Connect with us

सामाजिक

“पराग”(गोवर्धन) समुहाचे, बांधकाम उद्योगात दमदार पदार्पण…! मंचर येथे पूजन डेव्हलपर्स च्या “औरम” प्रकल्पाची उत्साहात सुरुवात…!!!

Published

on

मंचर दि. (प्रतिनिधी) उगवत्या सूर्याच्या सुवर्ण छटा मुळे जसे विश्व् सुवर्णमयी किरणांनी उजाळून टाकावे त्याच प्रमाणे सर्वसामान्य व्यक्तीचे जीवन्मान उंचावण्याच्या दृष्टीने मंचर ता आंबेगाव  येथे पराग (गोवर्धन ) समूहाचे चेअरमन देवेद्र शाह यांनी पूजन डेव्हलोपर्स चे माध्यनातून  “ऑरम” या प्रकल्पाची सुरुवात करून बिल्डर उद्योगात  पदार्पण केले आहे.

” उद्घाटनाचे दिवशीच नागरिकांकडून मोठया प्रमाणात बुकिंगला प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती प्रकल्पाचे संचालक पूजन शाह यांनी दिली “

सर्वच व्यक्ती उद्योग व्यवसायासाठी शहरी भागाची निवड करतात परंतू देवेंद्र शाह यांनी नेहमीच प्रामुख्याने ग्रामीण भागाताच नवीन व्यवसायाची सुरुवात करून त्यात यशस्वी झाले आहेत. यातून ग्रामीण भागात उद्योग व्यवसाय सुरु होऊन ग्रामीण भागातील तरुण पिढीला आपले गाव सोडून शहरी भागात जायला लागू नये कारण त्यामुळे त्या मागे असणाऱ्या त्या तरुणांच्या मुले पत्नी आई वडील यांना त्रास सहानुभूती करावा लागतो त्यापेक्षा ग्रामीण भागातील तरुण पिढीला आपल्या परिसरात नोकरी अथवा व्यवसायास वाव मिळवून दिला तर ग्रामीण भाग सक्षम होईल व यातूनच सक्षम देश होईल असे देवेंद्र शाह यांना वाटते.

दरम्यान आपल्या कुटुंबाचे जीवन्मान उंचवावे यासाठी ग्रामीण भागात नोकरी अथवा व्यवसाय करणारा राहणारा व्यक्ती आपल्या मुलांचे जीवन माण उंचवण्यासाठी आपले कुटुंब शहरात नेतो व स्वतः मात्र आपल्या नोकरी व्यवसायासाठी  शहरातून  आपल्या व्यवसायाच्या अथवा नोकरीच्या ठिकाणी ये जा करतो त्यामुळे ग्रामीण भागातच त्यांच्या कुटुंबाला सर्व सुविधा मिळून त्यांचे कुटुंबाचे जीवन मान उंचवावे यासाठी मंचर याठीकाणी या सर्वसुविधा युक्त प्रकल्पची सुरुवात करण्यात आली असल्याचे शाह यांनी सांगितले

ग्रामीण भागातील नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास न करता याच नैसर्गिक साधन संपत्ती मानवाच्या दृष्टीने उपयोग करीत पूजन डेव्हलोपर्स या  नावाने मंचर येथे सुरु केलेल्या “ऑराम” प्रकल्पामध्ये  सर्वसामान्य जनतेचे जीवनमान उंचावान्याचा दृष्टीने विविध सुविधा दिल्या आहेत यामुळे या ठिकाणी राहणाऱ्या कुटुंबाची जीवनशैली उंचावेल व आकर्षक किमतीमध्ये सर्व सुविधा युक्त घरे सर्व समान्य कुटुंबातील व्यक्तींना परवडेल या किंमत्तीमध्ये देण्यात येणार आहेत यात विविध सुविधा देण्यात येणार असून यात प्रामुख्याने प्रकल्पला आकर्षक द्वार व या ठिकाणी पाण्याच्ये आकर्षक फवारे, तसेच कलब हाऊस तसेच विविध कार्यक्रमासाठी हॉल, प्रशस्त मोकळ्या हवेची जागा, खेळासाठी मैदान, निसर्गाच्या सानिध्यात डोंगरी पाऊलवाट, विविध मनमोहक वृक्षाची फुल झाडांनी युक्त आकर्षक वनराई, चोहोबाजूने मनाला प्रसन्नता व आनंद निर्माण करणाऱ्या आकर्षक डोंगरी  टेकाड्यांचे समूह,निसर्गरम्य दृश्य डेक, या नैसर्गिक सुविधा सोबत कॉफ़ी शॉप, व्यायाम शाळा(जिम) सोबत बॅटमींटन, योगा, धावपट्टी(जॉगिंग ट्रॅक), ध्यानधारणा हॉल याही सुविधा देण्यात येणार आहेत त्यासोबत  सिनेमा गृह, मुलांसाठी मैदान, बसण्यासाठी आरामदायी जागा, विजेचे बिल कमी करण्यासाठी वीज सोलर सिस्टम वीज निर्मिती प्रकल्प ,सांस्कृतीक हॉल, यासोबत अनेक विविध सुविधा देण्यात येणार आहेत. 

कोणताही उद्योग व्यवसाय सुरु करताना त्या मागचा हेतू शुद्ध असणे खूप महत्वाचे आहे. यात समाज हिता सोबत निसर्गाचे हित जोपासाने हि अत्यावश्यक आहे.त्यामुळे नैसर्गिक साधन संपत्तीचा अपव्यय न होता त्याचे पालन होऊन येथील सर्व सामान्य व्यक्तीच्या कुटुंबाचे  जीवन्मान उचवावे हे द्येय डोळ्यासमोर ठेवून हा प्रकल्पाची निर्मिती करणार असल्याचे देवेंद्र शाह यांनी सांगितले.

  दरम्यान उगवत्या सूर्याची सुवर्णमयी किरणे म्हणजेच “औरम” होय. प्रसिद्ध उद्योगपती देवेंद्र शाह यांच्या संकल्पनेतून साकरत असलेल्या या नव्या प्रकल्पमुळे बिल्डिंग व्यवसायातून भविष्यात मोठी क्रांती होऊ शकते यात शंका नाही. ग्रामीण भागात शहरी भागात निर्माण होणाऱ्या प्रकल्पापेक्षाअत्याधुनिक सुविधा माफक किंमतीत  ग्रामीण भागात देऊन बांधकाम व्यवसायात मोठे बदल पुढील काळात शाह यांच्या या प्रजेक्ट मुले होण्याची शक्यता आहे.

या प्रकल्पाचे उदघाटण प्रसंगी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील मंचरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे, माजी पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले, राष्ट्रवादी काँग्रेस आंबेगाव तालुका अध्यक्ष विष्णुशेठ हिंगे या सोबत जिल्ह्यातील अनेक राजकीय सामाजिक शौक्षणिक औद्योगिक क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते

Continue Reading
1 Comment

1 Comment

  1. मा.संतोषभाऊ बोऱ्हाडे

    May 11, 2025 at 4:22 pm

    नविन प्रकल्पा करीता मनसे शुभेच्छा ! गोवर्धन डेअरी प्रमाणेच या क्षेत्रात सुद्धा विश्व तयार कराल . हिच भावना !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सामाजिक

“महिला बांधकाम कामगारांसाठी” शासनाकडून मिळणाऱ्या मदतीवर डल्ला मारणारे काथाकथित एजंट व पुढारी  म्हणजे “शिव” जन्मभूमीतील सध्याचे रांझ्याचे पाटील का?

Published

on

मंचर दि. (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या काळात एका महिलेवर अत्याचार करणाऱ्या पाटलाचे छत्रपतींनी हात पाय छाटले होते. परंतू त्याच छत्रपतींचे नाव घेऊन छत्रपती शिवरायांची जन्म भूमी असलेल्या जुन्नर तालुक्यात बांधकाम कामगार महिलांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या मदतीतून काही एजंटांनी व कथित गावपुढाऱ्यांनी हात ओले करण्याचा सपाटा लावला असताना या होणाऱ्या गैरव्यवहारावर प्रकाश झोत टाकणाऱ्या पत्रकारावर जीवघेणा हल्ला केला जातो व त्याच एजंटांची बाजू घेण्यासाठी काही कथित गाव पुढारी पत्रकारावर बेछुट खोटे आरोप करण्याचा प्रयत्न करतात हि खरी शरमेची गोस्ट बाब आहे 

दरम्यान सर्वसामान्य बांधकाम कामगारांचा आर्थिक स्थर उंचावण्यासाठी शासनाने बांधकाम कामगार योजना आणली या योजनेचा खरा अर्थ असा कि, रोजंदारीवर काम करणारे बांधकाम कामगार मजूर वर्गातील  कुटुंबाना आर्थिक सहाय्य मिळावे व यातून त्यांची मुले शिकुन सक्षम व्हावीत  या दृष्टीकोनातून शासनाने बांधकाम कामगानांच्या उत्कर्षासाठी आणलेल्या या योजनेचा काही एजंटांनी कथाकथित राजकीय पुढऱ्यांच्या आशीर्वादाने गोरस धंदा बनविल्याचा प्रकार समोर येत आहे.

सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यामध्ये सुरु असलेली बांधकाम कामगार योजनेमध्ये कामगारांना मिळणाऱ्या मदतीतून चांगली मोठी रक्कम कथाकथित एजंट लोकांना दयावी लागते व यात अनेक कथाकथित स्थानिक पुढाऱ्यांचा सहभाग असल्याचे बोलले जाते.व  हे कथाकथित गाव पुढारी समाजसेवेचा खोटा आवडत आणत गरिबांच्या टाळूवरील लोणी खात असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

     दरम्यान नुकत्याच एका इलेक्ट्रानिक वाहिनेने सुरु असलेल्या बांधकाम कामगार योजनेतील या गैरव्यवहाराचा भांडाफोड केला. या नंतर त्या पत्रकारावर काही एजंट लोक यांनी हल्ला  केला व काही कथित गाव पुढऱ्यांच्या मदतीने बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. व हि घटना छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्म स्थान असलेल्या जुन्नर तालुक्यात घडली.यामध्ये या राजकीय नेत्यांनी महिलांना त्रास दिल्याचा आरोप केला खरे तर हे गाव पुढारी ज्या नेत्याचे कार्यकर्ते आहेत त्याच नेत्याची एक क्लिप काही महिन्यापूर्वी प्रसारीत झाली होती.यामुळे जसा नेता तसा कार्यकर्ता अशी चर्चा नागरिक दाबक्या आवाजात करीत आहेत.

दरम्यान या कथाकथित पुढऱ्याच्या या लाजिरवान्या कृत्याचा सर्वच स्थरावरून निषेध केला जात असून . या प्रकरणाची उच्च स्तरीय कसून चौकशी करावी. सुरु असलेल्या या योजनेत खरंच किती बांधकाम कामगार आहेत का?  या सर्व बाबींची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे

Continue Reading

सामाजिक

ऊस उत्पादनाच्या वाढीसाठी “भीमाशंकर सह. साखर कारखान्याचे” ऊस लागवड धोरण जाहीर -अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांची माहिती

Published

on

मंचर दि. (प्रतिनिधी) भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे लागवड हंगाम २०२५-२६ साठी ऊस लागवडीचे धोरण जाहिर झाले असून त्याची अंमलबजावणी दि. १ जून २०२५ पासून करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.

 “उत्पादकता वाढ़ लक्ष योजना”

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीचे दृष्ठिने कारखान्यामार्फत “दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील ऊस उत्पादकता वाढ लक्ष २०२०” ही महत्वाकांक्षी ऊस विकास योजना राबविणेत येत आहे अशी माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष अँड.प्रदीप वळसे यांनी सांगितले

     भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माध्यमातून सुरु करण्यात येत असलेल्या या ऊस लागवड जाहीर धोरणबाबात   अधिक माहिती देताना बेंडे यांनी सांगितले की,  दि. १ जून २०२५ ते ३० ऑक्टोबर २०२५  पर्यंतच्या कालावधीमध्ये को.एम.०२६५ तर दि. १ जून २०२५ ते ३० एप्रिल २०२६ पर्यंतच्या कालावधीमध्ये   को.८६०३२ ऊस लागवडीस व नोंदीस परवानगी देण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे  दि. १ ऑगस्ट २०२५ ते ३० एप्रिल २०२६ अखेर पर्यंतच्या कालावधीमध्ये व्हीएसआय ०८००५ या ऊस लागवडीस परवानगी देण्यात आली आहे. दि. १ सप्टेंबर २०२५ ते ३० एप्रिल २०२६ अखेर पर्यंतच्या कालावधीमध्ये एम.एस. १०००१, को. ९०५७,  या ऊस लागवडीस परवानगी देण्यात आली आहे. को.व्हीएसआय १८१२१, फुले ऊस १५०१२, फुले ऊस १५००६, फुले ऊस १३००७, को.एम. ११०८२ इ. शिफारशीत ऊस लागवडीस दि. १ जून २०२५ ते दि. ३० एप्रिल २०२६ पर्यंत परवानगी देण्यात आली आहे.

              कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद व ऊस उत्पादक यांना मागणीप्रमाणे उपलब्धतेनुसार लागवड धोरणाप्रमाणे दि. १ जून २०२५ पासून बेणे वाटप करण्यात येणार आहे व खासगी ऊस लागवडीच्या नोंदी घेण्यात येणार आहेत. त्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस लागवड करावयाच्या क्षेत्राचा ७/१२ उतारा व आवश्यक कागदपत्रे पूर्तता संबधित विभागीय शेतकी कार्यालयात जाऊन करावी. खासगी ऊस लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी चार दिवसाचे आत संबंधित गट ऑफिसमध्ये जाऊन ऊस नोंद करावयाची आहे. 

दरम्यान उशीरा ऊस लागवड नोंद करणेस आलेल्या ऊस उत्पादकांची ऊस नोंदीसाठी आलेची तारीख हीच ऊस लागवड तारीख म्हणून नोंद करण्यात येईल. कारखान्यामार्फत कार्यक्षेत्र व परिसरामध्ये धोरणानुसार उधारीने / रोखीने राबविणेत येणाऱ्या ऊस विकास योजने अंतर्गत माती परीक्षण सुविधा, ताग बियाणे वाटप, ऊस बेणे वाटप,  रासायनिक खते पुरवठा, द्रवरुप जीवाणू खते, ऊस रोपे वाटप, खासगी ऊस लागवड अर्थसहाय्य, प्रेसमड, खोडवा व्यवस्थापनामध्ये पाचट कुट्टी सुविधा, ठिबक सिंचन योजना, व्हीएसआय उत्पादित मल्टीमायक्रोन्युट्रीएंट, मल्टीमॅक्रोन्युट्रीएंट, ह्युमक ॲसिड, वसंत उर्जा, जैविक कीटकनाशके बी.व्ही.एम., इ.पी.एन. इ. निविष्ठांचा पुरवठा, हंगामवार ऊस पीक स्पर्धा इ. ऊस विकास योजनांचा लाभ सर्व ऊस उत्पादकांनी घ्यावा.  ऊस पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेणेस इच्छुक  शेतकऱ्यांनी  प्रवेश शुल्क रक्कम रु.१००/-  डिसेंबर २०२५ अखेर भरणा करून स्पर्धेसाठी नाव नोंदणी करावी.

              त्याचप्रमाणे एकात्मिक कीड व्यवस्थापन योजनेमध्ये ऊस पिकामध्ये हुमणी कीडीचे नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी गोळा केलेले हुमणी कीडीचे भुंगेरे कारखान्यामार्फत प्रति किलो रु.३००/- प्रमाणे जून २०२५ अखेर खरेदी केले जाणार असून सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी हुमणीचे भुंगेरे गोळा करुन एकात्मिक हुमणी कीड नियंत्रण करावे. तरी वरील लागवड धोरणानुसार जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उसाची लागवड करावी व कारखाना ऊस विकास योजनांचा लाभ घ्यावा. ऊस विकास योजनेच्या अधिक माहितीसाठी विभागीय शेतकी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन  बेंडे यांनी केले आहे.

Continue Reading

सामाजिक

अवकाळी पावसाच्या नुकसानीचे आंबेगावमध्ये “तलाठी करणार पंचनामे” –  नायब तहसीलदार वाघ

Published

on

मंचर दि.29 (सदानंद शेवाळे): अवकाळी ऐन उन्हाळ्यात आलेल्या पावसामुळे आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम व पूर्व भागात मुसळधार पावसामुळे आंबा जांभूळ केळी मका बाजरी भुईमूग व पालेभाज्या वर्गीय पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे प्रत्येक गावातील गाव कामगार तलाठी आपापल्या सजातील नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करतील अशी माहिती आंबेगाव  तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार सचिन वाघ यांनी बोभाटा शी बोलताना दिली.

   मागील पंधरा दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे अनेक ठिकाणी बांध फुटले आहेत रस्ते वाहून गेले आहेत तर वीज पडल्याने कांदा बराखी  जळून गेली आहे पालेभाज्या वर्गीय पिके कोबी फ्लावर कोथिंबीर मेथी शापू सह अनेक पालेभाज्या पाण्यात पोहत आहेत.

 

संप काळातही “कृषी सहाय्यक” करणार पंचनामे 

 कामगार तलाठी आपापल्या सजा मध्ये पंचनामे करणार आहेत त्यांना सहाय्य करण्यासाठी सहाय्यक कृषी अधिकारी संपावर असतानाही आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत मदत करणार असल्याची माहिती घोडेगाव कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान आंबेगाव तालुक्यात  पूर्व भागात पाणी उपलब्ध असल्याने तालुक्यातील सुमारे 3 हजार 750 एकर क्षेत्रावर उन्हाळी बाजरी पिकाची पेरणी करण्यात आली होती  परंतू अवकाळी पावसाने  उन्हाळ्यात हमखास उत्पन्न देणारे बाजरीचे पीक भुईसपाट झाले आहे बाजरीच्या कणसांना चौरे ( कोंब ) फुटले आहेत तर जनावरांचा वाळलेल्या चारा वैरण पाण्यात भिजत आहे या वैरणीवर कुज व बुरशी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे   दुभत्या व भाकड जनावरांना हिवाळ्यात व उन्हाळ्यात  वाळलेल्या चाऱ्याची मोठी टंचाई यंदा भासणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.त्याचप्रमाणे  सुमारे दोन हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे अतोनात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे अशी माहिती तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

Continue Reading
Advertisement

Trending