Connect with us

सामाजिक

नेमकी “गद्दारी” करणं  म्हणजे काय?

Published

on

पुणे दि. (प्रतिनिधी)आंबेगाव च्या इतिहासात  एक अनोखी गोष्ट घडली “वळसे पाटलांना पाडा” असे जाहीर आवाहन देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी जाहीर सभेतून मतदारांना केले. खरंतर गद्दारांना पाडा असे म्हणणारे शरद पवार यांनी घेतलेला हा निर्णय किती योग्य व किती अयोग्य हा विचार मतदारांनी करावयाची वेळ आता आली आहे.

गेली अनेक वर्ष देशाच्या राजकारणात आपलें स्थान आढळ ठेवणारे शरद पवार आज जाहीर पणे वळसे पाटलांना पाडा असे म्हणतं आहेत हे  व्यासपीठावरून जरी योग्य वाटत असले तरी खरंच त्यांच्या या अवाहणास प्रतिसाद आंबेगावातील जनतेने दिला पाहिजे का? हाच खरां महत्वाचा विषय आहे.

कारण तालुक्यात बदल करण किंवा तोच प्रतिनिधी निवडणं हे सर्वस्वी तालुक्यातील सुजान मतदाराच्या हातात आहे. तो हक्क मतदार प्रमाणिकपणे बाजावतील यात शंका नाही. आज राज्यात साहेबाना सोडलं ही गद्दारी झाली असे भासविले जातं असले तरी काही वर्षा पूर्वी देखील राज्याचे मुख्यमंत्री होण्यासाठी शरद पवारांनी त्यावेळाचे नेते यशवंतराव चव्हाण यांच्या विरोधी भूमिका घेतली होती त्याला आपण काय? म्हणणार ती ही गद्दारीच होती ना? मग असे असताना शरद पवारांनी वळसे पाटलांना गद्दार म्हणणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा होणार नाहीत का?

दरम्यान साडेतीनशे वर्षापूर्वी गणोजी शिर्के यांनी छत्रपती संभाजी राजे सोबत केलेली गद्दारी केलेली महाराष्ट विसरला नाही असे सांगितले जाते. तर मग काही वर्षापूर्वी यशवंतराव चव्हाना बाबत झालेली गद्दारी तरी महाराष्ट कसा? विसरेल हेही महत्वाचे आहे. म्हणतात ना पेरलेले उगवते असाच काहीसा हा प्रकार म्हणावा लागेल नाही का?

आज कोणीही काहीही म्हणो परंतु १९९0अगोदर चा काळ  ज्या व्यक्तींनी पाहिला त्यांनी या तालुक्यातील दुष्काळ बेरोजगारी, आर्थिक असमतोल पाहिला आहे.ते पहाता वळसे पाटलांचे योगदान तालुक्यातील जनतेने विसरणे ही सुद्धा एक गद्दारीच ठरेलं असे म्हणणे वावगे ठरणार नाही का?

तालुक्यात अनेक नेत्यांच्या सभा होत आहेत होत राहणार परंतु आपल्या तालुक्याच्या हिताचे काय? हा विचार  जनतेने करायचा असतो तालुक्यात अनेक प्रश्न आहेत तालुक्यात एम आई  डी सी ची गरज आहे परंतु ही एम आय डी सी सुरु झाल्यावर तालुक्यातील प्रश्न सुटणार आहेत का? आज शेजारच्या अनेक तालुक्यातील शेतकरी या मुळे गाव सोडून वरागंदा झाला आहे. हे वास्तव आहे. काही खरेदी विक्री करणारे एजंट  या प्रकरणास हवा घालीत असले तरी एम आय डी सी ची  आंबेगाव तालुक्यात खरच गरजेची आहे का? हा विचार  होणे आवश्यक आहे.

दरम्यान शेजारी तालुक्याचे प्रश्न पहाता आंबेगाव तालुका खूप संपन्न आहे. असे सर्वांना जाणावेल परंतु शेवटी मतदार हा राजा आहे. त्याला त्यांचा मतदाणाचा हक्क आहे. व त्याने तो बजावला पाहिजे. परंतु, तो पूर्ण विचार करून….. कारण मतदानानंतर पुढील पाच वर्ष  हात चोळण्याशिवाय मतदार राजाच्या  हातात काहीच राहणार नाही हे नक्की, त्यामुळे विचार करा व मतदान करा…म्हणतात ना…. एकदा तोंडातून गेलेला शब्द व धनुष्यातून सुटलेला बाण परत घेता येत नाही तसेंच  एकदा केलेले मतदान पुन्हा पाच वर्षे तरी सुधारता येणार नाही म्हणूनच मतदान हे सर्व श्रेष्ठ दान आहे विचारपूर्वक करणे आवश्यक आहे 

Continue Reading
6 Comments

6 Comments

  1. Nilkanth Suresh Kale

    November 13, 2024 at 5:18 pm

    👌👌👌👌👌

    • Vikram Pandharinath Kale

      November 13, 2024 at 6:55 pm

      आंबेगाव ची सुज्ञ जनता ही विकास पुरुष नामदार दिलीपराव वळसे पाटीलचे मागे उभी आहे
      ⏰⏰

    • अशोक मोढवे

      November 14, 2024 at 12:28 am

      योग्य विचार मांडलेत आंबेगाव तालुक्यातील जनता सुज्ञान आहे या ठिकाणी दिलीपराव वळसे पाटीलच निवडून येणार

  2. Arvind Ramesh Ghodekar

    November 14, 2024 at 1:30 am

    अगदी बरोबर आहे एमआयडीसी ची तशी तालुक्याला गरज काय काही ठराविक लोक यासाठी आग्रही आहेत पण आंबेगाव शिरूर ची जनता सुज्ञ आहे तालुक्याचा विकास काय झाला आहे हे 1990 पासून पाहिलेली मांडली या तालुक्यात अजून आहेत

  3. Suyog

    November 14, 2024 at 3:12 am

    खुप छान विश्लेषण केलयं आपणं … पण तरी सुद्धा आंबेगाव ची जनता जर भावनिक होवुन मतदान करणार असेल तर त्यांच्या एवढे दुर्दैवी कोणचं नसतील

  4. Yash nandkar

    November 14, 2024 at 8:37 am

    100% सहमत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सामाजिक

“महिला बांधकाम कामगारांसाठी” शासनाकडून मिळणाऱ्या मदतीवर डल्ला मारणारे काथाकथित एजंट व पुढारी  म्हणजे “शिव” जन्मभूमीतील सध्याचे रांझ्याचे पाटील का?

Published

on

मंचर दि. (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या काळात एका महिलेवर अत्याचार करणाऱ्या पाटलाचे छत्रपतींनी हात पाय छाटले होते. परंतू त्याच छत्रपतींचे नाव घेऊन छत्रपती शिवरायांची जन्म भूमी असलेल्या जुन्नर तालुक्यात बांधकाम कामगार महिलांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या मदतीतून काही एजंटांनी व कथित गावपुढाऱ्यांनी हात ओले करण्याचा सपाटा लावला असताना या होणाऱ्या गैरव्यवहारावर प्रकाश झोत टाकणाऱ्या पत्रकारावर जीवघेणा हल्ला केला जातो व त्याच एजंटांची बाजू घेण्यासाठी काही कथित गाव पुढारी पत्रकारावर बेछुट खोटे आरोप करण्याचा प्रयत्न करतात हि खरी शरमेची गोस्ट बाब आहे 

दरम्यान सर्वसामान्य बांधकाम कामगारांचा आर्थिक स्थर उंचावण्यासाठी शासनाने बांधकाम कामगार योजना आणली या योजनेचा खरा अर्थ असा कि, रोजंदारीवर काम करणारे बांधकाम कामगार मजूर वर्गातील  कुटुंबाना आर्थिक सहाय्य मिळावे व यातून त्यांची मुले शिकुन सक्षम व्हावीत  या दृष्टीकोनातून शासनाने बांधकाम कामगानांच्या उत्कर्षासाठी आणलेल्या या योजनेचा काही एजंटांनी कथाकथित राजकीय पुढऱ्यांच्या आशीर्वादाने गोरस धंदा बनविल्याचा प्रकार समोर येत आहे.

सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यामध्ये सुरु असलेली बांधकाम कामगार योजनेमध्ये कामगारांना मिळणाऱ्या मदतीतून चांगली मोठी रक्कम कथाकथित एजंट लोकांना दयावी लागते व यात अनेक कथाकथित स्थानिक पुढाऱ्यांचा सहभाग असल्याचे बोलले जाते.व  हे कथाकथित गाव पुढारी समाजसेवेचा खोटा आवडत आणत गरिबांच्या टाळूवरील लोणी खात असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

     दरम्यान नुकत्याच एका इलेक्ट्रानिक वाहिनेने सुरु असलेल्या बांधकाम कामगार योजनेतील या गैरव्यवहाराचा भांडाफोड केला. या नंतर त्या पत्रकारावर काही एजंट लोक यांनी हल्ला  केला व काही कथित गाव पुढऱ्यांच्या मदतीने बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. व हि घटना छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्म स्थान असलेल्या जुन्नर तालुक्यात घडली.यामध्ये या राजकीय नेत्यांनी महिलांना त्रास दिल्याचा आरोप केला खरे तर हे गाव पुढारी ज्या नेत्याचे कार्यकर्ते आहेत त्याच नेत्याची एक क्लिप काही महिन्यापूर्वी प्रसारीत झाली होती.यामुळे जसा नेता तसा कार्यकर्ता अशी चर्चा नागरिक दाबक्या आवाजात करीत आहेत.

दरम्यान या कथाकथित पुढऱ्याच्या या लाजिरवान्या कृत्याचा सर्वच स्थरावरून निषेध केला जात असून . या प्रकरणाची उच्च स्तरीय कसून चौकशी करावी. सुरु असलेल्या या योजनेत खरंच किती बांधकाम कामगार आहेत का?  या सर्व बाबींची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे

Continue Reading

सामाजिक

ऊस उत्पादनाच्या वाढीसाठी “भीमाशंकर सह. साखर कारखान्याचे” ऊस लागवड धोरण जाहीर -अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांची माहिती

Published

on

मंचर दि. (प्रतिनिधी) भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे लागवड हंगाम २०२५-२६ साठी ऊस लागवडीचे धोरण जाहिर झाले असून त्याची अंमलबजावणी दि. १ जून २०२५ पासून करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.

 “उत्पादकता वाढ़ लक्ष योजना”

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीचे दृष्ठिने कारखान्यामार्फत “दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील ऊस उत्पादकता वाढ लक्ष २०२०” ही महत्वाकांक्षी ऊस विकास योजना राबविणेत येत आहे अशी माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष अँड.प्रदीप वळसे यांनी सांगितले

     भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माध्यमातून सुरु करण्यात येत असलेल्या या ऊस लागवड जाहीर धोरणबाबात   अधिक माहिती देताना बेंडे यांनी सांगितले की,  दि. १ जून २०२५ ते ३० ऑक्टोबर २०२५  पर्यंतच्या कालावधीमध्ये को.एम.०२६५ तर दि. १ जून २०२५ ते ३० एप्रिल २०२६ पर्यंतच्या कालावधीमध्ये   को.८६०३२ ऊस लागवडीस व नोंदीस परवानगी देण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे  दि. १ ऑगस्ट २०२५ ते ३० एप्रिल २०२६ अखेर पर्यंतच्या कालावधीमध्ये व्हीएसआय ०८००५ या ऊस लागवडीस परवानगी देण्यात आली आहे. दि. १ सप्टेंबर २०२५ ते ३० एप्रिल २०२६ अखेर पर्यंतच्या कालावधीमध्ये एम.एस. १०००१, को. ९०५७,  या ऊस लागवडीस परवानगी देण्यात आली आहे. को.व्हीएसआय १८१२१, फुले ऊस १५०१२, फुले ऊस १५००६, फुले ऊस १३००७, को.एम. ११०८२ इ. शिफारशीत ऊस लागवडीस दि. १ जून २०२५ ते दि. ३० एप्रिल २०२६ पर्यंत परवानगी देण्यात आली आहे.

              कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद व ऊस उत्पादक यांना मागणीप्रमाणे उपलब्धतेनुसार लागवड धोरणाप्रमाणे दि. १ जून २०२५ पासून बेणे वाटप करण्यात येणार आहे व खासगी ऊस लागवडीच्या नोंदी घेण्यात येणार आहेत. त्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस लागवड करावयाच्या क्षेत्राचा ७/१२ उतारा व आवश्यक कागदपत्रे पूर्तता संबधित विभागीय शेतकी कार्यालयात जाऊन करावी. खासगी ऊस लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी चार दिवसाचे आत संबंधित गट ऑफिसमध्ये जाऊन ऊस नोंद करावयाची आहे. 

दरम्यान उशीरा ऊस लागवड नोंद करणेस आलेल्या ऊस उत्पादकांची ऊस नोंदीसाठी आलेची तारीख हीच ऊस लागवड तारीख म्हणून नोंद करण्यात येईल. कारखान्यामार्फत कार्यक्षेत्र व परिसरामध्ये धोरणानुसार उधारीने / रोखीने राबविणेत येणाऱ्या ऊस विकास योजने अंतर्गत माती परीक्षण सुविधा, ताग बियाणे वाटप, ऊस बेणे वाटप,  रासायनिक खते पुरवठा, द्रवरुप जीवाणू खते, ऊस रोपे वाटप, खासगी ऊस लागवड अर्थसहाय्य, प्रेसमड, खोडवा व्यवस्थापनामध्ये पाचट कुट्टी सुविधा, ठिबक सिंचन योजना, व्हीएसआय उत्पादित मल्टीमायक्रोन्युट्रीएंट, मल्टीमॅक्रोन्युट्रीएंट, ह्युमक ॲसिड, वसंत उर्जा, जैविक कीटकनाशके बी.व्ही.एम., इ.पी.एन. इ. निविष्ठांचा पुरवठा, हंगामवार ऊस पीक स्पर्धा इ. ऊस विकास योजनांचा लाभ सर्व ऊस उत्पादकांनी घ्यावा.  ऊस पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेणेस इच्छुक  शेतकऱ्यांनी  प्रवेश शुल्क रक्कम रु.१००/-  डिसेंबर २०२५ अखेर भरणा करून स्पर्धेसाठी नाव नोंदणी करावी.

              त्याचप्रमाणे एकात्मिक कीड व्यवस्थापन योजनेमध्ये ऊस पिकामध्ये हुमणी कीडीचे नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी गोळा केलेले हुमणी कीडीचे भुंगेरे कारखान्यामार्फत प्रति किलो रु.३००/- प्रमाणे जून २०२५ अखेर खरेदी केले जाणार असून सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी हुमणीचे भुंगेरे गोळा करुन एकात्मिक हुमणी कीड नियंत्रण करावे. तरी वरील लागवड धोरणानुसार जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उसाची लागवड करावी व कारखाना ऊस विकास योजनांचा लाभ घ्यावा. ऊस विकास योजनेच्या अधिक माहितीसाठी विभागीय शेतकी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन  बेंडे यांनी केले आहे.

Continue Reading

सामाजिक

अवकाळी पावसाच्या नुकसानीचे आंबेगावमध्ये “तलाठी करणार पंचनामे” –  नायब तहसीलदार वाघ

Published

on

मंचर दि.29 (सदानंद शेवाळे): अवकाळी ऐन उन्हाळ्यात आलेल्या पावसामुळे आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम व पूर्व भागात मुसळधार पावसामुळे आंबा जांभूळ केळी मका बाजरी भुईमूग व पालेभाज्या वर्गीय पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे प्रत्येक गावातील गाव कामगार तलाठी आपापल्या सजातील नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करतील अशी माहिती आंबेगाव  तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार सचिन वाघ यांनी बोभाटा शी बोलताना दिली.

   मागील पंधरा दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे अनेक ठिकाणी बांध फुटले आहेत रस्ते वाहून गेले आहेत तर वीज पडल्याने कांदा बराखी  जळून गेली आहे पालेभाज्या वर्गीय पिके कोबी फ्लावर कोथिंबीर मेथी शापू सह अनेक पालेभाज्या पाण्यात पोहत आहेत.

 

संप काळातही “कृषी सहाय्यक” करणार पंचनामे 

 कामगार तलाठी आपापल्या सजा मध्ये पंचनामे करणार आहेत त्यांना सहाय्य करण्यासाठी सहाय्यक कृषी अधिकारी संपावर असतानाही आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत मदत करणार असल्याची माहिती घोडेगाव कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान आंबेगाव तालुक्यात  पूर्व भागात पाणी उपलब्ध असल्याने तालुक्यातील सुमारे 3 हजार 750 एकर क्षेत्रावर उन्हाळी बाजरी पिकाची पेरणी करण्यात आली होती  परंतू अवकाळी पावसाने  उन्हाळ्यात हमखास उत्पन्न देणारे बाजरीचे पीक भुईसपाट झाले आहे बाजरीच्या कणसांना चौरे ( कोंब ) फुटले आहेत तर जनावरांचा वाळलेल्या चारा वैरण पाण्यात भिजत आहे या वैरणीवर कुज व बुरशी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे   दुभत्या व भाकड जनावरांना हिवाळ्यात व उन्हाळ्यात  वाळलेल्या चाऱ्याची मोठी टंचाई यंदा भासणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.त्याचप्रमाणे  सुमारे दोन हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे अतोनात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे अशी माहिती तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

Continue Reading
Advertisement

Trending