Connect with us

राजकीय

उपमुख्यमंत्री अजित पवार आजोजित सभेतून आंबेगावतील मतदारांची नाराजी दूर करण्यात यशस्वी होतील का?

Published

on

द्रोणाचाऱयांना गुरू मानून आपल्या गुरुची मातीची मूर्ती तयार करून त्या मुर्ती समोर शस्र व शास्त्र याचा अभ्यास करून पारंगत झालेल्या गुरूच्या पहिल्या भेटीत गुरूंना गुरुदक्षिणा म्हणून आपला हाताचा आंगठा देण्याची तयारी ठेवणारे एकलव्य सारखे स्रेष्ठ शिष्य या भूमीत जन्माला आले.

  परंतु गुरू कडून सर्व विद्या घेऊन ऐन प्रसंगी गुरूला साथ देण्या ऐवजी  शरद पवारांसारख्या  गुरुची साथ सोडून पळ काढनाऱ्या वळसे पाटलांना तालुक्यातील जनता माफ करणार का? हा मोठा चर्चेचाविषय आहे त्याही आगोदर आपली उत्कृष्ठ प्रतिमा असतानाही हा निर्णय का घ्यावा लागला ?असेल या विषयी ही आंबेगाव कारांच्या मनात सारखे प्रश्न गोंगावत आहेत

राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर आंबेगाव तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील  काहीही झाले ‘तरी पवार साहेबांची साथ सोडणार नाहीत असे ठाम पणे आंबेगावचीच नव्हेतर महाराष्ट्रातील जनता सांगत होती. यात वळसे पाटील एकवेळ राजकारण सोडतील पण पवार साहेबांची साथ सोडणार नाहीत असा ठाम विश्वास आंबेगाव तालुक्यातील जनतेला होता.

परंतु झाले उलटेच अजित पवारांच्या सत्तेत सहभागी होण्याच्या घोषने नंतर पहिल्या फळीतच वळसे पाटलांनी पवारांना घराचा आहेर दिला व वळसे पाटलांनी पवार साहेबांची साथ सोडत सत्तेच्या तंबूत कूच केले  त्यामुळे अनेक चर्चांना उधान आले कधी नव्हे ते विश्वास घाताचा उल्लेख आंबेगावकर जनतेला सहन करावा लागणार या विचाराने आंबेगावच्या मतदार व कार्यकर्ते सैरभैर झाले आंबेगावकरी जनते समोर विश्वास घाताचा नवा आदर्श मांडला जातोय आपण आपल्या पुढील पिढीला काय आदर्श सांगणार यामुळे नागरिक प्रचंड नाराज झाले पण बोलणार कुणाला यामुळे सर्व गप्पा राहून आपापसात  जमेल तशी चर्चा सर्वत्र मतदारांतून केली जात आहे.

वळसे पाटील यांचे पवार  साहेबांवर खूप प्रेम आहे व त्यांना आदर्श ठेऊनच वळसे पाटलांनी काम केले आहे.या बाबत आंबेगावकारांच्या  मनात ठाम विश्वास आहे. तरीही वळसे पाटलांनी हा घेतलेला निर्णय घेण्यामागे असे काय घडले असावे की वळसे पाटलांना हा निर्णय घ्यावा लागला कारण वळसे पाटील मिठाचा खडा टाकून आपल्यावर  ज्या व्यक्तीने जीवापाड प्रेम केले आपले संपूर्ण आयुष्य उज्वल केले अशा पितृतुल्य द्रोणाचार्या सारख्या गुरुसमान व्यक्तीची साथ सहजा सहजी सोडणार नाहीत हे ही तितकेच खरे आहे परंतु अशी कोणती घटना घडली असावी की वळसे पाटलांना इतका टोकाचा व आपली प्रतिमा खराब करणारा  वाईट निर्णय घ्यावा लागला  यावर अद्यापही योग्य प्रकाश झोत टाकून कारण मीमांसा देण्यात आलेली नाही.

 त्यामुळे वळसे शरद पवार यांना का सोडले याचे सत्य उघड होणे आवश्यक आहे. कारण वळसे पाटलांनी विकासाचे कारण पुढे करत डिंभे धरणाला बोगदा पाडून पाणी कर्जत जामखेड कडे नेण्याचा रोहित पाटलांचा प्रयत्न असल्याचे जरी सांगितले असले तरी पवार घराणे व वळसे पाटील यांच्यात असलेले ऋणानुबंध पहाता हा मुद्दा तितकासा जनतेला पटणारा मुळीच नाही  मग वळसे पाटलांवर असा कोणता व कसला दबाव आहे किंवा होता. जी त्यांना पवार साहेबाना सोडण्याचा कठीण निर्णय घ्यावा लागला याबाबत आजही आंबेगाव करामध्ये चर्चा आहे.

 दरम्यान अशी चर्चा आहे कि, राष्ट्रवादी पक्ष फुटीच्या या सर्व घडामोडीत  अजित पवारांना पक्षाची सर्व सूत्रे स्वताकडे हवी होती व त्यांनाच मागील काळात पवार साहेबांचा वारसदार बोलले जात होते  पण पक्षाची दोर आपल्या हातातून निसटणार? याची जाणीव झाल्यानंतर त्यांनी विरोधी पक्षाशी हात मिळवणी केली असे एक वेळ म्हटले जाऊ शकते परंतु वळसे पाटलांची अशी कोणतीही मनीषा अथवा महत्वकांशा नव्हती  उलट पवार साहेबांचा मानसपुत्र म्हणून त्यांना ओळखले जात होते. पवारसाहेबासारख्या नेत्याचा सर्वात जवळचा विश्वासू व्यक्ती वळसे पाटील आहेत या बद्दल आंबेगावच्या जनतेच्या मनात वळसे पाटलांविषयी मनोमन मोठा आदर होता मग एव्हडे सर्व सुरळीत असताना सुद्धा असे काय घडले? की वळसे पाटलांसारख्या एकनिष्ठ शिष्यास आपल्या पितृतुल्य गुरुची म्हणजेच शरद पवार यांची अचानक साथ सोडावी लागली  या बाबत आंबेगावच्या जनतेच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत या आणि अनेक प्रश्नाचा उहापोह सध्या तालुक्यात जागोजागी ऐकावयास मिळत आहे

तालुक्यातील मतदारांमध्ये व जनतेच्या मनात दिलीप वळसे पाटलांची प्रतिमा प्रचंड स्वच्छ आहे वळसे पाटील कोणताही कोणतेही चुकीचे पाऊल टाकणार नाहीत असे असताना काय घडले याबाबत आजही जनता विचार करीत आहे  तसेच त्यांच्यावर कोणी दबाव आणून त्यांना पक्षांमध्ये हा निर्णय घेणे भाग पडले असावे असेही म्हणणे योग्य ठरणार नाही कारण वळसे पाटील एक  मुत्सद्दी व सक्षम नेते आहेत तरीही वळसे पाटलांना हा निर्णय का?घ्यावा लागला असावा हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो काहींच्या  मते वळसे पाटलांचे जवळचे कार्यकर्ते गोवर्धन प्रकल्पाचे सर्वोसर्वा देवेंद्र शाह यांचे व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे गुजरात कनेक्शन याला कारणीभूत असावे असेही म्हटले जाते तरअशीही एक चर्चा सूर सुरु आहे की  मागील काळात वळसे पाटलांना नामविण्यासाठी गोवर्धन प्रकल्पावर गेल्या काळात विनाकारण अनेक चौकशी करण्यात आल्या चौकशीतुन वळसे पाटलांना गोवण्याचाही प्रयत्न केंद्राकडून झाला असावा अशीही   चर्चा तालुक्यात ऐकावयास मिळत आहे.

दरम्यान गोवर्धन प्रकल्पावर तालुक्यातीलच नव्हे तीन तालुक्यातील अनेक कुटुंबे आपली उपजीविका करत आहेत गोवर्धन प्रकल्पामुळे आंबेगाव तालुक्यातील गोरगरींब व सर्वसामान्य शेतकर्याचे अर्थकारण सुरू आहे. मागील काळात या प्रकल्पावर बोट दाखवून बदनाम करण्याचा प्रयत्न झाल्याच्या घटना ताज्या आहेत. असे अनेक प्रश्न तालुक्यातील जनतेच्या मनात   सुरू आहेत पण नक्की ठोस कारणअद्यापही जनतेला ना मिळाल्याने जनता संभ्रमात आहे नजीकच्या पुढील काळात याची उत्तरे समोर येतील अशी अपेक्षा आहे परंतु वळसे पाटलांच्या पवार साहेबांची साथ सोडण्याच्या निर्णयावर आंबेगावचा मतदार कमालीचा नाराज असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे .

दरम्यान आंबेगाव तालुक्यात नुकत्याच झालेल्या शरद पवार साहेबांच्या सभेला आंबेगाव कारांनी प्रचंड प्रमाणात उपस्थिती दर्शवली होती या सभेनंतर निर्माण झालेल्या अनेक प्रश्नांना आपल्या सभेतुन प्रतिउत्तर देण्यासाठी येत्या चार मार्चला मंचर येथे अजित पवार यांची सभा आयोजित केली आहे परंतु या सभेने आंबेगाव तालुक्यातील जनतेच्या मनातील प्रश्नाची सोडवणूक प्रभावी पणे होईल का? हे हे पाहणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे आयोजित केलेल्या सभेतुन उपमुख्यमंत्री अजित पवार आंबेगाव कारांच्या मनावरील संशयाची जळमटे दूर करण्यात यशस्वी ठरतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

Continue Reading
1 Comment

1 Comment

  1. अशोक मोढवे

    March 3, 2024 at 4:54 am

    वळसे पाटील यांना कोणत्याही प्रकारचा धोका नाही कारण त्यांना आंबेगाव तालुक्यात मानणारा वर्ग मोठा आहे निधी मंजूर करण्यात वळसे पाटील कायमस्वरूपी अग्रेसर आहे आता ही शिंदे सरकार मधुन ४००कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात ते यशस्वी झाले आहेत त्यामुळे लोक त्यांना साथ देतील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

राजकीय

हे कार्यकर्ते… “खरंच जनहितार्थी कि लाभार्थी”?

Published

on

मंचर दि (प्रतिनिधी)राज्याच्या राजकारणात वळसे पाटलांना स्थान मिळाले नाही म्हणून वळसे पाटलांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी  पक्ष नेतृत्वाकडे कोणतीही दाद मागण्या ऐवजी .आपल्या नेत्यावर अन्याय होऊनही निमूटपणे मूग गिळून गप्प बसणारे हे कार्यकर्ते वर्षानुवर्षे सत्तेचा लाडू चाखत असूनही जेव्हा नेत्यावर अन्याय अन्याय होतो. तरीही गप्प असतील तर ते खरंच  जनहितार्थी लाभार्थी  कि, स्वार्थी ?

 राज्याच्या राजकारणात गेली पस्तीस वर्षे असणारे एकेकाळचे शरद पवार यांचे खंदे समर्थक दिलीप वळसे पाटील यांना यावर्षी मात्र राज्य मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नाही खऱ्या अर्थाने राज्याच्या उत्कर्षांसाठी नियोजनबद्ध काम करणाऱ्या व्यक्तीला महाराष्ट्र मुकाला असे म्हणावायास हरकत नाही कारण वळसे पाटलांनी ज्या खात्याचे काम पाहिले त्या खात्याचा कारभार उत्तम पप्रकारे करून खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील जनतेला न्याय दिला असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. 

या वेळी मात्र महायुतीच्या काळात त्यांना मंत्री मंडळातून डावळण्यात आले यामागे कोणतीही व काहीहि कारणे असतील. परंतु महाराष्ट राज्य  एका चांगल्या व्यक्तीला प्रभावी व्यक्तिमहत्वाला मुकला हेही खरेच. वळसे पाटलांनी त्यांच्या कारकिर्दीत ज्या खात्याचे काम पाहिलं त्या खात्याची प्रगती झाली आहे इतिहास आहे. अशा कर्तृत्वान व्यक्तीला बाजूला ठेवणे हे पक्ष नेतृत्वाचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल.

दरम्यान राज्य मंत्रिमंडळ विस्तारात माजी मंत्री छगन भुजबळ यांचे नाव नाही म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र डोक्यावर घेतला ओ बि सी वर अन्याय झाला. असे सांगत पक्ष नेतृत्वावर आगपाखाड केली व आपण काहीही करू शकतो हे दाखवत पक्ष नेतृत्वाच्या निर्णयाचा निषेध केला व जोडे मारो आंदोलन करून धिक्कार हि अनेक कार्यकर्त्यांनी केला.परंतु आंबेगाव तालुक्यात मात्र वळसे पाठलांच्या कार्यकर्त्यांकडून साधा निषेधही नोंदवीला गेला नाही.

आंबेगाव,जुन्नर, खेड, शिरूर तालुक्यात वळसे पाटलांचे शेकडो कार्यकर्ते आहेत.परंतु वळसे पाटलांची मंत्री पदी वर्णी लागली नाही. यावर कार्यकर्त्याकडून मंत्रिपदच्या मागणीसाठी प्रचंड हल्लाबोल होणं गरजेचं होत. परंतु  यावर बोलण्याचे धारिष्टय कोणत्याही कार्यकर्त्यामध्ये नाही. याचाच अर्थ वळसे पाटलांनी जे कार्यकर्ते जपले त्या कार्यकर्त्यांची भूमिका  फक्त “टी फॉर टॅट” अशीच होती कि काय? असा प्रश्न विचाराला जातं आहे. 

गेली अनेक वर्ष ते वळसेपाटलांच्या सोबत राहून समोर आल्यावर फक्त ” देखल्या देवाला दंडवत” घालत फक्त  सत्तेचा मलिदा चाखणारे लाभार्थी कार्यकर्ते वळसे पाटलांजवळ होते हि सांगण्यासाठी कोण्या जोतिष्याची आवश्यकता नसावी. कारण वळसे पाटलांना डावलले जातं असताना त्यांच्या बाजूने खंबीर भूमिका घेत रस्त्यावर येण्याचे धाडस एकाही कार्यकर्त्यांने दाखविले नाही किंवा या  लाभार्थी  कार्यकर्त्यांना  वळसे पाटलांना मंत्री पदापासुन डावळून त्याच्यावर अन्याय केला जातं आहे.  असेही वाटले नाही. किंवा त्यांची बाजू पक्ष नेर्तृत्वासमोर मांडण्याची हिंम्मतहि कोण्या कार्यकर्त्यांची झाली नाही हि मोठी शोकांतिका आहे.

दरम्यान काल झालेल्या आभार मेळाव्यात एकमेकांची उणी दुनी काढून आपण किती समर्थक हे दाखविण्याची जणू स्पर्धाच सुरु होती. परंतु त्यात साहेबांवर पक्ष नेतृत्वाने अन्याय केला असून त्यावर पक्ष नेतृत्वाला जाब विचारावा असा साधा मुद्दाही कोणी मांडला नाही. खरंतर वळसे पाटलांना याची खंत नक्कीच असेल पण काय करणार? एकही कार्यकर्ता काहीच बोलला नाही यावरून असेच दिसते कि,  साहेबांना मिळालेले बहुतांशी कार्यकर्ते फक्त जनहितार्थी नसून लाभार्थी आहेत का? अशा आशयाची चर्चा सर्वत्र सुरु आहे.

Continue Reading

राजकीय

माजी खासदार शिवाजीराव आढळराव ठरताहेत? “किंगमेकर”

Published

on

मंचर दि. (प्रतिनिधी) लोकसभेतील पराभवाचा वचपा काढत, खासदार अमोल कोल्हे यांचा शिरूरलोकसभा मतदार संघावर आपली एकहाती वर्चस्व निर्माण करण्याच्या संकल्पचा “अश्व” रोखून धरत,माजी खासदार शिवाजीराव आढळराव हे किंग मेकर ठरले असल्याची चर्चा सर्वत्र आहे.

 विधानसभेची रणधुमाळी संपली, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले महायुतीत आनंदी आनंद साजरा होत असताना मात्र विधानसभा काळात शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे यांनी फोडलेल्या गगनभेदी डरकाळ्या पराभवाच्या गर्तेत शांत झाल्या या लोकसभा मतदार संघात विजयाची पताका फडकविणारे शिरूर लोकसभेचे खासदार व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे स्टार प्रचारक अमोल कोल्हे यांचे पश्चिम महाराष्ट्राचा ओ बी सी चा नेता होण्याचे स्वप्न मात्र धुळीलाच मिळाले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

मागील दोन लोकसभा निवडणुकीत माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांना पराजयाची धूळ चारणारे तसेच प्रती संभाजी म्हणून आपली प्रतिमा मालिकांच्या माध्यमातून तयार करून सर्वसामान्य जनतेच्या गळ्यातील ताईत झालेले, खासदार  अमोल कोल्हे यांना यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी विधानसभेच्या रणांगणात मात देली व विधान सभेत आपल्याच  विचाराचे लोकप्रतिनिधी विजयी करून शिरूर लोकसभेवर आपला वरचष्मा असल्याचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी दाखवून दिले असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.

लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर खासदार आढळराव थोडे बॅक फूट वर गेले होते. त्यांचे राजकारण मर्यादीत झाले. अशा अशयाच्या चर्चा देखील सर्वत्र झाल्या.परंतु नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत खासदार शिवाजीराव आढळराव यांनी प्रचंड कष्ट घेत आंबेगाव,शिरूर, भोसरी,जुन्नर व हडपसर येथे आपल्या विचाराचे प्रतिनिधी निवडून आणून खासदार कोल्हे यांना चांगलाच झटका दिला असल्याचे बोलले जाते.

दरम्यान जुन्नर, हडपसर, आंबेगाव भोसरी हे मतदार संघ विधानसभेत विरोधात जाणे म्हणजे कोल्हे यांच्या पुढील राजकीय  वाटचालीच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे. असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यात कोल्हे यांना मतदारांनी लोकसभा मतदार संघात निवडून येताना जेव्हढी मते पडली त्या पेक्षा सुमारे दोन लाख कमी मते विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या वेळी आघाडीच्या उमेदवारांना  मतदान झालेले आहे.

दरम्यान  राज्याचे तात्कालीन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी दिलेली जबाबदारी माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी सार्थ करीत आपल्या विचाराचे उमेदवार निवडून आणले आहेत तर पुढील काळात खासदार कोल्हे यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी केलेल्या विविध घोषणा पूर्ण करणे करणे गरजेचे आहे. त्यात इंद्रायणी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, भोसरी ते खेड रस्ता या दोन गोष्टी उत्तर पुणे जिल्यातील मतदारांच्या दृष्टीने महत्वाच्या घोषणा आहेत. या घोषणा बाबत खासदार कोल्हे यांनी जागरूक राहून हि कामे युद्ध पातळीवर करणे त्यांच्या राजकीय सौख्याचे दृष्टीने गरजेचे आहे. परंतु केंद्रात व राज्यात विरोधी विचार सरणीचे सरकार असताना खासदार कोल्हे हे महत्व कांक्षी प्रकल्प कसे पूर्ण करणार? व  शिरूरच्या जनतेला कसा? न्याय मिळवून देणार हे पहाणे कुतूहलचे ठरणार आहे.

Continue Reading

राजकीय

“राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे फोटो शासकीय कार्यालयात लावावेत”:जेष्ठ नेते अशोक काळे यांची प्रशासनाकडे मागणी 

Published

on

मंचर दि(प्रतिनिधी) सत्य अहिंसा व शांततेचा भारताला नव्हे तर जगाला संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे फोटो व संदेश सर्व शासकीय नियमशासकीय कार्यालयांमध्ये त्वरित लावावे या मागणीचे निवेदन तहसीलदार आंबेगाव यांना काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोक आप्पा काळे पाटील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विजयराव आढारी यांनी दिले आहे.

जगाला शांततेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे फोटो सध्या तालुक्यामध्ये संपूर्ण शासकीय  निमशासकीय  कार्यालयात दिसत नाहीत गेले काही काळापासुन सर्व संस्थांमध्ये जगाला शांततेचा संदेश देणारे राष्ट्रपुरुष महात्मा गांधी यांचे फोटो व संदेश होते परंतु हे फोटो व संदेश काही दिवसापासून काही शासकीय कार्यालयांमधून हटवले गेलेले आहेत किंवा काढले गेलेले निदर्शनास येत आहे असे काळे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

 दरम्यान सर्व शासकीय नियम शासकीय कार्यालयांमध्ये महात्मा गांधीजींचे फोटो व संदेश लावावे जावेत असे आवाहन केले असून या प्रसंगी पाटणचे उपसरपंच कुंडलिक कुंडलिक असवले त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य दगडू मते सुनील शेळके रामदास मते गणेश खानदेशी बाळासाहेब इंदोरे बंटी मोरडे आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

 यासंदर्भातल्या निवेदनाच्या प्रती  राष्ट्रपती द्रोपदी मुर्दौ  राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते व काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे महाराष्ट्राचे राज्यपाल त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनाही पाठवले असून देशपातळीवरती व राज्य पातळीवरती या संदर्भामध्ये तातडीने कार्यवाही करावी व त्या दृष्टीने शासनाकडे पाठपुरावा करावा अशी विनंती ही संबंधित निवेदनामध्ये केलेले आहे.

दरम्यान याबाबत तालुका पातळीवर डिसेंबर अखेर कार्यवाही न झाल्यास राज्यघटनेनुसार परमपूज्य गांधींनी आखून दिलेल्या मार्गानुसार  राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते ज्या शासकीय कार्यालयामध्ये परमपूज्य गांधीजींचा फोटो नसेल त्या ठिकाणी आंदोलन करण्याचा मानस व्यक्त केलेला आहे या संदर्भात पो स्टेशन घोडेगाव ग्रामीणरुग्णालया घोडेगाव रजिस्टर आँफीस प्रकल्प कार्यालय यांना निवेदन देण्यात आले आहे.

Continue Reading
Advertisement

Trending