घोडेगाव दि. (प्रतिनिधी):-गणेशोत्सव व ईद ए मिलाद येत असल्याने या काळात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये,यासाठी घोडेगावयेथील पोलिसांनी संपूर्ण शहरातून रूट मार्च काढला.
सध्या सणासूदीचे दिवस सुरु असून सर्वत्र आनंदाला उधान आले आहे. या काळात मुस्लिम धार्मियांचा पवित्र सण ईद तर हिंदू धर्मातील सर्व गणांची देवता श्री गणेश देवता यांचा गणेशोत्सव हे दोन्ही सण एकत्रित आले आहेत त्यामळे आंबेगाव तालुक्याची शासकीय राजधानी व पश्चिम पाट्यातील महत्वाची बाजारपेठ असलेल्या घोडेगाव शहरातून सणासुदीच्या काळात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी रूट मार्चसंपूर्ण शहरातून काढण्यात आला.
दरम्यान तालुक्याचे पश्चिम भागात शेकडो सार्वजनिक,तर घरोघरी श्री गणेश स्थापना होते काही घरात दीड दिवस, काही ठिकाणी सात दिवस, ते दहा दिवसांपर्यंत देखील श्रीच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा केली जाते.त्यामुळे येणाऱ्या सणात कोणीही कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी नागरिकांनी घ्यावी. याकरिता घोडेगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर पवार यांच्या आदेशाने घोडेगाव शहरातील मार्गावर रूटमार्च काढण्यात आला होता.
दरम्यान या रूट मार्च मध्ये शस्त्रधारी पोलिस अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.पोलिस वाहनांचाही यामध्ये समावेश होता.सणासुदीच्या काळात कायदा सुव्यवस्था सुरळीत रहावी. व सर्वसामान्य दृष्टीने नागरिकांमध्ये असणारे भीतीचे वातावरण दूर व्हावे, यासाठी या रूट मार्च चे आयोजन केले जाते.यावेळी प्रत्येक चौकात थांबून ईद ए मिलाद व गणेशोत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन पोलिसांचे वतीने करण्यात आले.
भीमाशंकर : – काळवाडी (जांभोरी) येथे दरम्यान गोठ्यास अचानक आग लागल्याने गोठा जळुन भस्मसात झाला.तर गोठ्यात असलेल्या तीन बैला पैकी एक बैल होरपळून गोठ्यातच गतप्राण झाला व दोन जखमी जण जखमी झाले आहेत.
आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी पश्चिम भागातील भीमाशंकर खोऱ्यात असलेल्या जांभोरी येथील काळवाडी वस्तीवर दुर्दैवी हि घटना घडली आदिवासी भागात बहुतांश गोठे घराला लागुनच असतात परंतू सदर गोठा राहत्या घरापासून दूर पडाळीवर होता यामुळे मोठी दुर्घटना टळली. भर दुपारी चा वाजताच्या दरम्यान अचानक पणे आग लागून हि घटना घडली. आग लागल्यानंतर जवळ असलेल्या ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु आगीने रौद्र रूप धरण केल्यामुळे संपूर्ण गोठा आगीच्या भक्षस्थानी पडला यात तीन पैकी दोन बैलांना वाचविण्यात यश आले असून एका बैलाचा होरपळून मृत्यू झाला.यात बबन भोरु भोकटे या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान पोलीस कॉन्स्टेबल सावंत , लगड , तलाठी विशाल घारे , कोतवाल लक्ष्मीबाई मोरमारे, पशुवैद्यकीय आधिकारी विजय कोंढवळे,डाॅक्टर सचीन भोईर, पोलीस पाटील नवनाथ केंगले, जांभोरी गावच्या लोकनियुक्त सरपंच सुनंदाताई पारधी यांचे समवेत प्रशासनाकडून जागेवर जाऊन पंचनामा करण्यात आला आहे. शेतकऱ्यास लवकर मदत मिळावी असी ग्रामस्थांकडून मागणी करण्यात आली आहे.
घोडेगाव. (प्रतिनिधी) जुन्नर नगर वाचनालय व स्वराज्य मित्र मंडळ, यांचे संयुक्त विद्यमाने . झालेल्या राज्यस्तरीय भव्य मराठी वक्तृत्व स्पर्धेत घोडेगाव ता. आंबेगाव येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळविले
दरम्यान जुन्नर (ता जुन्नर )येथे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत पार पडलेल्या राज्यस्थारीय मराठी वक्तृत्व स्पर्धेत घोडेगाव येथील आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचलित, न्यू इंग्लिश मीडियम स्कूल,च्या एकूण २७ विद्यार्थ्यांनी विविध वयोगटातून सहभाग घेतला यामध्ये खालील विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये उत्कृष्ट सादरीकरण करून यश संपादन केले आहे.बक्षीस पात्र विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे: -इ. १ली ते २री गट: -कु. अभिनव तानाजी बोऱ्हाडे (प्रथम क्रमांक) कु. क्रिशा निखिल आर्वीकर (तृतीय क्रमांक) तसेच इ.३री ते ४थी गट:-कुमारी आर्या स्वप्नील वाळुंज (प्रथम क्रमांक),कु. अनुजा हर्षद राऊत(उत्तेजनार्थ),इयत्ता ८वी ते१०वी गट:-कु.ऋतिका रवींद्र जैद (प्रथम क्रमांक),कु.अनुष्का वसंत लांघी (तृतीय क्रमांक),कु. स्नेहल दत्तात्रय डुकरे (उत्तेजनार्थ) या स्पर्धेत सर्वात जास्त एकूण सात बक्षिसे विद्यालयाने विद्यालयाने पटकावली.
दरम्यान सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मराठी विषय शिक्षिका सौ .वंदना वायकर सौ. सुषमा फलके ,सौ सुनीता वाजे, सौ प्रज्ञा घोडेकर, सौ. जागृती महाजन यांनी मार्गदर्शन केले.तसेच संस्थेचे अध्यक्ष तुकाराम काळे ,उपाध्यक्ष अंड. संजय आर्वीकर, कार्याध्यक्ष सुरेश शेठ काळे, संस्थेचे सचिव विश्वासराव काळे, जॉईंट सेक्रेटरी प्रशांत काळे, समन्वय समिती चेअरमन राजेश काळे, खजिनदार सोमनाथ काळे, वस्तीगृह कमिटी चेअरमन सूर्यकांत गांधी, विद्यालयाचे चेअरमन बाळासाहेब काळे, संस्थेचे संचालक अजित काळे व अक्षय काळे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे तसेच पालकांचे हार्दिक अभिनंदन केले.
दरम्यान आपले विद्यार्थी शालाबाह्य राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी करून संस्थेच्या नाव लौकिकात भर घालत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो असे गौरवोद्गार सोमनाथ काळे सर यांनी काढले.
मंचर दि. (प्रतिनिधी) पक्षाचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री भीमाशंकर येथे दर्शनाला येणार असताना जिल्हाप्रमुख व माजी सरपंचांच्या नियोजनावर पाणी पाडत जेष्ठ पदाधिकार्याने केलेल्या कुरघुडीमुळे आंबेगाव तालुक्यात शिंदेच्या शिवसेनेलाही गट बाजीचे ग्रहण लागल्याची चर्चाच तालुक्यात सर्वत्र सुरु जगली आहे.
“सत्तेचे सगळेच चहाते असतात. “शिंदेची शिवसेना,सत्तेत असल्यापासुन त्यापक्षाकडे सध्या भरती सुरु आहे. पण यामुळे पक्ष बळकट होण्या ऐवजी सर्वत्र गट बाजीला उधान आले असल्याचे बोलले जात असून, त्याचा प्रत्यक्ष प्रत्यय पुणे जिल्यातील आंबेगाव तालुक्यात दिसून आल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे.”
“म्हणतात णा कानामागून मागून आली आणि तिखट झाली” या म्हणी प्रमाणे आगोदर पक्षात असलेल्या आपल्या सहकार्याना व जेष्ठ पदाधिकाऱ्यांना नव्याने पक्षात आलेल्या कार्यकर्त्यांची खोड मोडण्यात मजा येते असेच म्हणावे लागेत म्हणूनच विश्वासात न घेताचे कारण पुढे करत क्काही जेष्ठ पदाधीकाऱ्यांनी नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख व उबाटा पक्षातून शिंदे च्या पक्षात आलेल्या माजी सरपंचांची खोड मोडण्यासाठीच केला उतात्याप मात्र यशस्वी झाला असेच म्हणावे लागेल
घडले असे कि,मंचर शहराचे माजी सरपंच आणी शिंदे सेनेचे नवनिर्वाचित जिल्हा प्रमुख यांनी राज्याचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आपल्या एकनिष्ठतेची छाप पाडून आपले वर्चस्व वाढविण्याचा घाट घातल्याची कुणकुण काही जेष्ठ नेत्यांना लागल्या नंतर तालुक्यात राजकीय कुरघुडी ला सुरवात झाली. नवनिर्वाचित जिल्हा प्रमुख व माजी सरपंच यांनी घोडेगाव येथे मोठी बॅनरबाजी करीत सत्काराचे आयोजनही केले. पण ज्या ठिकाणी उपमुख्यमंत्री यांचे वाहन सत्कारासाठी थांबणार होते. त्याचे अगोदरच्या स्थळी उप मुख्यमंत्र्यांचा ताफा थांबावून काही जेष्ठ पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्र्यांचा सत्कार केला व सत्कार झाला असे सांगत उपमुख्यमंत्र्यांचा ताफा काढून दिला.
दरम्यान पुढे सत्कारच्या नियोजित स्थळी उपमुख्यमंत्री यांचा ताफा आल्यानंतर जमलेल्या शिव सैनिकांनी जयजयकारच्या घोषणा दिल्या त्याच सोबत ढोल ताशांचा आवाज झाला. जेसीबी ने फुलांची पुष्पावृष्टी हि करण्यात आली पण सत्कार अगोदरच झाला आहे असे समजत उपमुख्यमंत्री साहेबांनी याकडे दुर्लक्ष केले व गाडीच्या काचा हि खाली ना करता गाड्याचा ताफा तसाच पुढे सरकत श्री क्षेत्र भीमाशंकर शिवज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी रवाना झाला याठिकाणी जमलेल्या शिवसैनिकांची, कार्यकर्त्यांची यामुळे घोर निराशा झाली व नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख व नव्यानेच शिंदेच्या शिवसेनेत सामील झालेले मंचरच्या त्या नेत्याचा उपमुख्यमंत्री साहेबांचा सत्कार करण्याच्या त्या सर्व नियोजनावर पाणी पडले.
दरम्यान यातूनचा आंबेगाव तालुक्यात सध्या वर्चस्वची लढाई शिंदे गटात सुरु झाली असल्याची चर्चा सुरु झाली आहे. अशीच एकमेकांत सुरु असलेली कुरघुडी शिवसेना शिंदे गटास मात्र येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकामध्ये महागात पडू शकते अशी शक्यता सर्वत्र वर्तविली जात आहे यातून शिंदेच्या शिवसेनेतही गटा तटाचे राजकारण मोठ्या प्रमाणावर सुरु असलेले दिसून येत आहे.