singa8

rp8888

singa8

slot demo

slot qris

singa8

rp8888

https://bertrodriguez-museum.org

https://journal.uecommercebintaro.ac.id/

singa8

singa8

singa8

singa8

singa8

singa8

singa8

singa8

92GLORY

http://vecas.org.vn/id/

https://admire.ch/vendor/

Connect with us

सामाजिक

सेवाभाव, समर्पण आणि मानवतेचा दिव्य उत्सव…78व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या सेवांचा शुभारंभ 

Published

on

पुणे दि. (प्रतिनिधी): सेवाभाव समर्पण आणि मानवतेच्या दिव्य उत्सवाचे स्वरूप होऊ घातलेल्या 78व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या सेवांचा शुभारंभ नुकताच सदगुरु माता सुदिक्षा जी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन शुभहस्ते निरंकारी आध्यात्मिक स्थळ, समालखा येथे करण्यात आला.

 संत समागम सोहळा 31 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर, 2025 दरम्यान आयोजित होणार असून. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी वार्षिक निरंकारी संत समागमाच्या सेवांची सुरुवात एका अत्यंत भावपूर्ण क्षणाने झाली आहे. सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी या दिव्य जोडीच्या शुभहस्ते या सेवांचे उद्घाटन करण्यात आले. हे दृश्य केवळ एक परंपरा जतन करणारे नव्हते, तर सेवा, श्रद्धा आणि मानवता यांच्या प्रति खोलवर आस्था असल्याचे जिवंत प्रतिबिंब ठरले. या शुभप्रसंगी मिशनची कार्यकारिणी समिती, केंद्रीय सेवादल अधिकारी तसेच हजारो भाविक भक्तगण सेवाभावनेने तन्मय होऊन उपस्थित होते. या भव्य दिव्य आयोजनाच्या पूर्वतयारीच्या सेवांमध्ये भाग घेण्यासाठी संपूर्ण देशातीलच नव्हे तर मुंबई व पुणे सह महाराष्ट्रातून हजारोंच्या संख्येने सेवादल स्वयंसेवक व अन्य सेवादार भक्त समालखा (हरियाणा) स्थित निरंकारी आध्यात्मिक स्थळाकडे रवाना झाले आहेत. 

दरम्यान विविधतेने भरलेल्या जगामध्ये एका बाजूला मानवमात्र भाषा, संस्कृती, जातीपाती आणि धर्माच्या नावाखाली विभाजित झालेले दिसत आहेत तिथे दुसऱ्या बाजुला एक शाश्वत सत्य आपणां सर्वांना एका अतूट सूत्रामध्ये गुंफते आहे. आपण सर्व एकाच ईश्वराची लेकर आहोत जो ईश्वर वेळोवेळी अनेक रूपामध्ये साकार होऊन प्रेम, करुणा, समानता आणि मानवतेचा दिव्य संदेश देत आला आहे. आमची वेगवेगळी रूपं वेगवेगळे राहणीमान असूनही आमच्यामध्ये तीच एकसारखी चेतना, जीवनशक्ती प्रवाहित होत आहे. तीच आम्हाला एकमेकांशी जोडण्याचे कार्य करत आहे. हीच भावना आत्मसात करून संत निरंकारी मिशन मागील 96 वर्षापासून ‘वसुधैव कुटुंबकम’ अर्थात ‘अवघे विश्व एक परिवार’ ही दिव्य भावना जिवंत करत आहे. निरंकारी मिशन केवळ प्रेम, शांती आणि समरसता यांचा पावन संदेश नसून सत्संग सेवा आणि विशाल संत समागमांच्या माध्यमातून तो कृतीत उतरवत आहे. 

त्याचप्रमाणे सदगुरु माता सुदिक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांचे हार्दिक अभिनंदन संत निरंकारी मंडळाच्या प्रधान आदरणीय राजकुमारी तसेच संत निरंकारी मंडळाचे सचिव आदरणीय जोगिंदर सुखिजाजी यांनी पुष्पगुच्छ देऊन केले आणि शुभाशीर्वादांची कामना केली. समागम सेवेच्या शुभारंभ प्रसंगी हजारोंच्या संख्येने उपस्थित दर्शनाभिलाषी भाविक भक्तगणांना संबोधित करताना सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी सांगितले, की आज समागम सेवांच्या पावन प्रसंगी उपस्थित राहताना अत्यंत आनंद होत आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये जो उत्साह आहे, त्याची सुंदर झलक अनुभवायला मिळत आहे. नि:संदेह सत्संग, सेवा करत प्रत्येक मन भक्तीमय होत आहे. सर्वांमध्ये या परमात्म्याचे रूप पाहायचं आहे कोणत्याही प्रकारचा अभिमान न करता सर्वांचा आदर सन्मान करत सेवा करायची आहे. निरंकार प्रभूचे ध्यान करत या परमात्म्याची जोडून राहायचे आहे. 

समागम हा केवळ समूह रुपात एकत्रित होण्याचे नाव नव्हे तर तो सेवेचा एक प्रबळ भाव आहे. आपण आपल्या अंतर्मनामध्ये डोकावून आत्ममंथन करत हे पाहायचे आहे, की आमचे जीवन खरोखरच कोणत्या दिशेने चालले आहे. परमात्मा आतही आहे आणि बाहेरही आहे. आपण स्वतःमध्ये कोणत्याही प्रकारची भिंत तयार करायची नाही, तर स्वतःच्या अंतर्मनात डोकावून मनामध्ये साठलेल्या उणीवांमध्ये सुधारणा करायची आहे. त्याचप्रमाणे जवळपास 600 एकर परिसरात पसरलेले हे समारंभ स्थळ सेवा, श्रद्धा आणि मानवतेचे प्रतीक आहे. इथे लाखो भक्तांचा निवास, भोजन, आरोग्य, आवागमन आणि सुरक्षा यासारख्या सर्व व्यवस्था पूर्ण श्रद्धेने व नि:स्वार्था भावनेने केली जाते. देश विदेशातून आलेले संतजन सेवेमध्ये मग्न महात्मा आणि समाजाच्या सर्व थरांतून आलेले भाविक भक्तगण या महा उत्सवामध्ये सहभागी होऊन एकत्व, समर्पण आणि आत्मिक आनंद अनुभवतात.यावर्षी समागमाचे शीर्षक ‘आत्ममंथन’ असे आहे. याचा अर्थ आपण आपल्या अंतरात डोकावून विचार आणि कर्मांना आत्मज्ञानाने शुद्ध करण्याची प्रेरणा होय. हा प्रवास सद्गुरुकडून प्रदत्त ब्रह्मज्ञानानेच सुरू होतो आणि आत्मिक शांती, आनंद व मोक्षाचे द्वार उघडतो.  

दरम्यान मानवतेचा हा दिव्य उत्सव फक्त निरंकारी मिशनच्या अनुयायांनाच नव्हे तर प्रत्येक धर्म, जात, भाषेच्या देश-विदेशातील मानव प्रेमींचे खुल्या दिलाने स्वागत करतो. ही अशी भूमी आहे जिथे मानवता आध्यात्मिकता आणि सेवाभाव यांचा अनुपम संगम दृष्टिगोचर होतो. एक अशी अलौकिक अनुभूती प्रदान करतो, जी शब्दांच्या पलीकडील आहे.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सामाजिक

आदिवासी भागातील शेतकऱ्याच्या शेतीचे पंचांनामे करून त्वरित नुकसान भरपाई द्यावी -मारुती केंगले

Published

on

डिंभे दि. (प्रतिनिधी) आंबेगाव तालुक्याचे पश्चिम आदिवासी भागातील बळीराजाचे एकमेव उत्पन भात व हिरडा पिकांचे नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने प्रचंड नुकसान झाले असून याचे पंचांनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे वतीने मारुती  केंगले यांनी केली आहे.

नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱऱ्यांच्या कुटुंबाच्या तोडचा घासच पाळवीला आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड अतोनात नुकसान होऊन शेतकरी देशोधडीला लागल्याचे दिसत आहे. अशा कठीण प्रसंगी शासकीय मदतीची शेतकऱ्यांना गरज आहे पण शासनाकडून अद्यापही कोणत्याही मदतीबाबत दिलासादायक घोषणा अद्यापहि झालेली नाही त्यामुळे ऐन दीपावळीच्या काळात अनेकांची घरे दिव्यांनी उजाळालेली असतील परंतू महाराष्ट्रातील बळीराजच्या घरात अंधार असेल अशीच काही परिस्थिती दिसत आहे.

 तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात एकमेव पिक भात शेती आणि हिरडा हिरड्याला बाजार भाव आता सध्या  १०० रुपये इतका भाव आहे परंतू आदिवासी भागात पावसामुळे हिरडा पीक मोठ्याप्रमानावर सडून खराब झाले आहे. मे ते ऑक्टोबर सलग ५ महिच्या कालावधित झालेल्या मुसळधार पावसामुळे भातपिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊन भात पीक वाया गेले आहे तर अनेक ठिकाणी भातशेती पावसामुळे सडून गेली आहे.त्यामुळे पिकांची पंचनामे करून आदिवासी शेतकऱ्याला मदतीचा हात मिळावा यासाठी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले तालुक्याचे तहसिलदार कार्यालयास दिले असून निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी साहेब. प्रांत अधिकारी गोविंद शिंदे साहेब आंबेगाव तालुक्याचे आमदार व  माजी गृहमंत्री  दिलीपराव वळसे पाटील यांना देण्यात आले असून याबाबत त्वरित कार्यवाही ना झाल्यास नाजिकच्या काळात शेकऱ्यांच्या हितासाठी  भिमाशंकर रस्त्यावर तीव्र आंदोलनाचा इशारा केंगले यांनी दिला आहे.

Continue Reading

सामाजिक

जांभोरी येथे कुस्ती तालीम इमारत भूमिपूजन सोहळा संपन्न

Published

on

घोडेगाव दि (प्रतिनिधी ) जांभोरी (ता आंबेगाव)पासून जवळच असलेल्या माचीचीवाडी या ठिकाणी कुस्तीसाठी तालीम इमारतिचा भूमिपूजन समारंभ उत्साहात पार पाडला

आजच्या धाकधकीच्या काळात तरुणांई मोबाईल व गेम यात अडकून ना रहाता शारीरिक तंदृस्तीकडे आकर्षित व्हावी या हेतूने सुरु होत असलेल्या कुस्ती तालीम इमारतीसाठी  येथील वसंत वालकोळी,बबन केंगले, भिवा वालकोळी, अनंता वालकोळी, यांनी ११गुंठे जमीन दिली आहे त्याचप्रमाणे  महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री सहकारमंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील यांनी दहा लाख रुपयांचा निधी तालमीच्या प्रत्यक्ष बांध कामासाठी मंजूर केला आहे यासाठी आदिवासी भागाचे नेते सुभाषराव मोरमारे साहेब  संजय गवारी, प्रकाश घोलप, यांनी परीश्रम घेतले आहेत

 दरम्यान जांभोरी गावचे लोकनियुक्त सरपंच सुनंदाताई पारधी, पोलिस पाटील  नवनाथ केंगले, पोलिस पाटील सोनाली पोटे, ज्ञानेश्वर पारधी. पुनाजी पारधी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले,  श्री व्यंकोजी कुस्तीगीर तालीम संघटना जांभोरीचे अध्यक्ष भिवा वालकोळी, शिवाजी केंगले , सखाराम केंगले,  खरेदी विक्री संघाचे संचालक शामराव बांबळे, ग्रामपंचायत सदस्य दुंदा भोकटे, ग्रामपंचायत सदस्य शिवराम केंगले,किसन पोटे, अनंता वालकोळी, सुनिल वालकोळी, नामदेव भोकटे, घोडेगाव  पोलिस शिवाजी जनार्दन  केंगले, सुरेश केंगले,संजय केंगले, ग्रामसेवक सुनिल पारधी, कृषी सेवक सुनिल लोहकरे, भिवा केंगले, चंद्रकांत केंगले, पांडुरंग केंगले,राज केंगले,गफुरशेठ तांबोळी,सर्व जांभोरी ग्रामस्थ उपस्थित होते. 

Continue Reading

सामाजिक

हजारो कोस दूर असूनही संकटप्रसंगी आपल्या मायभूमीतील माणसांच्या  मदतीला धावणारी आंबेगावची कन्या….सौ.माधुरी श्रीकांत पवार

Published

on

मंचर दि. (प्रतिनिधी) -“नवदुर्गेचा सन्मान तू…परोपकारची खाण तू…. सर्वांचा अभिमान तू…….श्री शक्तीचा मान तू…… जन्मभूमीची ठेवी जाण तू”….. संपूर्ण महाराष्ट्रावर महा पुराचे संकट आले असताना हजारो कोस दूर अमेरिकेत असूनही आपल्या माय भूमितील आपल्या माणसांच्या मदतीसाठी धावणारी आंबेगाव ची कन्या “माधुरी ताई ” हि खरोखरच सर्वांचे प्रेरणादायी स्थान ठरली आहे.

गेल्या काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात  पावसाने थैमान माजविले असून यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून संपूर्ण महाराष्ट्रातील शेकडो कुटुंबे महापुराच्या तडाख्याने रस्त्यावर आली आहेत. महाराष्ट्रात निर्माण झालेल्या महापुराणे अनेक जण बेघर झाले आहेत अशा हतबल परिस्थितीत परोपकारच्या शिकवणीतून निर्माण झालेल्या माधुरी श्रीकांत पवार यांनी आपल्या मायभूमीचे पांग फेडण्याचा प्रयत्न केला आहे. तिच्या या निर्णयाने तिच्या जन्मदात्या मातापित्याचे उर अगदी अभिमानाने भरून आले असेल यात शंका नाही

आपल्या माय भूमितील आपल्या माणसाबद्द्ल मधुर्याचा ओलावा असलेल्या माधुरी ताईने  तीला शक्य होईल तेव्हढी मदत करीत आपले कर्तव्य बाजावण्याचा प्रयत्न केला आहे. ती आपल्या संभाषणात सांगते कि,

“मी “माधुरी श्रीकांत पवार”महाराष्ट्रातील अतिवृष्टी मुळे झालेल्या पूरग्रस्त घटना व नुकसान टीव्हीवर पाहत होते खूप वाईट वाटत होते, तसेच व्हाट्सअप वर  वळसे पाटील साहेबांनी केलेल्या आवहानामुळे माझ्या जन्मभूमीत असलेल्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीने माझ्या शेतकऱ्यांची फार मोठ्या प्रमाणात हानी झाली. सर्वात मोठे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यांना मी माझे आदर्श व सतत समाजाचा विचार करणारे माननीय दिलीपराव वळसे पाटील साहेब माजी गृहमंत्री यांच्या प्रेरणेने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना छोटीशी मदत माझ्या कृतीप्रमाणे पाठवीत आहे.”

 खरेतर “माधुरी ताई”  यांनी केलेली मदत हि पुरांनातील त्या टिटवीची आठवण करून देते कि जिने आपल्या मुलांना वाचविण्यासाठी समुद्र अटविण्याचा निर्धार केला शेवटी परमेश्वराला हि येऊन तिची मदत करावी लागली. आज या ताईंनी केलीली मदत हि अनेकांना आपल्या मायभूमी बद्द्लचे कर्तव्य बजावण्याची शिकवण देते यात शंका नाही. हा देश माझा आहे या देशाला देव भूमी म्हटले गेले आहे या ठिकाणी जन्म मिळणे हि  खरेतर सन्मानांची गोष्ट आहे. माधुरी यांनी केलेले हे कार्य सर्वांसाठी एक शिकवण आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यामुळे माधुरी पवार यांच्या प्रमाणे आपापल्या परीने मदत करा.चला सारे एक होऊया आपल्या देश बांधवांना पुन्हा उभे करण्यासाठी मदतीचा हात देऊया…..

Continue Reading
Advertisement

Trending

Best Replica Watches UK