.

आंबेगाव तालुक्यात महिला मतदान मोठ्या प्रमाणावर असून वळसे पाटील पूर्वा यांच्या रूपाने महिला उमेदवार देऊन स्त्री शक्तीला प्राधान्य दिले जाणार का? I आगामी काळात महिला वर्गाला केंद्रबिंदू ठेवून माहिला सक्षमिकरणाचा नारा देऊन तालुक्यातील महिलांचा विश्वास जिंकण्यात पूर्वा यशस्वी होणार का? जर यात पूर्वा यशस्वी झाल्या तर त्यांची पुढील राजकीय भावि्तव्य यशस्वी होऊ शकते व यात पूर्वा यांना हि निवडणूक सोयीची ठरवू शकते असे जाणकारांचे मत आहे.

त्याचप्रमाणे एकंदरीत पहात तालुक्याच्या विविध राजकीय सामाजिक क्षेत्रात पूर्वा यांचा असलेला सहभाग उल्लेखनीय आहे. सध्या पूर्वा या तालुक्यातील सर्व कला क्रीडा शौक्षणिक सामाजिक राजकीय कार्यक्रमात सक्रिय असून दररोज त्या गावोगावी जाऊन सर्वसामान्य जनतेमध्ये वावरत नागरिकांशी संवाद साधत मतदारांमध्ये विश्वास निर्माण करीत त्यांच्या अडिअडचणी सोडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु असे असले तरी फक्त भेटीगाठीतून तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या स्थानिक पातळीवरील अडिअडचणी सोडवून जनतेचा विश्वास संपादन करून समान्य जनतेसोबत नाळ जुळविण्यात त्या यशस्वी होतील का? असाही प्रश्न विचारला जातं आहे.

दरम्यान आगामी विधानसभेसाठी दिलीप वळसे पाटलानी आगामी विधानसभा निवडणूक लढाविणार असल्याचे जाहीर केले असले तरी त्यांनी आपल्या भाषणात “नाईलाजास्तव” या शब्दाची पुस्तिहि जोडली आहे. पुढे जाऊन नाईलाजावर योग्य इलाज शोधण्याचे त्यांनी अप्रत्यक्ष संकेतही दिले आहेत. असे म्हणणे वावगे ठरणार नाही. संपूर्ण आंबेगाव विधानसभा मतदार संघात “पूर्वा वळसे” यांचा मतदारांशी संपर्क मोठ्या प्रमाणावर सुरु असून सर्वत्र दौरे सुरु आहेत. आंबेगाव विधानसभा मतदार संघातील गावागावात वाडी वस्तीवर आयोजित कार्यक्रमामध्ये पूर्वा यांचा दौरा सुरु असून त्या मतदारा सोबत संपर्क करीत आहेत. यातून पूर्वा या संपूर्ण तालुका पिंजून काढीत नागरिकांचा विश्वास संपादन करीत आहेत. त्यांच्या सोबतीला दिलीप वळसे पाटील यांची विश्वासू टीम कार्यरत दिसत आहे.

संपूर्ण विधानसभा मतदार संघात “पूर्वा वळसे” यांच्या कार्य पद्धतीबद्दल नागरिकांनातून कमालीची उत्सुकता निर्माण होत असल्याचे चित्र दिसत आहे. तालुक्यात पहिल्यांदाच पूर्वा यांच्या रूपाने नारी शक्तीला तालुक्याच्या राजकारणात सक्रिय होण्याची संधी प्राप्त होत असल्याने तालुक्यातील महिला वर्गाकडून त्यांना कसा पाठींबा मिळतो याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यामुळे सध्याची राजकीय स्थिती पहाता आगामी विधानसभा निवडणुक हि आंबेगाव विधानसभा क्षेत्रात एक आगळीवेगळी स्थिती निर्माण होत असल्याचे चित्र दिसत आहे.एक युवा महिला नेतृत्व तालुक्याच्या राजकारणात प्रवेश करत असल्याने येणाऱ्या काळात तालुक्यातील जनता “पूर्वा वळसे” पाटलांच्या नेतृत्वास कसा? प्रतिसाद देणार व त्यासाठीच्या राजकीय गणिताची जुळवणूक वळसे पाटील कशी करणार? हे पहाणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे
राजकीय
हे कार्यकर्ते… “खरंच जनहितार्थी कि लाभार्थी”?

मंचर दि (प्रतिनिधी)राज्याच्या राजकारणात वळसे पाटलांना स्थान मिळाले नाही म्हणून वळसे पाटलांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी पक्ष नेतृत्वाकडे कोणतीही दाद मागण्या ऐवजी .आपल्या नेत्यावर अन्याय होऊनही निमूटपणे मूग गिळून गप्प बसणारे हे कार्यकर्ते वर्षानुवर्षे सत्तेचा लाडू चाखत असूनही जेव्हा नेत्यावर अन्याय अन्याय होतो. तरीही गप्प असतील तर ते खरंच जनहितार्थी लाभार्थी कि, स्वार्थी ?

राज्याच्या राजकारणात गेली पस्तीस वर्षे असणारे एकेकाळचे शरद पवार यांचे खंदे समर्थक दिलीप वळसे पाटील यांना यावर्षी मात्र राज्य मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नाही खऱ्या अर्थाने राज्याच्या उत्कर्षांसाठी नियोजनबद्ध काम करणाऱ्या व्यक्तीला महाराष्ट्र मुकाला असे म्हणावायास हरकत नाही कारण वळसे पाटलांनी ज्या खात्याचे काम पाहिले त्या खात्याचा कारभार उत्तम पप्रकारे करून खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील जनतेला न्याय दिला असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
या वेळी मात्र महायुतीच्या काळात त्यांना मंत्री मंडळातून डावळण्यात आले यामागे कोणतीही व काहीहि कारणे असतील. परंतु महाराष्ट राज्य एका चांगल्या व्यक्तीला प्रभावी व्यक्तिमहत्वाला मुकला हेही खरेच. वळसे पाटलांनी त्यांच्या कारकिर्दीत ज्या खात्याचे काम पाहिलं त्या खात्याची प्रगती झाली आहे इतिहास आहे. अशा कर्तृत्वान व्यक्तीला बाजूला ठेवणे हे पक्ष नेतृत्वाचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल.

दरम्यान राज्य मंत्रिमंडळ विस्तारात माजी मंत्री छगन भुजबळ यांचे नाव नाही म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र डोक्यावर घेतला ओ बि सी वर अन्याय झाला. असे सांगत पक्ष नेतृत्वावर आगपाखाड केली व आपण काहीही करू शकतो हे दाखवत पक्ष नेतृत्वाच्या निर्णयाचा निषेध केला व जोडे मारो आंदोलन करून धिक्कार हि अनेक कार्यकर्त्यांनी केला.परंतु आंबेगाव तालुक्यात मात्र वळसे पाठलांच्या कार्यकर्त्यांकडून साधा निषेधही नोंदवीला गेला नाही.
आंबेगाव,जुन्नर, खेड, शिरूर तालुक्यात वळसे पाटलांचे शेकडो कार्यकर्ते आहेत.परंतु वळसे पाटलांची मंत्री पदी वर्णी लागली नाही. यावर कार्यकर्त्याकडून मंत्रिपदच्या मागणीसाठी प्रचंड हल्लाबोल होणं गरजेचं होत. परंतु यावर बोलण्याचे धारिष्टय कोणत्याही कार्यकर्त्यामध्ये नाही. याचाच अर्थ वळसे पाटलांनी जे कार्यकर्ते जपले त्या कार्यकर्त्यांची भूमिका फक्त “टी फॉर टॅट” अशीच होती कि काय? असा प्रश्न विचाराला जातं आहे.
गेली अनेक वर्ष ते वळसेपाटलांच्या सोबत राहून समोर आल्यावर फक्त ” देखल्या देवाला दंडवत” घालत फक्त सत्तेचा मलिदा चाखणारे लाभार्थी कार्यकर्ते वळसे पाटलांजवळ होते हि सांगण्यासाठी कोण्या जोतिष्याची आवश्यकता नसावी. कारण वळसे पाटलांना डावलले जातं असताना त्यांच्या बाजूने खंबीर भूमिका घेत रस्त्यावर येण्याचे धाडस एकाही कार्यकर्त्यांने दाखविले नाही किंवा या लाभार्थी कार्यकर्त्यांना वळसे पाटलांना मंत्री पदापासुन डावळून त्याच्यावर अन्याय केला जातं आहे. असेही वाटले नाही. किंवा त्यांची बाजू पक्ष नेर्तृत्वासमोर मांडण्याची हिंम्मतहि कोण्या कार्यकर्त्यांची झाली नाही हि मोठी शोकांतिका आहे.
दरम्यान काल झालेल्या आभार मेळाव्यात एकमेकांची उणी दुनी काढून आपण किती समर्थक हे दाखविण्याची जणू स्पर्धाच सुरु होती. परंतु त्यात साहेबांवर पक्ष नेतृत्वाने अन्याय केला असून त्यावर पक्ष नेतृत्वाला जाब विचारावा असा साधा मुद्दाही कोणी मांडला नाही. खरंतर वळसे पाटलांना याची खंत नक्कीच असेल पण काय करणार? एकही कार्यकर्ता काहीच बोलला नाही यावरून असेच दिसते कि, साहेबांना मिळालेले बहुतांशी कार्यकर्ते फक्त जनहितार्थी नसून लाभार्थी आहेत का? अशा आशयाची चर्चा सर्वत्र सुरु आहे.
राजकीय
माजी खासदार शिवाजीराव आढळराव ठरताहेत? “किंगमेकर”

मंचर दि. (प्रतिनिधी) लोकसभेतील पराभवाचा वचपा काढत, खासदार अमोल कोल्हे यांचा शिरूरलोकसभा मतदार संघावर आपली एकहाती वर्चस्व निर्माण करण्याच्या संकल्पचा “अश्व” रोखून धरत,माजी खासदार शिवाजीराव आढळराव हे किंग मेकर ठरले असल्याची चर्चा सर्वत्र आहे.

विधानसभेची रणधुमाळी संपली, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले महायुतीत आनंदी आनंद साजरा होत असताना मात्र विधानसभा काळात शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे यांनी फोडलेल्या गगनभेदी डरकाळ्या पराभवाच्या गर्तेत शांत झाल्या या लोकसभा मतदार संघात विजयाची पताका फडकविणारे शिरूर लोकसभेचे खासदार व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे स्टार प्रचारक अमोल कोल्हे यांचे पश्चिम महाराष्ट्राचा ओ बी सी चा नेता होण्याचे स्वप्न मात्र धुळीलाच मिळाले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

मागील दोन लोकसभा निवडणुकीत माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांना पराजयाची धूळ चारणारे तसेच प्रती संभाजी म्हणून आपली प्रतिमा मालिकांच्या माध्यमातून तयार करून सर्वसामान्य जनतेच्या गळ्यातील ताईत झालेले, खासदार अमोल कोल्हे यांना यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी विधानसभेच्या रणांगणात मात देली व विधान सभेत आपल्याच विचाराचे लोकप्रतिनिधी विजयी करून शिरूर लोकसभेवर आपला वरचष्मा असल्याचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी दाखवून दिले असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.

लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर खासदार आढळराव थोडे बॅक फूट वर गेले होते. त्यांचे राजकारण मर्यादीत झाले. अशा अशयाच्या चर्चा देखील सर्वत्र झाल्या.परंतु नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत खासदार शिवाजीराव आढळराव यांनी प्रचंड कष्ट घेत आंबेगाव,शिरूर, भोसरी,जुन्नर व हडपसर येथे आपल्या विचाराचे प्रतिनिधी निवडून आणून खासदार कोल्हे यांना चांगलाच झटका दिला असल्याचे बोलले जाते.

दरम्यान जुन्नर, हडपसर, आंबेगाव भोसरी हे मतदार संघ विधानसभेत विरोधात जाणे म्हणजे कोल्हे यांच्या पुढील राजकीय वाटचालीच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे. असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यात कोल्हे यांना मतदारांनी लोकसभा मतदार संघात निवडून येताना जेव्हढी मते पडली त्या पेक्षा सुमारे दोन लाख कमी मते विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या वेळी आघाडीच्या उमेदवारांना मतदान झालेले आहे.

दरम्यान राज्याचे तात्कालीन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी दिलेली जबाबदारी माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी सार्थ करीत आपल्या विचाराचे उमेदवार निवडून आणले आहेत तर पुढील काळात खासदार कोल्हे यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी केलेल्या विविध घोषणा पूर्ण करणे करणे गरजेचे आहे. त्यात इंद्रायणी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, भोसरी ते खेड रस्ता या दोन गोष्टी उत्तर पुणे जिल्यातील मतदारांच्या दृष्टीने महत्वाच्या घोषणा आहेत. या घोषणा बाबत खासदार कोल्हे यांनी जागरूक राहून हि कामे युद्ध पातळीवर करणे त्यांच्या राजकीय सौख्याचे दृष्टीने गरजेचे आहे. परंतु केंद्रात व राज्यात विरोधी विचार सरणीचे सरकार असताना खासदार कोल्हे हे महत्व कांक्षी प्रकल्प कसे पूर्ण करणार? व शिरूरच्या जनतेला कसा? न्याय मिळवून देणार हे पहाणे कुतूहलचे ठरणार आहे.
राजकीय
“राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे फोटो शासकीय कार्यालयात लावावेत”:जेष्ठ नेते अशोक काळे यांची प्रशासनाकडे मागणी

मंचर दि(प्रतिनिधी) सत्य अहिंसा व शांततेचा भारताला नव्हे तर जगाला संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे फोटो व संदेश सर्व शासकीय नियमशासकीय कार्यालयांमध्ये त्वरित लावावे या मागणीचे निवेदन तहसीलदार आंबेगाव यांना काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोक आप्पा काळे पाटील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विजयराव आढारी यांनी दिले आहे.

जगाला शांततेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे फोटो सध्या तालुक्यामध्ये संपूर्ण शासकीय निमशासकीय कार्यालयात दिसत नाहीत गेले काही काळापासुन सर्व संस्थांमध्ये जगाला शांततेचा संदेश देणारे राष्ट्रपुरुष महात्मा गांधी यांचे फोटो व संदेश होते परंतु हे फोटो व संदेश काही दिवसापासून काही शासकीय कार्यालयांमधून हटवले गेलेले आहेत किंवा काढले गेलेले निदर्शनास येत आहे असे काळे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान सर्व शासकीय नियम शासकीय कार्यालयांमध्ये महात्मा गांधीजींचे फोटो व संदेश लावावे जावेत असे आवाहन केले असून या प्रसंगी पाटणचे उपसरपंच कुंडलिक कुंडलिक असवले त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य दगडू मते सुनील शेळके रामदास मते गणेश खानदेशी बाळासाहेब इंदोरे बंटी मोरडे आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
यासंदर्भातल्या निवेदनाच्या प्रती राष्ट्रपती द्रोपदी मुर्दौ राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते व काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे महाराष्ट्राचे राज्यपाल त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनाही पाठवले असून देशपातळीवरती व राज्य पातळीवरती या संदर्भामध्ये तातडीने कार्यवाही करावी व त्या दृष्टीने शासनाकडे पाठपुरावा करावा अशी विनंती ही संबंधित निवेदनामध्ये केलेले आहे.
दरम्यान याबाबत तालुका पातळीवर डिसेंबर अखेर कार्यवाही न झाल्यास राज्यघटनेनुसार परमपूज्य गांधींनी आखून दिलेल्या मार्गानुसार राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते ज्या शासकीय कार्यालयामध्ये परमपूज्य गांधीजींचा फोटो नसेल त्या ठिकाणी आंदोलन करण्याचा मानस व्यक्त केलेला आहे या संदर्भात पो स्टेशन घोडेगाव ग्रामीणरुग्णालया घोडेगाव रजिस्टर आँफीस प्रकल्प कार्यालय यांना निवेदन देण्यात आले आहे.
-
राजकीय1 year ago
वीस वर्षांपूर्वी राजकारणात स्वतःला सिद्ध करण्यासाठी वेगळे झालेले “त्रिदेव”, पुन्हा आंबेगावच्या आसमंतात एकत्रित झळकणार
-
राजकीय1 year ago
“टायगर इज बॅक” शिरुर लोकसभेच्या मैदानात खळबळ माजणार..!
-
राजकीय7 months ago
वळसे पाटील यांना मोठा धक्का : शरद बँकेचे संचालक जयसिंग थोरात यांचा शरद पवार गटात जाहीर प्रवेश
-
राजकीय1 year ago
आयात उमेदवारांपेक्षा निष्ठावंतांना संधी द्या; उद्योगपती देवेंद्र शहा यांच्या नावाची शिरूर लोकसभेसाठी चर्चा…….
-
राजकीय7 months ago
आंबेगाव मध्ये महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर : निवडणुकीत सहभाग न घेण्याचा शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचा निर्णय
-
राजकीय1 year ago
अढळरावांनी, वळसे पाटलांची भेट घेऊन केली चौकशी
-
राजकीय10 months ago
भोसरी विधानसभा क्षेत्रातील असंख्य नाराज कार्यकर्ते भाजपाला ठोकणार रामराम: उबाठा सेनेत करणार प्रवेश?
-
सामाजिक1 year ago
“माणसात देव शोधत, सर्वसामान्यांच्या हितासाठी प्रयत्नशील राहणारा, माणसातील “देवमाणूस”….
मा.संतोषभाऊ बोऱ्हाडे
September 24, 2024 at 5:18 pm
ज्यांचे वय झाले ज्यांना शरीर साथ देत नाही अशा व्यक्तीने आता थांबलं पाहिजे असं अजितदादा पवार म्हणतात .त्यानुसार दिलीप वळसे पाटलांनी थांबलं पाहिजे .हे जनतेचे मत आहे . राहिला प्रश्न पूर्वा वळसे चा सूर्योदय होऊन कधी सूर्यास्त होईल हे जनता दाखवून देईल . आणि पूर्वा कधी पश्चिमेला पोहोचतील हे कळणारही नाही .