Connect with us

सामाजिक

भारतीय डेअरी उद्योगाला प्रगतीची  “गरुड भरारी” देणारा श्वेतक्रांतीचा आणखी एक जनक “देवेंद्र शाह”

Published

on

मंचर दि. (संजय कोकणे यांजकडून) भारतीय श्वेतक्रांतीचे जनक म्हणून “डॉ.वर्गिस कुरियन” यांचे नाव आदराने घेतले जाते. त्याचप्रमाणे “भारतीय  डेअरी उद्योगाला” यशाच्या शिखरांवर नेण्यासाठी अविरत अहोरात्र,अथक, प्रामाणिक, प्रयत्न करणारे “धवल क्रांतिचे” दुसरे जनक म्हणून पराग (गोवर्धन) उद्योग समूहाचे संस्थापक, प्रसिद्ध उद्योगपती “देवेंद्र शाह” यांचे नाव समोर येते.

दरम्यान “देवेंद्र शाह” यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर डेअरी उद्योग क्षेत्रात  “गरुड भरारी” घेत जगाच्या बाजारपेठेत भारतीय डेअरी उद्योगाला नवी दिशा देत एक सन्मान जनक स्थान मिळवून दिले, व त्यातून भारतीय शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक  उत्कर्षांचे दिवस आणले.जीवनात एखाद्या ध्येयाने प्रेरित  होऊन अहोरात्र काम करीत, प्रयत्नाची पराकष्ठा करणारे थोडेच असतात. जीवनाचे ध्येय मिळविण्यासाठी  माणसाकडे  जबरदस्त  इच्छा शक्ती असावी लागते.  कारण माणूस स्वतः स्वतःच नशीब घडवितो असे  म्हणतात.  आपण  समाज्याचे देणे  लागतो या भूमिकेतून व एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित झालेल्या शाह यांनी  अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत येणाऱ्या आव्हानांना न जु्मानता अहोरात्र संघर्ष करून भारतीय डेअरी उद्योगात आपलें  अनन्य साधारण स्थान निर्माण केले.म्हणूनच आज  डेअरी उद्योग क्षेत्राच्या क्षितिजावर देवेंद्र शाह यांचे नाव सुवर्णाक्षरात नाव कोरले आहे.

 साधारणतः १९९२ या कालखंडात “देवेंद्र शाह” यांनी पराग डेअरी या उद्योगाची स्थापना करून, प्रचंड अडचणीत असलेला दूध व्यवसाय स्वीकारला व  या व्यवसायाच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना एक सक्षम आयुष्य जगण्याचा मार्ग शाह यांनी दाखविला. कारण याच कालावधीमध्ये  महाराष्ट्रात मध्ये दुधाला खाडा पद्धती सुरु होती. त्या खडा पद्धतीमध्ये दूध संघाने न स्वीकारलेले दूध शेतकऱ्यांना रस्त्यावर फेकून द्यावे लागतं होते अशा काळात संघाने न स्वीकारलेले दूध विकत घेऊन जबरदस्त इच्छाशक्ती, आवश्यक लवचिकता तसेच एखादे ध्येय  साध्य  करण्यासाठी लागणारा  धीर, सहनशिलता, अशा अनेक गुणांच्या जोरावर या उद्योगपतिने डेअरी व्यवसायात यशाचे शिखर गाठले त्यामुळे पराग समूह आशिया खंडातील नावाजलेला उद्योग झाला आज या उद्योगाची   वार्षिक उलाधाल सुमारे दहा हजार कोटिंच्या दिशेने झेप घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. 

आज भारतात नव्हे तर जगाच्या बाजार पेठेमध्ये अनेक देशामध्ये गोवर्धन, प्राईड ऑफ काऊ, गो चीझ, अवतार, अशा विविध नावाने तूप,बटर,दूध,दही,लस्सी,ताक, पनीर,प्रोटीन पावडर,चीझ, पेढे, काजू कतली  आदी  दुग्धजण्य उत्पादने उपलब्ध असून बाजारात या उत्पादनांना  ग्राहकांमध्ये प्रचंड मागणी आहे.त्याच प्रमाणे ग्राहकांना स्वच्छ निर्भेळ ताजे दूध मिळावे व शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवे  यासाठी “भाग्यलक्ष्मी डेअरी फार्म” या नावाने सुमारे साडे तीन हजार गाईंचा गोठा निर्माण केला आहे. व त्याद्वारे “प्राईड ऑफ काऊ” नावाने दुध व दुग्ध जन्य पदार्थाचा पुरवठा सुरु असून, अल्पवाधितच हे पदार्थ जगाच्या बाजारपेठेत लोकप्रिय झाले आहेत.

डेअरी क्षेत्रात आपण प्रगती करत असताना, ग्रामीण भागातील ज्या मायबाप शेतकऱ्यांनी “गोवर्धन कंपनीच्या” उत्कर्षांसाठी अविरत साथ दिली. या सर्व शेतकऱ्यांचे आपण काहीतरी देणे लागतो. या सामाजिक जाणीवेतून व निरपेक्ष भावानेतून, या शेतकऱ्यांचे  आर्थिक उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने  गायीच्या दुधाच्या उत्पादनात वाढ़ होणे आवश्यक होते. म्हणून “भाग्यलक्ष्मी डेअरी फार्म” येथे गाय दूध वाढीसाठी संशोधन करून, दूध उत्पादन वाढविले कारण गाय जेवढे दूध देते. तेव्हडाच खर्च तिच्या पालन पोषणावर होतो. यातून शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सुधारू शकत नाही. म्हणून “शाह” यांनी पंजाब, हरियाना भागातील गायी विकत आणल्या व त्यांच्या दुधाच्या  उत्पादनात वाढ़ करण्यासाठी संशोधन केले. व यात त्यांना यशहि मिळाले . एकेकाळी भारतात गायीच्या दूधाचे उत्पादन प्रती दिवसाला चार लिटर होते. तेच आता संपूर्ण भारताचा विचार करता प्रतिदिन आठ लिटर आहे. तर महाराष्ट्रापूरती दूध उत्पादन सरांसरी प्रती गायी दूध उत्पादन क्षमता बारा लिटर एव्हढी झाली आहे.

दरम्यान दूध उत्पादना पासून तर दुग्धजन्य पदार्थाच्या निर्मिती पर्यंत तसेच त्या दुग्धजन्य पदार्थाना जागतिक बाजार पेठ निर्माण करण्यापर्यंत “देवेंद्र शाह” यांनी डेअरी उद्योगात प्रचंड उत्क्रांती घडवून आणली. भारतीय डेअरी उद्योगामध्ये गरुडपंखाची ताकत यांनी आपल्या कार्य शैलीतून निर्माण केली. व संपूर्ण जग भारतीय डेअरी उद्योगाच्या आवाख्यात आणले म्हणूनच “देवेंद्र शाह” हे “डॉ कुरियन” नंतर दुसरे श्वेत क्रांतिचे जनक ठरले आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुढील कारकिर्दीस लक्ष लक्ष मंगलमय हार्दिक शुभेच्छा…..

Continue Reading
3 Comments

3 Comments

  1. अशोक मोढवे

    September 21, 2024 at 5:27 am

    आंबेगाव तालुक्याचे नाव देशाचे शिखरावर नेणाऱ्या उद्योजकाला कोटी कोटी शुभेच्छा तुम जियो हजारो साल के दिन हो पचास हजार

  2. मा.संतोषभाऊ बोऱ्हाडे

    September 22, 2024 at 4:32 pm

    आंबेगाव तालुक्याचे नाव आणि जगाच्या शिखरावरती नेणारे देवेंद्र शेठ शहा या आंबेगाव तालुक्याचे सुपुत्र आहेत . हे आंबेगाव तालुक्याचे भाग्य आहे असं म्हणायला काहीही हरकत नाही .

Leave a Reply

Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सामाजिक

“महिला बांधकाम कामगारांसाठी” शासनाकडून मिळणाऱ्या मदतीवर डल्ला मारणारे काथाकथित एजंट व पुढारी  म्हणजे “शिव” जन्मभूमीतील सध्याचे रांझ्याचे पाटील का?

Published

on

मंचर दि. (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या काळात एका महिलेवर अत्याचार करणाऱ्या पाटलाचे छत्रपतींनी हात पाय छाटले होते. परंतू त्याच छत्रपतींचे नाव घेऊन छत्रपती शिवरायांची जन्म भूमी असलेल्या जुन्नर तालुक्यात बांधकाम कामगार महिलांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या मदतीतून काही एजंटांनी व कथित गावपुढाऱ्यांनी हात ओले करण्याचा सपाटा लावला असताना या होणाऱ्या गैरव्यवहारावर प्रकाश झोत टाकणाऱ्या पत्रकारावर जीवघेणा हल्ला केला जातो व त्याच एजंटांची बाजू घेण्यासाठी काही कथित गाव पुढारी पत्रकारावर बेछुट खोटे आरोप करण्याचा प्रयत्न करतात हि खरी शरमेची गोस्ट बाब आहे 

दरम्यान सर्वसामान्य बांधकाम कामगारांचा आर्थिक स्थर उंचावण्यासाठी शासनाने बांधकाम कामगार योजना आणली या योजनेचा खरा अर्थ असा कि, रोजंदारीवर काम करणारे बांधकाम कामगार मजूर वर्गातील  कुटुंबाना आर्थिक सहाय्य मिळावे व यातून त्यांची मुले शिकुन सक्षम व्हावीत  या दृष्टीकोनातून शासनाने बांधकाम कामगानांच्या उत्कर्षासाठी आणलेल्या या योजनेचा काही एजंटांनी कथाकथित राजकीय पुढऱ्यांच्या आशीर्वादाने गोरस धंदा बनविल्याचा प्रकार समोर येत आहे.

सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यामध्ये सुरु असलेली बांधकाम कामगार योजनेमध्ये कामगारांना मिळणाऱ्या मदतीतून चांगली मोठी रक्कम कथाकथित एजंट लोकांना दयावी लागते व यात अनेक कथाकथित स्थानिक पुढाऱ्यांचा सहभाग असल्याचे बोलले जाते.व  हे कथाकथित गाव पुढारी समाजसेवेचा खोटा आवडत आणत गरिबांच्या टाळूवरील लोणी खात असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

     दरम्यान नुकत्याच एका इलेक्ट्रानिक वाहिनेने सुरु असलेल्या बांधकाम कामगार योजनेतील या गैरव्यवहाराचा भांडाफोड केला. या नंतर त्या पत्रकारावर काही एजंट लोक यांनी हल्ला  केला व काही कथित गाव पुढऱ्यांच्या मदतीने बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. व हि घटना छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्म स्थान असलेल्या जुन्नर तालुक्यात घडली.यामध्ये या राजकीय नेत्यांनी महिलांना त्रास दिल्याचा आरोप केला खरे तर हे गाव पुढारी ज्या नेत्याचे कार्यकर्ते आहेत त्याच नेत्याची एक क्लिप काही महिन्यापूर्वी प्रसारीत झाली होती.यामुळे जसा नेता तसा कार्यकर्ता अशी चर्चा नागरिक दाबक्या आवाजात करीत आहेत.

दरम्यान या कथाकथित पुढऱ्याच्या या लाजिरवान्या कृत्याचा सर्वच स्थरावरून निषेध केला जात असून . या प्रकरणाची उच्च स्तरीय कसून चौकशी करावी. सुरु असलेल्या या योजनेत खरंच किती बांधकाम कामगार आहेत का?  या सर्व बाबींची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे

Continue Reading

सामाजिक

ऊस उत्पादनाच्या वाढीसाठी “भीमाशंकर सह. साखर कारखान्याचे” ऊस लागवड धोरण जाहीर -अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांची माहिती

Published

on

मंचर दि. (प्रतिनिधी) भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे लागवड हंगाम २०२५-२६ साठी ऊस लागवडीचे धोरण जाहिर झाले असून त्याची अंमलबजावणी दि. १ जून २०२५ पासून करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.

 “उत्पादकता वाढ़ लक्ष योजना”

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीचे दृष्ठिने कारखान्यामार्फत “दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील ऊस उत्पादकता वाढ लक्ष २०२०” ही महत्वाकांक्षी ऊस विकास योजना राबविणेत येत आहे अशी माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष अँड.प्रदीप वळसे यांनी सांगितले

     भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माध्यमातून सुरु करण्यात येत असलेल्या या ऊस लागवड जाहीर धोरणबाबात   अधिक माहिती देताना बेंडे यांनी सांगितले की,  दि. १ जून २०२५ ते ३० ऑक्टोबर २०२५  पर्यंतच्या कालावधीमध्ये को.एम.०२६५ तर दि. १ जून २०२५ ते ३० एप्रिल २०२६ पर्यंतच्या कालावधीमध्ये   को.८६०३२ ऊस लागवडीस व नोंदीस परवानगी देण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे  दि. १ ऑगस्ट २०२५ ते ३० एप्रिल २०२६ अखेर पर्यंतच्या कालावधीमध्ये व्हीएसआय ०८००५ या ऊस लागवडीस परवानगी देण्यात आली आहे. दि. १ सप्टेंबर २०२५ ते ३० एप्रिल २०२६ अखेर पर्यंतच्या कालावधीमध्ये एम.एस. १०००१, को. ९०५७,  या ऊस लागवडीस परवानगी देण्यात आली आहे. को.व्हीएसआय १८१२१, फुले ऊस १५०१२, फुले ऊस १५००६, फुले ऊस १३००७, को.एम. ११०८२ इ. शिफारशीत ऊस लागवडीस दि. १ जून २०२५ ते दि. ३० एप्रिल २०२६ पर्यंत परवानगी देण्यात आली आहे.

              कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद व ऊस उत्पादक यांना मागणीप्रमाणे उपलब्धतेनुसार लागवड धोरणाप्रमाणे दि. १ जून २०२५ पासून बेणे वाटप करण्यात येणार आहे व खासगी ऊस लागवडीच्या नोंदी घेण्यात येणार आहेत. त्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस लागवड करावयाच्या क्षेत्राचा ७/१२ उतारा व आवश्यक कागदपत्रे पूर्तता संबधित विभागीय शेतकी कार्यालयात जाऊन करावी. खासगी ऊस लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी चार दिवसाचे आत संबंधित गट ऑफिसमध्ये जाऊन ऊस नोंद करावयाची आहे. 

दरम्यान उशीरा ऊस लागवड नोंद करणेस आलेल्या ऊस उत्पादकांची ऊस नोंदीसाठी आलेची तारीख हीच ऊस लागवड तारीख म्हणून नोंद करण्यात येईल. कारखान्यामार्फत कार्यक्षेत्र व परिसरामध्ये धोरणानुसार उधारीने / रोखीने राबविणेत येणाऱ्या ऊस विकास योजने अंतर्गत माती परीक्षण सुविधा, ताग बियाणे वाटप, ऊस बेणे वाटप,  रासायनिक खते पुरवठा, द्रवरुप जीवाणू खते, ऊस रोपे वाटप, खासगी ऊस लागवड अर्थसहाय्य, प्रेसमड, खोडवा व्यवस्थापनामध्ये पाचट कुट्टी सुविधा, ठिबक सिंचन योजना, व्हीएसआय उत्पादित मल्टीमायक्रोन्युट्रीएंट, मल्टीमॅक्रोन्युट्रीएंट, ह्युमक ॲसिड, वसंत उर्जा, जैविक कीटकनाशके बी.व्ही.एम., इ.पी.एन. इ. निविष्ठांचा पुरवठा, हंगामवार ऊस पीक स्पर्धा इ. ऊस विकास योजनांचा लाभ सर्व ऊस उत्पादकांनी घ्यावा.  ऊस पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेणेस इच्छुक  शेतकऱ्यांनी  प्रवेश शुल्क रक्कम रु.१००/-  डिसेंबर २०२५ अखेर भरणा करून स्पर्धेसाठी नाव नोंदणी करावी.

              त्याचप्रमाणे एकात्मिक कीड व्यवस्थापन योजनेमध्ये ऊस पिकामध्ये हुमणी कीडीचे नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी गोळा केलेले हुमणी कीडीचे भुंगेरे कारखान्यामार्फत प्रति किलो रु.३००/- प्रमाणे जून २०२५ अखेर खरेदी केले जाणार असून सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी हुमणीचे भुंगेरे गोळा करुन एकात्मिक हुमणी कीड नियंत्रण करावे. तरी वरील लागवड धोरणानुसार जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उसाची लागवड करावी व कारखाना ऊस विकास योजनांचा लाभ घ्यावा. ऊस विकास योजनेच्या अधिक माहितीसाठी विभागीय शेतकी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन  बेंडे यांनी केले आहे.

Continue Reading

सामाजिक

अवकाळी पावसाच्या नुकसानीचे आंबेगावमध्ये “तलाठी करणार पंचनामे” –  नायब तहसीलदार वाघ

Published

on

मंचर दि.29 (सदानंद शेवाळे): अवकाळी ऐन उन्हाळ्यात आलेल्या पावसामुळे आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम व पूर्व भागात मुसळधार पावसामुळे आंबा जांभूळ केळी मका बाजरी भुईमूग व पालेभाज्या वर्गीय पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे प्रत्येक गावातील गाव कामगार तलाठी आपापल्या सजातील नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करतील अशी माहिती आंबेगाव  तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार सचिन वाघ यांनी बोभाटा शी बोलताना दिली.

   मागील पंधरा दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे अनेक ठिकाणी बांध फुटले आहेत रस्ते वाहून गेले आहेत तर वीज पडल्याने कांदा बराखी  जळून गेली आहे पालेभाज्या वर्गीय पिके कोबी फ्लावर कोथिंबीर मेथी शापू सह अनेक पालेभाज्या पाण्यात पोहत आहेत.

 

संप काळातही “कृषी सहाय्यक” करणार पंचनामे 

 कामगार तलाठी आपापल्या सजा मध्ये पंचनामे करणार आहेत त्यांना सहाय्य करण्यासाठी सहाय्यक कृषी अधिकारी संपावर असतानाही आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत मदत करणार असल्याची माहिती घोडेगाव कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान आंबेगाव तालुक्यात  पूर्व भागात पाणी उपलब्ध असल्याने तालुक्यातील सुमारे 3 हजार 750 एकर क्षेत्रावर उन्हाळी बाजरी पिकाची पेरणी करण्यात आली होती  परंतू अवकाळी पावसाने  उन्हाळ्यात हमखास उत्पन्न देणारे बाजरीचे पीक भुईसपाट झाले आहे बाजरीच्या कणसांना चौरे ( कोंब ) फुटले आहेत तर जनावरांचा वाळलेल्या चारा वैरण पाण्यात भिजत आहे या वैरणीवर कुज व बुरशी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे   दुभत्या व भाकड जनावरांना हिवाळ्यात व उन्हाळ्यात  वाळलेल्या चाऱ्याची मोठी टंचाई यंदा भासणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.त्याचप्रमाणे  सुमारे दोन हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे अतोनात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे अशी माहिती तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

Continue Reading
Advertisement

Trending