Connect with us

राजकीय

“राज्य हातात द्या, महाराष्ट्राला गतवैभव प्राप्त करून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही”- शरद पवार 

Published

on

भोसरी दि (प्रतिनिधी);महाराष्ट्र राज्य हातामध्ये द्या ,तुम्हाला खात्री देतो महाराष्ट्राचा चेहरा बदलल्याशिवाय राहणार नाही. राज्याचे गतवैभव प्राप्त करून दिल्या शिवाय राहणार नाही असा एल्गार राष्ट्रवादी शरद पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भोसरी येथे केला 

महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे भोसरी विधानसभेचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ बुधवारी भोसरीतील गाव जत्रा मैदानावर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेनेचे उपनेते सचिन अहिर, राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तुषार कामठे, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, शिवसेना (उबाठा) शहराध्यक्ष ॲड. सचिन भोसले, आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष चेतन बेंद्रे, माजी महापौर आझम पानसरे, संजोग वाघिरे, माजी आमदार विलास लांडे , गौतम चाबुकस्वार, जगन्नाथ शेवाळे, ज्येष्ठ नेते प्रकाश बापू म्हस्के, शिवसेनेच्या पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, महाविकास आघाडी भोसरी मतदारसंघाचे उमेदवार अजित गव्हाणे ,पिंपरीच्या उमेदवार सुलक्षणा शीलवंत,  तसेच महाविकास आघाडीचे आणि माजी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पवार म्हणाले कि,महिलांचे संरक्षण, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, युवकांच्या हाताला काम अशा अनेक गोष्टी करायच्या आहेत.त्यासाठी तुमची भूमिका महत्त्वाची आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार बुधवारी भोसरी येथील सभेत म्हणाले. एकेकाळी देशात महाराष्ट्र क्रमांक एकचे राज्य होते. आज प्रत्येक बाबतीत महाराष्ट्राची घसरण सुरू आहे. गेल्या आठ वर्षाच्या भाजपच्या राजवटीत दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत महाराष्ट्र सातव्या क्रमांकावर फेकले गेले आहे .महाराष्ट्राला गतवैभव मिळवून द्यायचे असेल तर राज्य महाविकास आघाडीच्या हातात द्या महाराष्ट्राला पुन्हा गतवैभव दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी खात्री देखील शरद पवार यांनी दिली. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी मतदारसंघासाठी अतिशय पारखून उमेदवार दिले असून त्यांच्यासाठी निवडणूक हातात घ्या असे आवाहन देखील शरद पवारांनी या सभेमध्ये केले.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले कि, बरेच दिवसांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये सभेच्या निमित्ताने आलो आहे. एकेकाळी या शहराने संसदेत पाठवत देशाच्या संरक्षणाची मोठी जबाबदारी माझ्यावर दिली होती. महाराष्ट्राचा कारभार पाहताना कै. यशवंतराव चव्हाण, अण्णासाहेब मगर, श्री.घारे यांच्या मदतीने या शहरांमध्ये कारखानदारी आणली. महाराष्ट्राची जबाबदारी माझ्या हातात दिल्यानंतर साखर कारखाना, हिंजवडीतील आयटी कंपन्या अशा अनेक गोष्टी करता आल्या. सत्ता आपल्याकडे असताना आपण शहराचा कसा कायापालट करू शकतो हे याचे उदाहरण म्हणून पिंपरी चिंचवड शहराचे उदाहरण सांगता येईल. आज हिंजवडीमध्ये पाच लाखाहून अधिक लोक काम करत आहेत. कारखानदारी वाढली त्यातून शहर वाढले.नागरीकरण वाढले. त्यामुळे नवीन गोष्टी करायला येथे मर्यादा येत होत्या. कारखानदारी वाढवता येत नव्हती अशा वेळेला चाकण, जेजुरी, सासवड ,रांजणगाव, शिरवळ येथे कारखानदारी आणून पुण्याच्या आजूबाजूला देखील संपन्नता आणली.

 आपली नजर उपस्थित जनतेकडे फिरवत असताना त्यांच्या आवाजात प्रचंड गंभीरता अवतरली होती ते पुढे म्हणाले कि हि  स्थिती पुन्हा आणायची आहे . सहा महिन्यांपूर्वी देशाची निवडणूक होती. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगत होते आपल्याला 400 खासदार निवडून आणायचे आहे. आम्हाला आश्चर्य वाटले .300  खासदारांमध्ये सत्ता येऊ शकते. मग 400 खासदार भाजपला कशासाठी हवे आहेत. तेव्हा कळले यांना देशाच्या घटनेवर गदा आणायची आहे. सामान्य माणसाच्या अधिकारांवर नांगर फिरवायचा आहे म्हणून त्यावेळी आम्ही सर्व एकत्र आलो आणि देशाच्या घटनेवर होणारा हल्ला परतवून लावला. यामध्ये महाराष्ट्राचा अभिमान वाटला पाहिजे अशी कामगिरी महाराष्ट्राने केली .महाराष्ट्राने महायुतीला येथून हद्दपार केले.  30 हून अधिक आपल्या विचारांचे खासदार निवडून आणले हेच आता विधानसभा निवडणुकीमध्ये करायचे आहे 

शरद पवार पुढे म्हणाले गेली दहा वर्षे राज्यात भाजपची सत्ता आहे. यातील दोन वर्ष सोडली तर भाजपने सत्तेचे केंद्रीकरण करण्यावर लक्ष ठेवले. गेल्या आठ वर्षांमध्ये सत्तेचे केंद्रीकरण झाल्यामुळे भ्रष्ट व्यवस्था तयार झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रात अतिशय विदारक परिस्थिती आहे. महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. एकीकडे माझी लाडकी बहीण योजना राबवता आणि दुसरीकडे राज्यात 886 मुली गायब असल्याचा केंद्राचा अहवाल आहे. एका बाजूने बहीण लाडकी म्हणता.आणि दुसरीकडे आमच्या बहिणी कुठे गायब झाल्या हेच सत्ताधाऱ्यांना माहित नाही. महिलांना सन्मान, आधार आणि बळ देण्याची गरज आहे जे महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत.

पुणे शहर विद्येचे माहेरघर म्हटले जाते. शिक्षणाचा , शिक्षण संस्थांचा येथे विस्तार झाला. आमची मुले पदवीधर झाली आनंद आहे .मात्र आमच्या युवकांच्या हाताला काम नाही. त्यामुळे एक प्रकारची निराशा तरुण पिढीमध्ये आली आहे.  म्हणून महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर या युवकांना प्रोत्साहन म्हणून चार हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. महिला, शेतकरी, युवक यांना प्राधान्य देऊन महाराष्ट्राचे गतवैभव आपल्याला पुन्हा मिळवून द्यायचे आहे. त्यासाठी मतदारांना त्यांची भूमिका अतिशय काळजीपूर्वक पार पाडायची आहे असे देखील शरद पवार यांनी सांगितले . 

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

राजकीय

हे कार्यकर्ते… “खरंच जनहितार्थी कि लाभार्थी”?

Published

on

मंचर दि (प्रतिनिधी)राज्याच्या राजकारणात वळसे पाटलांना स्थान मिळाले नाही म्हणून वळसे पाटलांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी  पक्ष नेतृत्वाकडे कोणतीही दाद मागण्या ऐवजी .आपल्या नेत्यावर अन्याय होऊनही निमूटपणे मूग गिळून गप्प बसणारे हे कार्यकर्ते वर्षानुवर्षे सत्तेचा लाडू चाखत असूनही जेव्हा नेत्यावर अन्याय अन्याय होतो. तरीही गप्प असतील तर ते खरंच  जनहितार्थी लाभार्थी  कि, स्वार्थी ?

 राज्याच्या राजकारणात गेली पस्तीस वर्षे असणारे एकेकाळचे शरद पवार यांचे खंदे समर्थक दिलीप वळसे पाटील यांना यावर्षी मात्र राज्य मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नाही खऱ्या अर्थाने राज्याच्या उत्कर्षांसाठी नियोजनबद्ध काम करणाऱ्या व्यक्तीला महाराष्ट्र मुकाला असे म्हणावायास हरकत नाही कारण वळसे पाटलांनी ज्या खात्याचे काम पाहिले त्या खात्याचा कारभार उत्तम पप्रकारे करून खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील जनतेला न्याय दिला असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. 

या वेळी मात्र महायुतीच्या काळात त्यांना मंत्री मंडळातून डावळण्यात आले यामागे कोणतीही व काहीहि कारणे असतील. परंतु महाराष्ट राज्य  एका चांगल्या व्यक्तीला प्रभावी व्यक्तिमहत्वाला मुकला हेही खरेच. वळसे पाटलांनी त्यांच्या कारकिर्दीत ज्या खात्याचे काम पाहिलं त्या खात्याची प्रगती झाली आहे इतिहास आहे. अशा कर्तृत्वान व्यक्तीला बाजूला ठेवणे हे पक्ष नेतृत्वाचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल.

दरम्यान राज्य मंत्रिमंडळ विस्तारात माजी मंत्री छगन भुजबळ यांचे नाव नाही म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र डोक्यावर घेतला ओ बि सी वर अन्याय झाला. असे सांगत पक्ष नेतृत्वावर आगपाखाड केली व आपण काहीही करू शकतो हे दाखवत पक्ष नेतृत्वाच्या निर्णयाचा निषेध केला व जोडे मारो आंदोलन करून धिक्कार हि अनेक कार्यकर्त्यांनी केला.परंतु आंबेगाव तालुक्यात मात्र वळसे पाठलांच्या कार्यकर्त्यांकडून साधा निषेधही नोंदवीला गेला नाही.

आंबेगाव,जुन्नर, खेड, शिरूर तालुक्यात वळसे पाटलांचे शेकडो कार्यकर्ते आहेत.परंतु वळसे पाटलांची मंत्री पदी वर्णी लागली नाही. यावर कार्यकर्त्याकडून मंत्रिपदच्या मागणीसाठी प्रचंड हल्लाबोल होणं गरजेचं होत. परंतु  यावर बोलण्याचे धारिष्टय कोणत्याही कार्यकर्त्यामध्ये नाही. याचाच अर्थ वळसे पाटलांनी जे कार्यकर्ते जपले त्या कार्यकर्त्यांची भूमिका  फक्त “टी फॉर टॅट” अशीच होती कि काय? असा प्रश्न विचाराला जातं आहे. 

गेली अनेक वर्ष ते वळसेपाटलांच्या सोबत राहून समोर आल्यावर फक्त ” देखल्या देवाला दंडवत” घालत फक्त  सत्तेचा मलिदा चाखणारे लाभार्थी कार्यकर्ते वळसे पाटलांजवळ होते हि सांगण्यासाठी कोण्या जोतिष्याची आवश्यकता नसावी. कारण वळसे पाटलांना डावलले जातं असताना त्यांच्या बाजूने खंबीर भूमिका घेत रस्त्यावर येण्याचे धाडस एकाही कार्यकर्त्यांने दाखविले नाही किंवा या  लाभार्थी  कार्यकर्त्यांना  वळसे पाटलांना मंत्री पदापासुन डावळून त्याच्यावर अन्याय केला जातं आहे.  असेही वाटले नाही. किंवा त्यांची बाजू पक्ष नेर्तृत्वासमोर मांडण्याची हिंम्मतहि कोण्या कार्यकर्त्यांची झाली नाही हि मोठी शोकांतिका आहे.

दरम्यान काल झालेल्या आभार मेळाव्यात एकमेकांची उणी दुनी काढून आपण किती समर्थक हे दाखविण्याची जणू स्पर्धाच सुरु होती. परंतु त्यात साहेबांवर पक्ष नेतृत्वाने अन्याय केला असून त्यावर पक्ष नेतृत्वाला जाब विचारावा असा साधा मुद्दाही कोणी मांडला नाही. खरंतर वळसे पाटलांना याची खंत नक्कीच असेल पण काय करणार? एकही कार्यकर्ता काहीच बोलला नाही यावरून असेच दिसते कि,  साहेबांना मिळालेले बहुतांशी कार्यकर्ते फक्त जनहितार्थी नसून लाभार्थी आहेत का? अशा आशयाची चर्चा सर्वत्र सुरु आहे.

Continue Reading

राजकीय

माजी खासदार शिवाजीराव आढळराव ठरताहेत? “किंगमेकर”

Published

on

मंचर दि. (प्रतिनिधी) लोकसभेतील पराभवाचा वचपा काढत, खासदार अमोल कोल्हे यांचा शिरूरलोकसभा मतदार संघावर आपली एकहाती वर्चस्व निर्माण करण्याच्या संकल्पचा “अश्व” रोखून धरत,माजी खासदार शिवाजीराव आढळराव हे किंग मेकर ठरले असल्याची चर्चा सर्वत्र आहे.

 विधानसभेची रणधुमाळी संपली, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले महायुतीत आनंदी आनंद साजरा होत असताना मात्र विधानसभा काळात शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे यांनी फोडलेल्या गगनभेदी डरकाळ्या पराभवाच्या गर्तेत शांत झाल्या या लोकसभा मतदार संघात विजयाची पताका फडकविणारे शिरूर लोकसभेचे खासदार व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे स्टार प्रचारक अमोल कोल्हे यांचे पश्चिम महाराष्ट्राचा ओ बी सी चा नेता होण्याचे स्वप्न मात्र धुळीलाच मिळाले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

मागील दोन लोकसभा निवडणुकीत माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांना पराजयाची धूळ चारणारे तसेच प्रती संभाजी म्हणून आपली प्रतिमा मालिकांच्या माध्यमातून तयार करून सर्वसामान्य जनतेच्या गळ्यातील ताईत झालेले, खासदार  अमोल कोल्हे यांना यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी विधानसभेच्या रणांगणात मात देली व विधान सभेत आपल्याच  विचाराचे लोकप्रतिनिधी विजयी करून शिरूर लोकसभेवर आपला वरचष्मा असल्याचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी दाखवून दिले असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.

लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर खासदार आढळराव थोडे बॅक फूट वर गेले होते. त्यांचे राजकारण मर्यादीत झाले. अशा अशयाच्या चर्चा देखील सर्वत्र झाल्या.परंतु नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत खासदार शिवाजीराव आढळराव यांनी प्रचंड कष्ट घेत आंबेगाव,शिरूर, भोसरी,जुन्नर व हडपसर येथे आपल्या विचाराचे प्रतिनिधी निवडून आणून खासदार कोल्हे यांना चांगलाच झटका दिला असल्याचे बोलले जाते.

दरम्यान जुन्नर, हडपसर, आंबेगाव भोसरी हे मतदार संघ विधानसभेत विरोधात जाणे म्हणजे कोल्हे यांच्या पुढील राजकीय  वाटचालीच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे. असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यात कोल्हे यांना मतदारांनी लोकसभा मतदार संघात निवडून येताना जेव्हढी मते पडली त्या पेक्षा सुमारे दोन लाख कमी मते विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या वेळी आघाडीच्या उमेदवारांना  मतदान झालेले आहे.

दरम्यान  राज्याचे तात्कालीन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी दिलेली जबाबदारी माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी सार्थ करीत आपल्या विचाराचे उमेदवार निवडून आणले आहेत तर पुढील काळात खासदार कोल्हे यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी केलेल्या विविध घोषणा पूर्ण करणे करणे गरजेचे आहे. त्यात इंद्रायणी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, भोसरी ते खेड रस्ता या दोन गोष्टी उत्तर पुणे जिल्यातील मतदारांच्या दृष्टीने महत्वाच्या घोषणा आहेत. या घोषणा बाबत खासदार कोल्हे यांनी जागरूक राहून हि कामे युद्ध पातळीवर करणे त्यांच्या राजकीय सौख्याचे दृष्टीने गरजेचे आहे. परंतु केंद्रात व राज्यात विरोधी विचार सरणीचे सरकार असताना खासदार कोल्हे हे महत्व कांक्षी प्रकल्प कसे पूर्ण करणार? व  शिरूरच्या जनतेला कसा? न्याय मिळवून देणार हे पहाणे कुतूहलचे ठरणार आहे.

Continue Reading

राजकीय

“राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे फोटो शासकीय कार्यालयात लावावेत”:जेष्ठ नेते अशोक काळे यांची प्रशासनाकडे मागणी 

Published

on

मंचर दि(प्रतिनिधी) सत्य अहिंसा व शांततेचा भारताला नव्हे तर जगाला संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे फोटो व संदेश सर्व शासकीय नियमशासकीय कार्यालयांमध्ये त्वरित लावावे या मागणीचे निवेदन तहसीलदार आंबेगाव यांना काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोक आप्पा काळे पाटील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विजयराव आढारी यांनी दिले आहे.

जगाला शांततेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे फोटो सध्या तालुक्यामध्ये संपूर्ण शासकीय  निमशासकीय  कार्यालयात दिसत नाहीत गेले काही काळापासुन सर्व संस्थांमध्ये जगाला शांततेचा संदेश देणारे राष्ट्रपुरुष महात्मा गांधी यांचे फोटो व संदेश होते परंतु हे फोटो व संदेश काही दिवसापासून काही शासकीय कार्यालयांमधून हटवले गेलेले आहेत किंवा काढले गेलेले निदर्शनास येत आहे असे काळे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

 दरम्यान सर्व शासकीय नियम शासकीय कार्यालयांमध्ये महात्मा गांधीजींचे फोटो व संदेश लावावे जावेत असे आवाहन केले असून या प्रसंगी पाटणचे उपसरपंच कुंडलिक कुंडलिक असवले त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य दगडू मते सुनील शेळके रामदास मते गणेश खानदेशी बाळासाहेब इंदोरे बंटी मोरडे आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

 यासंदर्भातल्या निवेदनाच्या प्रती  राष्ट्रपती द्रोपदी मुर्दौ  राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते व काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे महाराष्ट्राचे राज्यपाल त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनाही पाठवले असून देशपातळीवरती व राज्य पातळीवरती या संदर्भामध्ये तातडीने कार्यवाही करावी व त्या दृष्टीने शासनाकडे पाठपुरावा करावा अशी विनंती ही संबंधित निवेदनामध्ये केलेले आहे.

दरम्यान याबाबत तालुका पातळीवर डिसेंबर अखेर कार्यवाही न झाल्यास राज्यघटनेनुसार परमपूज्य गांधींनी आखून दिलेल्या मार्गानुसार  राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते ज्या शासकीय कार्यालयामध्ये परमपूज्य गांधीजींचा फोटो नसेल त्या ठिकाणी आंदोलन करण्याचा मानस व्यक्त केलेला आहे या संदर्भात पो स्टेशन घोडेगाव ग्रामीणरुग्णालया घोडेगाव रजिस्टर आँफीस प्रकल्प कार्यालय यांना निवेदन देण्यात आले आहे.

Continue Reading
Advertisement

Trending