सामाजिक
अवसरी बुद्रुक येथे “कला अविष्कार चित्र व शिल्प प्रदर्शनाचे आयोजन” : प्रदर्शनाला नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद….

मंचर दि (प्रतिनिधी) अवसरी बुद्रुक येथील विद्या विकास मंदिर माध्य व उच्च माध्य विद्यालय या विद्यालयातील कलाशिक्षक श्री. संतोष चव्हाण सर यांच्या संकल्पनेतून कलाविष्कार चित्र आणि शिल्प प्रदर्शनाचे आयोजन आले होते .प्रदर्शनास नागरिकांणाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला

उत्तर पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रथमच प्रथमच दि.25 जाने ते 27 जाने. या काळात तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी ” कलाशिक्षक आणि विद्यार्थी यांच्या कलाकृतीचे कलाविष्कार चित्र आणि शिल्प प्रदर्शनाचे आयोजन आले होते .या प्रदर्शनाचे उदघाटन साई चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य मा.श्री.दत्ता ठुबे सर यांचे शुभहस्ते करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष श्री.विष्णू काका हिंगे पाटील कार्यकामाच्या अध्यक्ष स्थानी होते. तर प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी श्री.भास्कर हांडे सर ( वैश्विक आर्ट गॅलरी नेदरलँड) , सिटीस्केप आर्टीस्ट श्री. गणेश पोखरकर, हे प्रमुख पाहुणे होते.

दरम्यान महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री. किरण सरोदे सर, पुणे जिल्हा कलाशिक्षक संघाचे अध्यक्ष श्री. मिलिंद शेलार सर, आंबेगाव तालुका कलाशिक्षक संघाचे अध्यक्ष श्री. भानुदास बोऱ्हाडे सर, आंबेगाव तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. विनोद बोंबले सर , विद्या विकास मंदिर अवसरी बु.विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री. नानासाहेब पाटील सर आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध विषयावर आणि विविध माध्यमातून चित्रे साकारली आहेत.
कलाशिक्षक श्री संतोष चव्हाण सर आणि विद्यालयातील विद्यार्थ्यांनी तसेच आंबेगाव तालुक्यातील काही कलाशिक्षक व विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आणि विविध माध्यमातून साकारलेल्या 250 चित्र व शिल्प कलाकृतींचा कलाविष्कार प्रदर्शनाच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे. व यात प्रामुख्याने निसर्ग चित्रे,व्यक्ती चित्रे, वस्तू चित्रे याबरोबरच सामाजिक विषयांवरील चित्रे तसेच अमूर्त व आधुनिक शैलीची चित्रे जलरंग, पोस्टर रंग, ॲक्रॅलिक, ऑईल पेस्टल, क्रेऑन यां सोबतच तैलचित्र देखील साकारली आहेत. त्याचप्रमाणे विद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री. आदेश शहा यांची 50 काष्ठ शिल्प या प्रदर्शनात मांडण्यात आली होती.
कोरोना नंतर शाळा रेग्युलर सुरू झाल्या परंतु मुलांमध्ये शिक्षणाच्या बाबतीत पठारावस्था आलेली आहे. मुलांना यातुन बाहेर काढून शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी मुलांना रंगांच्या सानिध्यात आणून त्यांच्यात उत्साह निर्माण करण्याच्या हेतूने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून विद्यालयाने ग्रामीण भागात अशा प्रकारचा अतिशय स्तुत्य आणि यशस्वी उपक्रम राबविला आहे.
यासाठी संस्थेचे अध्यक्ष, श्री. विष्णू काका हिंगे, उपाध्यक्ष – श्री. योगेश शेठ चव्हाण, उपसचिव श्री. दिपकशेठ चवरे, संचालक- श्री. अजित वाडेकर, शिवशंभो प्रतिष्ठान अवसरी बु. यांचे विशेष सौजन्य लाभले.आणि ग्रामपंचायत अवसरी बु यांचे विशेष सहकार्य लाभले. या प्रसंगी श्री.सचिन वाघ साहेब, मंचर पोलीस स्टेशन चे श्री. डावखर साहेब आणि शिंदे साहेब, पुणे जिल्हा कलाध्यापक संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री. श्रावण जाधव सर, भाजप चे जिल्हाध्यक्ष जनसेवक श्री.संजयभाऊ थोरात साहेब, आंबेगाव तालुका कांग्रेस कमेटी चे अध्यक्ष राजु इनामदार, मयूर मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री. हरिदास रामवत सर, पुणे जिल्हा उपप्रमुख श्री. अजितराव चव्हाण, शिवाजीराव आढळराव पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. राजु आढळराव सर, आदी मान्यवरांनी त्याचप्रमाणे विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक व शिक्षक, ग्रामस्थ, पालक , माजी विद्यार्थी यांनी सदिच्छा भेटी देवून विद्यालयाने राबविलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.
त्याचप्रमाणे शिंगवे, पारगाव, निरगुडसर, लांडेवाडी , घोडेगाव या शाळांचे कलाशिक्षक व विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या.या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे.
सामाजिक
आदिवासी भागातील शेतकऱ्याच्या शेतीचे पंचांनामे करून त्वरित नुकसान भरपाई द्यावी -मारुती केंगले

डिंभे दि. (प्रतिनिधी) आंबेगाव तालुक्याचे पश्चिम आदिवासी भागातील बळीराजाचे एकमेव उत्पन भात व हिरडा पिकांचे नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने प्रचंड नुकसान झाले असून याचे पंचांनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे वतीने मारुती केंगले यांनी केली आहे.
नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱऱ्यांच्या कुटुंबाच्या तोडचा घासच पाळवीला आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड अतोनात नुकसान होऊन शेतकरी देशोधडीला लागल्याचे दिसत आहे. अशा कठीण प्रसंगी शासकीय मदतीची शेतकऱ्यांना गरज आहे पण शासनाकडून अद्यापही कोणत्याही मदतीबाबत दिलासादायक घोषणा अद्यापहि झालेली नाही त्यामुळे ऐन दीपावळीच्या काळात अनेकांची घरे दिव्यांनी उजाळालेली असतील परंतू महाराष्ट्रातील बळीराजच्या घरात अंधार असेल अशीच काही परिस्थिती दिसत आहे.
तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात एकमेव पिक भात शेती आणि हिरडा हिरड्याला बाजार भाव आता सध्या १०० रुपये इतका भाव आहे परंतू आदिवासी भागात पावसामुळे हिरडा पीक मोठ्याप्रमानावर सडून खराब झाले आहे. मे ते ऑक्टोबर सलग ५ महिच्या कालावधित झालेल्या मुसळधार पावसामुळे भातपिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊन भात पीक वाया गेले आहे तर अनेक ठिकाणी भातशेती पावसामुळे सडून गेली आहे.त्यामुळे पिकांची पंचनामे करून आदिवासी शेतकऱ्याला मदतीचा हात मिळावा यासाठी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले तालुक्याचे तहसिलदार कार्यालयास दिले असून निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी साहेब. प्रांत अधिकारी गोविंद शिंदे साहेब आंबेगाव तालुक्याचे आमदार व माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांना देण्यात आले असून याबाबत त्वरित कार्यवाही ना झाल्यास नाजिकच्या काळात शेकऱ्यांच्या हितासाठी भिमाशंकर रस्त्यावर तीव्र आंदोलनाचा इशारा केंगले यांनी दिला आहे.
सामाजिक
जांभोरी येथे कुस्ती तालीम इमारत भूमिपूजन सोहळा संपन्न

घोडेगाव दि (प्रतिनिधी ) जांभोरी (ता आंबेगाव)पासून जवळच असलेल्या माचीचीवाडी या ठिकाणी कुस्तीसाठी तालीम इमारतिचा भूमिपूजन समारंभ उत्साहात पार पाडला
आजच्या धाकधकीच्या काळात तरुणांई मोबाईल व गेम यात अडकून ना रहाता शारीरिक तंदृस्तीकडे आकर्षित व्हावी या हेतूने सुरु होत असलेल्या कुस्ती तालीम इमारतीसाठी येथील वसंत वालकोळी,बबन केंगले, भिवा वालकोळी, अनंता वालकोळी, यांनी ११गुंठे जमीन दिली आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री सहकारमंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील यांनी दहा लाख रुपयांचा निधी तालमीच्या प्रत्यक्ष बांध कामासाठी मंजूर केला आहे यासाठी आदिवासी भागाचे नेते सुभाषराव मोरमारे साहेब संजय गवारी, प्रकाश घोलप, यांनी परीश्रम घेतले आहेत
दरम्यान जांभोरी गावचे लोकनियुक्त सरपंच सुनंदाताई पारधी, पोलिस पाटील नवनाथ केंगले, पोलिस पाटील सोनाली पोटे, ज्ञानेश्वर पारधी. पुनाजी पारधी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले, श्री व्यंकोजी कुस्तीगीर तालीम संघटना जांभोरीचे अध्यक्ष भिवा वालकोळी, शिवाजी केंगले , सखाराम केंगले, खरेदी विक्री संघाचे संचालक शामराव बांबळे, ग्रामपंचायत सदस्य दुंदा भोकटे, ग्रामपंचायत सदस्य शिवराम केंगले,किसन पोटे, अनंता वालकोळी, सुनिल वालकोळी, नामदेव भोकटे, घोडेगाव पोलिस शिवाजी जनार्दन केंगले, सुरेश केंगले,संजय केंगले, ग्रामसेवक सुनिल पारधी, कृषी सेवक सुनिल लोहकरे, भिवा केंगले, चंद्रकांत केंगले, पांडुरंग केंगले,राज केंगले,गफुरशेठ तांबोळी,सर्व जांभोरी ग्रामस्थ उपस्थित होते.
सामाजिक
हजारो कोस दूर असूनही संकटप्रसंगी आपल्या मायभूमीतील माणसांच्या मदतीला धावणारी आंबेगावची कन्या….सौ.माधुरी श्रीकांत पवार

मंचर दि. (प्रतिनिधी) -“नवदुर्गेचा सन्मान तू…परोपकारची खाण तू…. सर्वांचा अभिमान तू…….श्री शक्तीचा मान तू…… जन्मभूमीची ठेवी जाण तू”….. संपूर्ण महाराष्ट्रावर महा पुराचे संकट आले असताना हजारो कोस दूर अमेरिकेत असूनही आपल्या माय भूमितील आपल्या माणसांच्या मदतीसाठी धावणारी आंबेगाव ची कन्या “माधुरी ताई ” हि खरोखरच सर्वांचे प्रेरणादायी स्थान ठरली आहे.
गेल्या काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने थैमान माजविले असून यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून संपूर्ण महाराष्ट्रातील शेकडो कुटुंबे महापुराच्या तडाख्याने रस्त्यावर आली आहेत. महाराष्ट्रात निर्माण झालेल्या महापुराणे अनेक जण बेघर झाले आहेत अशा हतबल परिस्थितीत परोपकारच्या शिकवणीतून निर्माण झालेल्या माधुरी श्रीकांत पवार यांनी आपल्या मायभूमीचे पांग फेडण्याचा प्रयत्न केला आहे. तिच्या या निर्णयाने तिच्या जन्मदात्या मातापित्याचे उर अगदी अभिमानाने भरून आले असेल यात शंका नाही
आपल्या माय भूमितील आपल्या माणसाबद्द्ल मधुर्याचा ओलावा असलेल्या माधुरी ताईने तीला शक्य होईल तेव्हढी मदत करीत आपले कर्तव्य बाजावण्याचा प्रयत्न केला आहे. ती आपल्या संभाषणात सांगते कि,
“मी “माधुरी श्रीकांत पवार”महाराष्ट्रातील अतिवृष्टी मुळे झालेल्या पूरग्रस्त घटना व नुकसान टीव्हीवर पाहत होते खूप वाईट वाटत होते, तसेच व्हाट्सअप वर वळसे पाटील साहेबांनी केलेल्या आवहानामुळे माझ्या जन्मभूमीत असलेल्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीने माझ्या शेतकऱ्यांची फार मोठ्या प्रमाणात हानी झाली. सर्वात मोठे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यांना मी माझे आदर्श व सतत समाजाचा विचार करणारे माननीय दिलीपराव वळसे पाटील साहेब माजी गृहमंत्री यांच्या प्रेरणेने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना छोटीशी मदत माझ्या कृतीप्रमाणे पाठवीत आहे.”
खरेतर “माधुरी ताई” यांनी केलेली मदत हि पुरांनातील त्या टिटवीची आठवण करून देते कि जिने आपल्या मुलांना वाचविण्यासाठी समुद्र अटविण्याचा निर्धार केला शेवटी परमेश्वराला हि येऊन तिची मदत करावी लागली. आज या ताईंनी केलीली मदत हि अनेकांना आपल्या मायभूमी बद्द्लचे कर्तव्य बजावण्याची शिकवण देते यात शंका नाही. हा देश माझा आहे या देशाला देव भूमी म्हटले गेले आहे या ठिकाणी जन्म मिळणे हि खरेतर सन्मानांची गोष्ट आहे. माधुरी यांनी केलेले हे कार्य सर्वांसाठी एक शिकवण आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यामुळे माधुरी पवार यांच्या प्रमाणे आपापल्या परीने मदत करा.चला सारे एक होऊया आपल्या देश बांधवांना पुन्हा उभे करण्यासाठी मदतीचा हात देऊया…..
-
राजकीय2 years ago
वीस वर्षांपूर्वी राजकारणात स्वतःला सिद्ध करण्यासाठी वेगळे झालेले “त्रिदेव”, पुन्हा आंबेगावच्या आसमंतात एकत्रित झळकणार
-
राजकीय1 year ago
“टायगर इज बॅक” शिरुर लोकसभेच्या मैदानात खळबळ माजणार..!
-
राजकीय11 months ago
वळसे पाटील यांना मोठा धक्का : शरद बँकेचे संचालक जयसिंग थोरात यांचा शरद पवार गटात जाहीर प्रवेश
-
राजकीय2 years ago
आयात उमेदवारांपेक्षा निष्ठावंतांना संधी द्या; उद्योगपती देवेंद्र शहा यांच्या नावाची शिरूर लोकसभेसाठी चर्चा…….
-
राजकीय12 months ago
आंबेगाव मध्ये महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर : निवडणुकीत सहभाग न घेण्याचा शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचा निर्णय
-
राजकीय1 year ago
अढळरावांनी, वळसे पाटलांची भेट घेऊन केली चौकशी
-
राजकीय1 year ago
भोसरी विधानसभा क्षेत्रातील असंख्य नाराज कार्यकर्ते भाजपाला ठोकणार रामराम: उबाठा सेनेत करणार प्रवेश?
-
सामाजिक1 year ago
“माणसात देव शोधत, सर्वसामान्यांच्या हितासाठी प्रयत्नशील राहणारा, माणसातील “देवमाणूस”….