सामाजिक
दोन्ही किडन्या निकामी झालेल्या मुलाला, “आईने किडनी देऊन दिले जीवनदान”……

मंचर दि. (प्रतिनिधी)”आई” हा शब्द प्रत्येकाच्या मुखात असतो. आपणांवर एखादे छोटे अथवा किमान खरचटलं तरी आपण आई म्हणतो म्हणतात परमेश्वराने आईच प्रेम मिळविण्यासाठी पृथ्वी तलावर जन्म घेतला तुला मातेने नऊ महिने आपल्या उदरात वाढवून आपणाला जन्म देण्यासाठी ती स्वतःच्या जीवाची कधीच पर्वा करत नाही ती आई… आज अशाच एका आईने आपल्या मुलाच्या जीवसाठी आपली किडनी काढून दिली आईच्या पायाखाली स्वर्ग असतो कारण तीच खरी त्यागाची देवता होय,

आईने केलेल्या किडनीदानाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. कठोर झालेल्या नियतीमुळे चोहोबाजूंनी घेरलेल्या मुलासाठी मातेने स्वतःची एक किडनी देऊन मृत्यूच्या दाढेतुन आपल्या मुलाला सहीसलामत बाहेर काढले आहे. आपले सर्वस्व त्यागून आपल्या मुलांच्या कल्याणसाठी ती सर्व तो परी त्याग करते ती देवता म्हणजेच…….. “आई”
वय वर्षे अवघे ३० हा काळ म्हणजे नव्या स्वप्नांना जिद्दीचे पंख लावून आयुष्याला आकार देण्याचे हे वय…… पण, नियतीला कदाचित त्याची आणखी परीक्षा पहाण्याची लहर असावी. काही कळायच्या आतच त्याच्या दोन्ही किडन्या फेल झाल्याचे निदान झाले. अख्खे कुटुंब हादरले. कोलमडून पडण्याची वेळ आली. मात्र पुन्हा एक माता पुढे आली. कठोर झालेल्या नियतीमुळे वादळात चोहोबाजूंनी घेरलेल्या मुलासाठी या मातेने आपले काळीज मोठे केले आणि स्वतःची एक किडनी देऊन मृत्यूच्या दाढेत अडकलेल्या आपल्या मुलाला सहीसलामत बाहेर ओढून आणले. सुनील बन्सी मेंगडे असे या भाग्यवान तरुणाचे नाव आहे.
“मातेने किडनी देऊन आई म्हणजे काय? याचा बोध करून दिला परंतू या मुलाला सामाजिक स्तरावर माणुसकीची जाणीव असलेल्या अनेक ज्ञात अज्ञात व्यक्तींनी मदत केली त्यांचेही आभार मनाने गरजेचे आहे”
दरम्यान मातृत्वाच्या दातृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करणारी ही घटना आहे मेंगडेवाडी (ता. आंबेगाव ) गावातील शेतकरी कुटुंबातील बन्सी मेंगडे व उषा मेंगडे दाम्पत्याला दोन मुलगे व एक मुलगी असे पंचकोनी कुटुंब शेतात काबाड कष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. मुलगी मंगल प्रदीप टाव्हरे हिचे लग्न होऊन सासरी गेली आहे. घरी दोन मुलगे पती पत्नी असे आनंदी कुटुंब बन्सी मेंगडे यांच्या सुनील व राहुल या दोन मुलांपैकी सुनील याचे २०१९ साली लग्न झाले त्यांना अडीच वर्षाची लहान मुलगी आहे. सुनील मेंगडे याला २०२० साली टाइफाइड झाला औषधोपचाराने तो बरा झाला पुन्हा २०२१ साली टाइफाइड झाला त्यातुनहि तो बरा झाला.परंतू २०२३ साली या कुटुंबात एक दुखद घटना घडली राहुल मेंगडे याचे अकाली निधन झाले सर्व जबाबदारी सुनीलच्या खांद्यावर आली. सुनील शिरूर तालुक्यातील जातेगाव येथील कंपनीत दररोज मोटारसायकलवर कामाला जात आहे या घटनेतून सावरत असतानाच सुनील मेंगडे याला तब्बेत साथ देईनाशी झाली. शरीराच्या विविध तपासण्या केल्या त्यामध्ये किडनी कमी क्षमतेने काम करत असल्याचे निदर्शनास आले.
त्याचप्रमाणे त्यावर दर महिन्याला हजारो रुपयांची औषधे सुनील घेत आहे. मोटारसायकलच्या प्रवासाने सुनीलला जास्त दगदग होत असल्याने सुनील ला जाण्या येण्यासाठी डिसेंबर २०२४ मध्ये नवीन चारचाकी कार घेण्यासाठी नातेवाईकांनी सहकार्य केले. नवीन कार चे घरी आगमन झाले सर्व आनंदात असताना त्याच दिवशी सुनीलची तब्बेत अचानक बिघडली दुसऱ्या दिवशी डॉक्टरांच्या कडे गेले असता विविध तपासण्या केल्यानंतर दोन्ही किडन्या फेल झाल्या असून आता दररोज डायलेसीस करण्याशिवाय पर्याय नसुन तरूण असल्याने किडनी प्रत्यारोपण करावे लागेल असे सांगितले. मेंगडे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला किडनी देण्यासाठी पत्नी सोनल तसेच बहीण मंगल पुढे आल्या आमची एक किडनी घ्या दोन्ही किडन्या फेल झाल्याने मृत्यूच्या दारात पोचलेल्या सुनीलला त्याची आई उषा यांनी आपली एक किडनी देण्याचा निर्णय घेतला सर्व तपासण्या केल्यानंतर आईची किडनी सुनीलच्या शरीराला मॅच होत असल्याने किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान त्यासाठी पुण्यातील अनेक हॉस्पिटल मध्ये शस्त्रक्रियेसाठी खर्चाचा अंदाज काढण्यात आला त्यासाठी सुमारे ८ ते १० लाख रुपये सांगण्यात आले त्यासाठी एवढे पैसे कसे जमवणार शस्त्रक्रियेनंतर दर महिन्याला औषधावर खर्चहि जास्त येणार होता त्यामुळे बन्सी मेंगडे यांनी शेताचा एक तुकडा विकून काही पैसे जमवले तरीही पैसे अपुरे पडत होते मुलाच्या उपचारासाठी बन्सी मेंगडे यांची सुरु असलेली घालमेल माजी सरपंच भरत फल्ले यांच्या लक्षात आली त्यांनी बन्सी मेंगडे यांना माजी गृह मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे स्वीय सहाय्यक रामदास वळसे पाटील यांच्याकडे नेले त्यांनी दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यातील एका खासगी रुग्णालयात साडेपाच लाख रुपयात शत्रक्रिया करण्यासाठी मदत केली राज्य शासनाच्या वतीने दोन लाख रुपयांची मदत हि मिळवून दिली.
त्याचप्रमाणे सुनील काम करत असलेल्या कंपनीतील मित्रांनी हि एक लाख रुपयांची मदत केली. आई उषा मेंगडे व मुलगा सुनील मेंगडे यांच्या वरील शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आज दोघेही मायलेक ठणठणीत बरे झाले असून सुनील हि दररोज कंपनीत कामाला जात आहे तर आई घरातील व शेतातील दररोजची कामे करत आहे. रामदास वळसे पाटील यांच्यामुळे आमच्या मुलाचे लवकर ऑपरेशन झाल्याने तो मृत्यूच्या दाढेतून परत आला खऱ्या अर्थाने त्यांच्या रूपाने आमच्या मदतीला जणू देवच आल्याची भावना बन्सी मेंगडे यांनी व्यक्त केली आहे.
सामाजिक
आदिवासी भागातील शेतकऱ्याच्या शेतीचे पंचांनामे करून त्वरित नुकसान भरपाई द्यावी -मारुती केंगले

डिंभे दि. (प्रतिनिधी) आंबेगाव तालुक्याचे पश्चिम आदिवासी भागातील बळीराजाचे एकमेव उत्पन भात व हिरडा पिकांचे नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने प्रचंड नुकसान झाले असून याचे पंचांनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे वतीने मारुती केंगले यांनी केली आहे.
नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱऱ्यांच्या कुटुंबाच्या तोडचा घासच पाळवीला आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड अतोनात नुकसान होऊन शेतकरी देशोधडीला लागल्याचे दिसत आहे. अशा कठीण प्रसंगी शासकीय मदतीची शेतकऱ्यांना गरज आहे पण शासनाकडून अद्यापही कोणत्याही मदतीबाबत दिलासादायक घोषणा अद्यापहि झालेली नाही त्यामुळे ऐन दीपावळीच्या काळात अनेकांची घरे दिव्यांनी उजाळालेली असतील परंतू महाराष्ट्रातील बळीराजच्या घरात अंधार असेल अशीच काही परिस्थिती दिसत आहे.
तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात एकमेव पिक भात शेती आणि हिरडा हिरड्याला बाजार भाव आता सध्या १०० रुपये इतका भाव आहे परंतू आदिवासी भागात पावसामुळे हिरडा पीक मोठ्याप्रमानावर सडून खराब झाले आहे. मे ते ऑक्टोबर सलग ५ महिच्या कालावधित झालेल्या मुसळधार पावसामुळे भातपिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊन भात पीक वाया गेले आहे तर अनेक ठिकाणी भातशेती पावसामुळे सडून गेली आहे.त्यामुळे पिकांची पंचनामे करून आदिवासी शेतकऱ्याला मदतीचा हात मिळावा यासाठी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले तालुक्याचे तहसिलदार कार्यालयास दिले असून निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी साहेब. प्रांत अधिकारी गोविंद शिंदे साहेब आंबेगाव तालुक्याचे आमदार व माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांना देण्यात आले असून याबाबत त्वरित कार्यवाही ना झाल्यास नाजिकच्या काळात शेकऱ्यांच्या हितासाठी भिमाशंकर रस्त्यावर तीव्र आंदोलनाचा इशारा केंगले यांनी दिला आहे.
सामाजिक
जांभोरी येथे कुस्ती तालीम इमारत भूमिपूजन सोहळा संपन्न

घोडेगाव दि (प्रतिनिधी ) जांभोरी (ता आंबेगाव)पासून जवळच असलेल्या माचीचीवाडी या ठिकाणी कुस्तीसाठी तालीम इमारतिचा भूमिपूजन समारंभ उत्साहात पार पाडला
आजच्या धाकधकीच्या काळात तरुणांई मोबाईल व गेम यात अडकून ना रहाता शारीरिक तंदृस्तीकडे आकर्षित व्हावी या हेतूने सुरु होत असलेल्या कुस्ती तालीम इमारतीसाठी येथील वसंत वालकोळी,बबन केंगले, भिवा वालकोळी, अनंता वालकोळी, यांनी ११गुंठे जमीन दिली आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री सहकारमंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील यांनी दहा लाख रुपयांचा निधी तालमीच्या प्रत्यक्ष बांध कामासाठी मंजूर केला आहे यासाठी आदिवासी भागाचे नेते सुभाषराव मोरमारे साहेब संजय गवारी, प्रकाश घोलप, यांनी परीश्रम घेतले आहेत
दरम्यान जांभोरी गावचे लोकनियुक्त सरपंच सुनंदाताई पारधी, पोलिस पाटील नवनाथ केंगले, पोलिस पाटील सोनाली पोटे, ज्ञानेश्वर पारधी. पुनाजी पारधी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले, श्री व्यंकोजी कुस्तीगीर तालीम संघटना जांभोरीचे अध्यक्ष भिवा वालकोळी, शिवाजी केंगले , सखाराम केंगले, खरेदी विक्री संघाचे संचालक शामराव बांबळे, ग्रामपंचायत सदस्य दुंदा भोकटे, ग्रामपंचायत सदस्य शिवराम केंगले,किसन पोटे, अनंता वालकोळी, सुनिल वालकोळी, नामदेव भोकटे, घोडेगाव पोलिस शिवाजी जनार्दन केंगले, सुरेश केंगले,संजय केंगले, ग्रामसेवक सुनिल पारधी, कृषी सेवक सुनिल लोहकरे, भिवा केंगले, चंद्रकांत केंगले, पांडुरंग केंगले,राज केंगले,गफुरशेठ तांबोळी,सर्व जांभोरी ग्रामस्थ उपस्थित होते.
सामाजिक
हजारो कोस दूर असूनही संकटप्रसंगी आपल्या मायभूमीतील माणसांच्या मदतीला धावणारी आंबेगावची कन्या….सौ.माधुरी श्रीकांत पवार

मंचर दि. (प्रतिनिधी) -“नवदुर्गेचा सन्मान तू…परोपकारची खाण तू…. सर्वांचा अभिमान तू…….श्री शक्तीचा मान तू…… जन्मभूमीची ठेवी जाण तू”….. संपूर्ण महाराष्ट्रावर महा पुराचे संकट आले असताना हजारो कोस दूर अमेरिकेत असूनही आपल्या माय भूमितील आपल्या माणसांच्या मदतीसाठी धावणारी आंबेगाव ची कन्या “माधुरी ताई ” हि खरोखरच सर्वांचे प्रेरणादायी स्थान ठरली आहे.
गेल्या काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने थैमान माजविले असून यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून संपूर्ण महाराष्ट्रातील शेकडो कुटुंबे महापुराच्या तडाख्याने रस्त्यावर आली आहेत. महाराष्ट्रात निर्माण झालेल्या महापुराणे अनेक जण बेघर झाले आहेत अशा हतबल परिस्थितीत परोपकारच्या शिकवणीतून निर्माण झालेल्या माधुरी श्रीकांत पवार यांनी आपल्या मायभूमीचे पांग फेडण्याचा प्रयत्न केला आहे. तिच्या या निर्णयाने तिच्या जन्मदात्या मातापित्याचे उर अगदी अभिमानाने भरून आले असेल यात शंका नाही
आपल्या माय भूमितील आपल्या माणसाबद्द्ल मधुर्याचा ओलावा असलेल्या माधुरी ताईने तीला शक्य होईल तेव्हढी मदत करीत आपले कर्तव्य बाजावण्याचा प्रयत्न केला आहे. ती आपल्या संभाषणात सांगते कि,
“मी “माधुरी श्रीकांत पवार”महाराष्ट्रातील अतिवृष्टी मुळे झालेल्या पूरग्रस्त घटना व नुकसान टीव्हीवर पाहत होते खूप वाईट वाटत होते, तसेच व्हाट्सअप वर वळसे पाटील साहेबांनी केलेल्या आवहानामुळे माझ्या जन्मभूमीत असलेल्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीने माझ्या शेतकऱ्यांची फार मोठ्या प्रमाणात हानी झाली. सर्वात मोठे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यांना मी माझे आदर्श व सतत समाजाचा विचार करणारे माननीय दिलीपराव वळसे पाटील साहेब माजी गृहमंत्री यांच्या प्रेरणेने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना छोटीशी मदत माझ्या कृतीप्रमाणे पाठवीत आहे.”
खरेतर “माधुरी ताई” यांनी केलेली मदत हि पुरांनातील त्या टिटवीची आठवण करून देते कि जिने आपल्या मुलांना वाचविण्यासाठी समुद्र अटविण्याचा निर्धार केला शेवटी परमेश्वराला हि येऊन तिची मदत करावी लागली. आज या ताईंनी केलीली मदत हि अनेकांना आपल्या मायभूमी बद्द्लचे कर्तव्य बजावण्याची शिकवण देते यात शंका नाही. हा देश माझा आहे या देशाला देव भूमी म्हटले गेले आहे या ठिकाणी जन्म मिळणे हि खरेतर सन्मानांची गोष्ट आहे. माधुरी यांनी केलेले हे कार्य सर्वांसाठी एक शिकवण आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यामुळे माधुरी पवार यांच्या प्रमाणे आपापल्या परीने मदत करा.चला सारे एक होऊया आपल्या देश बांधवांना पुन्हा उभे करण्यासाठी मदतीचा हात देऊया…..
-
राजकीय2 years ago
वीस वर्षांपूर्वी राजकारणात स्वतःला सिद्ध करण्यासाठी वेगळे झालेले “त्रिदेव”, पुन्हा आंबेगावच्या आसमंतात एकत्रित झळकणार
-
राजकीय1 year ago
“टायगर इज बॅक” शिरुर लोकसभेच्या मैदानात खळबळ माजणार..!
-
राजकीय11 months ago
वळसे पाटील यांना मोठा धक्का : शरद बँकेचे संचालक जयसिंग थोरात यांचा शरद पवार गटात जाहीर प्रवेश
-
राजकीय2 years ago
आयात उमेदवारांपेक्षा निष्ठावंतांना संधी द्या; उद्योगपती देवेंद्र शहा यांच्या नावाची शिरूर लोकसभेसाठी चर्चा…….
-
राजकीय12 months ago
आंबेगाव मध्ये महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर : निवडणुकीत सहभाग न घेण्याचा शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचा निर्णय
-
राजकीय1 year ago
अढळरावांनी, वळसे पाटलांची भेट घेऊन केली चौकशी
-
राजकीय1 year ago
भोसरी विधानसभा क्षेत्रातील असंख्य नाराज कार्यकर्ते भाजपाला ठोकणार रामराम: उबाठा सेनेत करणार प्रवेश?
-
सामाजिक1 year ago
“माणसात देव शोधत, सर्वसामान्यांच्या हितासाठी प्रयत्नशील राहणारा, माणसातील “देवमाणूस”….